Thursday, 17 March 2022

शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !

 शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !


लेखन : पत्रकार एन.के.

[ होळी अर्थात त्या संस्कृती आणि परंपरेची जोड म्हणून साजरी केली जाणारी होलीकात्सव, या दिवशी रावणाच्या प्रतिमेला म्हणजेच वाईट विचारांना पेटवून, चांगल्या विचारांची आरास व्हावी यासाठी केली जाणारी ही होळी, मनुष्य प्राणी जितका विचार करतो त्यात कितपत चांगले विचार असतात पाहायला गेलं तर कमबुद्धी विचार जास्त आणि चांगली प्रात्यक्षिक सोडले तर एखाद्या बद्दल चांगली वैचारिक विचारसरणी मात्र शून्य असते, स्वाभाविक माणूस ज्या ईश्वराने ज्या प्रकरतीने बनवलं, तस स्वार्थी टॅग लावून बनवलं असावं अशी घृणा विचार आल्याशिवाय राहवत नाही. होळीला शिमगा ही म्हणतात, शिमग्याला बोंबलल जात पण कधी आपण विचार केलाय का कायम आपण कुठल्या ना कुठल्या विचारांवर, संकुचित वृत्तीवर, अमुक व्यक्तीवर बोंबलत असतो, इतकं असताना आज एक चांगलं विचार त्या होळी अग्नी साक्षीने निर्धार करूया, मनाला पटेल तेच मार्ग, मनाला पटेल असच कर्तव्य, मनाला पटेल असंच वाटचाल वजा वागणूक मग बाकीचे असणारे जळक्या त्या ज्वालाना म्हणा - बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला ! ]


  होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


                   कृष्ण फाल्गुनची होते सुरुवात,
                   पाहिली जाते पौर्णिमेचि वाट
                  चंद्राचा प्रखर असतो प्रकाश,
                होळी या सणाची होते सुरुवात
             होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।१।।

         उगवतो नवीन दिवस, उजळते नवी पहाट,
              सुरु होतो मग, रंगांचा वर्षाव
           खूप उधळतो गुलाल आसमंतात,
         येते स्मित हास्य, सर्वांच्या चेहऱ्यात
         होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।२।।

      आज देशभरात होळीचा सण साजरा होत असतांना मनातील वाईट विचारांची होळी करून संकल्प करण्याचा हा दिवस ,निसर्गाच्या विविध रंगानी जसा फळा फुलांचा दर्पण येतो तसा ,हा ऐक्याचा आणि आनंदाच्या रंगाचा उधळण करणारा सण बहरलेली वने ,पशु पक्षाचा चिवचिवाट, रानातील लयबद्ध संगीत ही मानवी मनावर्ती किती अधिराज्य करतात. हीच खरी होळीची ओळख. निसर्गाने आपल्याला दिलेली जी ऐक्य, सौंदर्य, माधुर्य हे आपण आज खऱ्या अर्थाने जपायला हवं, होळी हा पवित्र सण असला तरीही आपल्यातला रावण अजून मेलेला नाही, आपल्या कर्मातून झालेल्या नुकसानाची होळी अभी बाकी है ! खुप दिवसानंतर लिहिण्याचा योग आला, पण आज काही विषय लिहायला घ्यावं अस वाटलं सायंकाळी बोंब मारण्याचा आवाज कानावर आला मग विचार केला की बोंब मारणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि ते होळीला नाही तर रोज बोंबलत असतात, आज बोंब मारणाऱ्यांना सणाचं कारण असत, तर रोज बोंब मारणाऱ्याचं वेगळं लॉजिक असत - द्वेष, मोह, मत्सर, जळफळाट हा मुख्य कारण असतो, अन अशी डिजिटल बोंबाच्या बाराखड्या प्रत्येकाच्या उरावर बसलेले असणार हे नक्की. म्हणून आज आपण निर्धार करूया की रोजच्या रावणाला मग आपल्यातला असो इतरांच्यातला पण नक्की संपवू, अर्थात होळी रे होळी मध्ये राख करू.
       मनुष्य इतका हुशार प्राणी आहे की त्याचे रंग इतके असतात ना त्याची गणना आकड्यात करणे अशक्य आहे. रोज नाही तर प्रत्येक क्षणाला , परिस्थिती नुसार रंगबदलू गिरगीट अर्थात माणूस. माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वतःमुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवतत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम धृवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. विचार शब्द लहान वाटत असला तरी त्याची उंची आणि परिणाम मात्र अभाळाएव्हढं आहेत. प्रत्येकाचे जिवनमान, प्रत्येकाची पारख, प्रत्येकाला मनाच्या कप्प्यात - कक्षेत  समजून घेताना कामाला येणारे सर्वात ताकदवर अस्त्र म्हणजे विचार आहे अनेक वेळा आपण यावर शब्दांकन करून झालेलं आहे. आज ह्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक निर्धार वजा शपथ घेऊया की मागे बोलणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात, पुढे गोड बोलून पाठीमागे बोंबलनारे पण हजारो आहेत. त्यांना मनाच्या एका लाईन मध्ये उभं करून कप्प्यात घेऊन मारा म्हणावं बोंब, हात दुखेल पण थांबणार नाहीत कारण वर बोललो ना आपण कारण विचारसरणीचं जर मलीन असेल तर बोंबाटा तो बनता है ना बॉस !
      मग ठरवल ना की, पिछे भोकने वाले कभी आगे आके दहाड नही सकते ! म्हणून प्रत्येक माणूस पकडून चालू, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ, विशेषण असणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याचा मागे एखादा तर चुगल्या असतो, जळणारा असतो, स्वार्थी नावाच्या रंगाच्या डब्याने रंगपंचमी खेळलेला असतो , मोहाच्या आणि द्वेषाच्या रांगेतून खरेदी केलेली  बुद्धी सत्व माणसं असतात. मग यावर उपाय काय तर एकच आपण लॉयल राहायचं, आपलं कर्म, धर्म, संस्कार कायम ठेवत ठेवायचं, म्हणजे परीणामी आपल्याला सुंदर जगण्यातली रंग मिळतील आणि जिणं सुखाच होईल, मनावरचा अतिभार कमी होईल. जाता जाता एवढं सांगेन...-ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो. सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्याच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतुमध्ये त्याच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो ... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

        मी,
जमा करतोय आज
तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्या-दाव्याचं गवत..
होळीत दहन करायचं आहे,
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे..
तुम्ही करता का थोडी मदत..?
             आज..
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र,
काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा इत्यादी..
झाकायची आहे त्याच रंगात..
जात, धर्म, कर्म अन बरचस काही..
फक्त माणूस कळला पाहिजे,
इतकीच सरळ अन् साधी..
माझी मागणी आहे.. ( संकलित )

            - धन्यवाद ! 

Monday, 14 February 2022

व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला...! )

शिर्षक: व्हॅलेंटाईन डे'ज : प्रेमाचा आठवडा ( पाश्चात्य संस्कृती मधला... )


  जगात आता प्रेमयुगल असो प्रेमाच्या माणसाला प्रेम व्यक्त करणारा आठवडा म्हणून फेब्रुवारी मधला हा पूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन डे च्या नावाने प्रचलित होतोय. नवीन तरुण तरुणी असतील किंवा मनात असलेल्या प्रेमाच्या भावनेला व्यक्त करून एक प्रेमळ नात्याला जन्म घालण्याचा आठवडा म्हणून याकडे पाहिलं जातं. गिफ्ट, डेट, भेट, अमुक डे तमुक डे च्या नावाखाली आज कालचे नव्या भविष्याची चेहरे आज एक यशस्वी का अयशस्वी नात्याला हात घालत आहेत याच गणित मात्र न सुटलेल आहे. ह्या पाश्चात्य संस्कृती वर अनुकरण म्हणून भारताची एक साधारण वयोगट किंवा साधारण टक्केवारीचा गट लयास जातोय का , संस्कृती पायदळी तुडवली जात आहे का याची शास्वती मात्र अद्याप अदृश्य आहे. आज खऱ्या मनाने किंवा कुंडली आणि गोतावळा मिळून तयार केलेली नाती कित्येक कोर्टात धूळ खात पडल्या आहेत. असे असताना प्रेम ही संकल्पना खोटी का ? प्रेम म्हणून असणारी सद्भावना संपली का ? नाती आजपण खोट्या बनतात का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की नाही असेल पण ओघाच्या काळोखात कित्येक नाती बनतात आणि मनाला ठेच लागून दुर्दैवी दुर्घटनेच्या शिकाराला बळी पडत आहेत, पडतात तेही तितके महत्वाचे. मग याचे अनुकरण करावे किंवा नाही ? किंवा कितपत योग्य आहे याची खात्री करायला ही तितकेच महत्त्वाचे आहे. जगभर आपल्याला हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रत्येक संस्कृतीत सापडतात. या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके जगात लिहिली गेली आहेत. हत्या-आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे स्त्री-पुरुष प्रेम किंवा आकर्षण हा कुणा एका संस्कृतीचा मक्ता नाही. याचा अर्थ ही भावना बायालॉजिकल आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! अस म्हणत एक नवी पिढी वेगळ्या संस्कृतीला दृढ करत आहे म्हंटल तर वावग ठरणार नाही. यापेक्षा या पिढीला एक चांगल्या आणि सज्जड समज असो वा खऱ्या व्हॅलेंटाईनची ओळख करून देणे भविष्यात किंवा आता सध्याच्या काळाची गरज पालकांना आहे असे म्हणावे लागेल अन्यथा अनेक अशी कारणे, अनेक घटना, अनेक असे अनपेक्षित तात्पर्यना सामोरे जावे लागेल हे नक्की.
     आज पण आपण आपल्या पाल्याला म्हणून किंवा किशोर वयातल्या हरेक त्या कपलला आता समज देऊन अशा संस्कृतीच अनुकरण करायला बंद करायला हवं अन्यथा नको असलेल्या लाक्षणिक नात्याने अनेक कुटुंबाची डोकेदुखी वाढवू शकते. खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन म्हणजे काय याची प्रचिती अजून कुणाला आली असेल का नाही माहीत नाही आठवडा भर तयारी इ. असणारी ही मुलं नक्की करतात काय आणि कोणत्या कल्पक गोष्टीकडे वाहिली जाताहेत याच गूढ मात्र मनात कायम असत..!
  जसे की कुणीतरी आपल्याला विशिष्ट दिवशी गिफ्ट देणं, आपणही कुणाला तरी एखादी भेट आठवण म्हणून देणं अशा संपूर्णपणे भौतिक असणाऱ्या घटकांचा सध्याच्या जगात बोलबाला दिसून येतो. भेटवस्तू देणं नक्कीच चुकीचं नाही तरीसुद्धा अशाप्रकारेच प्रेम व्यक्त केले जाते किंवा तसेच ते सिद्ध केले जावे हा अट्टाहास चुकीचा नाही का? अशा भेटवस्तू किती दिवस या भावनेला न्याय देऊ शकतील? मला वाटतं, फक्त काही दिवस किंवा फार तर त्या वस्तूचा वापर होतोय तोवरच. सतत "लव्ह यु" म्हणून जर प्रेम सिद्ध होते असा समज असेल तर तो गैरच आहे. कारण या दोन शब्दांचा फक्त आधार घेतला गेलेला असतो. खरी भावना तर यापासून कोसो दूर असलेली दिसते. "लव्ह यु" या शब्दाने जर प्रेम अबाधित रहात असते तर समाजातील शेकडो प्रेमविवाह मोडलेच नसते बरोबर ना..?
   प्रेमाचं ना टिकवायच असेल तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप जास्त खोल प्रेमाची भावना रूजलीय तर तिची खोली तितक्याच उत्स्फुर्तपणे बाहेर उफाळून यायला हवी ना? मुळातच प्रेमाची भावना ही पवित्र आणि उदात्त अशी असल्याने तिचे महत्त्व फार उच्च आहे. तिला भौतिक गोष्टींचा आधार द्यावा लागत नाही. ती कोणत्याही नीती-मुल्यांच्या पाशात अडकणारी नाही. सामाजिक मान्यतांच्या पल्याड जाऊन ती आपले अस्तित्व टिकवून ठेवताना दिसते. तिच्यावर, त्याच्यावर किंवा आपल्या इतर कोणत्याही नात्यावर आपले खूप प्रेम आहे हे वेळोवेळी, अगदी छोट्या छोटया प्रसंगातून समोरच्याला जाणवले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, सतत आपल्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात राहिलेच पाहिजे. परंतु त्या "व्हॕलेंटाईन" असणाऱ्या व्यक्तीसाठी दिवसातला किमान वेळ तरी फक्त त्या व्यक्तीचासाठीच असायला हवा ना? आपल्या प्रिय व्यक्तीची एखादी लहानशी आवड लक्षात ठेवून ती योग्य वेळी पूर्ण केली तरी  ते समोरचे मन आनंदाने नाचू लागते.
    आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. आपण ती लिलया सांभाळत असतो. तरीही प्रत्येकाच्या मनात एखादी "खास" अशी व्यक्ती असते तर तिला तशीच "#खास" वागणूक मिळायला हवी ना? इतरांपेक्षा थोडे जास्त महत्त्व त्या व्यक्तीला असायला हवे ना? परिस्थिती कशाही असोत, जर आपण आपल्यासाठी "खास" असणाऱ्या व्यक्तीसाठी "लव्ह यु"च्या पलिकडे जाऊन तिला जपत असू, पैसा, गिफ्ट किंवा तत्सम भौतिक गोष्टींना वगळून आपण तिच्यासाठी प्रेमभाव प्रदर्शित करत असू, त्या व्यक्तीचे मन समजून घेत असू तर ते खरे प्रेम असेल. अशा नातेसंबंधात हक्क आणि कर्तव्य यांची सहजसुंदर सांगड घातलेली असावी. मग अशा प्रेमाच्या नात्यात "लव्ह यु" आणि "हॕप्पी व्हॕलेंटाईन डे" म्हणण्याची गरजच पडणार नाही. कारण जगातील सर्वात महत्त्वाची, अमूल्य अशी गोष्ट असते ती म्हणजे आपण समोरच्या प्रिय व्यक्तीसाठी खर्च केलेली वेळ. जर ही वेळच आपण देऊ शकत नसेल तर बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात.म्हणून एक सात्विक विचार घेतला तर व्हॅलेंटाईन हा आपला सण नव्हे, करायचा आहे साजरा तर कायम नात्याच्या महत्वकांक्षा बघून व्यक्त व्हा..! 
      म्हणून इतकंच सांगतो, आपल्या कोणत्याही नात्याला काही द्यायची इच्छा असेल तर आपला थोडासा वेळ, खास तिच्यासाठी, त्या माणसासाठी, त्या वस्तूसाठी, त्या नात्यासाठी राखून ठेवला तर ते नाते चमकून उठेल. प्रत्येकाने असा प्रयत्न एकदा करूनच बघा. तुम्हाला कोणतेही स्पेशल डे साजरे करण्याची गरज पडणार नाही.


  लेखन : पत्रकार एन.के.
  मोब. ८८०६६०५८५२

Tuesday, 4 January 2022

व्यसन : मोबाइलचं !

 शिर्षक : व्यसन मोबाईलचं !

लेखन : पत्रकार एन.के. ( ०४ जाने २०२२ )
  


       व्यसन म्हंटल की डोळ्यासमोर अनेक मद्यजन्य पदार्थ तरळतात पण आजकाल सगळ्याच वयोगटातील लोकांचं एक मौखिक तथा आपण सर्रास म्हंटल तर एक व्यसन "मोबाईल".  एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य. मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही. लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे. मोबाईलच्या अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात जितकं चांगलं आहे तितकंच अनेक अक्षरजंजाळ असलेली ही वस्तू अनेकांच्या मदतीला नक्की येते पण घातक सुद्धा तितकीच आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नैतिक नाती, जिवंत नाती दुरावत आहेत हे तितकेच सत्य.  संपर्क आणि इतर महत्त्वाचे कामासाठी वापरले जाणाऱ्या ह्या साधनाचा अतिरेक होऊन मृत्यच्या दारात घेऊन जाणारा एक प्रवासी साधन म्हणून मोबाईल हळूहळू उदयास यायला लागला आहे अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. अनेक खेळ, अनेक ऑनलाइन ठग, पब्जी सारख्या खेळामुळे अनेक घटना घडलेल्या आपण पहिल्या असतील. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की मोबाईल जेवढ हवं तेवढं वापरा अतिरिक्त वापर कधी कधी माहीत नसलेल्या आजाराचं आमंत्रण ठरू नये तर मिळवलं.
मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा‌.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.

   धन्यवाद !
  

Monday, 30 August 2021

कर्माचं श्रेष्ठत्व...!

 जगण्यातल्या : कर्माचं श्रेष्ठत्व..!




         म्हणतात ना की आपले काम ज्यामुळे आपले पोट भरते, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे गुजराण होते त्याला कायम श्रेष्ठस्थानी मानणं हे आपलं प्रथम आद्य कर्तव्य आहे तथा असावे. अनेक जण आज परिस्थिती मुळे असो अथवा शिक्षण असो यामुळे एक सुनिश्चित कामापासून वंचित असतात पण काहींना ते मिळालेल असत त्यात समाधान मानणे अवघड जात असते. परमेश्वर आहे किंवा नाही हा भाग जरी दुसरा असलं तरी ही आपल्या अंतर्गत कृपेने, श्रद्धेने आपल्याला अर्धी भाकरी नशीब होते त्याला सोनं समजून त्याची प्रामाणिक चव चाखणे अर्थात प्रामाणिक पर्वाचे साक्षीदार होणे. वैध की अवैध आपल्या हातात जितक असत त्याहून अधिक आपल्या येणाऱ्या किंवा वर्तमान काळ ठरवतो की आपण कसे वागले पाहिजे, मनुष्य म्हणून प्रत्येक क्षण परीक्षेचा आहे, आणि त्यात अभ्यास करून उत्तीर्ण होणे म्हणजे त्या क्षेत्रात पारंगत होणे असे मानावे. भाग्य आणि कर्म ह्या आपल्या जगण्यातील महत्वाच्या दोन दुवा असल्या तरीही आपल्या वाटेस आलेल्या त्या फलप्राप्तीला आपले कर्मच जबाबदार असतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणून नमूद करू इच्छितो की आपण आता ह्या क्षणी कोणत्या पदावर, कामावर, कर्तव्यावर आहोत हे जर फळ असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आपले भूतकाळ मधील संघर्षमय कर्मच जबाबदार असतात. आपली बौद्धिक क्षमता अशी विचाराधीन असते की आपल्याला आपल्या विरोधातील लोक, जे आपल्या मनाशी जुळत नाही ते लोक आपल्याला कुठून तरी किंवा कायम टोचत असल्या सारखं सुखी वाटतात. जगात अशी चांगली माणसं ही आहेत जी चांगल्या प्रतिसादाला चांगलं आणि काही जण चांगल्या प्रतिसादाचा वाईट परतावा देणं धन्य मानत असतात. कधी कधी आपण चांगलं काम करतो आणि त्याच फळ वाईट मिळत त्याला आपण अपयश किंवा कायम त्या परताव्याचा मनधारणीला सत्य मानून बसतो अस न करता या उलट आपण एक सुंदर अनुभव म्हणून घेऊन चांगल्या कामाचा पाढा सुरू ठेवणे अर्थात शहाणपण.
     कर्मा इज मोस्ट इंपोरटंट म्हणतात तस कर्मच आपल्या जगण्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा अविभाज्य घटक असतो. अस असताना एक साहजिक प्रश्न पडणं गरजेचं आहे भाग्य महत्वाचं की कर्म ? मग एकच उत्तर सापडत ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वाटेल आलेल्या त्या प्रत्येक कृतीतून आपल्याला मिळालेल यश आणि आपल्या वाट्याला येणं अर्थात आपलं भाग्य...! #सुंदर कर्माचे साक्षीदार व्हा..! #आनंदी राहा....!
    
        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : ३० ऑगस्ट २०२१, वेळ : १०:३०

Sunday, 29 August 2021

वन्स अगेन हेल्प..!

उपकाराची वाच्यता नकोचं..!

        उपकार याचा समानार्थी शब्द अर्थात मदत मग ती मदत उदात्त भावनेने असो किंवा अडचणीच्या काळात असो त्याला समर्पक असे योगदान म्हणजे सर्वश्रेष्ठ सहयोग म्हणू आपण.  ‘उपकार फेडायचे नाहीत’ या वाक्याला दोन सावल्या आहेत. त्यातली पहिली सावली म्हणजे ‘काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात’ ही आणि दुसरी सावली म्हणजे ‘कोणतेच उपकार विसरायचे नसतात’ ही ! उपकार करत असताना माणूस कोण किंवा त्या अर्थी प्रतिसाद किंवा बहुदा प्रशंसा मिळावी यासाठी संकुचित भावना बाळगून असणारे आज भूतलावर मुबलक भेटतील. बऱ्याच वेळी आपलं अस महत्वाचं काहीसं असत आणि त्या अवेळी पण त्या परिस्थितीत उभं राहून केलेल्या व्यक्तिगत मदतीला अर्थातच उपकाराला एक किनार नसते किंवा त्याची परत फेड होणे अशक्य. त्याला कारण ही असंच आहे की काही उपकारच असे असतात, की त्यांची परतफेड होवू शकत नाही. असे उपकार फेडून विसरून जाण्यापेक्षा त्या उपकारांची जाणीव ठेवून त्याच प्रकारची मदत दुसऱ्याला करणे हीच खरे तर उपकारकर्त्याप्रतिची कृतज्ञता असते. परंतु अलीकडे कृतज्ञतेची जाणीव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देवून बाजूला केलं जातं. ज्या जिन्याने वर चढता येणे शक्य होते, त्या जिन्याचाच विसर पडतो आणि या घटनाक्रमाला जगरहाटी म्हणण्याची हिणकसता बऱ्याच वेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.

      आपल्या सर्वांवर झालेले माझ्या मात्यापित्यांचे, गुरूंचे व्यक्तिगत वाटचाल करीत असतांना सभोवतीच्या असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचे उपकार हे आपल्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग असून त्यावर आपण आपल्या सत्सत्विवेक बुद्धीचे सम्यकपणे भरणपोषण करीत असतो, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले माणूसपण जिवंत ठेवणे होय. आणि या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत, हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. उपकार फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, हा मौलिक विचार आजच्या घडीला सर्वांसाठीच कमालीचा उपयुक्त आहे, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल किंवा सांगणारा अस कोणी महारथी नाही अद्याप..?

        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : २९ ऑगस्ट २०२१, वेळ : ९:३०

Saturday, 28 August 2021

स्वार्थी लोकं आणि आपण...!

 स्वार्थी लोकं आणि स्वतःची बौद्धिक लढाई..!


    आपल्या जीवनात अनेक प्रकारची लोक येतात काही लोक आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात आणि त्या प्रती कोणत्याही अपेक्षांचं डोंगर नाही ठेवत. काही जण असे असतात की फक्त काम झालं की बस, त्यानंतर कोण माणूस महत्वाचा आणि किंवा नाती महातावाचो याकडे कोण लक्ष ही न देणारे असे द्विधा मनस्थितीची माणस आपल्याला रोज भेटतात. काही वेळा अशी आपली तारांबळ फारवेळा होते ते म्हणजे अस की ह्या अशा लोकांच पारख करण मात्र जड जातं. आपण कोणत्याही अमुक क्षेत्रात काम करत असू त्या त्या प्रत्येक क्षेत्रात एखादं चेहरा नक्की त्या मतलबी रंगाचा , स्वार्थी स्वभावाचा नक्की असतो. अनेक चेहरे तोंडावर सोबत चालणारी असतात पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी उपलब्ध नसतात हेही त्या प्रकारात मोडतात ज्याला आपण स्वार्थी म्हणतो आणि अशा प्रकारची माणसं जीवनात मुबलक भेटतात, अनेक वेळा प्रत्येकाला आपल्या माणसाचं सुख पचत नसत त्यांची होणारी जळफळाट त्यांच्या वागण्यातून प्रत्यक्ष निदर्शनास येऊन जाते. प्रत्येक माणसाची प्रतिमा तसेच त्यातील गुण जे काहींना काही अँटिक अस वेगळेपण असणारी प्रत्येक व्यक्ती जीवनात महत्वाची असते, पद आणि प्रतिष्ठा अनेक ठिकाणी नक्की कामाला येणार नाही अशावेळी मात्र त्या वेगळेपण जपणाऱ्या माणसाकडून काम होऊन जातं म्हणजेच प्रत्येक व्यक्ती म्हणून व्यक्तीच नव्हे तर आपल्या जिवनात प्रत्येक संदर्भ, प्रत्येक क्षण, प्रत्येक योगदान आपल्या जगण्याला महत्व प्राप्त करून देणारी असते.
          तसेच आपला भूतकाळ आपल्या वर्तमानमध्ये खुप परीणाम करणारा असतो. ज्यांच्या आयुष्यात नियम नाहीत त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही कारण नियम नसतील, तोल नसेल तर पडणे साहजिक तसे मानवी जीवनात एक चकोर घेऊन जगण्यात अर्थ आहे अन्यथा अनर्थ म्हटले त्या जगण्याला तरी उत्तम. म्हणून जाता जाता तात्पर्य एवढंच सांगू इच्छितो की लोक कशी असतात त्याचा विचार सोडून द्या, कारण लोक क्षणिक काळासाठी असतात जगायला आपले आचार, विचार तथा वैचारिक संचारच कामाला येतात. म्हणून स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जगातील कोणतीही तंत्रज्ञान त्याचा अंदाज लावू शकली नाही. स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास कायम ठेवत ठेवा, जागृत ठेवा. स्वतः वर दृढ विश्वास ठेवा आज वेळ वाईट आहे उद्या नक्की चांगले दिवस येतील या निश्चयाने सुंदर जगणं आपलंसं करून घ्या...! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )
       तारीख : २८ ऑगस्ट २०२१, वेळ : ९:३०

Friday, 27 August 2021

कर्माचा तराजू...!

 कर्माचं वजन करणारा तराजू ...?




            शिर्षक वाचून वाटलं असेल कदाचित नवल पण सत्य आहे, जगात माणूस म्हणून जगणारा प्राणी सोडला ना कोणीही स्वार्थाच्या विचारांचा शोधून सापडणार नाही, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक विचारांना दिवसभरात बळी ही पडतो आणि अनेक वैचारिक कल्पकतेला सामोरे ही जातो, कुणी पदाचा वापर करतो तर कोण स्वभावाचा तर कोण सलगीचा पण कुठं ना कुठं सुख दुःखाच्या डोंगरात आयुष्याची क्षणिक विचार रेखाटतो मात्र नक्की. १०० पैकी ९० जण आजही एखाद्याचं मन राखाव, इतरांना वाईट वाटू नये, मी गुणवंत वाटावा म्हणून जगणारे आहेत. तर पद, प्रतिष्ठा पैसे यांच्या जोरावर बाहुल्या नाचावणारे कटपुतली भेटतील. सत्य आहे बघा ना की जगणाऱ्या पंक्तीत तर प्रत्येकजण आहे, फक्त शैली, विचार, आचार, संचार वेगवेगळ्या आहेत. एक चारोळी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली " किसींका बुरा करके, अपनी बारी का इंतजार जरूर करना.." साहजिक आहे आपण कोण कसे किती याच काही ताळमेळ आपल्या डेली बेसिस मध्ये काहीसं पण फरक करणारं नसतं पण एवढं लक्षात ठेवा की याची परीक्षा नक्की होत असते, कोण घेत, कशी असते हे गूढ झालं, पण जस वर हिंदीतील शब्दांकन आहे त्या पद्धतीने कुठं तरी आपल्या वागण्या-समजण्याची एक तोल-माप नक्की होत असत. आज आपण कुणाला वाईट म्हंटल किंवा कुणाला चांगलं याची तूर्तास चर्चा श्रीमुखावर नक्की होत नसेल पण त्या चांगल्या की वाईट बद्दल किलो किंवा लिटर मध्ये नक्की नसेल पण त्याच मोजमाप पाठीमागे नक्कीच होत असत.
     कर्म म्हणजे काम हे आपल्याला माहीत आहे पण जगण्यातली कर्मे खुप फरकाची असतात, सोज्वळ मनाने केलेली प्रार्थना म्हणे स्वर्गाच्या दरवाजाचा रस्ता सुखद करतो, तस कर्म पण आपल्याला पुढील रस्त्याची आखणी ती पाठीमागील वैचारिक हितगुज मध्ये दडलेलं असत. जाता जाता एवढं सांगेन जगाला स्वतःची पर्वा असते इतरांची नाही. आपल्याला आपलं कर्तव्य आणि कर्म सुरळीत ठेवायचं आहे, तूर्तास कमी जास्त कोण असेल नसेल पण कर्मच्या तराजू मध्ये आपण कायम "वजनदार" असण्याचा प्रामाणिक प्रयत्न असुद्या, वाईट सर्वांना वाटत , दुःख प्रत्येकाला होत, भावनेच्या पुस्तकातील हे धडे जे रोज असतात, अनेक सुख-दुःखाच्या भरमसाठ धडे अनुभवायला मिळतात पण त्या धड्यांचा अभ्यास करून आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी आणि जगण्याच्या बोर्डात अव्वल यायचं असेल तर त्या ईश्वराच्या तराजू मध्ये कायम आपले वजन आपल्या सद कर्मानी वाढते ठेवा..! आनंदी राहा धन्यवाद...!!


        लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. ( ८८०६६०५८५२ )