Wednesday, 2 December 2020

कोरोना : एक शिकवण !

 शिर्षक : कोरोना : एक शिकवण..!

[ गेली वर्षभर कोरोनाने थैमान घातलं आणि अक्षरशः प्रत्येकाच्या आयुष्यात नकोसा वाटणारा वर्ष म्हणून हिणवले जाणारे वर्ष म्हंटल तर चालेल. सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. तस ह्या "जगणं" नावाच्या झटापटीत प्रत्येकाची गळचेपी होऊन बाजार भरला आहे पण बाजारात प्रत्येकाला किंमत मिळेना, जगणे अवघड आणि मरणे डाव्या हाताची मळ झाली आहे हे खरं. या संकटातही अहोरात्र झटलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागाच्या तमाम योध्याना लेख समर्पित...करतो तसेच कोरोनाच्या काळात आपल्याला मानवी जीवनात मिळालेल्या शिकवण बद्दल लेख आपल्यासमोर सादर करतोय...]

देशात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाच्या युद्धात आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस, नर्स आपले कर्तव्य बजावत आहे. ‘भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील,’ असं मत इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी यांनी व्यक्त केलं आहे. आजवर लॉकडाऊन म्हणून अनेकांच्या पोटाला चिमटा बसला अनेक उद्योग पासून ते अनेक व्यवसाय रसा-तळाला गेले आहेत. 

आज वर वर्ष भरत आलं तरी कोरोनाच्या भीतीने आणि संसर्गाने जी देश विदेश पातळीवर थैमान घातले आहे ते नक्कीच उभारून किंवा पडलेली खळगी भरून निघायला मात्र नक्की अनेक वर्षे लागतील यात आशंका नको. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. कोरोनाच्या काळात जास्तीत जास्त धावपळ न जीवाचं रान करून जे ह्या मानव जातीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला अर्थात डॉक्टर, नर्स आणि पोलीस प्रशासन हेच दैवत म्हणून उभे ठाकले. आज प्रत्येक गावात , देशात नाही जगात एकच प्रश्न सामान्य पासून ते असामान्य लोकांच्या समोर असलेला प्रश्न म्हणजे " कोरोना ". 

त्याबद्दल - 

समतोल बिघडला निसर्गाचा

मानवा कसा घातला रे घाव,

कोरोनाच्या या महामारीतून

देवा सुटकेचा आम्हा मार्ग दाव,

दाखविली अनेक तुझी रुपे देवा

आलास कोरोना योद्धे बनुनी,

डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी

प्रशासक, शेतकरी अन् गृहिणी,

एखाद्याच्या चुकीमुळे प्रत्येकजण

कोरोनाच्या विळख्यात अडकतो आहे,

या काळातही प्रत्येक कोरोना योद्धा

जिवाचं रान करुन लढतो आहे. 

... वरील संकलित उक्ती मुळे वाटून जात की नक्कीच जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस प्रशासनाने केलेलं योगदान आज नक्कीच चांगल्या आणि जिवाच्या बचावासाठीच ते योगदान नक्कीच नमूद करण्या इतपत श्रेष्ठ म्हणावं लागेल. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला लाखो लोक मृत्यूमुखी पडले काही देशांची अर्थव्यवस्था खिळीखिळी करून टाकणारी प्रचंड मोठी महामारी भारतासारख्या देशालाही सळोकी पळो करून सोडलं आहे. भारताच्या राजकीय आणि केंद्रीय मंत्री महोदय यांच्या सावधानते मूळ आज भारतात त्याचा वेग कमी होत आहे. तसेच काहीशी परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाचे जगणे किंवा राहणीमान सुरळीत सुरू असताना कोरोनाच्या आगमनने सर्व काही बदलून गेले. तसेच त्याच्या ह्या संसर्गमुळे आपल्याला अनेक धडे शिकायला ही मिळालं. जसे की पाण्याचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे. मनुष्याने निसर्गाचं मोठं नुकसान केलंय. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पण आता या सर्वात कोरोनाने काय शिकवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर सोपं आहे; निसर्गाला त्रास दिला की तो तुम्हाला त्रास देतो आणि हीच महत्वाची शिकवण आहे की निसर्गाला गृहीत धरू नये. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही असे म्हणतात आणि ते तंतोतंत खरे आहे आणि म्हणूनच निसर्गाची काळजी घ्या हा सर्वात मोठा धडा कोरोनाच्या या संकटाने आपल्याला शिकवला आहे. 

     नोकरी आणि पोटापाण्यासाठीच्या धावपळीने जीवनशैली अतिशय धकाधकीचे बनलंय आणि त्यामुळे घरच्यांना वेळ देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे देखील दुर्मिळ झाले आहे. खरंतर घरच्या मंडळींना वेळ देणे अतिशय महत्वाचे असते. आई वडिलांचा एकमेकांशी आणि मुलांशी संवाद, घरातील ज्येष्ठ लोकांशी संवाद या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनामुळे लोक व्यथित असले तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आहे आणि याचमुळे घरच्यांना भरपूर वेळ देणे शक्य झाले आहे. काही घरांमध्ये वाद होत आहेत पण अनेक नाती देखील मजबूत होत आहेत. कोरोनाने आपल्या सर्वांनाच नात्यांचे महत्व शिकवले आहे. म्हणून नाती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पासून ते प्रत्यक्ष गाठी भेटी झाल्या पाहिजेत ही आमूलाग्र बदल घडवणारे बाळकडू ह्या कोरोनाने आपल्याला दिल. तसेच आपल्याला म्हणता येईल स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात कचऱ्याचे प्रमाणात अतिशय मोठे आहेत पण त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहेत. स्वच्छता असल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही हे तर सर्वांनाच माहितीये. पण तरीही सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे. कोणताही आजार पसरण्यासाठी अस्वछता अतिशय पोषक आहे. कोरोनाने लोकांना सारखे हात धुण्यास शिकवले. मास्क देखील लोक घालू लागले आहेत. सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने संपूर्ण निसर्ग स्वछ होतोय. कचऱ्याचे प्रमाण कमी झालंय. थोडक्यात काय कोरोनाने सर्वांना स्वच्छतेची शिस्त लावली असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही. हीच सवय आपण यापुढेही अशीच पाळली पाहिजे. विचित्र जीवनशैली, वेळी-अवेळी खाणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या देशातील लोकांच्या तब्येतीचा स्तर खालावला आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ या सगळ्या गोष्टींमुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे सारखे आजार असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले लक्ष्य केले आहे.

            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीरो गप्रतिकारक शक्ती चांगलीच असावी लागते. म्हणजे कोरोनाने सर्वांना तब्येतीचं महत्व शिकवलं. तब्येतीची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे देखील या विषाणूने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मग आयुष्यभर तब्येतीची काळजी घेतल्यास सर्व प्रकारच्या व्याधी आणि रोगांपासून दूर राहण्यास आपण सक्षम होऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारलं आहे. प्रदूषणात मोठी घट झाली असून वन्य जीवन देखील आनंदी असल्याचे अनेक ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय. वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीवप्राणी असो अथवा वन्यप्राणी सर्वच जीवनचक्राचा एक आमूलाग्र आणि अतिशय महत्वाचा भाग आहेत. त्यांची संख्या कमी झाल्यास जीवनाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांच्या कत्तलीमध्ये देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आनंदाने एकमेकांची काळजी घेऊन एकत्र राहावे अशीच शिकवण कोरोना सर्वांना देत आहे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यास त्यावर नक्कीच मात करू शकतो. कोणताही आजार असो तो नेहमीच सगळं हिरावून घेत नाही तर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देऊन देखील जातो. अनेक वेळेस आपल्याला अनेक गोष्टींबद्दल पूर्वकल्पना देतो.अनेक गोष्टी शिकवून देखील जातो.

    ... प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहुयात आणि कोरोनाने आपल्याला जे धडे अथवा शिकवण दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करून ती अमलात आणून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखूयात.


                             © धन्यवाद ( लेखन : पत्रकार एन.के. ) 

                             © मोबाईल : +९१८८०६६०५८५२