Tuesday, 26 November 2024

EVM ची विश्वासहर्ता आणि लोकशाही !


 २६ नोव्हेंबर हा "संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो १९४९ साली ह्याच दिवशी समान हक्क घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी समदं देशाला दिला, मतदान करून लोकशाही बळकट करा, जनसेवा, शिक्षण, आरोग्य, आदी मध्ये हवी असणारी प्रारंभीक न्याय हक्क यासाठी संविधानिक महत्त्व आज जगमान्य तथा सर्वोच्च आहे. आणि मतदान प्रक्रिया आणि आपले योगदान ह्या हक्काला आज EVM पायदळी तुडवत तर नाही ना ? गहण प्रश्न नक्की आहे पण आज आपण अनेक अपेक्षा ठेऊन प्रस्थापित किंवा चुकीच्या प्रवाहाला बदलाच्या रुळावर आणण्यासाठी केलेलं मतदान त्याच चिन्हाला, त्याच लायक उमेदवाराला गेलंय का ? प्रश्न उभं राहतं ना..

    नुकत्याच विधानसभेच्या ( सण २०२४) निवडणूक पार पडल्यानंतर लागलेला निकाल आज चौक न शहरे सुन्न करणारा नक्की आहे, अभूतपूर्व मताधिक्य, उच्चांकी मतदान यानंतर कार्यकर्ते आणि नेत्या मध्ये असणारा एक आनंदाचा वाईब मात्र हरवला गेला आहे का अशी आशंका प्रत्येकाला येतेय. मान्य करून चालू की निकाल बरोबर आहे त्यावेळी की ज्यावेळी जनतेची असणारी प्रश्न, शिक्षण, रोजगार, निवडणूक मध्ये येणाऱ्या प्रत्येक घटक मागण्या ह्या जनतेच्या मान्य आहेत अस समजावे का ? २३ तारखे नंतर निकालात असलेली तफावत बातम्या, मतांची टक्केवारी आणि महत्वाचे म्हणजे इलेक्शन कमिशनची निवडणूक दिवशी अचानक बंद होणारी साईट, निकाल नंतर पुन्हा बंद होणारे इंटरनेट वरील साईटची पुनरावृत्ती कुठं तर शंकेला पाल उभं राहिल्यासारख नक्की आहे. आणि झालेल्या सभा, आरक्षण मुद्दे, अन्यायकारक वागणूक , किंवा पक्षफोडीची कारणे, इ मुळे कुठं तरी नाराजीचा सूर पाहायला मिळत होता पण तरीही इतकं अवाढव्य यश महायुतीला मिळणं आणि त्या यश नंतर असलेल्या तफावतीच्या बातम्या, व्हिडीओ स्टेटमेंट वरून लोकशाही इतकी मलिन झाली का ? असे प्रश्न उभे राहतात, लोकशाही बळकट करावी म्हणून मतदान करायला जागृत करणार इलेक्शन कमिशन आणि मतदान केल्या नंतर अनपेक्षित निकाल तंत्र वापरण्यात येत मग कुणाच चूक आहे यांत ? मतदान केलेल्या मतदात्याचं की मत नोंदवून घेतलेल्या जपान मेक असलेल्या EVM मशीनचं ? असे अनेक मुद्दे असताना किंवा EVM बाबत अजूनही विधानसभा, लोकसभा येथे योग्य की अयोग्य वर शंका उपस्थित करताना लोकशाहीसाठी हे मशीन फायदेशीर किंवा सुरक्षित असतील का ? मध्ये ५ वर्षे जून एक निवडणूक आयोग अधिकारी यांनी स्वतः कबूल केलं आहे की बेंगलोर मध्ये असलेले EVM मशीनचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊन महाराष्ट्र, हरियाणा सारख्या मोठ्या राज्याच्या निवडणूक साठी सुरत हुन मशीन आणल्या गेल्या, करार बाबत तक्रार किंवा मशीन देवाण घेवाण बाबत कुठं ही तक्रार आज पर्यंत अवगत नसताना मशीन गुजरात मधून का आणल्या गेल्या, बेंगलोर मधून का मशीन आल्या नाहीत याची उत्तर एक मतदाता म्हणून तुम्हाला कोणी देणार आहे का ? तुम्ही टाकलेलं मत हे तुमच्या प्रश्न आणि योग्य व्यक्तिमत्त्वाला म्हणून केलेलं सर्वश्रेष्ठ दान अगदी योग्य ठिकाणी पडलं, बटन योग्य माणसाला गेलं याची शास्वती तुम्हाला कोण देणार आहे का ? VVPAT मशीन जरी आपल्याला चित्र दाखवत नक्की पण कोणत्या क्रमने मत पडलं, कोणत्या नंबरला किंवा ह्याच चिन्हाला मतदान तुम्ही केला अस जगाला राहूदे पण स्वतःला तरी कळण गरजेचं असताना कोण तुम्हाला याची गॅरंटी देणार आहे का ? उत्तर आहे का तुमच्याकडे स्वतःला चिमटा घेऊन विचारा एकदा की केलेलं मतदान ह्या क्रमांकला आणि ह्याच चिन्हाला केलं आहे.  

    राजकारण आता कुठं तरी लोकशाही पिछाडीवर जाऊन हुकूमशाही आघाडीवर जाण्याची नक्की चिन्हे आज प्रत्येक निष्ठावंत आणि योग्य मतदात्याच्या मनात हा प्रश्न घोंगावत असणार. साधी गोष्ट आहे काश्मीर घ्या, हरियाणा द्या, छत्तीसगड घ्या महाराष्ट्र द्या. आज अनेक असे उमेदवार ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून जनसेवा केली, कोणतं तरी संविधानिक लोकप्रतिनिधी पद आपल्याला मिळेल ह्या आशेने जनतेच्या उंबऱ्या झिजवल्या त्यांना असलेली कर्तव्य आणि कर्तृत्व बघून जनतेने आज ना उद्या पसंदी दिली तरी निकाल आणि पद मात्र मशीन ठरवणार हे नक्की. कुठं तरी लोकशाही आणि खऱ्या अर्थाने असणाऱ्या जनसेवा रक्तात असलेल्या माणसांना लोकशाही मार्गाने जनसेवेसाठीची पावती उद्या मिळेल का ? EVM ठरवेल की कुणाची मेजोरिटी कुणाच सरकार यावं, आणि त्यात एखाद्या सामान्य सामाजिक कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीचं म्हणून समजायचं का ? आज देशात अनेक अशी प्रश्न आहेत, देश प्रगतीपथावर कार्यान्वित असायला हवं पण देशात आज ही भगवा, हिरवा ह्यात वाटणी होतोय का ? अशी भीती प्रत्येक गल्ली आणि बोळ मधून येतेय. कित्येक उमेदवार यांची निवडणूक अमानत जप्त होते, ते उमेदवार आपल्या मतदारसंघात रात्र न दिवस काम करून जनतेच्या मनात घर केली आहेत, त्यांच्या पदरी सुद्धा पडलेलं मतदान हे केवळ शॉक देणार आहे. आज निवडणुका झाल्या खरं पण केवळ शून्य आमदार म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच चिन्ह जातंय, ज्या माणसाने भले काहीही असो पण मराठी माणसांच्या कामगार वर्गाला न्याय देणं, बाह्य राज्यातील टोलला शाबूत ठेवण्याचा काम त्यांनी केलं, आजही एखादी परराज्यातील कंपनी भूमिपुत्रला त्रास दिली तर पहिला राजसाहेब आठवतात. हे सगळं संपून हुकूमशाही आणून केवळ सत्ता, पैसा, खुर्ची आणि लादलेला निकाल जनतेने स्वीकारून मूग गिळून गप्प बसायचं का ? 

     आज सगळी कडे मशीन बाबत शंका आणि टाहो फुटेल इतकं संघर्ष उफाळून आहे पण जनतेच्या बाजूने आवाज उठवायला पाठबळ नाही कारण एकच "संख्याबळ". उद्या विधानभवन मध्ये अन्यायकारक घोषणा झाल्या, जाचक अटी झाल्या, लादलेली महागाई आली तर त्यावर आवाज उठवायला विरोधी बाकावर "विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही" इतकं दुर्दैवी महाराष्ट्र झाला का ? शाळेत बाकावर बसलो की आपल्याला शाहणपण शिकवणारी शिक्षक जरूर असतात पण वाईट बाजूने जाऊ नको म्हणून सांगणारा बाकावरचा मित्र मात्र लवशेष झालाय इतकं खर. मशीन हे मानवनिर्मित आहे आणि मानवनिर्मित गोष्टी अलगद हाताळता येतात हे तितकंच सत्य आणि स्वार्थासाठी मशीनसोबत छेडछाडी करून पोळी भाजून घेता येऊ शकते हे कटू सत्य. काल अमेरिकेने एक स्टेटमेंट दिलं की अमुक एवढी लाख मते मोजायला अमेरिकेत एवढी ३+ दिवस लागतात तर इथे भारत देश १ दिवसात अवाढव्य मते मोजून निकाल सांगू शकतो, भारताच्या ह्या संशोधन बद्दल आदर नक्की आहे पण अमेरिकेपेक्षा फास्ट आणि जलद विश्वास ठेवेल का आपलं आत्मसन्मान एकदा विचारा स्वतःला. केवळ जनतेची असणारी स्वप्ने आणि गाजर वाटून जर लोकशाही पुनः प्रस्थापित होत असती तर आंबेडकर,गांधी, नेहरू, फुले यांच्या सोबत सर्व स्वातंत्र्य सेनानी यांना प्राणाची आहुती द्यायची गरज नव्हती मग माझ्या मते, मोठी भाषणे, मोठी गाजरे वाटून सुद्धा सत्ता आणि देश मिळवता आला असतंच की मग. लोकशाही जर एखाद्या EVM सारख्या मशीनने ठरवायला सुरवात केली तर उद्या तुम्ही काय खावं, काय परिधान करावं, काय वागावं, कुणाच्या बाजूने असावं, कुणाला समर्थन द्यावं एवढंच नाही तर तुम्ही कुठं हसावं, कुठं रडावं हे देखील येणाऱ्या काळात एखादी अदृश्य शक्तीचं ठरवलं तर वाईट वाटून घेऊ नका. आज धर्म आणि झेंड्याच्या विळख्यात राजकारण सामावलेले आहे. मुद्दे केवळ अजेंड्यावर गिरवायची आणि जनतेला भूल देऊन आपण मात्र शंड होऊन बसायचं हाच कानमंत्र जपा. "एक है तो सेफ है" ... का ? देश स्वतंत्र होताना ही सगळे सेफ आणि एक होते म्हणून ह्या तिरंग्याची शान आजही कायम आहे. जर देशाची इतकी काळजी घ्या सत्ताधारी यांना आहे. 

         "लोकशाहीला जिवंत ठेवायच असेल तर किंवा जनतेच्या मनातलं सरकार जर जनतेला हवं असेल पारदर्शक निवडणूक ही काळाची गरज आहे, निवडणूक म्हणून न पाहता आता पक्ष वाढीसाठी केलेला अट्टाहास का काय म्हणून वाटू लागलं आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक व्हायच्या अनेक कागद शिक्का मारून भष्टाचार व्हायचे, पण निपक्षपाती पणे निवडणूक होताना कधी अशी द्विधा मनस्थिती किंवा निवडणूक प्रक्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्तापर्यंत बदलला नव्हता. देश उभं करणं सोप्प नव्हतं पण देश चाललंय त्या वाटेने पुन्हा चांगल्या विचारांवर आणण कठीण वाटू लागलं आहे. कुठे तरी केवळ टिका म्हणून नाही पण आता बहुमताने आलेल्या अनेक कार्यकर्तेह्यांच्या मनात सुद्धा मतदान प्रक्रिये बद्दल खंत प्रकट होताना दिसत आहे. पारदर्शक तथा सुरक्षित पद्धतीने निवडणुक होऊन जनतेच्या मताचा स्पष्ट कौल भविष्यात तरी येईल का ? वाट पाहत बसण्यात गैर नक्की नाही पण कुठं तरी धुमसत असलेली खंतला ही पिढी आणि व्यवस्था न्याय देणार आहे की नाही?"


■ लेखन : एन.के. वळसंग...✍🏻

Thursday, 26 October 2023

" कुछ तो लोग कहेंगे...!" ☺️

 ■ शिर्षक : कुछ तो लोग कहेंगे...!😊

■ लेखन : पत्रकार एन.के....✍️

       [आपण माझे ब्लॉग वरील नियमीत वाचक आहात, आपला अनमोल प्रतिसाद हा कायम माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणारे असते ; आजचा विषय पुन्हा एकदा लिखाणाला सुरवात करतोय - ]



       माहीत आहे का आपण जगातील जेवढ्या सजीव जीवशृष्टी आहे त्यात आपण सर्वात चलाख आणि बुद्धिमान प्राणी म्हणून गणले जातो, आपल्याला आकलन शक्ती आहे, आपल्याला चालनात्मक विचारसरणी आहे, केवळ ह्या जगात जगणं हा एकमेव उद्देश ठेऊन दिनचर्या ठरवणारे ८०% असतील अस मला वाटत पण प्रत्येकाच्या बौद्धिक विचारात ध्येयाचा एक संघर्षमय वाटचाल नक्की असते हे खरंय, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे कुवत आहे, आपल्याकडे ती अचिवमेंट मिळवायची धमक आहे, तथा असतंच. पण कधी कधी आपण कोण काय, कुठला, काय म्हणेल का ह्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील म्हणून आपण संथ गतीने वाटचाल करताना दिसतो, आपलं कर्तव्य आपल्या बुद्धीच्या जोरावर खरं सोनं ( ध्येयाचं ) मिळवून देणार असेल तर लाजायचं कशाला आणि कुणाच्या दिसण्यासाठी , कुणाच्या प्रतिक्रियेसाठी आपण का आपलं जगणं बदलायचं ; सोडून द्यायचं " कुछ तो लोग कहेंगे उनका काम है केहना-टोकना " 😊

         'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना,'

        'छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना..!'

ह्या उक्ती प्रमाणे आपलं आयुष्य आपण इतरांच्या मर्जीने जगत आहोत असं तर नाही ना ? एकदा विचार करून बघा, आपले छंद, आपल्या सवयी, आपले मनमोकळ्या विचारांची वाचा, आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम अस भरपूर काही अनेक वेळा ते काय म्हणतील म्हणून बंधने पाळून जातो आपण. एवढंच नाही तर आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड - निवड ठरवितांना या तथाकथित 'लोकांचा विचार' आपण करतो आणि आपण बांधील आहोत असे काहीसे मन करून बसतो अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात आणि त्या मानायला हाव्यातचं. पण, बहुतांश वेळा 'लोक काय म्हणतील' याचा बागुलबुवा करुन आपल्या मर्जीचा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला सपशेल बाजूला सारून लोकांच्या मातांना प्राधान्य देतो. आणि, मनातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात करतचं नाही. त्यामुळे लोकांची ही निर्रथक भीती आपल्या प्रगतीत स्पीडब्रेकर बनली आहे इतकं तरी समजावं माझ्या मते. हे बघा लोकं जगाची खबरबात तर ठेवतातच पण हे करताना  आपल्यावर नजर ठेवणारी ही आपली कंटक जरी असली तरीही त्यांना प्रेरणास्रोत म्हणून घ्या आणि वाटचाल करा कारण अशा लोकांची समरणशक्ती फार कमी असते. आणि तसेही जे आज आपली निंदा नालस्ती करतात उद्या आपल्या एकाद्या विषयावर टाळ्या वाजविणारेही हेच लोक असतात. मग, लोक काय म्हणतील याचं अवडंबर-आगडोंब कशाला करायचा ? बरोबर ना हे करत असताना सुद्धा आपण ज्या स्वभावाने सामोरे जातो म्हणजे अस की आपण लोकांना देत असलेलं फाजील महत्त्व व लोकांकडे बघण्याचा आपला चष्माच आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. लोकांना तुमच्या प्रगतीपेक्षा अधोगतीशीच जास्त देणं-घेणं असतं. चुकीचे सल्ले कसे देता येतील, प्रोत्साहन न देता सतत टीका कशी करता येईल, तुमच्या प्रगतीत अडथळे कसे निर्माण करता येतील याबाबतीत लोकांचा उत्साह अफाट असतो. त्यामुळे 'लोक काय म्हणतील' या अत्यंत फालतू गोष्टीचा विचार मनातून काढून टाकायला हवा ना ? 

     लेखाच्या शेवटी हेच म्हणेन की आपल्या जगण्यात असणारी पारंगता ही शाबूत ठेवा. आपल्याला आवडत असणाऱ्या व्यक्ती असतील, नाती असतील, आपल्या मनाला स्पर्शून आपल्याला सुखद अनुभव देत आपल्यासाठी चांगले आहेत असं वाटणारे सगळी नाती जपत चला, समाज आणि संसार काहीतर म्हणेल आणि त्यांना काय वाटेल ह्या विचाराने आपलं जगणं पायदळी तुडवून गुदमरत जगणं म्हणजे लाईफ असते का ? मनाला स्वच्छंद करा, मोकळा स्वास घ्या, आपल्या भावनांची कदर करणाऱ्या, आपल्या सुख आणि दुःखाच्या प्रत्येक सावलीत त्याची निगराणी असते त्या माणसाला जवळ करा, सांभाळ करा, चिरकाल साथ घ्या-द्या, लोकांच्या बघण्यात सुद्धा आजकाल आपल्याला खोटं असतं याची प्रचिती येत असते, रक्ताच्या नात्यात गैरसमज होतात, लोकांचं काय घेऊन बसलात ? कधी कधी सोडून द्यायला ज्यावेळी आपण शिकतो ना तेव्हा आपण ठाम व्हायला पाऊल टाकतो, आणि एकदा "स्वतःवर ठाम" झाला की जगातली कुठल्याही पॉवर ला तुम्हाला हरवायचं धाडस होणार नाही. आणि तात्पर्य जर मिळालं तर एवढंच सौम्य घ्या की आपल्या सभोवताल असणाऱ्या "आपल्या जवळची" नाती आपल्या साठी एक कॉल, एक मेसेज, एक आवाजाच्या कवडश्याने परिस्थिती ओळखणारे, समोर चेहरा अन डोळे बघून आपली व्यथा सर्वार्थाने जाणणारे जगाच्या विरोधात आपल्या बाजूने उभी राहणारी असतात न अशा हिऱ्यांना जपून ठेवा ; जगाला अशा वेळी फुलस्टॉप द्या आणि नात्याला वेळ द्या ! 

    धन्यवाद ! 


Thursday, 19 October 2023

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 🥰

 ■ शिर्षक : ...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती  ! 😊


काट्यांच्या जंजाळ मध्ये गुरफटून गेलेलं गुलाब पाहिलं,

मंद पहाटे दर्द सुगंध देणार मधाळ सोनचाफा पाहिलं,

ते दर्द, दुःख, पिडा अलगद विसरून तुला मढवता नाही आलं,

होय तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || १ ||



सोडलेले केस, टपोरे डोळे, गलिच्छ गुलाबी तुझे ते ओठ,

थरथरणारी पाऊलं, शहारणारी हालचाल, धरता नाही आलं बोट,

केसाच्या बाजूनं हात फिरवत तुला न्याहाळता नाही आलं,

कारण एकचं, तुझ्या नजरेला नजर भिडवता नाही आलं ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || २ ||


होताना स्पर्श, रोमांचक भरे हर्ष अनुभवता नाही आलं,

मिठीच्या घट्ट पकड मध्ये तुला भुलवता नाही आलं,

खांद्याच्या बाजूला ओठांची झुंबड स्पर्शवता नाही आलं, 

पुन्हा एकदा तुला भेटलो खरं घट्ट मिठीत घेऊन माझी बर्फाळ प्रेम वाळवंट म्हणता नाही आलं !

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ३ ||


केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले,

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची सुगंधीच हळव्या शपथाची ; मन ही धुंद होऊन भुले,

सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची हेचं जाणता आलं नाही ! 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ४ ||


उन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती,

चंद्राने हि सूर्यावर कधीच झेप घेतली होती ; 

पण ती अजून नजरेच्या मोहात खेळत बसली होती,

ही प्रेमाची मोहक नाव तिच्या बंदराशी केव्हाच पोहचली होती,

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ५ ||


कारण आठवत नाही, पण त्या दिवशी ती खूप लाजरी झाली होती,

कदाचित माझ्याच हातांनी सावराहावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती,

ती पवित्र आहे, ती पूजनीय आहे, ती आदर्श, ती माझी अशी सर्वकाही होती,

का कुणास ठाऊक मोहक असते नेहमी पण त्या दिवशी डोळ्यातुन प्रेम बाण मारून तिरंदाज समजत होती ; 

...कारण आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती ! || ६ ||


   ■ लेखन : पत्रकार एन.के....✍️

Thursday, 21 September 2023

क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

 ■ शिर्षक : क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में !

■ लेखनप्रपंच : पत्रकार एन.के...✍️


[ ना चाह पूरी कर पाया, ना साकार कर पाया सपने को,

खुद से ज्यादा तवज्जो दी, मैंने ही सायद किसी अपने को,

इसी को सायद जिंदगी कहते है, ताउम्र धूप में तपने को,

यूं जिंदगी बीत जाएगी, और परिणत हो जाऊंगा लाश में,

'ना जाने क्यों भटक रहा हूँ मैं किस मंजिल की तलाश में ' ह्या पंक्ती नुसार आपण आहोत त्या सुंदर जगण्या पासून वंचित होऊन अमुक ध्येय घेऊन उठाठेव करत तारखा बदलतात तस जगणं बदलत असतो हे सत्य,पण आपल्या आजवर दिलेलं योगदान म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचं जगणं असावं यासाठी केलेलं मार्गक्रमण म्हणजे जगणं असतं का ? ; धगधग, धावपळ, त्रागा, चिडचिड तर कधी समाधानकारक लिटल बीट क्षण अस भरीव जगणं म्हणजे लाईफ इतकंच आपल्याला माहीत आहे, पण आपण आपल्या असलेल्या आणि चाललेल्या जिवनात समाधानी राहता आलं तर नक्कीच जे पदरात तेच जीवनात नक्की असेल सो मग आजपासून "भटकणं बंद" आणि "उमटण सुरू " 😊 ]


   नमस्कार वाचकहो ! एक पुनः सुंदर लेखन आपल्या भेटीस आणतोय दोन गोष्टी माणसाच्या हातात नसतात. एक जन्म आणि दुसरी मृत्यू. पण जन्म व मृत्यूमधील आयुष्य माणसाच्याच हाती असते. ते आयुष्य कोणती मूल्ये घेऊन जगतो. त्यावर जगण्याची कृतार्थता ठरते. सॉक्रेटिसने शिष्यांना चार मौलिक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या पहिल्या दोन विसरण्यासंबंधी तर राहिलेल्या दोन लक्षात ठेवण्यासंबंधी आहेत. विसरायला सांगितलेल्या गोष्टी अर्थात लक्षात ठेवल्या पाहिजेत. जीवनाची वाटचाल करताना आणि विशेषतः यशाच्या शिखराकडे जाताना, वाटेत आपला द्वेष, मत्सर करणारी, अडचणीचे काटे टाकणारी माणसे भेटतात. एकदा का आपण यशाच्या किंवा सत्तेच्या उंच ठिकाणी पोहोचलो की ज्यांनी आपल्या वाटेत काटे टाकले, द्वेष मत्सर केला, त्यांना विसरायचे. हे अवघड आहे. पण त्यांच्याशी सूडबुद्धीने वागायचे नाही. त्यांचा द्वेष, मत्सर करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्या उद्देशाने वा ध्येयाने आपण ते यश वा सत्ता प्राप्त केली त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी धडपडत राहायचे आणि हे वाईट वागणाऱ्यांना विसरल्याशिवाय शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट विसरायची, ती म्हणजे त्या यशाच्या वा सत्तेच्या जोरावर आपण ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांना मदत केली त्यांना विसरायचे. आठवणी आणि विसर ह्या गणितात आपल्याला जे हवं म्हणजे अस की आपल्या मानसिक समाधान साठी आपल्याला हवं असणार प्रत्येक पाऊल म्हणजे संघर्ष आपण रोजरास करत असतो, आपलं ध्येय न वाटचाल ही एक भौतिक सुखाच्या शोधतलं प्रवास म्हणावं लागेल. कुठेतरी वाचनात आलेलं एक सुंदर चारोळी - 

   'आयुष्य काळोखाने माखले असताना काही माणसं,'

'आपले जगणे विसरून इतरांच्या आयुष्यात उजेड पेरत असतात,'

'आदर्शाची स्थळ आपल्या अवतीभवती असतात,'

'आपण उगाचच दूरवरच्या, न अनुभवलेल्या माणसांचे कौतुक करीत दाखले देत असतो,'

'आत बाहेर निर्मळ असणारी माणसं अभावानेच आढळतात.'

   ह्या चारोळी प्रमाणे आपल्या कर्म आणि स्वभावाचा आपल्या जगण्यावर फार फरक पडत असतो, इतरांच्या मनावर अधिराज्य करता येईल इतकं समन्स स्वभाव आपल्याजवळ हवा, कारण अशी स्वभाव आपल्याला परत देताना भरभरून देत असतात. आपण केलेलं।योगदान आणि वाटचाल नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असं "रस्ता" रुपी असतो, मग ध्येय वेगळं असलं तरीही वाटचाल असते हे नक्की, प्रत्येकाला जगण्यात स्वार्थ हवं असतं, हवं तसं नात हवं असत, प्रेमाचा प्रवास अवगत असतो, वय, उंची, पगार, पाणीच्या पलीकडे इच्छाशक्ती म्हणून स्वार्थाचं एक हच्छावाला असतोच, कारण प्रत्येक मानव महत्वाकांक्षी असतो. आपल्या मनात स्वप्ने रंगवितो. स्वप्नसृष्टीत रममाण होऊन जातो. पण ही स्वप्ने केवळ सुंदर शब्दांनीच रंगवून त्यात दंग होऊन चालणार नाही ती सत्यसृष्टीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवेत, अम करण्याची तयारी हवी, श्रम करणाऱ्याला लक्ष्मी हसतमुखाने माल घालते. अम करणाऱ्याला यशाच्या रुपाने परमेश्वर दर्शन देतो, नियमित अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेत यश मिळवितो. तस चांगले कर्म आणि स्वभाव चांगला ठेवणाऱ्याला नक्कीच चांगली फळ ह्या जिवनात मिळतात हे नक्की ! जाता जाता समारोप करता करता एक कवितेच्या २-३ पंक्ती शेअर करतोय - 

                गुडघे गेले, कंबर गेली,

            नेहमी नेहमी कण्हायचं नाही,

               आता आपलं काय राहिलं?

       हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही ! 


                पिढी दर पिढी चालीरीतीत,

                थोडे फार बदल होणारच, 

                  पोरं-पोरी त्यांच्या संसारात,

                 कळत नकळत गुंतणारच ! 


                तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा

               कुणाकडूनही करायची नाही,

                  मस्तपैकी जगायचं सोडून,

             रोज थोडं थोडं मरायचं नाही ! 


          स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं,

              पुढे पुढे चालत राहायचं असतं,

                  वास्तू तथास्तू म्हणत असते,

             हे उमजून निरामय जगायचं असतं ! 


        धन्यवाद ! © पत्रकार एन.के. 







       

Monday, 18 September 2023

नात्यांचा ऋणानुबंध आणि समज-उमज !

 लेखनप्रपंच : पत्रकार एन.के. 

   नाते म्हणजे अनेक प्रकारची असतात, नातलग पासून , मैत्री किंवा प्रेमा पर्यंतचे ह्या नात्याना आपण बनवताना केलेली सजावट, भरलेला जिव्हाळा, दिलेला आमूलाग्र स्व बदल आणि वैचारिक फिनिशिंग खूप महत्त्वाचा असतो न त्यासाठी आपण समर्पित केलेलं ही असत, पण कधी कधी क्षणिक अविचाराने झालेला आघात, किंवा क्षणार्धात आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल केलेलं नकोस विचार ह्या नात्यांना तडा देऊन अविरत हव्यासा असणारं हे बंध तोडायला भाग पडत, नात्यात गोडवा, रुसवा हवाच पण क्षणीक असावं, नाते द एन्ड पर्यंत घेऊन जाणार बुद्धीचातुर्य कदापी नसावं...



   धन्यवाद ! ब्लॉग साधारण एक-दिड वर्षे लिखाण बंद असूनही आपला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोग होतं, अशीच आपली सोबत असुद्या ; लेखनाला पुन्हा एकदा सुरवात करतोय - ऋणानुंबधाशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही ह्या जन्माशी आईचा ऋणानुबंध त्यातूनच आईला मुलांबद्दल प्रेम आपुलकी वाटू लागते मग या ऋणानुबंधाला सुरुवात होते, एखाद्या ओहोळाप्रमाणे हे ऋणानुबंध एकमेकांत कधी सहानुभूती तर कधी खरं अधोरेखित प्रेम वृद्धींगत होत ऋणानुबंधाच्या गाठी तयार होत राहतात. काही निरगाठी तर काही सूरगाठी ! आपले एखाद्याशी उत्तम पटते तर एखाद्याशी कमी मग ते कुटुंब असू देत शेजारी पाजारी मित्रमैत्रीणी हे ऋणानुबंधामुळेच. नात्यात येताना आणि नात्याला नाव देताना आपण अनेकवेळा विचार करतो की माणूस आपल्याला कोणत्या स्वार्थाने जवळ करायचा आहे की स्वभावाने, स्वभावाने जवळ येणारी चिरकाल टिकणारी असतात स्वार्थाने जवळ येणारी माणस संधी साधून नात्याचं बिमोड करतात हे सत्य. आपल्याला हवी असणारी प्रत्येक नाती आपली असतात आणि हे प्रत्येक नात्यातील गोडवा चाखत जीवनचक्र ह्या ऋणानुबंधात अडकत जाते एका नव्या जाणीवेने अस्तित्व टिकवण्यासाठी कारण आपलं अस्तित्वच ही खरी आपली अस्मिता खूणगाठ असते जगण्याची ! ज्यांच्या मधे तुमच्या बद्दल आपुलकी असते जिव्हाळा असतो ते ऋणानुबंध दृढ होतात दोघांतही समान आपुलकीचा धागा असेल तर, कधी कधी ऋणानुबंध विधिलिखीत असतात परमेश्वरी संकेत तर कधी कधी ते असूनही जपताना अडचणी येतात हे ही ऋणानुबंधच...! अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, प्रत्येकाच्या घनिष्ठ बंधीलतेने बनलेली असतात न ही नाती तुटली जाऊ नयेत यासाठी थोडं-फार त्याग समर्पण करण गरजेचं आहे, दैनंदिन आयुष्य जगता-जगता आपोआपच एक साचलेपण येत जातं. जीवनातही आणि नात्यांमध्येही. परिणामी सुरुवातीला घट्ट असणारे ऋणानुबंध सैलावत जातात. प्रसंगी कायमचे दुरावतात देखील. कुठल्याच नात्याची विशिष्ट अशी हमी देता येत नाही, हे खरंच. मात्र ती ‘एक्स्पायर’ होणार नाहीत, इतकी काळजी तर प्रत्येक जण घेऊच शकतो ना...! 

     राहिला प्रश्न अशी नाती जपलं पाहिजे की आपल्यासाठी वेळ काढतात, नड काढतात, धावून येतात, पाठीशी राहतात, ह्या नात्याना तेवत ठेऊन त्या प्रती प्रेम अन जिव्हाळा कायम असुद्या आणि कोणतंही नातं नवं असतं तेव्हा त्यात उत्स्फूर्तता जास्त असते. नवेपणात हवीहवीशी ओढ जास्त असते, त्यामुळे तिथे नातं जपण्यात, वृद्धिंगत करण्यात आपसूकच ऊर्जा जास्त लावली जाते. नातं जसजसं मुरायला लागतं, प्रगल्भता वाढत जाते, तसतशी त्यातली उत्स्फूर्तता नकळत कमी होते. एकमेकांच्या सवयी, स्वभाव अंगवळणी पडतात आणि त्यात तोचतोपणा येत जातो. तिथे लावल्या जाणाऱ्या ऊर्जेत कपात केली जाते, मुद्दाम नाहीच, अगदी नकळत होत जाते. आणि यातून आयुष्यात आलेलं साचलेपण अस्वस्थता देत राहतं. खूपदा याची परिणती विपरीत असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, आवडी-निवडी, आचार-विचार भिन्न असतात. त्यामुळे सगळेच बदलत्या परिस्थितीत सहज समायोजन करू शकतील, असंही नसतं. पण इथे एक पर्याय असू शकतो, किंबहुना असतो. तो म्हणजे, नात्याच्या वॉरंटीचा कालावधी कसा वाढवता येईल, याचा विचार करणे. नात्यांमध्ये आलेल्या साचलेपणाला घालवण्यासाठी कल्पकतेचा वापर प्रामाणिकपणे करता येऊ शकतो. समोरची व्यक्ती कसा प्रतिसाद देईल, हे आपण सांगू शकत नाही; पण आपल्या सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्नांनी समोरच्या व्यक्तीच्या (व स्वत:च्याही) वर्तनात काही बदल होण्याची शक्यता मात्र नक्की वाढते. नाती ही आयुष्याला मिळालेली मोठी देणगी आहे. ती संपवायला क्षण पुरतो, पण दृष्टिकोनात थोडा सकारात्मक बदल करून आहेत ती नाती मनातून स्वीकारता येतात का ते पाहा, म्हणजे नात्यांमधला तोचतोपणा टाळण्यासाठी क्रिएटिव्ह कसं होता येईल, याचा विचार करा. दैनंदिन गोष्टींनाही नावीन्यपूर्ण पद्धतींनी हवंहवंसं करता येतं. चुटकीसरशी सगळं बदलेल असं नाही. नातं जपणं ही जबाबदारीही कुण्या एकाची नसते. पण मरगळ संपेल, स्वतःला आनंद मिळेल आणि प्रयत्नांना दिशाही. अवास्तव अपेक्षांचं ओझं बाळगण्यापेक्षा/लादण्यापेक्षा जे आहे ते सुटसुटीत करून जपण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह होऊन जगण्याचा प्रयत्न करा.


   धन्यवाद ! 

Wednesday, 20 July 2022

रिलेशनशिप : अपेक्षा आणि प्रेम !

 

शिर्षक : रिलेशनशिप : अपेक्षा आणि प्रेम ! 

लेखन : पत्रकार एन.के....✍️

 



 प्रत्येकालाच आयुष्यात प्रेम हवं असतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पनाही वेगळ्या असतात. पण काही प्रमाणात एकमेकांशी जुळतील अशाच असतात. प्रेमात वय , रंग, रूप अनेकदा पाहिलं जातं, पण खरं प्रेम हे निष्ठेची असावी, विश्वासाची कडा असावी हे खरं.  खरं तर प्रेम करणं अर्थात प्रेमात पडणं खूप सोपं आहे. पण प्रेम केल्यानंतर एकमेकांना ते नातं टिकवून ठेवणं आणि त्या नात्याची काळजी घेणं खूपच कठीण आहे. प्रेमामध्ये पैशापेक्षा किंवा कोणत्याही गिफ्ट्सपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे एकमेकांंना समजून घेऊन ‘वेळ’ देणे. वेळ नसेल नात्यात तूट अशी अनेक बहुतांश किस्से अनुभूती म्हणून सभोवताल पाहायला मिळतात.  वास्तविक प्रेमात एकमेकांना काही प्रमाणात गृहीत धरणं योग्य आहे. प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच. कारण कोणत्याही दोन व्यक्ती सतत त्याग करून आणि अपेक्षा न ठेवता एकत्र राहू शकत नाही. अशा गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये घडत असतात. पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला हे नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टी आपल्या जोडीदारासाठी करणं हे ओघाने आलंच. आजच्या पिढीच प्रेम म्हणजे  नकळत्या वयात चित्रपट पाहून एक स्वप्नवत जग तयार होतं आणि चित्रपटाप्रमाणेच आपली प्रेयसी वा प्रियकर असावा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण त्याला प्रेम नाही तर अट्रॅक्शन म्हणतात. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत होत नाही. बरेच जण मनापासून प्रेम करून ते अगदी शाळेपासून असलं तरीही लग्नापर्यंत नेतात आणि सुखाने संसारही करतात. पण स्वप्नात जगणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं. एकमेकांच्या गुणदोषासह स्वीकारणं. असं असल्यानंतर अपेक्षा आल्याच आणि अपेक्षा आल्या म्हणजे त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारी भांडणही आलीच. पण त्यासाठी आपल्या जोडीदाराला सतत गृहीत धरणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी जाणवतो का? खरं तर आपणच बरोबर आणि आपला जोडीदार चुकत आहे असं मनात ठेवलं तर नातं कधीच टिकणार नाही. पण आपण किंवा आपला जोडीदार सतत गृहीत धरत असेल तर असं करणं कितपत योग्य आहे..? म्हणून अपेक्षा जस्ट अ रुल ऑफ रिलेशनशिप असावं बाकी माणूस म्हणून स्वीकारलेल्या गुण दोष सहित जपलं जावं आणि टिकलं जावं यासाठी उद्दात मनाने प्रयत्नशील असावे हे खरं. प्रेमाच्या सुरुवातीला तुम्ही जे म्हणाल ते शब्द झेलण्यासाठी तुम्ही दोघंही तयार असता. मग वर्ष निघून जाताना या छोट्या छोट्या गोष्टी आणि आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यातून का काढून टाकता? सुरुवातीला तुम्हाला एकमेकांना जिंकून घ्यायचं असतं म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितून वेळ काढून भेटत असता. मग नातं टिकवतानादेखील ही गोष्ट नंतर करणं महत्त्वाचं नाही का? वेळ दिला नाही तर तो किंवा ती समजून घेईल हे सर्वात मोठं गृहीत धरणं असतं. इथूनच सुरुवात होते ती एकमेकांना न समजून घेण्याची. दोघांमधली सामंजस्य का संपत? कुठे निघून जातात एकमेकांना समजून घ्यायचे विचार? परिस्थिती कशीही असो एकमेकांची काळजी घेणं हा प्रेमातील सर्वात महत्त्वाचा भाग. मग अगदी सकाळी उठून गुड मॉर्निंग हा साधा मेसेज करून २ मिनिटं चॅट करणं असो वा दिवसभरातून कामातून वेळ काढून तू काही खाल्लंस का किंवा तू कुठे आहेस, कशी आहेस वा काय करतेस हे विचारणं असो. अगदी इतकंही जमत नसेल तर निदान तिला वा त्याला अपेक्षा असते ती केवळ आपल्याशी बोलण्याची. तेदेखील समोरचा समजून घेईल आपण कामात आहोत हे मनात ठेवून गृहीत धरणं खूपच चुकीचं आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. बघायला गेलं तर जोड्या अशाच असतात ज्या भिन्न स्वभावाच्या असतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची ताकद हवी. पण समोरचा एकच व्यक्ती समजून घेत असेल सतत तर ते नातं फार काळ टिकणं शक्य नाही. मुलं आणि मुली दोघांनाही हे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसतं. मुलांच्या बाबतीत घडत नाही असं नाही. पण मुली प्रचंड प्रमाणात प्रेमात असताना मुलांची काळजी घेतात. त्यांना दिवसभरातून कितीतरी मेसेज करणं, ते कुठे आहेत, काय करत आहेत, जेवले की नाही हे सर्व प्रश्न काळजीपोटी विचारले जातात. ते कोणत्याही संंशयापोटी नसतात. पण त्या मेसेजचे रिप्लाय देण्याइतका अगदी 30 सेकंदाचाही वेळ नसावा हे नक्कीच योग्य नाही. माणूस कितीही कामात असला तरीही त्याला या गोष्टींना रिप्लाय देण्याइतका वेळ असतोच आणि अगदी नसेलच तर तो वेळ काढावा लागतो. तो किंवा ती समजून घेईल हे गृहीत धरणं काही काळापर्यंत नक्कीच तुमच्या नात्यामध्ये काम करू शकतं. पण काही वर्ष गेल्यानंतर हेच तुमच्या नात्यातील भांडणाचं मोठं कारण ठरू शकतं. कारण ज्या व्यक्तीला साधा मेसेज करून बोलायला वा रिप्लाय करायलाही वेळ नाही. त्या माणसावर आपण प्रेम केलं का असे प्रश्न पडायला सुरुवात होते. वेळ हा मुद्दा प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो हे तुम्हाला प्रत्येकालाच माहीत आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नसेल आणि या गोष्टी तुम्ही सतत समजून घ्याव्या असं त्याला वाटत असेल तर त्याचं हे गृहीत धरणं नक्कीच चुकीचं आहे. कारण त्याला त्याच्या कामासाठी वेळ असतो. तो ज्या घरात राहात आहे, त्या व्यक्तींसाठी कितीही कामातून त्याला वेळ काढता येत असतो कारण त्याला घरात भांडण नको असतं. पण तुम्ही त्याला समजून घेता म्हणून सतत तुम्हाला कारण देत तुम्हाला वेळ न देणं हे कधीही योग्य नाही. नात्यात वेळ देणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं असतं कारण हेच क्षण असतात जे तुम्हाला अधिक जवळ आणतात. तुमच्या समोर तुमचा जोडीदार इतर गोष्टींसाठी वेळ काढताना दिसत आहे. पण तुम्ही विचारल्यानंतर जर त्याच्याकडे शंभर कारणं असतील तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. 
प्रेमाच्या नात्यातही आदर ठेवणं गरजेचं आहे. आपला जोडीदार आपल्या प्रत्येक मताचा आदर ठेवत असेल. पण आपण जर त्याचा आदर ठेवतच नसू तर त्याचं हे असं गृहीत धरणं खूपच अपमानास्पद आहे. आपला जोडीदार आपण म्हटलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो. पण जर आपण त्याची एकही गोष्ट ऐकली नाही तर कसं वाटेल त्याला? याचा विचारदेखील व्हायला हवा. सतत आपण कामात आहोत, मग नंतर बोलूया, नंतर करतो हे बोलणं चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपला जोडीदार कामात असतो तसंच आपणही कामात असूनही त्याची काळजी घेत असतो हे त्याने लक्षात घ्यायला हवे. जोडीदाराच्या जागी एकदा स्वतःला ठेवून अशावेळी विचार करून नक्की पाहा. अगदी त्याने किंवा तिने भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यायला शिका. भरभरून समोरची व्यक्त जर तुमच्याविषयीच्या प्रेमाविषयी बोलत असेल तर तिला चुकीचं उत्तर देऊन नाराज करू नका.

धन्यवाद ! 🌺

Thursday, 17 March 2022

शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !

 शिर्षक : बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला !


लेखन : पत्रकार एन.के.

[ होळी अर्थात त्या संस्कृती आणि परंपरेची जोड म्हणून साजरी केली जाणारी होलीकात्सव, या दिवशी रावणाच्या प्रतिमेला म्हणजेच वाईट विचारांना पेटवून, चांगल्या विचारांची आरास व्हावी यासाठी केली जाणारी ही होळी, मनुष्य प्राणी जितका विचार करतो त्यात कितपत चांगले विचार असतात पाहायला गेलं तर कमबुद्धी विचार जास्त आणि चांगली प्रात्यक्षिक सोडले तर एखाद्या बद्दल चांगली वैचारिक विचारसरणी मात्र शून्य असते, स्वाभाविक माणूस ज्या ईश्वराने ज्या प्रकरतीने बनवलं, तस स्वार्थी टॅग लावून बनवलं असावं अशी घृणा विचार आल्याशिवाय राहवत नाही. होळीला शिमगा ही म्हणतात, शिमग्याला बोंबलल जात पण कधी आपण विचार केलाय का कायम आपण कुठल्या ना कुठल्या विचारांवर, संकुचित वृत्तीवर, अमुक व्यक्तीवर बोंबलत असतो, इतकं असताना आज एक चांगलं विचार त्या होळी अग्नी साक्षीने निर्धार करूया, मनाला पटेल तेच मार्ग, मनाला पटेल असच कर्तव्य, मनाला पटेल असंच वाटचाल वजा वागणूक मग बाकीचे असणारे जळक्या त्या ज्वालाना म्हणा - बोंबलूद्या ! तेवढंच येत त्या कर्मठ बुद्धीला ! ]


  होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


                   कृष्ण फाल्गुनची होते सुरुवात,
                   पाहिली जाते पौर्णिमेचि वाट
                  चंद्राचा प्रखर असतो प्रकाश,
                होळी या सणाची होते सुरुवात
             होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।१।।

         उगवतो नवीन दिवस, उजळते नवी पहाट,
              सुरु होतो मग, रंगांचा वर्षाव
           खूप उधळतो गुलाल आसमंतात,
         येते स्मित हास्य, सर्वांच्या चेहऱ्यात
         होळी रे होळी, पुरणाची पोळी ।।२।।

      आज देशभरात होळीचा सण साजरा होत असतांना मनातील वाईट विचारांची होळी करून संकल्प करण्याचा हा दिवस ,निसर्गाच्या विविध रंगानी जसा फळा फुलांचा दर्पण येतो तसा ,हा ऐक्याचा आणि आनंदाच्या रंगाचा उधळण करणारा सण बहरलेली वने ,पशु पक्षाचा चिवचिवाट, रानातील लयबद्ध संगीत ही मानवी मनावर्ती किती अधिराज्य करतात. हीच खरी होळीची ओळख. निसर्गाने आपल्याला दिलेली जी ऐक्य, सौंदर्य, माधुर्य हे आपण आज खऱ्या अर्थाने जपायला हवं, होळी हा पवित्र सण असला तरीही आपल्यातला रावण अजून मेलेला नाही, आपल्या कर्मातून झालेल्या नुकसानाची होळी अभी बाकी है ! खुप दिवसानंतर लिहिण्याचा योग आला, पण आज काही विषय लिहायला घ्यावं अस वाटलं सायंकाळी बोंब मारण्याचा आवाज कानावर आला मग विचार केला की बोंब मारणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि ते होळीला नाही तर रोज बोंबलत असतात, आज बोंब मारणाऱ्यांना सणाचं कारण असत, तर रोज बोंब मारणाऱ्याचं वेगळं लॉजिक असत - द्वेष, मोह, मत्सर, जळफळाट हा मुख्य कारण असतो, अन अशी डिजिटल बोंबाच्या बाराखड्या प्रत्येकाच्या उरावर बसलेले असणार हे नक्की. म्हणून आज आपण निर्धार करूया की रोजच्या रावणाला मग आपल्यातला असो इतरांच्यातला पण नक्की संपवू, अर्थात होळी रे होळी मध्ये राख करू.
       मनुष्य इतका हुशार प्राणी आहे की त्याचे रंग इतके असतात ना त्याची गणना आकड्यात करणे अशक्य आहे. रोज नाही तर प्रत्येक क्षणाला , परिस्थिती नुसार रंगबदलू गिरगीट अर्थात माणूस. माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वतःमुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवतत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम धृवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. विचार शब्द लहान वाटत असला तरी त्याची उंची आणि परिणाम मात्र अभाळाएव्हढं आहेत. प्रत्येकाचे जिवनमान, प्रत्येकाची पारख, प्रत्येकाला मनाच्या कप्प्यात - कक्षेत  समजून घेताना कामाला येणारे सर्वात ताकदवर अस्त्र म्हणजे विचार आहे अनेक वेळा आपण यावर शब्दांकन करून झालेलं आहे. आज ह्या पवित्र सणाच्या निमित्ताने एक निर्धार वजा शपथ घेऊया की मागे बोलणारे प्रत्येकाच्या जीवनात असतात, पुढे गोड बोलून पाठीमागे बोंबलनारे पण हजारो आहेत. त्यांना मनाच्या एका लाईन मध्ये उभं करून कप्प्यात घेऊन मारा म्हणावं बोंब, हात दुखेल पण थांबणार नाहीत कारण वर बोललो ना आपण कारण विचारसरणीचं जर मलीन असेल तर बोंबाटा तो बनता है ना बॉस !
      मग ठरवल ना की, पिछे भोकने वाले कभी आगे आके दहाड नही सकते ! म्हणून प्रत्येक माणूस पकडून चालू, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ, विशेषण असणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याचा मागे एखादा तर चुगल्या असतो, जळणारा असतो, स्वार्थी नावाच्या रंगाच्या डब्याने रंगपंचमी खेळलेला असतो , मोहाच्या आणि द्वेषाच्या रांगेतून खरेदी केलेली  बुद्धी सत्व माणसं असतात. मग यावर उपाय काय तर एकच आपण लॉयल राहायचं, आपलं कर्म, धर्म, संस्कार कायम ठेवत ठेवायचं, म्हणजे परीणामी आपल्याला सुंदर जगण्यातली रंग मिळतील आणि जिणं सुखाच होईल, मनावरचा अतिभार कमी होईल. जाता जाता एवढं सांगेन...-ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो. सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्याच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतुमध्ये त्याच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो ... आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.

        मी,
जमा करतोय आज
तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्या-दाव्याचं गवत..
होळीत दहन करायचं आहे,
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे..
तुम्ही करता का थोडी मदत..?
             आज..
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र,
काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा इत्यादी..
झाकायची आहे त्याच रंगात..
जात, धर्म, कर्म अन बरचस काही..
फक्त माणूस कळला पाहिजे,
इतकीच सरळ अन् साधी..
माझी मागणी आहे.. ( संकलित )

            - धन्यवाद !