Thursday, 21 September 2023

क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

 ■ शिर्षक : क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

■ लेखनप्रपंच : पत्रकार एन.के...✍️


[ ना चाह पूरी कर पाया, ना साकार कर पाया सपने को,

खुद से ज्यादा तवज्जो दी, मैंने ही सायद किसी अपने को,

इसी को सायद जिंदगी कहते है, ताउम्र धूप में तपने को,

यूं जिंदगी बीत जाएगी, और परिणत हो जाऊंगा लाश में,

'ना जाने क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में ' ह्या पंक्ती नुसार आपण आहोत त्या सुंदर जगण्या पासून वंचित होऊन अमुक ध्येय घेऊन उठाठेव करत तारखा बदलतात तस जगणं बदलत असतो हे सत्य,पण आपल्या आजवर दिलेलं योगदान म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं जगणं असावं यासाठी केलेलं मार्गक्रमण म्हणजे जगणं असतं का ? ; धगधग, धावपळ, त्रागा, चिडचिड तर कधी समाधानकारक लिटल बीट क्षण अस भरीव जगणं म्हणजे लाईफ इतकंच आपल्याला माहीत आहे, पण आपण आपल्या असलेल्या आणि चाललेल्या जिवनात समाधानी राहता आलं तर नक्कीच जे पदरात तेच जीवनात नक्की असेल सो मग आजपासून "भटकणं बंद" आणि "उमटण सुरू " 😊 ]


   नमस्कार वाचकहो ! एक पुनः सुंदर लेखन आपल्या भेटीस आणतोय दोन गोष्टी माणसाच्या हातात नसतात. एक जन्म आणि दुसरी मृत्यू. पण जन्म व मृत्यूमधील आयुष्य माणसाच्याच हाती असते. ते आयुष्य कोणती मूल्ये घेऊन जगतो. त्यावर जगण्याची कृतार्थता ठरते. सॉक्रेटिसने शिष्यांना चार मौलिक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या पहिल्या दोन विसरण्यासंबंधी तर राहिलेल्या दोन लक्षात ठेवण्यासंबंधी आहेत. विसरायला सांगितलेल्या गोष्टी अर्थात लक्षात ठेवल्या पाहिजेत. जीवनाची वाटचाल करताना आणि विशेषतः यशाच्या शिखराकडे जाताना, वाटेत आपला द्वेष, मत्सर करणारी, अडचणीचे काटे टाकणारी माणसे भेटतात. एकदा का आपण यशाच्या किंवा सत्तेच्या उंच ठिकाणी पोहोचलो की ज्यांनी आपल्या वाटेत काटे टाकले, द्वेष मत्सर केला, त्यांना विसरायचे. हे अवघड आहे. पण त्यांच्याशी सूडबुद्धीने वागायचे नाही. त्यांचा द्वेष, मत्सर करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्या उद्देशाने वा ध्येयाने आपण ते यश वा सत्ता प्राप्त केली त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी धडपडत राहायचे आणि हे वाईट वागणाऱ्यांना विसरल्याशिवाय शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट विसरायची, ती म्हणजे त्या यशाच्या वा सत्तेच्या जोरावर आपण ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांना मदत केली त्यांना विसरायचे. आठवणी आणि विसर ह्या गणितात आपल्याला जे हवं म्हणजे अस की आपल्या मानसिक समाधान साठी आपल्याला हवं असणार प्रत्येक पाऊल म्हणजे संघर्ष आपण रोजरास करत असतो, आपलं ध्येय न वाटचाल ही एक भौतिक सुखाच्या शोधतलं प्रवास म्हणावं लागेल. कुठेतरी वाचनात आलेलं एक सुंदर चारोळी - 

   'आयुष्य काळोखाने माखले असताना काही माणसं,'

'आपले जगणे विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात,'

'आदर्शाची स्थळ आपल्या अवतीभवती असतात,'

'आपण उगाचच दूरवरच्या, न अनुभवलेल्या माणसांचे कौतुक करीत दाखले देत असतो,'

'आत बाहेर निर्मळ असणारी माणसं अभावानेच आढळतात.'

   ह्या चारोळी प्रमाणे आपल्या कर्म आणि स्वभावाचा आपल्या जगण्यावर फार फरक पडत असतो, इतरांच्या मनावर अधिराज्य करता येईल इतकं समन्स स्वभाव आपल्याजवळ हवा, कारण अशी स्वभाव आपल्याला परत देताना भरभरून देत असतात. आपण केलेलं।योगदान आणि वाटचाल नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असं "रस्ता" रुपी असतो, मग ध्येय वेगळं असलं तरीही वाटचाल असते हे नक्की, प्रत्येकाला जगण्यात स्वार्थ हवं असतं, हवं तसं नात हवं असत, प्रेमाचा प्रवास अवगत असतो, वय, उंची, पगार, पाणीच्या पलीकडे इच्छाशक्ती म्हणून स्वार्थाचं एक हच्छावाला असतोच, कारण प्रत्येक मानव महत्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून त्यात दंग होऊन चालणार नाही ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत, अम करण्याची तयारी हवी, श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने माल घालते. अम करणाऱ्याला यशाच्या रुपाने परमेश्वर दर्शन देतो, नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवितो. तस चांगले कर्म आणि स्वभाव चांगला ठेवणाऱ्याला नक्कीच चांगली फळ ह्या जिवनात मिळतात हे नक्की ! जाता जाता समारोप करता करता एक कवितेच्या २-३ पंक्ती शेअर करतोय - 

                गुडघे गेले, कंबर गेली,

            नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

               आता आपलं काय राहिलं?

       हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही ! 


                पिढी दर पिढी चालीरीतीत,

                थोडे फार बदल होणारच, 

                  पोरं-पोरी त्यांच्या संसारात,

                 कळत नकळत गुंतणारच ! 


                तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

               कुणाकडूनही करायची नाही,

                  मस्तपैकी जगायचं सोडून,

             रोज थोडं थोडं मरायचं नाही ! 


          स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं,

              पुढे पुढे चालत राहायचं असतं,

                  वास्तू तथास्तू म्हणत असते,

             हे उमजून निरामय जगायचं असतं ! 


        धन्यवाद ! © पत्रकार एन.के. 







       

Monday, 18 September 2023

नात्यांचा ऋणानुबंध आणि समज-उमज !

 लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. 

   नाते म्हणजे अनेक प्रकारची असतात, नातलग पासून , मैत्री किंवा प्रेमा पर्यंतचे ह्या नात्याना आपण बनवताना केलेली सजावट, भरलेला जिव्हाळा, दिलेला आमूलाग्र स्व बदल आणि वैचारिक फिनिशिंग खूप महत्त्वाचा असतो न त्यासाठी आपण समर्पित केलेलं ही असत, पण कधी कधी क्षणिक अविचाराने झालेला आघात, किंवा क्षणार्धात आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल केलेलं नकोस विचार ह्या नात्यांना तडा देऊन अविरत हव्यासा असणारं हे बंध तोडायला भाग पडत, नात्यात गोडवा, रुसवा हवाच पण क्षणीक असावं, नाते द एन्ड पर्यंत घेऊन जाणार बुद्धीचातुर्य कदापी नसावं...



   धन्यवाद ! ब्लॉग साधारण एक-दिड वर्षे लिखाण बंद असूनही आपला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोग होतं, अशीच आपली सोबत असुद्या ; लेखनाला पुन्हा एकदा सुरवात करतोय - ऋणानुंबधाशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही ह्या जन्माशी आईचा ऋणानुबंध त्यातूनच आईला मुलांबद्दल प्रेम आपुलकी वाटू लागते मग या ऋणानुबंधाला सुरुवात होते, एखाद्या ओहोळाप्रमाणे हे ऋणानुबंध एकमेकांत कधी सहानुभूती तर कधी खरं अधोरेखित प्रेम वृद्धींगत होत ऋणानुबंधाच्या गाठी तयार होत राहतात. काही निरगाठी तर काही सूरगाठी ! आपले एखाद्याशी उत्तम पटते तर एखाद्याशी कमी मग ते कुटुंब असू देत शेजारी पाजारी मित्रमैत्रीणी हे ऋणानुबंधामुळेच. नात्यात येताना आणि नात्याला नाव देताना आपण अनेकवेळा विचार करतो की माणूस आपल्याला कोणत्या स्वार्थाने जवळ करायचा आहे की स्वभावाने, स्वभावाने जवळ येणारी चिरकाल टिकणारी असतात स्वार्थाने जवळ येणारी माणस संधी साधून नात्याचं बिमोड करतात हे सत्य. आपल्याला हवी असणारी प्रत्येक नाती आपली असतात आणि हे प्रत्येक नात्यातील गोडवा चाखत जीवनचक्र ह्या ऋणानुबंधात अडकत जाते एका नव्या जाणीवेने अस्तित्व टिकवण्यासाठी कारण आपलं अस्तित्वच ही खरी आपली अस्मिता खूणगाठ असते जगण्याची ! ज्यांच्या मधे तुमच्या बद्दल आपुलकी असते जिव्हाळा असतो ते ऋणानुबंध दृढ होतात दोघांतही समान आपुलकीचा धागा असेल तर, कधी कधी ऋणानुबंध विधिलिखीत असतात परमेश्वरी संकेत तर कधी कधी ते असूनही जपताना अडचणी येतात हे ही ऋणानुबंधच...! अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, प्रत्येकाच्या घनिष्ठ बंधीलतेने बनलेली असतात न ही नाती तुटली जाऊ नयेत यासाठी थोडं-फार त्याग समर्पण करण गरजेचं आहे, दैनंदिन आयुष्य जगता-जगता आपोआपच एक साचलेपण येत जातं. जीवनातही आणि नात्यांमध्येही. परिणामी सुरुवातीला घट्ट असणारे ऋणानुबंध सैलावत जातात. प्रसंगी कायमचे दुरावतात देखील. कुठल्याच नात्याची विशिष्ट अशी हमी देता येत नाही, हे खरंच. मात्र ती ‘एक्स्पायर’ होणार नाहीत, इतकी काळजी तर प्रत्येक जण घेऊच शकतो ना...! 

     राहिला प्रश्न अशी नाती जपलं पाहिजे की आपल्यासाठी वेळ काढतात, नड काढतात, धावून येतात, पाठीशी राहतात, ह्या नात्याना तेवत ठेऊन त्या प्रती प्रेम अन जिव्हाळा कायम असुद्या आणि कोणतंही नातं नवं असतं तेव्हा त्यात उत्स्फूर्तता जास्त असते. नवेपणात हवीहवीशी ओढ जास्त असते, त्यामुळे तिथे नातं जपण्यात, वृद्धिंगत करण्यात आपसूकच ऊर्जा जास्त लावली जाते. नातं जसजसं मुरायला लागतं, प्रगल्भता वाढत जाते, तसतशी त्यातली उत्स्फूर्तता नकळत कमी होते. एकमेकांच्या सवयी, स्वभाव अंगवळणी पडतात आणि त्यात तोचतोपणा येत जातो. तिथे लावल्या जाणाऱ्या ऊर्जेत कपात केली जाते, मुद्दाम नाहीच, अगदी नकळत होत जाते. आणि यातून आयुष्यात आलेलं साचलेपण अस्वस्थता देत राहतं. खूपदा याची परिणती विपरीत असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, आवडी-निवडी, आचार-विचार भिन्न असतात. त्यामुळे सगळेच बदलत्या परिस्थितीत सहज समायोजन करू शकतील, असंही नसतं. पण इथे एक पर्याय असू शकतो, किंबहुना असतो. तो म्हणजे, नात्याच्या वॉरंटीचा कालावधी कसा वाढवता येईल, याचा विचार करणे. नात्यांमध्ये आलेल्या साचलेपणाला घालवण्यासाठी कल्पकतेचा वापर प्रामाणिकपणे करता येऊ शकतो. समोरची व्यक्ती कसा प्रतिसाद देईल, हे आपण सांगू शकत नाही; पण आपल्या सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्नांनी समोरच्या व्यक्तीच्या (व स्वत:च्याही) वर्तनात काही बदल होण्याची शक्यता मात्र नक्की वाढते. नाती ही आयुष्याला मिळालेली मोठी देणगी आहे. ती संपवायला क्षण पुरतो, पण दृष्टिकोनात थोडा सकारात्मक बदल करून आहेत ती नाती मनातून स्वीकारता येतात का ते पाहा, म्हणजे नात्यांमधला तोचतोपणा टाळण्यासाठी क्रिएटिव्ह कसं होता येईल, याचा विचार करा. दैनंदिन गोष्टींनाही नावीन्यपूर्ण पद्धतींनी हवंहवंसं करता येतं. चुटकीसरशी सगळं बदलेल असं नाही. नातं जपणं ही जबाबदारीही कुण्या एकाची नसते. पण मरगळ संपेल, स्वतःला आनंद मिळेल आणि प्रयत्नांना दिशाही. अवास्तव अपेक्षांचं ओझं बाळगण्यापेक्षा/लादण्यापेक्षा जे आहे ते सुटसुटीत करून जपण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह होऊन जगण्याचा प्रयत्न करा.


   धन्यवाद !