Thursday, 26 October 2023

" कुछ तो लोग कहेंगे...!" ☺️

 ■ शिर्षक : कुछ तो लोग कहेंगे...!😊

■ लेखन : पत्रकार एन.के....✍️

       [आपण माझे ब्लॉग वरील नियमीत वाचक आहात, आपला अनमोल प्रतिसाद हा कायम माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणारे असते ; आजचा विषय पुन्हा एकदा लिखाणाला सुरवात करतोय - ]



       माहीत आहे का आपण जगातील जेवढ्या सजीव जीवशृष्टी आहे त्यात आपण सर्वात चलाख आणि बुद्धिमान प्राणी म्हणून गणले जातो, आपल्याला आकलन शक्ती आहे, आपल्याला चालनात्मक विचारसरणी आहे, केवळ ह्या जगात जगणं हा एकमेव उद्देश ठेऊन दिनचर्या ठरवणारे ८०% असतील अस मला वाटत पण प्रत्येकाच्या बौद्धिक विचारात ध्येयाचा एक संघर्षमय वाटचाल नक्की असते हे खरंय, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे कुवत आहे, आपल्याकडे ती अचिवमेंट मिळवायची धमक आहे, तथा असतंच. पण कधी कधी आपण कोण काय, कुठला, काय म्हणेल का ह्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील म्हणून आपण संथ गतीने वाटचाल करताना दिसतो, आपलं कर्तव्य आपल्या बुद्धीच्या जोरावर खरं सोनं ( ध्येयाचं ) मिळवून देणार असेल तर लाजायचं कशाला आणि कुणाच्या दिसण्यासाठी , कुणाच्या प्रतिक्रियेसाठी आपण का आपलं जगणं बदलायचं ; सोडून द्यायचं " कुछ तो लोग कहेंगे उनका काम है केहना-टोकना " 😊

         'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,'

        'छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना..!'

ह्या उक्ती प्रमाणे आपलं आयुष्य आपण इतरांच्या मर्जीने जगत आहोत असं तर नाही ना ? एकदा विचार करून बघा, आपले छंद, आपल्या सवयी, आपले मनमोकळ्या विचारांची वाचा, आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम अस भरपूर काही अनेक वेळा ते काय म्हणतील म्हणून बंधने पाळून जातो आपण. एवढंच नाही तर आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड - निवड ठरवितांना या तथाकथित 'लोकांचा विचार' आपण करतो आणि आपण बांधील आहोत असे काहीसे मन करून बसतो अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात आणि त्या मानायला हाव्यातचं. पण, बहुतांश वेळा 'लोक काय म्हणतील' याचा बागुलबुवा करुन आपल्या मर्जीचा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला सपशेल बाजूला सारून लोकांच्या मातांना प्राधान्य देतो. आणि, मनातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात करतचं नाही. त्यामुळे लोकांची ही निर्रथक भीती आपल्या प्रगतीत स्पीडब्रेकर बनली आहे इतकं तरी समजावं माझ्या मते. हे बघा लोकं जगाची खबरबात तर ठेवतातच पण हे करताना  आपल्यावर नजर ठेवणारी ही आपली कंटक जरी असली तरीही त्यांना प्रेरणास्रोत म्हणून घ्या आणि वाटचाल करा कारण अशा लोकांची समरणशक्ती फार कमी असते. आणि तसेही जे आज आपली निंदा नालस्ती करतात उद्या आपल्या एकाद्या विषयावर टाळ्या वाजविणारेही हेच लोक असतात. मग, लोक काय म्हणतील याचं अवडंबर-आगडोंब कशाला करायचा ? बरोबर ना हे करत असताना सुद्धा आपण ज्या स्वभावाने सामोरे जातो म्हणजे अस की आपण लोकांना देत असलेलं फाजील महत्त्व व लोकांकडे बघण्याचा आपला चष्माच आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. लोकांना तुमच्या प्रगतीपेक्षा अधोगतीशीच जास्त देणं-घेणं असतं. चुकीचे सल्ले कसे देता येतील, प्रोत्साहन न देता सतत टीका कशी करता येईल, तुमच्या प्रगतीत अडथळे कसे निर्माण करता येतील याबाबतीत लोकांचा उत्साह अफाट असतो. त्यामुळे 'लोक काय म्हणतील' या अत्यंत फालतू गोष्टीचा विचार मनातून काढून टाकायला हवा ना ? 

     लेखाच्या शेवटी हेच म्हणेन की आपल्या जगण्यात असणारी पारंगता ही शाबूत ठेवा. आपल्याला आवडत असणाऱ्या व्यक्ती असतील, नाती असतील, आपल्या मनाला स्पर्शून आपल्याला सुखद अनुभव देत आपल्यासाठी चांगले आहेत असं वाटणारे सगळी नाती जपत चला, समाज आणि संसार काहीतर म्हणेल आणि त्यांना काय वाटेल ह्या विचाराने आपलं जगणं पायदळी तुडवून गुदमरत जगणं म्हणजे लाईफ असते का ? मनाला स्वच्छंद करा, मोकळा स्वास घ्या, आपल्या भावनांची कदर करणाऱ्या, आपल्या सुख आणि दुःखाच्या प्रत्येक सावलीत त्याची निगराणी असते त्या माणसाला जवळ करा, सांभाळ करा, चिरकाल साथ घ्या-द्या, लोकांच्या बघण्यात सुद्धा आजकाल आपल्याला खोटं असतं याची प्रचिती येत असते, रक्ताच्या नात्यात गैरसमज होतात, लोकांचं काय घेऊन बसलात ? कधी कधी सोडून द्यायला ज्यावेळी आपण शिकतो ना तेव्हा आपण ठाम व्हायला पाऊल टाकतो, आणि एकदा "स्वतःवर ठाम" झाला की जगातली कुठल्याही पॉवर ला तुम्हाला हरवायचं धाडस होणार नाही. आणि तात्पर्य जर मिळालं तर एवढंच सौम्य घ्या की आपल्या सभोवताल असणाऱ्या "आपल्या जवळची" नाती आपल्या साठी एक कॉल, एक मेसेज, एक आवाजाच्या कवडश्याने परिस्थिती ओळखणारे, समोर चेहरा अन डोळे बघून आपली व्यथा सर्वार्थाने जाणणारे जगाच्या विरोधात आपल्या बाजूने उभी राहणारी असतात न अशा हिऱ्यांना जपून ठेवा ; जगाला अशा वेळी फुलस्टॉप द्या आणि नात्याला वेळ द्या ! 

    धन्यवाद ! 


Thursday, 19 October 2023

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 🥰

 ■ शिर्षक : ...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 😊


काट्यांच्या जंजाळ मध्ये गुरफटून गेलेलं गुलाब पाहिलं,

मंद पहाटे दर्द सुगंध देणार मधाळ सोनचाफा पाहिलं,

ते दर्द, दुःख, पिडा अलगद विसरून तुला मढवता नाही आलं,

होय तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || १ ||



सोडलेले केस, टपोरे डोळे, गलिच्छ गुलाबी तुझे ते ओठ,

थरथरणारी पाऊलं, शहारणारी हालचाल, धरता नाही आलं बोट,

केसाच्या बाजूनं हात फिरवत तुला न्याहाळता नाही आलं,

कारण एकचं, तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || २ ||


होताना स्पर्श, रोमांचक भरे हर्ष अनुभवता नाही आलं,

मिठीच्या घट्ट पकड मध्ये तुला भुलवता नाही आलं,

खांद्याच्या बाजूला ओठांची झुंबड स्पर्शवता नाही आलं, 

पुन्हा एकदा तुला भेटलो खरं घट्ट मिठीत घेऊन माझी बर्फाळ प्रेम वाळवंट म्हणता नाही आलं !

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ३ ||


केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले,

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची सुगंधीच हळव्या शपथाची ; मन ही धुंद होऊन भुले,

सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची हेचं जाणता आलं नाही ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ४ ||


उन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती,

चंद्राने हि सूर्यावर कधीच झेप घेतली होती ; 

पण ती अजून नजरेच्या मोहात खेळत बसली होती,

ही प्रेमाची मोहक नाव तिच्या बंदराशी केव्हाच पोहचली होती,

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ५ ||


कारण आठवत नाही, पण त्या दिवशी ती खूप लाजरी झाली होती,

कदाचित माझ्याच हातांनी सावराहावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती,

ती पवित्र आहे, ती पूजनीय आहे, ती आदर्श, ती माझी अशी सर्वकाही होती,

का कुणास ठाऊक मोहक असते नेहमी पण त्या दिवशी डोळ्यातुन प्रेम बाण मारून तिरंदाज समजत होती ; 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ६ ||


   ■ लेखन : पत्रकार एन.के....✍️

Thursday, 21 September 2023

क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

 ■ शिर्षक : क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

■ लेखनप्रपंच : पत्रकार एन.के...✍️


[ ना चाह पूरी कर पाया, ना साकार कर पाया सपने को,

खुद से ज्यादा तवज्जो दी, मैंने ही सायद किसी अपने को,

इसी को सायद जिंदगी कहते है, ताउम्र धूप में तपने को,

यूं जिंदगी बीत जाएगी, और परिणत हो जाऊंगा लाश में,

'ना जाने क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में ' ह्या पंक्ती नुसार आपण आहोत त्या सुंदर जगण्या पासून वंचित होऊन अमुक ध्येय घेऊन उठाठेव करत तारखा बदलतात तस जगणं बदलत असतो हे सत्य,पण आपल्या आजवर दिलेलं योगदान म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं जगणं असावं यासाठी केलेलं मार्गक्रमण म्हणजे जगणं असतं का ? ; धगधग, धावपळ, त्रागा, चिडचिड तर कधी समाधानकारक लिटल बीट क्षण अस भरीव जगणं म्हणजे लाईफ इतकंच आपल्याला माहीत आहे, पण आपण आपल्या असलेल्या आणि चाललेल्या जिवनात समाधानी राहता आलं तर नक्कीच जे पदरात तेच जीवनात नक्की असेल सो मग आजपासून "भटकणं बंद" आणि "उमटण सुरू " 😊 ]


   नमस्कार वाचकहो ! एक पुनः सुंदर लेखन आपल्या भेटीस आणतोय दोन गोष्टी माणसाच्या हातात नसतात. एक जन्म आणि दुसरी मृत्यू. पण जन्म व मृत्यूमधील आयुष्य माणसाच्याच हाती असते. ते आयुष्य कोणती मूल्ये घेऊन जगतो. त्यावर जगण्याची कृतार्थता ठरते. सॉक्रेटिसने शिष्यांना चार मौलिक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या पहिल्या दोन विसरण्यासंबंधी तर राहिलेल्या दोन लक्षात ठेवण्यासंबंधी आहेत. विसरायला सांगितलेल्या गोष्टी अर्थात लक्षात ठेवल्या पाहिजेत. जीवनाची वाटचाल करताना आणि विशेषतः यशाच्या शिखराकडे जाताना, वाटेत आपला द्वेष, मत्सर करणारी, अडचणीचे काटे टाकणारी माणसे भेटतात. एकदा का आपण यशाच्या किंवा सत्तेच्या उंच ठिकाणी पोहोचलो की ज्यांनी आपल्या वाटेत काटे टाकले, द्वेष मत्सर केला, त्यांना विसरायचे. हे अवघड आहे. पण त्यांच्याशी सूडबुद्धीने वागायचे नाही. त्यांचा द्वेष, मत्सर करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्या उद्देशाने वा ध्येयाने आपण ते यश वा सत्ता प्राप्त केली त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी धडपडत राहायचे आणि हे वाईट वागणाऱ्यांना विसरल्याशिवाय शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट विसरायची, ती म्हणजे त्या यशाच्या वा सत्तेच्या जोरावर आपण ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांना मदत केली त्यांना विसरायचे. आठवणी आणि विसर ह्या गणितात आपल्याला जे हवं म्हणजे अस की आपल्या मानसिक समाधान साठी आपल्याला हवं असणार प्रत्येक पाऊल म्हणजे संघर्ष आपण रोजरास करत असतो, आपलं ध्येय न वाटचाल ही एक भौतिक सुखाच्या शोधतलं प्रवास म्हणावं लागेल. कुठेतरी वाचनात आलेलं एक सुंदर चारोळी - 

   'आयुष्य काळोखाने माखले असताना काही माणसं,'

'आपले जगणे विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात,'

'आदर्शाची स्थळ आपल्या अवतीभवती असतात,'

'आपण उगाचच दूरवरच्या, न अनुभवलेल्या माणसांचे कौतुक करीत दाखले देत असतो,'

'आत बाहेर निर्मळ असणारी माणसं अभावानेच आढळतात.'

   ह्या चारोळी प्रमाणे आपल्या कर्म आणि स्वभावाचा आपल्या जगण्यावर फार फरक पडत असतो, इतरांच्या मनावर अधिराज्य करता येईल इतकं समन्स स्वभाव आपल्याजवळ हवा, कारण अशी स्वभाव आपल्याला परत देताना भरभरून देत असतात. आपण केलेलं।योगदान आणि वाटचाल नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असं "रस्ता" रुपी असतो, मग ध्येय वेगळं असलं तरीही वाटचाल असते हे नक्की, प्रत्येकाला जगण्यात स्वार्थ हवं असतं, हवं तसं नात हवं असत, प्रेमाचा प्रवास अवगत असतो, वय, उंची, पगार, पाणीच्या पलीकडे इच्छाशक्ती म्हणून स्वार्थाचं एक हच्छावाला असतोच, कारण प्रत्येक मानव महत्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून त्यात दंग होऊन चालणार नाही ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत, अम करण्याची तयारी हवी, श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने माल घालते. अम करणाऱ्याला यशाच्या रुपाने परमेश्वर दर्शन देतो, नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवितो. तस चांगले कर्म आणि स्वभाव चांगला ठेवणाऱ्याला नक्कीच चांगली फळ ह्या जिवनात मिळतात हे नक्की ! जाता जाता समारोप करता करता एक कवितेच्या २-३ पंक्ती शेअर करतोय - 

                गुडघे गेले, कंबर गेली,

            नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

               आता आपलं काय राहिलं?

       हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही ! 


                पिढी दर पिढी चालीरीतीत,

                थोडे फार बदल होणारच, 

                  पोरं-पोरी त्यांच्या संसारात,

                 कळत नकळत गुंतणारच ! 


                तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

               कुणाकडूनही करायची नाही,

                  मस्तपैकी जगायचं सोडून,

             रोज थोडं थोडं मरायचं नाही ! 


          स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं,

              पुढे पुढे चालत राहायचं असतं,

                  वास्तू तथास्तू म्हणत असते,

             हे उमजून निरामय जगायचं असतं ! 


        धन्यवाद ! © पत्रकार एन.के. 







       

Monday, 18 September 2023

नात्यांचा ऋणानुबंध आणि समज-उमज !

 लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. 

   नाते म्हणजे अनेक प्रकारची असतात, नातलग पासून , मैत्री किंवा प्रेमा पर्यंतचे ह्या नात्याना आपण बनवताना केलेली सजावट, भरलेला जिव्हाळा, दिलेला आमूलाग्र स्व बदल आणि वैचारिक फिनिशिंग खूप महत्त्वाचा असतो न त्यासाठी आपण समर्पित केलेलं ही असत, पण कधी कधी क्षणिक अविचाराने झालेला आघात, किंवा क्षणार्धात आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल केलेलं नकोस विचार ह्या नात्यांना तडा देऊन अविरत हव्यासा असणारं हे बंध तोडायला भाग पडत, नात्यात गोडवा, रुसवा हवाच पण क्षणीक असावं, नाते द एन्ड पर्यंत घेऊन जाणार बुद्धीचातुर्य कदापी नसावं...



   धन्यवाद ! ब्लॉग साधारण एक-दिड वर्षे लिखाण बंद असूनही आपला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोग होतं, अशीच आपली सोबत असुद्या ; लेखनाला पुन्हा एकदा सुरवात करतोय - ऋणानुंबधाशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही ह्या जन्माशी आईचा ऋणानुबंध त्यातूनच आईला मुलांबद्दल प्रेम आपुलकी वाटू लागते मग या ऋणानुबंधाला सुरुवात होते, एखाद्या ओहोळाप्रमाणे हे ऋणानुबंध एकमेकांत कधी सहानुभूती तर कधी खरं अधोरेखित प्रेम वृद्धींगत होत ऋणानुबंधाच्या गाठी तयार होत राहतात. काही निरगाठी तर काही सूरगाठी ! आपले एखाद्याशी उत्तम पटते तर एखाद्याशी कमी मग ते कुटुंब असू देत शेजारी पाजारी मित्रमैत्रीणी हे ऋणानुबंधामुळेच. नात्यात येताना आणि नात्याला नाव देताना आपण अनेकवेळा विचार करतो की माणूस आपल्याला कोणत्या स्वार्थाने जवळ करायचा आहे की स्वभावाने, स्वभावाने जवळ येणारी चिरकाल टिकणारी असतात स्वार्थाने जवळ येणारी माणस संधी साधून नात्याचं बिमोड करतात हे सत्य. आपल्याला हवी असणारी प्रत्येक नाती आपली असतात आणि हे प्रत्येक नात्यातील गोडवा चाखत जीवनचक्र ह्या ऋणानुबंधात अडकत जाते एका नव्या जाणीवेने अस्तित्व टिकवण्यासाठी कारण आपलं अस्तित्वच ही खरी आपली अस्मिता खूणगाठ असते जगण्याची ! ज्यांच्या मधे तुमच्या बद्दल आपुलकी असते जिव्हाळा असतो ते ऋणानुबंध दृढ होतात दोघांतही समान आपुलकीचा धागा असेल तर, कधी कधी ऋणानुबंध विधिलिखीत असतात परमेश्वरी संकेत तर कधी कधी ते असूनही जपताना अडचणी येतात हे ही ऋणानुबंधच...! अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, प्रत्येकाच्या घनिष्ठ बंधीलतेने बनलेली असतात न ही नाती तुटली जाऊ नयेत यासाठी थोडं-फार त्याग समर्पण करण गरजेचं आहे, दैनंदिन आयुष्य जगता-जगता आपोआपच एक साचलेपण येत जातं. जीवनातही आणि नात्यांमध्येही. परिणामी सुरुवातीला घट्ट असणारे ऋणानुबंध सैलावत जातात. प्रसंगी कायमचे दुरावतात देखील. कुठल्याच नात्याची विशिष्ट अशी हमी देता येत नाही, हे खरंच. मात्र ती ‘एक्स्पायर’ होणार नाहीत, इतकी काळजी तर प्रत्येक जण घेऊच शकतो ना...! 

     राहिला प्रश्न अशी नाती जपलं पाहिजे की आपल्यासाठी वेळ काढतात, नड काढतात, धावून येतात, पाठीशी राहतात, ह्या नात्याना तेवत ठेऊन त्या प्रती प्रेम अन जिव्हाळा कायम असुद्या आणि कोणतंही नातं नवं असतं तेव्हा त्यात उत्स्फूर्तता जास्त असते. नवेपणात हवीहवीशी ओढ जास्त असते, त्यामुळे तिथे नातं जपण्यात, वृद्धिंगत करण्यात आपसूकच ऊर्जा जास्त लावली जाते. नातं जसजसं मुरायला लागतं, प्रगल्भता वाढत जाते, तसतशी त्यातली उत्स्फूर्तता नकळत कमी होते. एकमेकांच्या सवयी, स्वभाव अंगवळणी पडतात आणि त्यात तोचतोपणा येत जातो. तिथे लावल्या जाणाऱ्या ऊर्जेत कपात केली जाते, मुद्दाम नाहीच, अगदी नकळत होत जाते. आणि यातून आयुष्यात आलेलं साचलेपण अस्वस्थता देत राहतं. खूपदा याची परिणती विपरीत असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, आवडी-निवडी, आचार-विचार भिन्न असतात. त्यामुळे सगळेच बदलत्या परिस्थितीत सहज समायोजन करू शकतील, असंही नसतं. पण इथे एक पर्याय असू शकतो, किंबहुना असतो. तो म्हणजे, नात्याच्या वॉरंटीचा कालावधी कसा वाढवता येईल, याचा विचार करणे. नात्यांमध्ये आलेल्या साचलेपणाला घालवण्यासाठी कल्पकतेचा वापर प्रामाणिकपणे करता येऊ शकतो. समोरची व्यक्ती कसा प्रतिसाद देईल, हे आपण सांगू शकत नाही; पण आपल्या सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्नांनी समोरच्या व्यक्तीच्या (व स्वत:च्याही) वर्तनात काही बदल होण्याची शक्यता मात्र नक्की वाढते. नाती ही आयुष्याला मिळालेली मोठी देणगी आहे. ती संपवायला क्षण पुरतो, पण दृष्टिकोनात थोडा सकारात्मक बदल करून आहेत ती नाती मनातून स्वीकारता येतात का ते पाहा, म्हणजे नात्यांमधला तोचतोपणा टाळण्यासाठी क्रिएटिव्ह कसं होता येईल, याचा विचार करा. दैनंदिन गोष्टींनाही नावीन्यपूर्ण पद्धतींनी हवंहवंसं करता येतं. चुटकीसरशी सगळं बदलेल असं नाही. नातं जपणं ही जबाबदारीही कुण्या एकाची नसते. पण मरगळ संपेल, स्वतःला आनंद मिळेल आणि प्रयत्नांना दिशाही. अवास्तव अपेक्षांचं ओझं बाळगण्यापेक्षा/लादण्यापेक्षा जे आहे ते सुटसुटीत करून जपण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह होऊन जगण्याचा प्रयत्न करा.


   धन्यवाद !