Tuesday, 26 November 2024

EVM ची विश्वासहर्ता आणि लोकशाही !


 २६ नोव्हेंबर हा "संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो १९४९ साली ह्याच दिवशी समान हक्क घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी समदं देशाला दिला, मतदान करून लोकशाही बळकट करा, जनसेवा, शिक्षण, आरोग्य, आदी मध्ये हवी असणारी प्रारंभीक न्याय हक्क यासाठी संविधानिक महत्त्व आज जगमान्य तथा सर्वोच्च आहे. आणि मतदान प्रक्रिया आणि आपले योगदान ह्या हक्काला आज EVM पायदळी तुडवत तर नाही ना ? गहण प्रश्न नक्की आहे पण आज आपण अनेक अपेक्षा ठेऊन प्रस्थापित किंवा चुकीच्या प्रवाहाला बदलाच्या रुळावर आणण्यासाठी केलेलं मतदान त्याच चिन्हाला, त्याच लायक उमेदवाराला गेलंय का ? प्रश्न उभं राहतं ना..

    नुकत्याच विधानसभेच्या ( सण २०२४) निवडणूक पार पडल्यानंतर लागलेला निकाल आज चौक न शहरे सुन्न करणारा नक्की आहे, अभूतपूर्व मताधिक्य, उच्चांकी मतदान यानंतर कार्यकर्ते आणि नेत्या मध्ये असणारा एक आनंदाचा वाईब मात्र हरवला गेला आहे का अशी आशंका प्रत्येकाला येतेय. मान्य करून चालू की निकाल बरोबर आहे त्यावेळी की ज्यावेळी जनतेची असणारी प्रश्न, शिक्षण, रोजगार, निवडणूक मध्ये येणाऱ्या प्रत्येक घटक मागण्या ह्या जनतेच्या मान्य आहेत अस समजावे का ? २३ तारखे नंतर निकालात असलेली तफावत बातम्या, मतांची टक्केवारी आणि महत्वाचे म्हणजे इलेक्शन कमिशनची निवडणूक दिवशी अचानक बंद होणारी साईट, निकाल नंतर पुन्हा बंद होणारे इंटरनेट वरील साईटची पुनरावृत्ती कुठं तर शंकेला पाल उभं राहिल्यासारख नक्की आहे. आणि झालेल्या सभा, आरक्षण मुद्दे, अन्यायकारक वागणूक , किंवा पक्षफोडीची कारणे, इ मुळे कुठं तरी नाराजीचा सूर पाहायला मिळत होता पण तरीही इतकं अवाढव्य यश महायुतीला मिळणं आणि त्या यश नंतर असलेल्या तफावतीच्या बातम्या, व्हिडीओ स्टेटमेंट वरून लोकशाही इतकी मलिन झाली का ? असे प्रश्न उभे राहतात, लोकशाही बळकट करावी म्हणून मतदान करायला जागृत करणार इलेक्शन कमिशन आणि मतदान केल्या नंतर अनपेक्षित निकाल तंत्र वापरण्यात येत मग कुणाच चूक आहे यांत ? मतदान केलेल्या मतदात्याचं की मत नोंदवून घेतलेल्या जपान मेक असलेल्या EVM मशीनचं ? असे अनेक मुद्दे असताना किंवा EVM बाबत अजूनही विधानसभा, लोकसभा येथे योग्य की अयोग्य वर शंका उपस्थित करताना लोकशाहीसाठी हे मशीन फायदेशीर किंवा सुरक्षित असतील का ? मध्ये ५ वर्षे जून एक निवडणूक आयोग अधिकारी यांनी स्वतः कबूल केलं आहे की बेंगलोर मध्ये असलेले EVM मशीनचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊन महाराष्ट्र, हरियाणा सारख्या मोठ्या राज्याच्या निवडणूक साठी सुरत हुन मशीन आणल्या गेल्या, करार बाबत तक्रार किंवा मशीन देवाण घेवाण बाबत कुठं ही तक्रार आज पर्यंत अवगत नसताना मशीन गुजरात मधून का आणल्या गेल्या, बेंगलोर मधून का मशीन आल्या नाहीत याची उत्तर एक मतदाता म्हणून तुम्हाला कोणी देणार आहे का ? तुम्ही टाकलेलं मत हे तुमच्या प्रश्न आणि योग्य व्यक्तिमत्त्वाला म्हणून केलेलं सर्वश्रेष्ठ दान अगदी योग्य ठिकाणी पडलं, बटन योग्य माणसाला गेलं याची शास्वती तुम्हाला कोण देणार आहे का ? VVPAT मशीन जरी आपल्याला चित्र दाखवत नक्की पण कोणत्या क्रमने मत पडलं, कोणत्या नंबरला किंवा ह्याच चिन्हाला मतदान तुम्ही केला अस जगाला राहूदे पण स्वतःला तरी कळण गरजेचं असताना कोण तुम्हाला याची गॅरंटी देणार आहे का ? उत्तर आहे का तुमच्याकडे स्वतःला चिमटा घेऊन विचारा एकदा की केलेलं मतदान ह्या क्रमांकला आणि ह्याच चिन्हाला केलं आहे.  

    राजकारण आता कुठं तरी लोकशाही पिछाडीवर जाऊन हुकूमशाही आघाडीवर जाण्याची नक्की चिन्हे आज प्रत्येक निष्ठावंत आणि योग्य मतदात्याच्या मनात हा प्रश्न घोंगावत असणार. साधी गोष्ट आहे काश्मीर घ्या, हरियाणा द्या, छत्तीसगड घ्या महाराष्ट्र द्या. आज अनेक असे उमेदवार ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून जनसेवा केली, कोणतं तरी संविधानिक लोकप्रतिनिधी पद आपल्याला मिळेल ह्या आशेने जनतेच्या उंबऱ्या झिजवल्या त्यांना असलेली कर्तव्य आणि कर्तृत्व बघून जनतेने आज ना उद्या पसंदी दिली तरी निकाल आणि पद मात्र मशीन ठरवणार हे नक्की. कुठं तरी लोकशाही आणि खऱ्या अर्थाने असणाऱ्या जनसेवा रक्तात असलेल्या माणसांना लोकशाही मार्गाने जनसेवेसाठीची पावती उद्या मिळेल का ? EVM ठरवेल की कुणाची मेजोरिटी कुणाच सरकार यावं, आणि त्यात एखाद्या सामान्य सामाजिक कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीचं म्हणून समजायचं का ? आज देशात अनेक अशी प्रश्न आहेत, देश प्रगतीपथावर कार्यान्वित असायला हवं पण देशात आज ही भगवा, हिरवा ह्यात वाटणी होतोय का ? अशी भीती प्रत्येक गल्ली आणि बोळ मधून येतेय. कित्येक उमेदवार यांची निवडणूक अमानत जप्त होते, ते उमेदवार आपल्या मतदारसंघात रात्र न दिवस काम करून जनतेच्या मनात घर केली आहेत, त्यांच्या पदरी सुद्धा पडलेलं मतदान हे केवळ शॉक देणार आहे. आज निवडणुका झाल्या खरं पण केवळ शून्य आमदार म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाच चिन्ह जातंय, ज्या माणसाने भले काहीही असो पण मराठी माणसांच्या कामगार वर्गाला न्याय देणं, बाह्य राज्यातील टोलला शाबूत ठेवण्याचा काम त्यांनी केलं, आजही एखादी परराज्यातील कंपनी भूमिपुत्रला त्रास दिली तर पहिला राजसाहेब आठवतात. हे सगळं संपून हुकूमशाही आणून केवळ सत्ता, पैसा, खुर्ची आणि लादलेला निकाल जनतेने स्वीकारून मूग गिळून गप्प बसायचं का ? 

     आज सगळी कडे मशीन बाबत शंका आणि टाहो फुटेल इतकं संघर्ष उफाळून आहे पण जनतेच्या बाजूने आवाज उठवायला पाठबळ नाही कारण एकच "संख्याबळ". उद्या विधानभवन मध्ये अन्यायकारक घोषणा झाल्या, जाचक अटी झाल्या, लादलेली महागाई आली तर त्यावर आवाज उठवायला विरोधी बाकावर "विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही" इतकं दुर्दैवी महाराष्ट्र झाला का ? शाळेत बाकावर बसलो की आपल्याला शाहणपण शिकवणारी शिक्षक जरूर असतात पण वाईट बाजूने जाऊ नको म्हणून सांगणारा बाकावरचा मित्र मात्र लवशेष झालाय इतकं खर. मशीन हे मानवनिर्मित आहे आणि मानवनिर्मित गोष्टी अलगद हाताळता येतात हे तितकंच सत्य आणि स्वार्थासाठी मशीनसोबत छेडछाडी करून पोळी भाजून घेता येऊ शकते हे कटू सत्य. काल अमेरिकेने एक स्टेटमेंट दिलं की अमुक एवढी लाख मते मोजायला अमेरिकेत एवढी ३+ दिवस लागतात तर इथे भारत देश १ दिवसात अवाढव्य मते मोजून निकाल सांगू शकतो, भारताच्या ह्या संशोधन बद्दल आदर नक्की आहे पण अमेरिकेपेक्षा फास्ट आणि जलद विश्वास ठेवेल का आपलं आत्मसन्मान एकदा विचारा स्वतःला. केवळ जनतेची असणारी स्वप्ने आणि गाजर वाटून जर लोकशाही पुनः प्रस्थापित होत असती तर आंबेडकर,गांधी, नेहरू, फुले यांच्या सोबत सर्व स्वातंत्र्य सेनानी यांना प्राणाची आहुती द्यायची गरज नव्हती मग माझ्या मते, मोठी भाषणे, मोठी गाजरे वाटून सुद्धा सत्ता आणि देश मिळवता आला असतंच की मग. लोकशाही जर एखाद्या EVM सारख्या मशीनने ठरवायला सुरवात केली तर उद्या तुम्ही काय खावं, काय परिधान करावं, काय वागावं, कुणाच्या बाजूने असावं, कुणाला समर्थन द्यावं एवढंच नाही तर तुम्ही कुठं हसावं, कुठं रडावं हे देखील येणाऱ्या काळात एखादी अदृश्य शक्तीचं ठरवलं तर वाईट वाटून घेऊ नका. आज धर्म आणि झेंड्याच्या विळख्यात राजकारण सामावलेले आहे. मुद्दे केवळ अजेंड्यावर गिरवायची आणि जनतेला भूल देऊन आपण मात्र शंड होऊन बसायचं हाच कानमंत्र जपा. "एक है तो सेफ है" ... का ? देश स्वतंत्र होताना ही सगळे सेफ आणि एक होते म्हणून ह्या तिरंग्याची शान आजही कायम आहे. जर देशाची इतकी काळजी घ्या सत्ताधारी यांना आहे. 

         "लोकशाहीला जिवंत ठेवायच असेल तर किंवा जनतेच्या मनातलं सरकार जर जनतेला हवं असेल पारदर्शक निवडणूक ही काळाची गरज आहे, निवडणूक म्हणून न पाहता आता पक्ष वाढीसाठी केलेला अट्टाहास का काय म्हणून वाटू लागलं आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक व्हायच्या अनेक कागद शिक्का मारून भष्टाचार व्हायचे, पण निपक्षपाती पणे निवडणूक होताना कधी अशी द्विधा मनस्थिती किंवा निवडणूक प्रक्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्तापर्यंत बदलला नव्हता. देश उभं करणं सोप्प नव्हतं पण देश चाललंय त्या वाटेने पुन्हा चांगल्या विचारांवर आणण कठीण वाटू लागलं आहे. कुठे तरी केवळ टिका म्हणून नाही पण आता बहुमताने आलेल्या अनेक कार्यकर्तेह्यांच्या मनात सुद्धा मतदान प्रक्रिये बद्दल खंत प्रकट होताना दिसत आहे. पारदर्शक तथा सुरक्षित पद्धतीने निवडणुक होऊन जनतेच्या मताचा स्पष्ट कौल भविष्यात तरी येईल का ? वाट पाहत बसण्यात गैर नक्की नाही पण कुठं तरी धुमसत असलेली खंतला ही पिढी आणि व्यवस्था न्याय देणार आहे की नाही?"


■ लेखन : एन.के. वळसंग...✍🏻

No comments:

Post a Comment