Friday, 24 January 2020

फक्त मनाला लढ म्हणा..!

शिर्षक - फक्त मानाला लढ म्हणा...!


 [ कष्टाच्या झाडाखाली चढ आणि उताराची सावली असतेच, चांगल्या म्हणवणाऱ्या दिवसा मागुन वाईट दिवसांची झालर येत असतेच, बहरलेल्या झाडाला वाळवी लागल्यासारख माणसाच्या आयुष्यात देखील अनेक नयन पाणावणारे क्षण एक ना एक दिवस गर्दी करतातच, म्हणून जगण्याला अर्थ नाही म्हणून देवाला आणि दैवाला दोष देणारे आपण सर्रास पाहतो, पण पडलेल्या रास्तावरच्या खड्याला बायपास मारून नवीन सुरवात करून आसवांना आनंद अश्रुत कन्व्हर्ट करणारा एक छोटासा किमान-कमाल प्रयत्न माझ्या या लेखद्वारे...]

        सामान्य माणूस जगायला खऱ्या अर्थाने जगायला लागला तेव्हा त्याची भूक समजली आणि आजवर कमी कमी म्हणत मला कमी पडतंय म्हणून वयाच्या काठी पर्यंत मला हवं हवं म्हणून हव्यासी बनून गेला. कमी जास्त काम जास्त म्हणत साठवत गेला पण कधी सुखं म्हणून अनुभवला का नाही ना ? क्वचितच सोडले तर ऐश आराम वगळता कौटुंबिक तथा जगण्याचं खरं सुख मात्र कोसो दूर गेला आणि ते सुख अगदी बोटावर मोजणी होईल इतक्याच लोकांनी अनुभवली. काम, काबाड कष्ट, मेहनत करून हव्या त्या गोष्टी आज आपल्याला साध्य ही करता येतात हो पण शेजारी असा तसा म्हणून आपले असे तसे रस्ते बदलणारे बाहुल्यांचे वाटाड्या म्हणवणाऱ्या वाटसरूची संख्या मात्र अमाप झाली आहे. देवाच्या देवळात जाताना महागडी चप्पल कडे साधारण १०००-१२०० च्या चपलाकडे लक्ष देणारा आणि गरीब १-२ रु. देताना १०० द विचार करणारा कृत्रिम मानव आज निर्मित झाला आहे. देवाकडे जाताना मागण्या शंभर एक असतात पण देताना हात मात्र पठयाचे आकुंचन पावतात म्हणजे स्वार्थी वृत्तीच जग आपल्या भोवताल आहे. आपल्याला आज कष्ट करायचं आहे तर व्यासपीठ शोधावं लागत. व्यासपीठावर आपला वचक असायला हवं तर कष्टाचे पाढे मात्र २-३ वेळा जास्तीचे पाठ करावी लागतील इतकं समरस परिस्थिती मात्र नक्की आहे. सर्रास आपलं सामान्य जनजीवन घेतलं तर आज अनेकांच्या हाताला काम नाही, धंदा करावं तर मार्केट नाही, भांडवल नाही. या अशा नैराश्यात जगणारा आजचा बेरोजगार नोकऱ्या, आणि कामासाठी वणवण भटकंती करताना दिसतो आहे. कुटुंब आई वडील बायको आणि समाज यांच्या समोर मी व्यस्त दिसलो पाहिजे कामाला असल्याचं एक स्व समाधान आणि समाज सोबत कुटुंबाला दिलासा म्हणून कार्य करत राहणे म्हणजे एकच ध्येय हा आजच्या सर्वांगीण तरुण पिढीचा पाढा झाला आहे. अशात कर्ज काढून भांडवल करणे, धंद्याला चालना मिळायच्या आत आर्थिक मंदीची झळ आणि परत रस्त्यावर येऊन बेरोजगार नावाचा शिक्का माथी घेऊन हिंडणे हीच दिनचर्या बनून जाते. अशा वेळी मन सुन्न होत आणि वेगवेगळ्या नाहक आणि दृष्ट विचारांनी मन ग्रासत आणि अशा वेळी संयम सोडून हातात दोरी, किंवा नोकरीच्या आमिषाने संसार आणि कुटुंबाची राखरांगोळी करणाऱ्या कुटुंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे, असे तरुण आणि मंदीमुळे कंपण्यातून बडतर्फ झालेल्या बेरोजगार गटातील व्यक्तींनी टोकाचा निर्णय न घेता सावरत स्वविश्व उभं करावं न मुंगी होऊन का होईना पण साखर खात जगावं ही गरज, आणि जन जागृती आहे.
      ह्या संदर्भद्वारे इतकंच मत प्रकट करेन की आपण सगळे निव्वळ श्वास घेतोय जगतोय म्हणून जगणं सुरू आहे असा पाढा आहे. आपली तीच मळलेली वाट, त्या वाटेवरचे तेच जुने धुळीचे कण झेलत आपणही जुने होतोय, वर्ष निघून जातात, काही दिवस आणि रात्र काढून एखाद्या दगडाला ठेच लागून पडतो, थांबला जातो तिथंच नकारात्मक गोष्टीचा उदय होतो न आपण संपलं सगळं आता खूप आपण जग पाहिलं पण त्यातून आपण हरलो म्हणून दुःखाला कवटाळून क्षण क्षण संपत जातो. आतून शुष्क होतोय खचला जातोय, पण हा कधी विचार मनात आणत नाही की कधी तरी, कुठे तरी ह्या प्रवासाला नवीन दिशा देत आपला मार्ग जिवंत जगण्याकडे जाईल का ? संपलेल्या वाटेवर नवी चैत्र पालवी फोडता येईल का ? सूक्ष्म सही पण छान जगणं पुन्हा जगता येईल का ? हा विचार कदापी मनात येत नाही. म्हणून चला पेटून उठा आणि म्हणा " स्पर्धा अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही" आपल्या चांगल्या वाणी आणि कुशाग्र वागण्यातून जगाला आपलंसं करत माणसांमधलं आणि परिस्थितीमधलं वैविध्य कुशलतेने हाताळत आपलं स्वतःच जग आणि व्यक्तिमत्त्व विशेष प्रभावशाली करा. समजून ज शून्य आहे मी आणि ज्याच्या सोबत असेन ज्या रस्त्यावर माझी वाटचाल असेल त्याची किंमत नक्की दूगनी (दुप्पट ) करेन म्हणून संघर्षाला आज पासून लागा. स्वतः स्वतःला घडवा नक्की यश मिळेल जळणारे आणि आपल्या लहान कार्याला बघून आता हसणारे बाकीचे मात्र कधी अहंकार तर कधी आत्मसन्मान तर कधी भावनिक कुचंबणा ह्यातून सामान्यच राहतील अशी गोड समजूत मनाला द्या आणि आपल्या वाटचालीत आपण कुठे माघार घ्यायची ,कुठे पुढाकार घ्यायचा हे स्वतः आत्मपरीक्षण करून ठरवा. जगाच्या सल्ल्याची किंचितही वाट बघू नका. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जगू तोपर्यंत आयुष्याची संध्याकाळ खुणावू लागलेली असते. मग जाता जाता बघा जमलं तर अस जगायला " मनाचा थांग लागू न देता स्वच्छंद जागा म्हणजे एक विलक्षण संयमित मुखवटा जगाला दिसेल ही पण तुमचा आतला पॉवर ऑफ न्यू च्यापटर कायम कार्यरत ठेवा. सोबत यश शिखर सर केल्यावर आपली माणसं जी संकटात उभी होती त्यांचं ही मन जिंका. आजच्या युगात मानसिक संघर्ष, उलथापालथ घडत असताना,शब्दांना मौनाचा बांध घालणं खूप कठीण असते अशा देवाने निर्माण केलेली अशी माणसं आजूबाजूला असताना आपण नक्की कुठे चुकलो आणि अपयशी झालो त्याचा आरसा ठेवा आणि लेट बट ग्रेट जगायला सुरू करा.

धन्यवाद...!      - पत्रकार एन.के.- 8806605852

Tuesday, 10 December 2019

फॉरेनवाला इंडिया...

शिर्षक : पाश्चिमात्य संस्कृती-विचारांचा इंडिया...

लेखन : पत्रकार एन.के. - ८८०६६०५८५२

         [ भगवतगीता आणि कुराण सारख्या अनमोल धर्मग्रंथानी बनलेला हा आपला सुजलाम सुफलाम भारत देश. संस्कृती आणि परंपरा जपत मार्गक्रमण करणारा आपला देश आज अनेक लहान पासून वृद्ध पर्यंत ट्रेण्डच्या विळख्यात फसून मॉडर्न वाली व्याख्या आत्मसात करायला निघालेली पिढी आणि या पाश्चिमात्य मॉडर्न मुळे निर्मित झालेल्या वाईट नजरा आणि घाणेरडी प्रवृत्ती तथा यामुळं अत्याचार सारख्या निर्लज्म घटनांना कारणीभूत कोण ? संस्कृती बाजूला ठेऊन, वयाचा विचार न करता, राहणीमान न पारखता उच्च-भु राहण्याच्या गडबडीत भारतीय नारी म्हणून कोसो दूर गेलेल्या पिढीला, सिनेस्टाईलची कॉपीराईट जिंदगी जगणाऱ्याची डोळे उघडण्यासाठी छोटासा माझा प्रयत्न या लेखद्वारे...]


         शिर्षक अन संदर्भ वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणार हे नक्कीच कारण ; आमच्या फॅशनला आणि राहणीमान आणि स्टेटस भरी जिंदगीला कोणी उपदेश द्यावा आजच्या मानवी विचारांच्या पलीकडचे आहे. अत्याचाराच्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भोवतालच्या घटनांचा क्रम पहिला तर आजवर अत्याचार सहन करून जिवन संपवून घेतलेली ही स्त्री मात्र आहे. बलात्कार, खून, अतिप्रसंग, छेडछाडीच्या बातम्या शिवाय आज पेपर पासून वृत्त चॅनेल्सना सुद्धा रंग नाही का असे छिन्न प्रश्न मनात येऊन जातात. देशाचं भवितव्य म्हणून नजीकच्या काळात बातमी वाचली की देशात महिलांना जास्त धोका असणारा देश म्हणजे चक्क भारत, बलात्कार सारख्या गोष्टीच्या घटनाक्रममध्ये सर्रास भारताचा अव्वल स्थानी क्रमांक पाहायला मिळाला. बातम्या वाचताना किंवा असे विश्लेषण हाताळताना मनात लाज ही वाटते आणि चीडही तितकीच येते. सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर आज जी पिढी तयार होते आहे हेच कारणीभूत असेल ? किंवा आजच राहणीमान आजची "स्टाईल मे रेहने का" मूळ किंवा लोकांची मनस्थिती मूळे अर्थात स्वार्थी ( जी मी क्वालिटी असलो / असले पाहिजे ) च्या नादात अनेक भयावह घटना घडतात हेच अंतिम सत्य म्हणावं लागेल. भारत हा देश अनेक प्रांत अनेक धर्म अनेक महापुरुष अनेक ग्रंथ अनेक वेदो-पुराणनी बनला आहे. भारताच्या विविध प्रांत नुसार चालीरीती, परंपरा, पेहराव इतकंच काय तर खाद्य संस्कृती सुद्धा विभिन्नतेने नटलेली आहे. आज ह्या संस्कृती न विभिन्नता लोप पावत इतिहास जमा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर आजही मॉडर्न म्हणून जगण्यात लोकांना न सध्य + भावी पिढीला धन्यता वाटते. म्हणजे एकूण एक तात्पर्य गाघरा छोली ते चोळी पासून पंजाबी ड्रेस सारख्या पेहरावांची जागा आज जीन्स- टॉप ने घेतली तर वरण भात किंवा दाल-बाटी ची जागा हळूहळू पिझझा बर्गर घेत आहेत म्हटलं तर वावग ठरणार नाही. याचबरोबर सिनेमा न ऑनलाईनवाल्या लाईफने तर लाईफ बदलून टाकली न त्यातून निर्माण होणारी स्टाईल, वागणं, बोलणे, कृत्य यातून आजची पिढी हिरो हिरोईन झाल्या तर काकू अँटी झाल्या न मग स्टाईल के नाम पे बिकनेवाली जिंदगी नजरेच्या जाळ्यात आयटमच्या शिक्क्याला जागा दिली न त्यात सेम बेरोजगारी, ( अंधार कोठडीत पडलेले न कुत्रं पण विचारत नाही आता ) त्या उच्चशिक्षण घेऊन ही काम नसल्याने कट्टा ओस पडून दारू न नसेचे अड्डे तुडुंब व्हायला लागले. म्हणजे आपली संस्कृती, संस्कार कानाडोळा झाले न 90-60 वाले युवक निर्माण झाले. न तरीही मेक इन इंडिया म्हणून अजून प्रशासन ठेम्बा मिरवतय.
संदर्भ कडवट हाती घेतोय भावना दुखावल्या तर क्षमस्व म्हणणार नाही कारण मत प्रकट करतोय न ठाम आहे या मतावर. आज बाहेर काम करणाऱ्या मुली कितीही काम असेल तरी किमान घरापासून ४०-५० किमी अंतराच्या आत काम करतात. आणि अगदीच अडचण असल्यास आज सध्या घरासमोर ४ चाकी असते. साधारण ८ वाजता जरी घरी जायला निघालो तरी लवकर म्हणजे साधारण ९:३० पर्यंत आपण पोहचू म्हणजे सेफ झोन मध्ये पोहचू. हा एक भाग झाला पण जर रोज आपण रात्री प्रवास करतो एकांतात तर त्याला सेफ्टी राहणं महत्वाचं म्हणजे लहान संरक्षण पुरते शस्त्र बाळगा. याच बरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आपण राहतो कसे न आपल्या सभोवताल असणारी जनरेशन न त्याची नजर यावर लक्ष ठेऊन जगात जगाल तर नक्कीच आयुष्य आदर्श न सुरक्षित बनेल मधे एक मराठी कार्यक्रम बघत होतो बिग बॉस मधील मंडळी कार्यक्रमसाठी उपस्थित होते तर अभिजित बिचुकले माहीत असेल सर्वाना त्यांनी एक महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी पुणेकर बहुतेक आडनाव असावे यांच्या एक संदर्भ रंगला " की बिचुकले यांनी ६०+ वर्षाच्या त्या पुणेकर यांना आई म्हंटले म्हणून त्यांनी त्रागा केला की मी महाराष्ट्र गाजवते, थिरकवते मी म्हातारी झाली का ? मला आई म्हणतो हा मी अजून जवान आहे..! अक्षरशः जुंपली की बोलू नका हवं तर बिचुकले तुम्ही पण आई उपमा देऊ नका... उत्तरार्थ बिचुकले म्हणाले की जगातील सर्वात महान उपमा दिली पण तुम्हाला नाही आवडली...!" म्हणजे यावरून तात्पर्य अस की ६० वर्षाची वृद्धा म्हणते मी अजून जवान आहे म्हणजे युवक न पुरुषाच्या मनाची चालबिचालता इथं कोणी मलिन केली. सोबत एक अनुभव अजून शेअर करतो " टिकटॉक माहीत असेल सर्वाना त्यावर ट्रेंड चालतो ३५ ते ५० वर्षाच्या महिला आपल्या आवाजात अनेक नालायक प्रश्नाला स्वतः वाचा फोडलेला पाहायला मिळालं जसे की- "हॅलो फ्रेंड्स लग्न झालं तर काय झालं प्रेम होऊ शकत, लायसन्स असलं तरी आर.टी.ओ. म्हणून मॅनेज होता का ? मी सिंगल आहे बॉय फ्रेंड बनता का ?" इतकंच नाही तर अर्धनग्न कपड्यात व्हिडिओ बनवून पोस्ट करून एक पुरुष न त्याच्या दांडग्या विचारला आपण मालिन करण्याचं कामच केलात ना. अशा सोशल मीडिया माध्यमातून ओळख न मैत्री न प्रेम न ब्रेकअप आणि अंतिम द एन्ड काही वेळा नाही अनेक वेळा : जीवित हानीचा थरार ...! मग मला सांगा चूक कुणाची ??

     जाता जाता एवढंच सांगेन कुणाला दोष देण्याचा किंचितही हेतू नाही पण आपली संस्कृती न परंपरा न आपण कसे असावे पासून कसे जगावे हे सांगणारे महान धर्म ग्रंथांची पर्वणी आपल्याला लाभली आहे त्यानुसार जगणं असुद्या फॅशन करा पण त्याचा बाजार नको, स्टाईल करा पण त्याचा लोकाभिमुख स्टंट नको, महिलांनी विशेषतः स्वतःची काळजी घ्या, स्वतः मॉडर्न राहा पण विचारांनी दृशातून प्रदर्शनाकडे वाटचाल करणारी नको, प्रत्येक वेळी चूक पुरुषाची नसते कारण आपलं संरक्षण आपण स्वतः करायचं आहे पूर्वी स्वयंपाक घरातून बाहेर येत नव्हत्या महिला यातून १०% घ्या नजरा वाईट असतात तर त्यात बदल म्हणून संस्कृती अभिप्रेत होईल असं राहणीमान अवलंबून घ्या...!लवकर निघा-लवकर पोहचा. कसेही जगा पण भारताला इंडिया म्हणून बघून जगू नका. आपण अमेरिकेत नाही भारतात राहतो याचे देहभान सर्वाना असुद्या....!


धन्यवाद...!

"एखाद्या मुलीचा असो किंवा मुलाचा, त्यांचं सौन्दर्य हे जपायची गोष्ट आहे, पुजायची गोष्ट आहे ; भोगायची नाही" एवढं ध्यानात असुद्या...!

Saturday, 30 November 2019

खरा रावण अजून जिवंत आहे...!

शिर्षक :- खरा रावण मेलाच नाही..!

लेखन :- पत्रकार एन.के.- ८८०६६०५८५२

⚫ Justice For Nirbhaya_Priyanka ⚫



[ आई ! प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला शब्द. प्रांत, देश, राज्य, गाव अनेक तर धर्म, जात, पंथ, बोलीभाषा अनेक पण मानव प्राणी हा एकाच प्रजातीचा आणि त्याचा जन्म हा एक महिले कडून होते न त्याला आपण आई म्हणतो. मातृत्व दिल्यावर जगाची पारख झालेले आपण जगाच्या बाजारात हमीभाव मिळवून रॉयल जगण्यात तिची ती ९ महिन्याच्या त्रासाला बायपास देऊन इतरांच्या आया, बहिणी कडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत करतो ? इतकंच नाही तर लचके तोडायच्या संधीला धन्यता मानून अमानुष बनून जातो. एवढी नीच प्रवृत्ती कशी निर्मित होते ? कसे बनतात हे नराधम ? बनतात पुनः तर दरवर्षी दसऱ्याला रावण जळून पण उरतो कसा...?
         लेख यासाठी लिहीत आहे की, देशात राहायचं तर का ? कशासाठी ? भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल म्हणजे झालं का ? नराधम अजून तयार होत आहे सावधान आणि सतर्क राहा. रात्र वैऱ्याची आहे. आज जगाच्या पाठीवर महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. हम भी कुछ कम नही म्हणून समाजात आपला आदर्श निर्माण करतात आणि जगतात. अस कोणतं क्षेत्र नाही की जिथं महिला काम करत नाहीत. एवढंच नाही तर देशाचं नेतृत्व केलेल्या महिलांचा उदाहरण, धाडशी संस्था, कार्य करणारी महिला अधिकारी वर्ग पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या देशाचा हेवा वाटेल इतकी महिला शक्ती आज देशात आपल्याला वर्तमान आणि भूतकाळात पाहायला मिळत. एक महिला उभी राहिली म्हणून राज्य गुलामगिरी मधून बाहेर आल, महिला सोबतीने समाजाची घाण अंगावर घेत शिकवली म्हणून आज सगळ्यांना अक्षरांची ओळख झाली. महिला इतकी सक्षम आहे. तशीच एक स्त्री जी आपली आई, बहीण, बायको च्या रुपात आपल्या आयुष्यात असते किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात असते मग प्रत्येकाच्या ती मुख्य भाग म्हणून जगण्याची आणि देशाची रण रागिणी आहे तर देहावर नजर टाकणारे कोणत्या उदरातून जन्माला आले ? आरोप प्रत्यारोप, श्रद्धांजली, जस्टिश हे ते नको ढीगभर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या... कोपर्डी नंतर चिमुकली असिफा नंतर हे ताज उदाहरण प्रियांका रेड्डी प्रकरण बघून मन छिन्न झालं. काय गुन्हा होता त्यांचा मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून ? का राक्षसाची भूक भागवायला ? गेंड्याच्या शिंगाला खाज सुटली म्हणून खाजवून घ्यायला जन्म घेतला का त्यांनी ? आजही अशा प्रकरणांनी त्या नराधमाच्या जन्म प्रक्रियेवर लाज वाटते कोणत्या सिस्टीम मधून जन्म घेतले असतील हे ? नराधमांना शिक्षा करायला ही सरकार तयार नाही. लाचार मीडिया आपली लोणी खाण्यात व्यस्त तर तळव्याचाटु नेत्यांनी आपली आरोप प्रत्यारोपात त्या पीडितांची खोटी सहानुभूती घेऊन उभे ठाकले हे सर्व चित्र आज आहे हे बदलणार कधी ? रावण अर्थात मारणार कधी ? निष्पापांच्या अंगावर पडणारे ओरखडे थांबणार कधी ? अजून किती निर्भया, असिफा आणि प्रियांका बघणार आहोत आपण ? कठोर शासन का होत नाही ? अशा नराधमांना भर रस्त्यात नग्न करून हात-पाय कापून धिंडवडे काढून नॉयलॉनच्या दोरीने गळ्यातला स्वास शांत होईपर्यंत ओरखडे का दिल जात नाही...? 

माझी ओळख तेव्हाच संपली,
फक्त "निर्भया" म्हणूनच उरली,
आता मरणाची आस मनी धरली,
शंभर वर्षे तर केव्हाच भरली....!!

... आपली आई, बहीण, बायको जिथं कुठं कामाला जात असेल, शिकायला जात असेल तिच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आज मनापासून काळजी वाटते आहे हे सत्य. आजपासून संध्याकाळ झाली की १० कॉल झाले तरी चालेल पण काळजीपोटी चौकशी करत राहू अशी शपथ घ्या. समाजात जगायचं असेल तर फक्त नाव, पैसा पुरेस नाही तर आज भीतीची गरज आहे. भीतीने बचाव म्हणून सतर्क राहून कार्य करा, राहा, जगा. कारण दरवर्षी दसऱ्याला रावण जळतो पण जळताना हसत मरतो कारण त्याला माहिती आहे. हा मनुष्य मला जरवर्षी जाळतो पण मी कोणत्याही स्त्रीला स्पर्श देखील केला नाही, आणि हास्य यासाठी करतो आणि म्हणतो आज मला जाळलं पण तुमच्यात अजून रावण शिल्लक आहे. म्हणजे खरा रावण जिवंत आहे. तो मेलाच नाही. फक्त कधी निर्माण होईल कुणाला माहीत नाही इतकच, म्हणून काळजी घ्या स्वतःची...!

       जाता जाता एवढंच सांगेन जगात प्रत्येकाला आई आहे, जगात प्रेम आहे जिव्हाळा आहे, माणसाला आवाज आहे, शब्द आहेत, बुद्धी पण प्लस पॊइंट मध्ये आहे. एकदा बालपण आठवा आई आठवेल फक्त आईचे कर्तृत्व आणि त्याग तथा योगदान लक्षात ठेवा बस...! माय-बाप, माता-भगिनीला माझा सल्ला आहे आपल्याची काळजी घ्या, स्टाईलने जगणारी पिढी आहे, कॉपी-पेस्टची नीच प्रवृत्ती समाजात कुठ तरी उदयास येत आहे. अंधारात रावण आहे रावणात महिला द्वेश नव्हता पण बदनाम झाला आणि "बदनाम राक्षस बननें देर नही करता"

काळजी घ्या ! स्वतःला जपा !! सतर्क-सावधान राहा...!!!


धन्यवाद...!!!

Saturday, 23 November 2019

कर्माची फळं...!

शिर्षक :- आयुष्यात एक न एक दिवस कर्माची फळ चाखायला मिळतातचं...

लेखन - पत्रकार एन.के.: ८८०६६०५८५२

[ ज्या अर्थी लहान का असेना सक्षम जिवनगाडा ओढत आपण जगत असतो आणि या जगण्यात आपल्या सभोवताल लहान सहान किंवा आपल्या गस्ती (सोयरीक ; मित्र, नातलग ) मधील लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नात्याने भेटत असतात या नात्यांची सांगड घालताना आपण दिलेला त्याना भाव, वागणं यातून आपल्या मनाची कर्मेद्वार कळून जातात. सेम असेच आपण बाहेरच्या जगात वावरताना जसे आपण वागतो "तसे" कर्मफळ आपल्या हयातीच्या जिंदगानीत मिळत राहतात. ]

      भगवत गीतेमध्ये म्हंटले आहे की "कर्म करत जा फळाची चिंता करू नकोस." खरचं कर्मच माणसाचे सर्व काही आहे. माणसाचे बाबतीत जे काही आज घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत. कर्माच्या बाबतीत माणूस बेफिकीर बनतो खरं पण त्यानंतर आज ना उद्या त्याच रस्त्याने जाणार आहोत आपण याचा विसर मात्र पडून जातो. शिर्षक प्रमाणे फार काही लांब नाही स्वार्थी कातड्यापासून थोडं सोयरीक बाजूला करून घेऊन जगायला शिकण्याची आज गरज आहे पण त्याची प्रचिती माझं शेजारच्याला यावं या विचाराने आजचा माणूस ग्रासला आहे सत्य. म्हणून आपल्या आज ना उद्याची चिंता करून रक्त आटवून घेण्यापेक्षा "Believe on कर्म" जाणून घेणे बंधनकारक म्हणायला काय हरकत आहे. म्हणून माझ्या विचाराने मी विशद होतो जे काही कर्म झालेत त्याची फळे आज आणि आजच्या ह्या जन्मीच मिळणार आहेत एवढं ग्राह्य असावं. जर जन्मतः चांगलं केलं असेल किंवा हयात जिंदगीत जर चांगलं केलं असेल विचाराने आणि आपल्या सभोवताल असणाऱ्या सजीव असो निर्जीव असो या सगळ्या सोबत असणारी कनेक्टव्हिटी जर उत्तम असेल चांगली आणि डिस-कनेक्टव्हिटी असेल तर भोगाची सरशी जीवनासोबत आहे एवढं जाणून जावं माझं मत. अर्थातच जे तुम्ही करता, राहता, वागता आयुष्यात तुमच्या कडून जे घडलं आहे याची नोंद कुठं ना कुठं होत असते न पुढच्या जन्म बघायला कदाचित परमेश्वराला सुद्धा वेळ नाही त्यामुळे योग्य वेळी या मोबदल्यात तुमची चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून पदरात पडत असतात एवढं जाणते व्हा. खूप दिवसांनी लिहायला घेतलं तस सारांश आणि पिन अगोदरच केलेलं पण आज वेळ मिळाला म्हणून मध्यरात्री लिखाण करतोय अनुक्रमे कर्म आणि फळे यावर संदर्भ झाला पण मी म्हणतो किंवा आपल्या ज्ञात असणारे सर्वजण ह्या विचारातून नक्की गेलं पाहिजे म्हणजे की, किंवा गेले असतील बहुदा आपण किती ही चांगली काम करू पण मानव म्हटलं की एक क्षुल्लक चूक झालेली असते किंवा होते तीच चूक लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात म्हणजे केलेली चांगली कामे विसरली जातात अलगद पण चुका मात्र अलगद आणि कायम स्मरणात राहतात. म्हणतात ना "Choose Ur Wors Voicely" जितके बोलायच तितकंच बोलायच जास्त बोलायला जायचं सुद्धा नाही हे सज्जड ऍक्शन ऍक्ट समजा हवं तर. भावनेच्या भरात क्षणार्धात व्यक्त झालेलो असतो आपण तेच कुठं ना कुठं पुढच्याच्या मनाला लागून जात आणि आयुष्य भराच दुखणं होऊन बसलेल असत.
         अच्छा मग राहायचं कस अस पण प्रश्न पडतो तेव्हा मी सल्ले द्यायला कोणी मोठा उपदेशक नाही पण जे पटलं ते लिखित स्वरूपात आपल्या समोर विशद होत आहे इतकंच. मग तात्पर्य इतकंच सांगेन की परिस्थिती समजून घेऊन रिऍक्ट व्हा आणि रिस्पॉन्ड करा. आपल्या हातून होणारी कर्मे ही आपली फलश्रुती असतात. चांगल्या फळ प्राप्तीसाठी एक सुंदर उपाय आणि ऑप्शन आपल्याजवळ आहे म्हणजे की चांगले विचार ठेवले तर प्रत्येक क्षणी वाईट कमी करून चांगलं जास्त घेतलं तर हातून नक्की सदकर्म होत राहतील आणि प्लस्पॉइंट म्हणजे समाधान. कोणाच्याही बद्दल किंतु परंतु असल्यास सकारात्मक विचाराने ते बदलू शकतो. अनेक वेळा आपण अनेक गोष्टींना गृहीत धरतो एखाद्या माणसाबद्दल मत बनवण्या अगोदर आपण जर त्याच्याशी जर सुसंवाद साधला तर कित्येक गैरसमज दूर होतील न नाती शाबूत राहतील.

    "आयुष्यात शहाणपण यायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते; म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपली कर्मेच त्याला सुंदर बनवणार आहेत."

धान्यवाद...!

[ लॉंग टर्म नंतर लेख पूर्ण करायला वेळ लागला त्या बद्दल दिलगिरी ] 

Tuesday, 3 September 2019

नात्यांचा रिचार्ज...

लेख शिर्षक :- रिचार्ज नात्यांचा : लाइफटाइम विथ अनलिमिटेड

【 नाते तोडताना १०० वेळा विचार करा की आपण हे नातं निर्माण का केलं, आणि इतके दिवस का टिकवलं...?, प्रेम करणारी प्रत्येक नाती आणि एक व्यक्ती व्यथित जीवन म्हणून जगण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावं अस लेखन बाय मी...】

लेखन - पत्रकार एन.के.

माणसाच्या आयुष्यात जगणं म्हणजे काय हे अजून प्रत्येकाला उत्तम उमजल आहे असे नाही. कारण कोणताही मनुष्य असो किंवा व्यक्ती ती आजही जगण्याच्या शोधात अर्थात सुखाच्या शोधात आहेत हे नक्की. आपण दैनंदिन जीवन जगत असताना कधी सुरवात तर कधी एन्ड ला घेऊन नाराज होतो आणि दिवसभरच्या कष्टाने कमावलेल्या आनंदी क्षणांना क्षणात दूर करून जातो. जगण्याच्या पंक्तीत आजही माणूस हा प्राणी भुकेला आहे मग ते धन, दौलत असो किंवा सुख यासाठी माणूस आजही कष्टाच्या झाडाखाली वास्तव्य करत आहे.
नात्यांची सांगड घालताना मनस्वी आणि कल्पक नात्यांची पाखरण होते. मनस्वी नाती तात्पुरती नसतात तर काळजी करणारे असतात, आपल्याला आपल्या राहणीमान बद्दल उद्देशून संबोधणारे असतात, आयुष्यभराच्या सोबतीनं जगण्याची कमिटमेंट करणारी असतात, पुढच्या व्यक्तीच नातं चिरकाल टिकाव यासाठी धडपडणारी आणि प्रसंगी जीवाचे रान झाले तरी नात्याला गालबोट न लावणारी ही मनस्वी नाती जी आज विश्वासाने आणि मानापासून प्रेम बंधनात तर कुठं एक आई-वडील, भाऊ-बहिणीच्या नात्यात त्यांची प्रखरता दिसते. तर याउलट कल्पक नाती म्हणजे फक्त नात्याला आपल्या आवेश आणि भावेश मध्ये गुरफटून स्वार्थी आस धरून टिकवली जाणारी ही नाती, सुदंर दिसण आणि सुंदर असणं याच काडीमात्र स्पर्श न घेता निवळ आकर्षणाच्या मुद्द्यावर कामपूरता मामा म्हणून जपलेली नाती म्हणजे कल्पक नाती असे संदर्भीय नातीचे प्रकार आज मानवाच्या जीवनात पाहायला मिळतात.
जीवनाचा प्रवास सुखाचा चालेलल असत पण या प्रवासात सोबत म्हणून असणारी घरची नाती एका बाजूला आणि आपल्या असणाऱ्या मनातल्या विविध आशा आणि वैचारिक जगण्याला खत पाणी घालून काळजीने रोपटं मोठं करणारी नाती आपल्याला मिळतात. विश्वासाच्या झाडाची उंची खांद्याच्या वर गेली की मग ते नात घट्ट आणि चिरकाल टिकणार म्हणून गणले जाते. आपण बनवलेली नाती ही वेगळ्या उंचीची असतात त्या नात्यातील पुढच्याच मन धरणी करून जगणं आणि त्याच्या पुढ्यात असलेली आपली चांगली प्रतिमा मलीन न होऊ देता त्याला जपून त्याची निगा राखणे म्हणजेच नात्यांची जोड मजबूत करणे. काही वेळा असे घडते की लहान सहान गोष्टी चुकीच्या घडतात तेव्हा ह्या नात्यात असणाऱ्या परामर्शला खंत वाटून जाते तेव्हा ही नाती समजून उमजून आपल्याला पर्यायी मार्ग निर्माण करतात जेणेकरून ही बनलेल्या नात्यांना तडा जाऊ नये म्हणून राग रुसवा फुगवा निर्माण होतो पण त्या रागाच्या आणि फुगव्याच्या पाठीवर एक प्रेम , जिव्हाळा लपलेलं असत आणि हे तेच सांगत असत की नातं जपलं का ? नात निर्माण का केलं ? आज चूक तुमची असो वा त्यांची पण त्यामुळे झालेला अंतर्गत खेद नात्याला पटरीवरुन खाली खेचतो आहे का ? याची सांगड घालून ते हक्काच नात कायम उत्तम राहावं यासाठी प्रयत्न करून त्यात पुनः प्रेम भरून जोमाने जगणाऱ्या नात्याला समानार्थी शब्द म्हणजेच ही मनस्वी नाती.
म्हणून ज्या नाती आहेत त्यांची कदर करा आणि त्याला अधिक सुंदर बनवा आणि सोबत राहा, जस आपल्याला नात हवं तसं घडावा न कायम सोबत करा कारण की आपण सगळेच निसर्गाचा समताेल ढासळसाय, शुष्क झालाय असं म्हणून जातो पण आपल्या अंतर मनाचा निसर्गही असाच झालाय ह्याची खंत आहे का? भावनांचे ऋतु व्यवहारी झळांमुळे कसे झाकाेळून गेलेत, काेरडे झाले आहेत ह्याची आपल्याला जराशी जाणीवही नाही.जे अंतरंगी घडतयं तेच बाहेर प्रतीत हाेतयं...हे आतले ऋतु जेव्हा पुन्हा भावनीक शिंपणांनी बहरतील,जेव्हा हे हक्काचे आणि मनापासून बनवलेली नाती जपण्यासाठी धडपडले जातील तेव्हाच बाहेरच्या निसर्गाच्या प्रतीची संवेदनशीलता वाढेल आणि त्याची काळजी घेतली जाईल.
म्हणून जाता जाता एक चार ओळी ( संकलित )
"कुणी काहीही म्हणाे प्रेम तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खूप बदलतं. तुम्ही प्रेमात पडण्याआधी जसे असता , प्रेमात पडल्या नंतर मात्र तुमच्या आेळखीच्या खूणा तुम्हालाच शाेधाव्या लागतात. प्रेम यशस्वी ,अयशस्वी असं कधीच नसतं ते फक्त असतं. अशी व्यवहारीक परिमाण त्याला लावू नयेत. सगळ्या व्यवहारी शृंखला प्रेमात सहज तुटल्या जातात...अहंकार, राग, हेका ह्या भावना प्रेमापुढे नतमस्तक हाेतात. जपणूक , काळजी ,आठवणींमधे 'मीपण' कधी गळून पडतं ते कळतच नाही....आपण एकच गाेष्ट जाणताे ती म्हणजे आपलं कुणावर तरी प्रेम आहे...आणि ते खूप सुंदर आहे...!"


धन्यवाद ! मो.- ८८०६६०५८५२

Friday, 23 August 2019

अश्रु छळतात..!

कवितेचं शिर्षक - का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!

लेखन - पत्रकार एन.के.
मोबाईल - ८३२९१४१४४३

प्रेमाच्या छायेत मीही विसरलोय स्वतःला म्हणून इतकं काळजी करतोय तुझी कारण जीवन आहेस तू माझी,
जगणं खूप खोटं आहे त्रास होईल तुला पण जप कायम स्वतःला कारण नात टिकवण्यासाठी केलेली ही धडपड मी अनभवतो तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य करेन खर्ची माझी ! .....१

प्रेम प्रत्येकाला मिळत अस नाही पण जे मिळालं आहे त्याला जपायला शिक मनाने जोडलेली नाती कटू असतात, भावुक असतात पण बेवफा नसतात ,
राग, आणि लोभ ,मोह मत्सर पावलो पावली मिळेल पण निस्वार्थ जगायला शिक कारण आपल्या सच्चा मनाला पटलेली गोष्ट कधीही आपल्याला ठेच पोहचवणारी नसतात ! .....२

मानापासून प्रेम केलेली माणसेच आपल्याला त्रास देतात, मानसिक करतात कारण तुझे हाल ते सहन करू शकत नाहीत,
पुढची व्यक्ती मनाने आपल्यात गुंतून आपलं सर्वस्व तुम्हाला अर्पण करत असेल तर समजून जा की तुमच्या प्रेमात खूप मोठं यश आहे कारण ते तुम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत ! .....३

मनाच्या कोपऱ्यात बनलेली नाती ही मनापासून निर्माण केलेली असतात त्याला ईश्वराची देणं असते,
कुठल्या ना कुठल्या प्रवासात भेटलेली माणसे लाख मित्र बनतात पण प्रेम म्हणून उदयास आलेली ही उपमा नामक नातं मात्र खुद्द ईश्वराने तयार केलेलं असत ! ....४

इतकं मेहनत करून बनवलेली नाती जेव्हा आपल्यावर रागावतात, भांडतात तेव्हा संयम ठेव ते राग क्षणिक असत पण प्रेमाने आणि काळजीने केलेली उद्धट पण प्रेमळ वागणं असत,
एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी ह्या जगण्याला आपण नाही समजलो न रडून मोकळे झालो तर त्या माणसाला पण गमावण्याची वेळ येते कारण रडलेलं प्रत्येक अश्रूचा प्रत्येक थेंब त्या माणसावर असलेलं विश्वास कमी करत असत ! ....५

मग त्या पुढच्याच मन सुद्धा तुला कायम प्रश्न करत असत...

का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!

का ग ..? काय चुकलं माझं...?? आज अश्रूनाही कंठ फुटला होता..!

Monday, 5 August 2019

सुखाच्या रस्त्याची शोध मोहीम...!

शिर्षक :- गड्या सुखाचा रस्ता लय खडतर हाय र...
लेखन :- एन.के. (पत्रकार)
मोबा - ८८०६६०५८५२


"जुबानी जिंदगी की ना सुनो गैरोसे जीना तो अपने को है, जीना क्या होता है औरोसे क्या पता चलेगा चलना तो अपने को है...!" जीवनाच्या वाटेवर चढ उतार पाहणारे आपणच आपल्या जीवनाचे खरे वाटाड्या, दिशादर्शक असतो. जगण्याच्या पंक्तीत तुम्ही आम्ही फक्त आलेल्या रस्त्याला पार करत जायचं असतं, बाकी होणाऱ्या अपघाताला आपल्या मनाने बाजूला करता आलं तर बरं. नाही तर अपघात हे ठरलेलं आहे. कारण सुखाच्या पाठी लागलेल हे जग कुणाच्या ठेच लागण्याला कुणाची कदर करत नसते. इसलीये केहते है की- सुखाचा रस्ता लय खडतर हाय गड्या म्हणून जगा असे अभिमान वाटल पाहिजे, रहा असे की कौतुक वाटलं पाहिजे. हा पण लाईक्स साठी नाही तर जगासाठी जगायचं यासाठी कोणता रस्ता धरायचा थोडक्यात...
कुणाच्या जगण्याच्या रेषेवर आपण जळून चालत नाही तर त्याउलट आपण जर चांगली रूपरेषा असेल तर आनंद घ्या आणि सोबत अनुभव, जर रूपरेषा वाईट असल्यास न जळता त्या रेषेला कानाडोळा करा अगर दुर्लक्ष करा. पण आपण ज्या अर्थी एखाद्याला चांगलं देतो तेव्हा उलन का होईना आपल्याला चांगलं मिळणार हे लक्षात ठेवून जगा. पण आजच्या या बाजारात प्रत्येक माणूस स्वार्थी तर बनला आणि स्वतःच्या स्वार्थाला तात्पर्य म्हणून सुखाची आस धरून बसला आहे मग कसं जगणं पूर्ण होणार कारण स्वार्थाची जोड धंदा घेऊन कुणाचं प्रॉफिट झालं नाही. म्हणून आपलं बजेट नेहमी सर्वार्थाला अर्पण असलेलं असावं म्हणजे ही भाषा जरा धार्मिक झाली पण नक्कीच रुचणारी आहे म्हणून शब्दप्रयोग केला मी. म्हणजे माझ्या सांगण्याचा आणि विचाराच्या एक रस्त्यावरून अनुभवाची शिदोरी घेऊन निस्वार्थ भावनेने केलेले सदकार्य हेच तुम्हाला सुख नावाच्या महालकडे घेऊन जाणार आहे.
साधारण विचार करू आपण अनेक सोशल मीडिया बघत असतो वापरत असतो तेव्हा एखादे चांगले काम असेल तर आपण लाईक सहज करून जातो; पण कधी एस.टी. स्टँडवर मागायला आलेल्या चिमुरडीला कधी १-२ रुपये सोडलं तर कधी खायला दिलं तर कीती समाधान वाटत एकदा नक्की अनुभवा. आणि अगदी स्वच्छन्द मनाने करा बर कारण आज काल ट्रेंड झालाय त्याच्यापण काही गरिबांना जेवू घालून व्हिडीओ करून Tiktok वर अपलोड करायचं. आणि लाईक्स मिळवायच्या असे नको मनात आलं म्हणून नाही तर मन मोठं करून मदत करा आणि मग बघा समाधान कस असत ते आणि एक सांगू का ह्या समाधान शब्दात जितकी ताकद आहे न ते असलं ना तर सुख मुबलक आहे हे विसरू नका. निजी जीवन जगणाऱ्या तमाम जनसमुदाय बघतो आपण कुणाला कुणाची कदर नसते, कुणाला कुणासाठी वेळ नसतो, कोण आलं, गेलं, काय तर कोण मेल हे ही विचार न करणारे आजचे हे लोक आजचा हा कलियुग म्हणून आपल्या कर्माला कोणी तात्काळ फळं देवो न देवो "देव" देईल या आशेने का होईना सुंदर आणि क्षणिक सही पण मदत, दान, धर्म, प्रेम, जिव्हाळा, नातं, मैत्री ही जी पान आहेत ना ती दिवसातून एकदा तरी गरजू साठी बाहेर काढत जावा. समाधान मिळेल आनंद मिळेल आणि यातच सुखाची व्याख्या लपलेली आहे. म्हणतात ना *"येताना मोकळे हात घेऊन आलेलो न जाताना ही मोकळं जायचं असत...*"
जाता जाता सांगून जातो - रीती, रिवाज, रूढी, परंपरा जपा त्यात अभिमान आहे आपल्या देशाचा चेहरा आहे तो. ईदला- गले मिलो, दिवाळीला - चाचाला पुरणपोळी भरवा यातून मिळणार स्नेह, बंध, मैत्री, नातं शब्दाच्या पलीकडे आहे. सोळा सोमवार, सतरा-साठ व्रत-उपवास करून कोण आज पर्यंत सुखी झालं नाही ना मोठं झाले...! फक्त निर्मळ मनाने प्रत्येक वाईट-चांगला प्रत्येकाला त्याच्या पेक्षा किंचित का होईना प्रेम द्या. गरजुला मदत दान द्या. आणि घरी, आई-वडील यांना कुटूंबाला वेळ द्या, मग त्यानंतर बघा आनंद कसा फुलतो. आणि एकदा आनंद असेल तर सुखाचा रस्ता कितीही खडतर असुद्या अलगद पार होत आणि "सुख" आपल्याच पारड्यात...!


धन्यवाद...!