Wednesday, 1 August 2018

गब्बर इज बॅक...!

शिर्षक : बेबस हु मगर बेजुबान नही...जब तक है जान मै नाचुंगी

सध्या जनजीवन जगायचे तर नियमाच्या कक्षेत राहून जगायला हवं इतकं मात्र तय आहे. सामान्यांच जनजीवन पाहता रोजी रोटीसाठी आणि आपल्या भविष्यासाठी चार रुपडं एवढंस अजेंडा सोडलं तर आयुष्यभर पुरेल इतकं तेच स्वप्न बाळगणारा आपला बळीराजा आणि सामान्य मध्यम वर्गातील जनता जनार्धन. रोज उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार घालून दिवसाच्या सुरवातीपासून पलंगावर आडवं होईपर्यंत ईश्वराच्या चरणी माथा ठेवत नमन करत सर्वस्वी अनिश्चित जनजीवन आज सामान्यांच झालं आहे. आणि स्वतःच्या नशिबाच्या भोगाचे चटके यावर विचार करत दिवस रात्र आपली म्हणजे बळीराजा ते मनगटाच्या ताकदीवर आणि शरीराच्या घामावर आयुष्य काढणाऱ्या प्रत्येकाचं संपत असते.
     गेली ४ वर्ष भष्टाचार काय असतो आम्हाला दिसला नाही. बाकी बँकेचे घोटाळे कोणी केले, बालवाडीच्या चक्की पासून ते मेहता बिल्डर प्रकरण म्हणजे काय आम्हाला काही माहिती नाही त्याबाबत आम्ही कानाला खडा लावला आहे. आधार कार्ड लिंक करण्यात काही वर्षे कशी गेली हेच कळेनासं झालं आहे. बळीराजा आणि त्याच्या प्रति असलेली शाब्दिक कमी उच्च पण एक प्रकारची शिवीगाळ आजच्या नेत्याच्या थोबाडवर लगेच न स्पष्ट उमटू लागलेत. जवानाबद्दल बोलताना किंवा त्याच्या प्रति बळीराजावर भाष्य करताना इथं कोणीच थकत नाही. वरुण राजाच्या कृपादृष्टीत कमालीची कपात झाल्यानंतर यांच्या बोलणी खाण्यासाठी हा माझा बळीराजा आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील शिष्टमंडळ आणि राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवलं तर इतिहासाच्या पानात आपलं आयुष्य का कोरल गेलं नाही अशी क्षणिक खंत ही माझ्या बळीराजाला वाटत. पण आताच्या सरकार ना जनता ना-ही  बळीराजा ना-ही बेरोजगार यांच्यावर तत्पर होतंय फक्त विकासाच्या बतावण्या आणि सुंदर भाषणाची माळच आपल्या गळ्यात पडताहेत.
     सविस्तर सांगायचं झालं तर घटनेने नमूद केलेल्या कक्षेनुसार आरक्षणाच्या वाटण्या ह्या झाल्या पाहिजेत. मराठ्यांना , धनगरांना, लिंगायताना आरक्षण देऊ या आशेवर स्वान पथक जागवत असलेलं सरकार आज पुन्हा दूग्ध व्यवसाय ते शेतीहमीभाव या प्रश्नावर रयतेचे हाल केले. आता परत आरक्षणाच्या अश्वासनाला जगवताना जनतेचे रोजी रोटी साठी कामाच्या ठिकाणी जायचं मुस्किल झालं आहे न याला कारण जरी मोर्चा आणि आंदोलन असली तरी ह्या सरकारच्या बे-ताल टाळ मृधुंग मंत्र मुळेच झालं आहे. आता मराठे पेटून उठले आहेत उद्या धनगर मग लिंगायत या सर्वांच्या मागण्या मान्य कधी होणार आणि जनतेचे हाल कधी मार्गी लागणार याकडे बघणं म्हणजे पावसाची वाट बघण्यासारखं आहे. मोर्चेकरी आणि आंदोलन कर्ते सुद्धा चुकीचे नाहीत. कारण हक्क मागताना ते मागे हटणारे नाहीत. यावरून एक शोले मधलं गाणं आठवत गब्बर ने जेव्हा बसंतीला ताब्यात घेतलं तेव्हा एक गाणं जे- "जब तक है जान मैं नाचुंगी, बेबस हू मगर बेजुबान नही..;ये दुवा झुक सकती नही..."  या प्रमाणे जेवढं जीव आहे तो पर्यंत आम्ही हक्कासाठी लढणार आणि जरी आम्ही अधिकाराने बेबस असलो तरी हाकेच्या स्वरूपात आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचणार म्हणजे बेजुबान तरी आम्ही नाही असं तात्पर्य या बांधवाना द्यायचं असेल. म्हणून गब्बर हटाव मोहीम आता दृष्टीस येत आहे. आणि यासाठी जय विरु सारखे आपले बांधव आपल्या हक्कासाठी शांत मधून रोद्र कडे वळत आहे. पाहिलं तर सगळी कडे सत्ता आहे म्हणून ५६ इंच छाती मोठी करण्यापेक्षा यातल्या ५-६% टक्के तरी या मोर्चा आणि आंदोलनाचा विचार व्हायला हवं. आणि जनतेच्या मनावर होणाऱ्या हाल अपेष्टा बंद व्हाव्यात एवढीच इच्छा देवाजवळ करावीशी वाटते.


    लेखक - एन.के.

    दि. ३१ जुलै २०१७

   मोबाईल - ८८०६६०५८५२