शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !
लेखन : पत्रकार एन.के.
[ होळी अर्थात त्या संस्कृती आणि परंपरेची जोड म्हणून साजरी केली जाणारी होलीकात्सव, या दिवशी रावणाच्या प्रतिमेला म्हणजेच वाईट विचारांना पेटवून, चांगल्या विचारांची आरास व्हावी यासाठी केली जाणारी ही होळी, मनुष्य प्राणी जितका विचार करतो त्यात कितपत चांगले विचार असतात पाहायला गेलं तर कमबुद्धी विचार जास्त आणि चांगली प्रात्यक्षिक सोडले तर एखाद्या बद्दल चांगली वैचारिक विचारसरणी मात्र शून्य असते, स्वाभाविक माणूस ज्या ईश्वराने ज्या प्रकरतीने बनवलं, तस स्वार्थी टॅग लावून बनवलं असावं अशी घृणा विचार आल्याशिवाय राहवत नाही. होळीला शिमगा ही म्हणतात, शिमग्याला बोंबलल जात पण कधी आपण विचार केलाय का कायम आपण कुठल्या ना कुठल्या विचारांवर, संकुचित वृत्तीवर, अमुक व्यक्तीवर बोंबलत असतो, इतकं असताना आज एक चांगलं विचार त्या होळी अग्नी साक्षीने निर्धार करूया, मनाला पटेल तेच मार्ग, मनाला पटेल असच कर्तव्य, मनाला पटेल असंच वाटचाल वजा वागणूक मग बाकीचे असणारे जळक्या त्या ज्वालाना म्हणा - बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला ! ]
होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
कृष्ण फाल्गुनची होते सुरुवात,
पाहिली जाते पौर्णिमेचि वाट
चंद्राचा प्रखर असतो प्रकाश,
होळी या सणाची होते सुरुवात
होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।१।।
उगवतो नवीन दिवस, उजळते नवी पहाट,
सुरु होतो मग, रंगांचा वर्षाव
खूप उधळतो गुलाल आसमंतात,
येते स्मित हास्य, सर्वांच्या चेहऱ्यात
होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।२।।
आज देशभरात होळीचा सण साजरा होत असतांना मनातील वाईट विचारांची होळी करून संकल्प करण्याचा हा दिवस ,निसर्गाच्या विविध रंगानी जसा फळा फुलांचा दर्पण येतो तसा ,हा ऐक्याचा आणि आनंदाच्या रंगाचा उधळण करणारा सण बहरलेली वने ,पशु पक्षाचा चिवचिवाट, रानातील लयबद्ध संगीत ही मानवी मनावर्ती किती अधिराज्य करतात. हीच खरी होळीची ओळख. निसर्गाने आपल्याला दिलेली जी ऐक्य, सौंदर्य, माधुर्य हे आपण आज खऱ्या अर्थाने जपायला हवं, होळी हा पवित्र सण असला तरीही आपल्यातला रावण अजून मेलेला नाही, आपल्या कर्मातून झालेल्या नुकसानाची होळी अभी बाकी है ! खुप दिवसानंतर लिहिण्याचा योग आला, पण आज काही विषय लिहायला घ्यावं अस वाटलं सायंकाळी बोंब मारण्याचा आवाज कानावर आला मग विचार केला की बोंब मारणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि ते होळीला नाही तर रोज बोंबलत असतात, आज बोंब मारणाऱ्यांना सणाचं कारण असत, तर रोज बोंब मारणाऱ्याचं वेगळं लॉजिक असत - द्वेष, मोह, मत्सर, जळफळाट हा मुख्य कारण असतो, अन अशी डिजिटल बोंबाच्या बाराखड्या प्रत्येकाच्या उरावर बसलेले असणार हे नक्की. म्हणून आज आपण निर्धार करूया की रोजच्या रावणाला मग आपल्यातला असो इतरांच्यातला पण नक्की संपवू, अर्थात होळी रे होळी मध्ये राख करू.
मनुष्य इतका हुशार प्राणी आहे की त्याचे रंग इतके असतात ना त्याची गणना आकड्यात करणे अशक्य आहे. रोज नाही तर प्रत्येक क्षणाला , परिस्थिती नुसार रंगबदलू गिरगीट अर्थात माणूस. माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वतःमुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवतत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम धृवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. विचार शब्द लहान वाटत असला तरी त्याची उंची आणि परिणाम मात्र अभाळाएव्हढं आहेत. प्रत्येकाचे जिवनमान, प्रत्येकाची पारख, प्रत्येकाला मनाच्या कप्प्यात - कक्षेत समजून घेताना कामाला येणारे सर्वात ताकदवर अस्त्र म्हणजे विचार आहे अनेक वेळा आपण यावर शब्दांकन करून झालेलं आहे. आज ह्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक निर्धार वजा शपथ घेऊया की मागे बोलणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात, पुढे गोड बोलून पाठीमागे बोंबलनारे पण हजारो आहेत. त्यांना मनाच्या एका लाईन मध्ये उभं करून कप्प्यात घेऊन मारा म्हणावं बोंब, हात दुखेल पण थांबणार नाहीत कारण वर बोललो ना आपण कारण विचारसरणीचं जर मलीन असेल तर बोंबाटा तो बनता है ना बॉस !
मग ठरवल ना की, पिछे भोकने वाले कभी आगे आके दहाड नही सकते ! म्हणून प्रत्येक माणूस पकडून चालू, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ, विशेषण असणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याचा मागे एखादा तर चुगल्या असतो, जळणारा असतो, स्वार्थी नावाच्या रंगाच्या डब्याने रंगपंचमी खेळलेला असतो , मोहाच्या आणि द्वेषाच्या रांगेतून खरेदी केलेली बुद्धी सत्व माणसं असतात. मग यावर उपाय काय तर एकच आपण लॉयल राहायचं, आपलं कर्म, धर्म, संस्कार कायम ठेवत ठेवायचं, म्हणजे परीणामी आपल्याला सुंदर जगण्यातली रंग मिळतील आणि जिणं सुखाच होईल, मनावरचा अतिभार कमी होईल. जाता जाता एवढं सांगेन...-ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो. सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्याच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतुमध्ये त्याच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो ... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
मी,
जमा करतोय आज
तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्या-दाव्याचं गवत..
होळीत दहन करायचं आहे,
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे..
तुम्ही करता का थोडी मदत..?
आज..
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र,
काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा इत्यादी..
झाकायची आहे त्याच रंगात..
जात, धर्म, कर्म अन बरचस काही..
फक्त माणूस कळला पाहिजे,
इतकीच सरळ अन् साधी..
माझी मागणी आहे.. ( संकलित )
- धन्यवाद !