Thursday, 26 October 2023

" कुछ तो लोग कहेंगे...!" ☺️

 ■ शिर्षक : कुछ तो लोग कहेंगे...!😊

■ लेखन : पत्रकार एन.के....✍️

       [आपण माझे ब्लॉग वरील नियमीत वाचक आहात, आपला अनमोल प्रतिसाद हा कायम माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणारे असते ; आजचा विषय पुन्हा एकदा लिखाणाला सुरवात करतोय - ]



       माहीत आहे का आपण जगातील जेवढ्या सजीव जीवशृष्टी आहे त्यात आपण सर्वात चलाख आणि बुद्धिमान प्राणी म्हणून गणले जातो, आपल्याला आकलन शक्ती आहे, आपल्याला चालनात्मक विचारसरणी आहे, केवळ ह्या जगात जगणं हा एकमेव उद्देश ठेऊन दिनचर्या ठरवणारे ८०% असतील अस मला वाटत पण प्रत्येकाच्या बौद्धिक विचारात ध्येयाचा एक संघर्षमय वाटचाल नक्की असते हे खरंय, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे कुवत आहे, आपल्याकडे ती अचिवमेंट मिळवायची धमक आहे, तथा असतंच. पण कधी कधी आपण कोण काय, कुठला, काय म्हणेल का ह्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील म्हणून आपण संथ गतीने वाटचाल करताना दिसतो, आपलं कर्तव्य आपल्या बुद्धीच्या जोरावर खरं सोनं ( ध्येयाचं ) मिळवून देणार असेल तर लाजायचं कशाला आणि कुणाच्या दिसण्यासाठी , कुणाच्या प्रतिक्रियेसाठी आपण का आपलं जगणं बदलायचं ; सोडून द्यायचं " कुछ तो लोग कहेंगे उनका काम है केहना-टोकना " 😊

         'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,'

        'छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना..!'

ह्या उक्ती प्रमाणे आपलं आयुष्य आपण इतरांच्या मर्जीने जगत आहोत असं तर नाही ना ? एकदा विचार करून बघा, आपले छंद, आपल्या सवयी, आपले मनमोकळ्या विचारांची वाचा, आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम अस भरपूर काही अनेक वेळा ते काय म्हणतील म्हणून बंधने पाळून जातो आपण. एवढंच नाही तर आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड - निवड ठरवितांना या तथाकथित 'लोकांचा विचार' आपण करतो आणि आपण बांधील आहोत असे काहीसे मन करून बसतो अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात आणि त्या मानायला हाव्यातचं. पण, बहुतांश वेळा 'लोक काय म्हणतील' याचा बागुलबुवा करुन आपल्या मर्जीचा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला सपशेल बाजूला सारून लोकांच्या मातांना प्राधान्य देतो. आणि, मनातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात करतचं नाही. त्यामुळे लोकांची ही निर्रथक भीती आपल्या प्रगतीत स्पीडब्रेकर बनली आहे इतकं तरी समजावं माझ्या मते. हे बघा लोकं जगाची खबरबात तर ठेवतातच पण हे करताना  आपल्यावर नजर ठेवणारी ही आपली कंटक जरी असली तरीही त्यांना प्रेरणास्रोत म्हणून घ्या आणि वाटचाल करा कारण अशा लोकांची समरणशक्ती फार कमी असते. आणि तसेही जे आज आपली निंदा नालस्ती करतात उद्या आपल्या एकाद्या विषयावर टाळ्या वाजविणारेही हेच लोक असतात. मग, लोक काय म्हणतील याचं अवडंबर-आगडोंब कशाला करायचा ? बरोबर ना हे करत असताना सुद्धा आपण ज्या स्वभावाने सामोरे जातो म्हणजे अस की आपण लोकांना देत असलेलं फाजील महत्त्व व लोकांकडे बघण्याचा आपला चष्माच आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. लोकांना तुमच्या प्रगतीपेक्षा अधोगतीशीच जास्त देणं-घेणं असतं. चुकीचे सल्ले कसे देता येतील, प्रोत्साहन न देता सतत टीका कशी करता येईल, तुमच्या प्रगतीत अडथळे कसे निर्माण करता येतील याबाबतीत लोकांचा उत्साह अफाट असतो. त्यामुळे 'लोक काय म्हणतील' या अत्यंत फालतू गोष्टीचा विचार मनातून काढून टाकायला हवा ना ? 

     लेखाच्या शेवटी हेच म्हणेन की आपल्या जगण्यात असणारी पारंगता ही शाबूत ठेवा. आपल्याला आवडत असणाऱ्या व्यक्ती असतील, नाती असतील, आपल्या मनाला स्पर्शून आपल्याला सुखद अनुभव देत आपल्यासाठी चांगले आहेत असं वाटणारे सगळी नाती जपत चला, समाज आणि संसार काहीतर म्हणेल आणि त्यांना काय वाटेल ह्या विचाराने आपलं जगणं पायदळी तुडवून गुदमरत जगणं म्हणजे लाईफ असते का ? मनाला स्वच्छंद करा, मोकळा स्वास घ्या, आपल्या भावनांची कदर करणाऱ्या, आपल्या सुख आणि दुःखाच्या प्रत्येक सावलीत त्याची निगराणी असते त्या माणसाला जवळ करा, सांभाळ करा, चिरकाल साथ घ्या-द्या, लोकांच्या बघण्यात सुद्धा आजकाल आपल्याला खोटं असतं याची प्रचिती येत असते, रक्ताच्या नात्यात गैरसमज होतात, लोकांचं काय घेऊन बसलात ? कधी कधी सोडून द्यायला ज्यावेळी आपण शिकतो ना तेव्हा आपण ठाम व्हायला पाऊल टाकतो, आणि एकदा "स्वतःवर ठाम" झाला की जगातली कुठल्याही पॉवर ला तुम्हाला हरवायचं धाडस होणार नाही. आणि तात्पर्य जर मिळालं तर एवढंच सौम्य घ्या की आपल्या सभोवताल असणाऱ्या "आपल्या जवळची" नाती आपल्या साठी एक कॉल, एक मेसेज, एक आवाजाच्या कवडश्याने परिस्थिती ओळखणारे, समोर चेहरा अन डोळे बघून आपली व्यथा सर्वार्थाने जाणणारे जगाच्या विरोधात आपल्या बाजूने उभी राहणारी असतात न अशा हिऱ्यांना जपून ठेवा ; जगाला अशा वेळी फुलस्टॉप द्या आणि नात्याला वेळ द्या ! 

    धन्यवाद ! 


Thursday, 19 October 2023

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 🥰

 ■ शिर्षक : ...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 😊


काट्यांच्या जंजाळ मध्ये गुरफटून गेलेलं गुलाब पाहिलं,

मंद पहाटे दर्द सुगंध देणार मधाळ सोनचाफा पाहिलं,

ते दर्द, दुःख, पिडा अलगद विसरून तुला मढवता नाही आलं,

होय तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || १ ||



सोडलेले केस, टपोरे डोळे, गलिच्छ गुलाबी तुझे ते ओठ,

थरथरणारी पाऊलं, शहारणारी हालचाल, धरता नाही आलं बोट,

केसाच्या बाजूनं हात फिरवत तुला न्याहाळता नाही आलं,

कारण एकचं, तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || २ ||


होताना स्पर्श, रोमांचक भरे हर्ष अनुभवता नाही आलं,

मिठीच्या घट्ट पकड मध्ये तुला भुलवता नाही आलं,

खांद्याच्या बाजूला ओठांची झुंबड स्पर्शवता नाही आलं, 

पुन्हा एकदा तुला भेटलो खरं घट्ट मिठीत घेऊन माझी बर्फाळ प्रेम वाळवंट म्हणता नाही आलं !

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ३ ||


केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले,

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची सुगंधीच हळव्या शपथाची ; मन ही धुंद होऊन भुले,

सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची हेचं जाणता आलं नाही ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ४ ||


उन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती,

चंद्राने हि सूर्यावर कधीच झेप घेतली होती ; 

पण ती अजून नजरेच्या मोहात खेळत बसली होती,

ही प्रेमाची मोहक नाव तिच्या बंदराशी केव्हाच पोहचली होती,

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ५ ||


कारण आठवत नाही, पण त्या दिवशी ती खूप लाजरी झाली होती,

कदाचित माझ्याच हातांनी सावराहावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती,

ती पवित्र आहे, ती पूजनीय आहे, ती आदर्श, ती माझी अशी सर्वकाही होती,

का कुणास ठाऊक मोहक असते नेहमी पण त्या दिवशी डोळ्यातुन प्रेम बाण मारून तिरंदाज समजत होती ; 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ६ ||


   ■ लेखन : पत्रकार एन.के....✍️