Tuesday, 15 September 2020

मगचं लोकांना चुकीचं ठरवा !

 शिर्षक : आपली झोळी तपासा ; मगच लोकांना चुकीचं ठरवा !

लेखन - पत्रकार एन.के. ( संकेत टाइम्स : ८८०६६०५८५२ )

           [ नमस्कार वाचक हो, अनेकदा खुप काही लिखाण करून आपल्या समोर सादर करावे वाटते परंतु वेळे अभावी ; असो आजच्या वरील शीर्षक प्रमाणे आपल्या भोवताल असणार हे सुंदर जग, अनेकांना अनुभवायला येत का नाही माहीत पण म्हणतात की जग सुंदर आहे, आपल्या दैनंदिन कामात आपल्याला सुखाची छाया देणारी माणस, वस्तू, प्राणी हेच चांगले अन्यथा बाकीच्याशी देणं घेणं नाही म्हणून जीवन जगणाऱ्या पण जीवनावर कंटाळा करून नावडती म्हणून जगण्याला हिणावणऱ्या अशा प्रत्येकासाठी लिहतो आहे.. ]


.... ‘‘मी पणाचा गर्व मात्र नाशाकडे आणि ऱ्हासाकडे नेल्याशिवाय राहात नाही.’’ कारण नियती कधीच कुणाला माफ करत नाही. म्हणूनच चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. तुम्ही जे पेराल तेच उगवेल हे वास्तव आहे." ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या पहाडी आवाजातले गाणे बालपणापासून ऐकत आलोय, पण त्याचा मथितार्थ मोठा झाल्यावर समजू लागला. ‘‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर’’ हे का सांगितले आहे ते सदानकदा, पावलोपावली अनुभवास येते. माणसाचे कर्म चांगले असेल, तर निश्चितच त्याचे न मागता फळही चांगले मिळते, असा त्याचा बोध आहे. तुमच्या आचरणातून तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल ते भगवंताला प्रिय असते. स्वामी समर्थानी सांगितले आहे की, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ ज्या ज्या वेळी तुला संकटाशी सामना करावा लागेल. त्या त्या वेळी मी तुझ्या हाकेला धावून येईन, मात्र तू प्रयत्न कर. स्वत:च्या स्वभावातून आचरणातून समाजसेवा घडली पाहिजे. भुकेल्याची भूक आपली वाटून तुम्हाला ज्यावेळी दयेचा पाझर फुटेल तेव्हाच तुम्ही माणूस म्हणून जगण्याचे तुम्हाला समाधान मिळेल. अहंकार, गर्व कशासाठी? शाश्वत तर काहीच नाही, मग गरीब-श्रीमंत या भेदभावात माणसाला माणूस हरवून का बसला आहे.  आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला सत्याच्या वाटेने जाताना तुमचा नि:स्वार्थीपणाच कामाला येईल. चांगले कर्म केले तर कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. दिवसभर किंवा आयुष्यभर भक्तीत डुंबून जायची गरज नाही. घर, प्रपंच सोडून भक्ती करायची गरज नाही. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत जे आपल्याला स्वार्थ म्हणजे काय अशी तात्पर्य देऊन जातात. माणूस जगतो मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या स्वार्थासाठी हे नक्की क्वचित काही जण असतात जी ह्या समाजासाठी किंवा पुढच्या गरजुच्या हातची भूक,तहान, भागवत असतात. पण जसे ही क्वचित असतात ना तसे आपले उपकार पण क्वचित असतात कारण आपली काम व्हावी म्हणून प्रत्येकाला आपण उपकाराच्या सौम्य जाळ्यात घेतो पण त्या मागे खूप मोठा स्वार्थ असतो एवढं सगळं करत असताना नमूद करावे असे वाटते जगासमोर आज कोरोना सारख महा संकट समोर असताना आजही माणूस आपल्या जिवाच्या आकांताने स्वतःसाठी स्वतःच्या उपजीविका किंवा स्वतःच्या चांगुलपणाची लख्तरेची पान वर वर पुसण्यात अव्वल असतो. आपल्या जगण्याच्या एक शैलीत प्रत्येक माणसाची सवय म्हणतो मी तर की एखाद काम असत न त्या क्षेत्रातील त्या माणसाच्या वतीने काम होणार असेल तर त्याला दलाल रुपात बघून गोड प्रवृत्ती बनवून काम करून घेतो अनपेक्षित काम आल्याने पुढचा केला किंवा वेळ नसल्याने विलंब झालं तर तो माणूस चुकीचा किंवा वाईट ठरवणारे आपण जहागीरदार कोण ?     

       आहे का उत्तर नाही ना ? नसणार आहे कारण ही प्रवृत्ती प्रत्येक माणसाच्या अंगात भिनली आहे. खूपदा अस होत आपल्याला कॉल येतात संपर्क होतो खुप दिवसांनी झालेली संपर्क ही काही ना काही स्वार्थ घेऊन आलेली असतात ( काही वगळता ) त्यात तू कसा मी कसा, छान -बरेची मुक्ताफळे टाकून झाली की "माझं एक काम होतं" मग सुरू होते बोअरिंग बीजगणित पाढा ! हे बंद झालं पाहिजे यासाठी माझं मत आहे की आपण कुणाच्या मदतीला किती येतो न तेही निस्वार्थ तेवढंच आपल्याला क्विक वाला फीडबॅक मिळणार  आहे हे कदापी विसरू नका ! आपल्या झोळीत लोकांना द्यायला काय असेल नसेल तरच त्यावरून आपल्या पदरात पडणाऱ्या चांगल्या वाईटची लिस्ट ठरत असते. म्हणून एखाद्या माणसाच्या बद्दल बर वाईट मत प्रकट करत असताना विचार करा. स्वार्थ असुद्या नक्की पण त्याची प्रदर्शन मांडू नका, संयम न नात्याची पारख करा, टेहाळणी करा, नात्याला गालबोट किंवा हर्ट करण्याआधी शंभर वेळा विचार करा आणि मगच एखाद्या बद्दल विचार करा न मग वागा. भिंतीला कान असतात नक्की पण कानाला भिंत जवळ असते नसते पण पुढच्या व्यक्तीच्या मनातली तुमच्या बद्दलची प्रेमळ भिंतीची ती वीट ढासळू नये एवढी काळजी घ्या मात्र नक्की. मागील लेखातील एक संदर्भ घेतो - 


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"

बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें.. जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा..!

   धन्यवाद !