शिर्षक : मीडिया आणि समाज : एक विदारक सत्य !
लेखन : पत्रकार एन.के.
[ _सारांश : गेले ७-८ दिवसापासून अनेक विषय डोळ्यासमोर तरळत होते ते म्हणजे कोरोना काळात लिहावं आज वेळ मिळाला व्यक्त होतोय प्रतिक्रिया नक्की असावी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेल किंवा काही डिजिटल मीडियावर पाहायचं झालं तर कोरोनावर कानउघाडणी धडाधड येऊन पडायची अन पडत ही आहेच, या विरोधार्थी म्हंटल विविध विषय होते यात अनेक शेतकरी, कोरोनाच्या काळात घाला घातलेले अनेक धंदे, संसार, अनेक नियोजीत कामे, योजना, असे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक एक ना एक असे विषय जे संकटात होते आणि आहेत यावर कुणाचं किती लक्ष याकडे एक कटाक्ष टाकल तर तळ पायाची आग मस्तकात नक्कीच जाते, शेवटी आज मनातल उतरवत आहे..._ ]
आपण राहतो त्या समाजाच्या एका कोपऱ्यात जर एखादी भयानक गोष्ट घडली की वाऱ्यासारखी पसरणारी साधने म्हंटली की तडक डोळ्यासमोर येतात ती अमुक तमुक न्यूज चॅनेल, देशाच्या, राज्याच्या , जिल्ह्याच्या एवढंच नाही तर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गाव, गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडी आपल्या जवळ क्षणात पोहचवणारी एक वहिनी म्हणजे मीडिया, आज मीडिया आणि डिजिटल वर अनेक कामे मग ती आर्थिक असतील, किंवा संभोधन असेल किंवा मग कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही सौम्य किंवा मोठी कामे आज मिडियामार्फ़त होतात म्हणजेच की मिडियाचे महत्व आज प्रिंट मीडिया पेक्षा जास्त आहे. पण आज मीडियाचा इतका अतिरेक आज पाहायला मिळतो आहे की कोणत्या बातम्या असाव्यात किंवा कोणते संदर्भ घेऊन आपल्या समोर व्यक्त व्हायला हवं त्याच सोयर सुतक आहे का भला मोठा प्रश्न चिन्ह आज सर्वांसमोर उभा राहिला आहे. मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो. झालेला बदल आणि महत्त्वाचे म्हणजे विचारांची वळणधार नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगल्या आणि एक वाईट जाग्यावर नेऊन ठेवतो हे नक्की. 'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.
हा एक भाग झाला आणि आज ऑनलाइन शाळा किंवा अनेक अशा शालेय गोष्टीत अनेकांचा वेळ आणि प्रवास वाचला नक्की आहे पण कधी कधी नाहक गोष्टीवर मीडिया जास्त लक्ष देते या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब उपाशी, अनेक रोजगार ठप्प, अनेक लहान उद्योगांवर उपासमारीची वेळ आली पण त्यावर कधी बातमी गडद होताना दिसत नाही. म्हणून कोणत्या डिजिटल दुनियेवर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. सध्य परिस्थितीत पाहता मोबाईल वर सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग त्यात करमणूक आलं, त्यात वृत्त वाहिनी आल्या तस तसे प्रिंट मीडिया लोप पावत जाते की काय अशी भीती वाटू लागली आहे. गेले अनेक दिवस आपण पाहिलं की सुशांत नामक अभिनेत्याच्या आत्महत्तेनंतर मीडिया ने सदर प्रकरण इतके उचलून धरलं की गरज नसलेली गोष्ट अतिरेक करून सोडलं त्या बदल्यात कधी शेतकरी, कधी बेरोजगारी, कधी सामान्य माणसाच्या प्रश्नांना घेऊन लढाई लढली जात नाही ही खंतच म्हणावी लागेल. अनेक असे प्रश्न आहेत, कुटुंब आणि गाव आणि नगण्य प्रकरणे आहेत पण कधी मीडिया त्याला गंभीरपणे घेत नाही हे एक प्रकारचे दुर्दैवच म्हणावं लागेल.
अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!
धन्यवाद.
मोबाईल : +९१८८०६६०५८५२