Monday, 30 August 2021

कर्माचं श्रेष्ठत्व...!

 जगण्यातल्या : कर्माचं श्रेष्ठत्व..!




         म्हणतात ना की आपले काम ज्यामुळे आपले पोट भरते, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे गुजराण होते त्याला कायम श्रेष्ठस्थानी मानणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे तथा असावे. अनेक जण आज परिस्थिती मुळे असो अथवा शिक्षण असो यामुळे एक सुनिश्चित कामापासून वंचित असतात पण काहींना ते मिळालेल असत त्यात समाधान मानणे अवघड जात असते. परमेश्वर आहे किंवा नाही हा भाग जरी दुसरा असलं तरी ही आपल्या अंतर्गत कृपेने, श्रद्धेने आपल्याला अर्धी भाकरी नशीब होते त्याला सोनं समजून त्याची प्रामाणिक चव चाखणे अर्थात प्रामाणिक पर्वाचे साक्षीदार होणे. वैध की अवैध आपल्या हातात जितक असत त्याहून अधिक आपल्या येणाऱ्या किंवा वर्तमान काळ ठरवतो की आपण कसे वागले पाहिजे, मनुष्य म्हणून प्रत्येक क्षण परीक्षेचा आहे, आणि त्यात अभ्यास करून उत्तीर्ण होणे म्हणजे त्या क्षेत्रात पारंगत होणे असे मानावे. भाग्य आणि कर्म ह्या आपल्या जगण्यातील महत्वाच्या दोन दुवा असल्या तरीही आपल्या वाटेस आलेल्या त्या फलप्राप्तीला आपले कर्मच जबाबदार असतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणून नमूद करू इच्छितो की आपण आता ह्या क्षणी कोणत्या पदावर, कामावर, कर्तव्यावर आहोत हे जर फळ असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आपले भूतकाळ मधील संघर्षमय कर्मच जबाबदार असतात. आपली बौद्धिक क्षमता अशी विचाराधीन असते की आपल्याला आपल्या विरोधातील लोक, जे आपल्या मनाशी जुळत नाही ते लोक आपल्याला कुठून तरी किंवा कायम टोचत असल्या सारखं सुखी वाटतात. जगात अशी चांगली माणसं ही आहेत जी चांगल्या प्रतिसादाला चांगलं आणि काही जण चांगल्या प्रतिसादाचा वाईट परतावा देणं धन्य मानत असतात. कधी कधी आपण चांगलं काम करतो आणि त्याच फळ वाईट मिळत त्याला आपण अपयश किंवा कायम त्या परताव्याचा मनधारणीला सत्य मानून बसतो अस न करता या उलट आपण एक सुंदर अनुभव म्हणून घेऊन चांगल्या कामाचा पाढा सुरू ठेवणे अर्थात शहाणपण.
     कर्मा इज मोस्ट इंपोरटंट म्हणतात तस कर्मच आपल्या जगण्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा अविभाज्य घटक असतो. अस असताना एक साहजिक प्रश्न पडणं गरजेचं आहे भाग्य महत्वाचं की कर्म ? मग एकच उत्तर सापडत ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वाटेल आलेल्या त्या प्रत्येक कृतीतून आपल्याला मिळालेल यश आणि आपल्या वाट्याला येणं अर्थात आपलं भाग्य...! #सुंदर कर्माचे साक्षीदार व्हा..! #आनंदी राहा....!
    
        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : ३० ऑगस्ट २०२१, वेळ : १०:३०

Sunday, 29 August 2021

वन्स अगेन हेल्प..!

उपकाराची वाच्यता नकोचं..!

        उपकार याचा समानार्थी शब्द अर्थात मदत मग ती मदत उदात्त भावनेने असो किंवा अडचणीच्या काळात असो त्याला समर्पक असे योगदान म्हणजे सर्वश्रेष्ठ सहयोग म्हणू आपण.  ‘उपकार फेडायचे नाहीत’ या वाक्याला दोन सावल्या आहेत. त्यातली पहिली सावली म्हणजे ‘काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात’ ही आणि दुसरी सावली म्हणजे ‘कोणतेच उपकार विसरायचे नसतात’ ही ! उपकार करत असताना माणूस कोण किंवा त्या अर्थी प्रतिसाद किंवा बहुदा प्रशंसा मिळावी यासाठी संकुचित भावना बाळगून असणारे आज भूतलावर मुबलक भेटतील. बऱ्याच वेळी आपलं अस महत्वाचं काहीसं असत आणि त्या अवेळी पण त्या परिस्थितीत उभं राहून केलेल्या व्यक्तिगत मदतीला अर्थातच उपकाराला एक किनार नसते किंवा त्याची परत फेड होणे अशक्य. त्याला कारण ही असंच आहे की काही उपकारच असे असतात, की त्यांची परतफेड होवू शकत नाही. असे उपकार फेडून विसरून जाण्यापेक्षा त्या उपकारांची जाणीव ठेवून त्याच प्रकारची मदत दुसऱ्याला करणे हीच खरे तर उपकारकर्त्याप्रतिची कृतज्ञता असते. परंतु अलीकडे कृतज्ञतेची जाणीव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देवून बाजूला केलं जातं. ज्या जिन्याने वर चढता येणे शक्य होते, त्या जिन्याचाच विसर पडतो आणि या घटनाक्रमाला जगरहाटी म्हणण्याची हिणकसता बऱ्याच वेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.

      आपल्या सर्वांवर झालेले माझ्या मात्यापित्यांचे, गुरूंचे व्यक्तिगत वाटचाल करीत असतांना सभोवतीच्या असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचे उपकार हे आपल्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग असून त्यावर आपण आपल्या सत्सत्विवेक बुद्धीचे सम्यकपणे भरणपोषण करीत असतो, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले माणूसपण जिवंत ठेवणे होय. आणि या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत, हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. उपकार फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, हा मौलिक विचार आजच्या घडीला सर्वांसाठीच कमालीचा उपयुक्त आहे, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल किंवा सांगणारा अस कोणी महारथी नाही अद्याप..?

        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : २९ ऑगस्ट २०२१, वेळ : ९:३०

Saturday, 28 August 2021

स्वार्थी लोकं आणि आपण...!

 स्वार्थी लोकं आणि स्वतःची बौद्धिक लढाई..!


    आपल्या जीवनात अनेक प्रकारची लोक येतात काही लोक आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि त्या प्रती कोणत्याही अपेक्षांचं डोंगर नाही ठेवत. काही जण असे असतात की फक्त काम झालं की बस, त्यानंतर कोण माणूस महत्वाचा आणि किंवा नाती महातावाचो याकडे कोण लक्ष ही न देणारे असे द्विधा मनस्थितीची माणस आपल्याला रोज भेटतात. काही वेळा अशी आपली तारांबळ फारवेळा होते ते म्हणजे अस की ह्या अशा लोकांच पारख करण मात्र जड जातं. आपण कोणत्याही अमुक क्षेत्रात काम करत असू त्या त्या प्रत्येक क्षेत्रात एखादं चेहरा नक्की त्या मतलबी रंगाचा , स्वार्थी स्वभावाचा नक्की असतो. अनेक चेहरे तोंडावर सोबत चालणारी असतात पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी उपलब्ध नसतात हेही त्या प्रकारात मोडतात ज्याला आपण स्वार्थी म्हणतो आणि अशा प्रकारची माणसं जीवनात मुबलक भेटतात, अनेक वेळा प्रत्येकाला आपल्या माणसाचं सुख पचत नसत त्यांची होणारी जळफळाट त्यांच्या वागण्यातून प्रत्यक्ष निदर्शनास येऊन जाते. प्रत्येक माणसाची प्रतिमा तसेच त्यातील गुण जे काहींना काही अँटिक अस वेगळेपण असणारी प्रत्येक व्यक्ती जीवनात महत्वाची असते, पद आणि प्रतिष्ठा अनेक ठिकाणी नक्की कामाला येणार नाही अशावेळी मात्र त्या वेगळेपण जपणाऱ्या माणसाकडून काम होऊन जातं म्हणजेच प्रत्येक व्यक्ती म्हणून व्यक्तीच नव्हे तर आपल्या जिवनात प्रत्येक संदर्भ, प्रत्येक क्षण, प्रत्येक योगदान आपल्या जगण्याला महत्व प्राप्त करून देणारी असते.
          तसेच आपला भूतकाळ आपल्या वर्तमानमध्ये खुप परीणाम करणारा असतो. ज्यांच्या आयुष्यात नियम नाहीत त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही कारण नियम नसतील, तोल नसेल तर पडणे साहजिक तसे मानवी जीवनात एक चकोर घेऊन जगण्यात अर्थ आहे अन्यथा अनर्थ म्हटले त्या जगण्याला तरी उत्तम. म्हणून जाता जाता तात्पर्य एवढंच सांगू इच्छितो की लोक कशी असतात त्याचा विचार सोडून द्या, कारण लोक क्षणिक काळासाठी असतात जगायला आपले आचार, विचार तथा वैचारिक संचारच कामाला येतात. म्हणून स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जगातील कोणतीही तंत्रज्ञान त्याचा अंदाज लावू शकली नाही. स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास कायम ठेवत ठेवा, जागृत ठेवा. स्वतः वर दृढ विश्वास ठेवा आज वेळ वाईट आहे उद्या नक्की चांगले दिवस येतील या निश्चयाने सुंदर जगणं आपलंसं करून घ्या...! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : २८ ऑगस्ट २०२१, वेळ : ९:३०

Friday, 27 August 2021

कर्माचा तराजू...!

 कर्माचं वजन करणारा तराजू ...?




            शिर्षक वाचून वाटलं असेल कदाचित नवल पण सत्य आहे, जगात माणूस म्हणून जगणारा प्राणी सोडला ना कोणीही स्वार्थाच्या विचारांचा शोधून सापडणार नाही, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक विचारांना दिवसभरात बळी ही पडतो आणि अनेक वैचारिक कल्पकतेला सामोरे ही जातो, कुणी पदाचा वापर करतो तर कोण स्वभावाचा तर कोण सलगीचा पण कुठं ना कुठं सुख दुःखाच्या डोंगरात आयुष्याची क्षणिक विचार रेखाटतो मात्र नक्की. १०० पैकी ९० जण आजही एखाद्याचं मन राखाव, इतरांना वाईट वाटू नये, मी गुणवंत वाटावा म्हणून जगणारे आहेत. तर पद, प्रतिष्ठा पैसे यांच्या जोरावर बाहुल्या नाचावणारे कटपुतली भेटतील. सत्य आहे बघा ना की जगणाऱ्या पंक्तीत तर प्रत्येकजण आहे, फक्त शैली, विचार, आचार, संचार वेगवेगळ्या आहेत. एक चारोळी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली " किसींका बुरा करके, अपनी बारी का इंतजार जरूर करना.." साहजिक आहे आपण कोण कसे किती याच काही ताळमेळ आपल्या डेली बेसिस मध्ये काहीसं पण फरक करणारं नसतं पण एवढं लक्षात ठेवा की याची परीक्षा नक्की होत असते, कोण घेत, कशी असते हे गूढ झालं, पण जस वर हिंदीतील शब्दांकन आहे त्या पद्धतीने कुठं तरी आपल्या वागण्या-समजण्याची एक तोल-माप नक्की होत असत. आज आपण कुणाला वाईट म्हंटल किंवा कुणाला चांगलं याची तूर्तास चर्चा श्रीमुखावर नक्की होत नसेल पण त्या चांगल्या की वाईट बद्दल किलो किंवा लिटर मध्ये नक्की नसेल पण त्याच मोजमाप पाठीमागे नक्कीच होत असत.
     कर्म म्हणजे काम हे आपल्याला माहीत आहे पण जगण्यातली कर्मे खुप फरकाची असतात, सोज्वळ मनाने केलेली प्रार्थना म्हणे स्वर्गाच्या दरवाजाचा रस्ता सुखद करतो, तस कर्म पण आपल्याला पुढील रस्त्याची आखणी ती पाठीमागील वैचारिक हितगुज मध्ये दडलेलं असत. जाता जाता एवढं सांगेन जगाला स्वतःची पर्वा असते इतरांची नाही. आपल्याला आपलं कर्तव्य आणि कर्म सुरळीत ठेवायचं आहे, तूर्तास कमी जास्त कोण असेल नसेल पण कर्मच्या तराजू मध्ये आपण कायम "वजनदार" असण्याचा प्रामाणिक प्रयत्न असुद्या, वाईट सर्वांना वाटत , दुःख प्रत्येकाला होत, भावनेच्या पुस्तकातील हे धडे जे रोज असतात, अनेक सुख-दुःखाच्या भरमसाठ धडे अनुभवायला मिळतात पण त्या धड्यांचा अभ्यास करून आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी आणि जगण्याच्या बोर्डात अव्वल यायचं असेल तर त्या ईश्वराच्या तराजू मध्ये कायम आपले वजन आपल्या सद कर्मानी वाढते ठेवा..! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )

Thursday, 26 August 2021

जगणं स्वतःसाठीचं...!

 जगणं स्वतःसाठीच....!


पाळतोय उगाच पोटासाठी जगायचं मात्र राहून गेलंय,
त्रास होतो चिंता वाटते पण स्वतःसाठी परखायचं राहून गेलंय,
घर न दार अनेकदा विसरतो मी इतकं व्यस्त असतो मी,
आपल्या कुटुंबासाठी कधी नसतो पण सर्वांसाठी स्वस्त असतो मी..! |1|

पद, पैसा,प्रतिष्ठा हेच दिनचर्येचा जणु आयुष्याचा भागचं झालय,
स्वतःसाठी कधी न जगणारा , कंटाळूनही राबण्याचं आता सवय झालंय,
आई बाबा मुलं बाळ यांच्यासाठी वेळ कमी असतो माझ्याकडे,
पण रोज न चुकता माझ्या भुकेच्या चौकशीच रजिस्टर मात्र कायम असतं त्यांच्याकडे...! |2 |  

जगाला चांगलं दिसावं, मी त्यात पारंगत असावं यासाठी कायम माझी खटाटोप,
यात स्वतःच्या चांगल्या अन घराच्या त्या माझ्या माणसाच्या अपेक्षा मात्र रोजच पावतात लोप,
लोक काय म्हणतील म्हणून भिऊन ही वागतो तस जरा पण लढत असतो कायम,
वय, ताकद कमी होते पण स्वस्वार्थी अन जगासाठी जगायचं आलेख मात्र असतो वाढता कायम...! |3|

भूक लागली की नाही याचं भान नसतं न घरच्यांना वेळ द्यायचं कधी याच शेड्युल नसत,
पण आयुष्यात कधीतरी ४-५ वर्षे सुखात जगू ह्या हव्यासापोटी मात्र कायम तत्पर आपलं बिगुल असत,
सण विसरतो मी, चक्क समारंभात ही व्यस्त असतो मी इतका कस बिझी ?
अस जगणं कधी तरी थांबेल न निदान होणारी पिळवणूक बघून तरी देव करेल का सुखाच्या त्या पर्वाला राजी...? |4|

बस झालं ना राजकारण ना समाजकारण करतो पण का इतकं माझ्यासाठी नकारघंटा,
आता घर, आई बाबा न कुटुंबासाठी मी देणार वेळ बस बाकीचे खटाटोप,
काम असेल , कर्तव्य असेल तेही नक्की करेन पण आयुष्य काढणार नाही तर आता जगणार,
आपल्यासाठी, आपल्या माणसासाठी, कुटुंबासाठी मी अल्व्हेज रिचेबल राहणार...! |5|


       लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )