शिर्षक : कोरोना : द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह गेम ऑफ लाईफ..!
शब्दांकन / लेखन : पत्रकार एन.के. ८८०६६०५८५२
[ ...प्रत्येकाच्या जीवनात जगणं असलं तरी कष्ट असेल तर जगण्याच्या व्याख्या तूर्तास बदलून जातात आज पर्यंत आपण यावर एकमत होतो आणि आजही आहोत. पण कुणाला माहीत नव्हतं की प्रत्येक मानवी जीवनाला एक स्टॉप करणारा, भयावह तथा एक असा विषाणू जन्य रोग मानवी जनजीवन विस्कळीत करून टाकणारा येईल आणि त्याच नाव कोरोना असेल. प्रत्येक क्षेत्रात काम।करणाऱ्या प्रत्येकाला, मानव म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक जीवसृष्टीला जिवाच्या आकांताने भीती घालणारा काळ म्हणून कोरोनाच्या रूपाने हे गेले दोन-एक वर्ष असतील अस स्वप्नात ही वाटलं नसेल पण आज अनुभवत असलेल्या ह्या क्षणाला भविष्यात जागा नसावी असच प्रत्येकाला वाटत. अर्थात कोरोना काळ म्हणजे ब्लॅक काळ म्हणून कायम ओळखला जाईल इतकं वाईट काळ आज गत वर्षी अन सन २०२० चा होता हे तितकंच सत्य... प्रत्येक माणसाच्या जगण्यातल्या त्या वर्ष बद्दल, जनजीवन आणि आजची परिस्थितीवर लेखन करतोय संदर्भीय लेख -]
प्रिय वाचक हो कोरोना आणि जीवन यावर हे तिसरे लेख असावे माझ्या मते जसं इसवी सन किंवा हिजरी सन असतं तसं बहुतेक येणाऱ्या काळात कोव्हिड सन किंवा कोरोना सन अशाही नोंदी सापडल्या तर आश्चर्य वाटायला नको. मनात आणलं तर 2019 पर्यंत 'कोरोनापूर्व' आणि 2020 पासून 'कोरोनोत्तर' जग अशी स्वतंत्र कालगणना करता येईल. यातला गमतीचा भाग सोडून द्या पण खरंच या एका वर्षात आपलं जगणं अंतर्बाह्य बदललं हे नाकारता येणार नाही. एक पत्रकार म्हणून कोरोना व्हायरसबद्दल बोलत-लिहित आणि व्यक्तीशः कोव्हिडचा अनुभव घेत हे वर्षं कसं सरलं याचा हा लहानसा लेखाजोखा आज करतो आहे. पण आज खरंच ह्या लॉकडाऊन नावाच्या परिस्थिती वर नक्कीच नकोशी भूमिका घेणारे प्रत्येक चेहरा, कष्टकरी, मजूर,पगारदार, प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीवर उठलेला हा कोरोना अर्थात प्रत्येकाच्या नावडीचा विषय आहे हे नक्की. आजच्या ह्या घडीला प्रत्येक माणसाच्या जगण्याचा मतितार्थ अर्थात पैसे अन एक सुंदर बेझिजक जीवनशैली इतकंच आहे मग तो श्रीमंतांच्या यादीत असो वा मग गरिबांच्या यादीत. कारण हा कोरोना काळाचा बदल मात्र नक्कीच सर्व अक्षम्य बदलाचा प्रतीक आहे आणि या भयावह काळानंतर म्हणजेचकोरोनानंतर माणसाच्या आयुष्याची दिशा ही बदलली जाईल आणि ती जशी बदलणार आहे, तसाच भाषाव्यवहारही बदलणार आहे. या बदलाची तयारी ज्या भाषा करतील त्याच भविष्यात टिकणार आहेत. आजची सध्याची परिस्थिती पाहता हे किंवा अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण सांगायचं झालंच तर. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपली ७५ टक्के कर्मचारी घरून कसे काम करतील, या दिशेने कामही सुरू केले. जगभरात हे होत आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी ‘लर्न फ्रॉम होम’ सारख्या घोषणा करत शिक्षणही ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कमी मनुष्यबळ असताना ही कामे न पारंगत असणाऱ्या लोकांनाच इथे किंवा भविष्यात किंमत असेल हे स्पष्ट करणार, शिकवण देणारं चित्रण अर्थात कोरोना काळ. कोरोनासारख्या साथी याआधीही या जगाने पाहिल्या आहेत. पण कोरोनाची साथ वेगळी आणि अधिक विश्वव्यापी ठरली याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे दळणवळणाचा वेग (Speed of Mobility) आणि माहितीच्या प्रसारणाचा वेग (Speed of Information). हे दोन्ही वेग आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वोच पातळीवर आहेत. या दोन्ही वेगात आणखी बदल होणार आहेत. पण आता ते ज्या पातळीवर आहेत. त्यात आयुष्याची भाषा म्हणून काय करायला हवे, या अनुषंगाने सातत्याने विचार आणि कृती व्हायला हवी हे नक्कीच.
कोव्हिडच्या काळात प्रत्येकाचं प्रवासपर्व जवळजवळ खुंटला आहे. जिथे कुटुंबीयांच्या भेटी होत नव्हत्या आणि वर्षभर आपल्याच घरी जाता येणं शक्य नव्हतं तिथे नव्या जागा आणि नव्या लोकांच्या भेटीगाठी होण्याची काय कथा. पण एरव्ही जे स्मार्टफोन्स आणि चॅटिंग अॅप्स पालक आणि मुलांमध्ये वादाचा मुद्दा ठरतात तीच यावेळी मदतीला धावून आली. लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले, अडीअडचणीला मदतीला धावून जाऊ शकले आणि कमी होत चाललेला संवाद व्हर्चु्अली का असेना सुरू ठेवू शकले हे ही नसे थोडके. प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. 2020 ने सुद्धा खूप काही शिकवलं. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागणारं कोंदण म्हणजे माणुसकी. समुद्राप्रमाणेच काळाच्या लाटाही एकापाठोपाठ एक थडकत राहतात. अथांग काळातून आपण आपल्या छोट्याशा होडीतून प्रवास करत असतो. लाटा त्यांचं काम करत राहतात, आपलं काम फक्त वल्हवण्याचं बरोबर ना...? याच बरोबर शासन आणि प्रशासन यांच्या सूचना आणि पावले ही आपल्याला आगंतुक पालयाच्या तर आहेतच म्हणून एक पॉझिटिव्ह ( कोरोना मधला नाही हा ! ) एटीट्युड घेऊन जाऊया ते अस की या कोरोना विषाणूमुळे जनतेला स्वत:हून जनता कर्फ्यू पाळून घरात बसवण्यास भाग पाडत आहे. घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडत आहे. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहेत, एकत्र बसून स्वत:च्या कुटुंबातील भूतकाळातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, सुख-दु:खाच्या, मंगलदायी, गमतीजमती यांची उजळणी करावयास भाग पाडत आहे. ज्यांचे आरोग्य कमकुवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास भाग पाडत आहे. प्रत्येकास नित्यनियमाने दररोज व्यायाम करण्यास भाग पाडत आहे़ बºयाच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणवून देत आहे. गमतीनं का होईना सर्व पुरुष मंडळींना घरात स्त्रियांना मदत करण्यास भाग पाडत आहे. या वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास प्रामुख्याने एका गोष्टीची मात्र आठवण होते, ती म्हणजे आपण विसरत जात असलेली आपली भारतीय महान संस्कृती आणि तिचे महत्त्व. स्वतःची काळजी घ्या, शक्य तितके कोरोना पासून स्वतःचे, कुटुंबाचे रक्षण करा, व सूचना पाळत स्वतःला एक स्वावलंबी विचार प्रेरक बनवा, काळजी घेत, सुरक्षित राहा !
धन्यवाद !