Friday, 22 June 2018

मनाला परत वाटलं प्रेम आपलं बहरत गेलं...!

शिर्षक :- वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं..!

लेखक :- एन.के. पत्रकार

दि. :- २१/०६/२०१८

सकाळच्या कोवळ्या उन्हात तुला भेटायचं म्हणून उठलो,
आवरलं अंघोळ केलं आरशा समोर एक तास घालवलो,
मनाला तुझ्या त्या नजरेची चाहूल लागलेली हृदय हसत हसत थोडं डोललं,
म्हणजेच वाटलं आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ....१

नटखट गोजिरी ती हसरी नजर भिडली नजरेला,
न वाटलं मनमोकळी दाद मिळाली या हसण्याला,
वाटलं जवळ बसून हितगुज आयुष्याचे सांगावे तुजला,
पण ओंजळ दूर आहे म्हणून मन मलाच खायला उटलं,
म्हणजेच वाटलं फक्त आठवणी ताज्या झाल्या न प्रेम आपलं बहरत गेलं...! ...२

खुप वाटते आपले कुणीतरी असावे केवळ मी तुझाच आणि तूही फक्त माझीच, असे म्हणावे कुणीतरी रात्रंदिवस जुरतय तुझ्यासाठी येरे परत,
म्हणावे किती स्वप्न पाहावे, किती झुरावे, नसत इतकं भाव कोणी खात,
हळू हळू झोप लागत गेली स्वप्न सुद्धा तुझेच न हळूच कंठ पण रागावून दाटलं,
आणि काय मग परत वाटलं आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...३

तुझे स्पर्श जणू भासे ओल्या पावसाळी सकाळच ते कोवळं ऊन,
प्रेम बहारायला प्रेम पुरेस नसत जोडल्या पाहिजेत मतं आणि मनं,
पण त्या विश्वासात निर्माण होते ते प्रेम ,आपुलकी अन जिव्हाळ्याच बंधन,
खरच असे करून तू माझी तुझ्याविषयीची जबाबदारी का वाढवतेस,
पण मनाला हे पटलं न मन परत म्हटलं ..
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...४

तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते,
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते,
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
अस लिहताना प्रत्येक वेळी वाटलं परत एकदा,
आठवणी ताज्या झालाय न प्रेम आपलं भरत गेलं...!...५

धन्यवाद...!

Sunday, 10 June 2018

जगायचं लोन मिळतं का बघायला हवं...!

शिर्षक - जगायचं लोन मिळत का बघायला हवं...!

लेखक - एन.के. पत्रकार

मोबाईल- ८८०६६०५८५२

आमच्या सर्वांगीण विकासासाठी आजही आपण आपल्या आपल्या परीने जगतो आहोत. सामाजिक भान आणि वैचारिक औचित्य मात्र आता आपल्यापासून कोसो दूर गेलं आहे. सक्षम आणि भक्कम जगणं म्हणजे काय याचा ठाव ठिकाणं लागणं आता आपल्या विचाराच्या आणि मेंदूच्या बाहेरच घटक बनलं आहे. तू,तुम्ही,तुमचं जरासं कमी होऊन आता मी माझं जास्त होत आहे.
वेळ कुणासाठीही थांबत नाही, हे माहिती असून सुद्धा नको असलेल्या गोष्टीत प्राविण्य मिळवणारे न्यूनगंडाचे महाशय आता वाढीस लागले आहेत. मात्र या सगळ्यात आपण जगायचेच मात्र विसरून जातो आहोत.
ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी ना इतरांच्यासाठी अस दिवसा मागून दिवस जातात, वर्षामागून वर्ष..पण काही आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात.काळाबरोबर तुम्ही पुढे निघून जाता तुमच्या प्रियजनांबरोबर..
तुमचं आयुष्य बदलतं, मित्रमंडळी बदलतात, आजूबाजूचं  जगही बदलतं
पण मनात कोरलेल्या त्या काही आठवणी तशाच असतात, तुम्हाला हव्या असल्यातरी किंवा नको असल्या तरीही,  ज्या आनंदाच्या क्षणी दुख देवून जातात आणि दुखाच्या क्षणी आनंद...कधीतरी अचानक त्या आठवणी मनात दाटून येतात अन चेहऱ्यावर एक गोड हास्याची लकीर देवून जातात...आणि कोणी जर त्या हसण्या मागचं कारण विचारलं तर तुम्ही फक्त एवढंच म्हणता "Nothing" म्हणून जगणं खूप सुंदर आहे ओ पण कसं जगायचं याच पुस्तक मात्र बाजारातल्या कुठल्याच कप्प्यात मिळत नाही ही खरी खंत. अनेकदा आम्ही तुम्ही खूप सार पैसे कमावतो माणसे कमावतो पण त्या पुंजीची योग्य विल्हेवाट असो किंवा ताळमेळ जमेनास झाला की मग आयुष्यच सिद्धांत आणि प्रमेय चुकल्या गेल्या इतकंच त्या पाठीमाग तात्पर्य मिळत.
म्हणून आपलं या जन्मात काहीतरी राहातंय पण नक्की काय राहातंय हेच समजायला आज कुणाकडे पुरेसा वेळ सुद्धा नाही आहे. सत्य आहे पण कटू पण तितकंच आहे ना पैसा अडका जमीन जुमला कितीही असलं तरी सुद्धा माणसं कमवलं नसेल तर मयताच्या गर्दीत पण लेखा जोखा होतीच ना ओ... तुमच्यासाठी वाचनातल्या ४ ओळी...-
आज उद्या म्हणता म्हणता
खूप काही करायचं राहून गेलं
आयुष्य निसटलं हातून
मात्र जगायचं राहून गेलं…

फुलासारखी उमळली नाती
आणि तितक्याच लवकर कोमेजू लागली
या देवाण घेवाणचा जगात
नातं जपायचं राहून गेलं
ज्यांनी प्रेम केलं माझावर
त्यांना सोबत करायचं राहून गेलं…!

- धन्यवाद..!