Sunday, 30 December 2018

आभार प्रदर्शन...!

🙏 मनापासून धन्यवाद ! नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या किंवा देणाऱ्या सर्व जिवलग मित्र, मैत्रिणी,प्रतिष्ठित, अधिकारी तथा प्रियजन...

        वर्षभर लेख न अनेक माध्यमातुन कायम ना सही काही अनेक दलबदल काळात सानिध्यात राहिलो न सोबत करत असताना आपण म्हणजे कधी तुम्हीही किंवा मीही कधी जात पहिली नाही किंवा कधी रंग-रूप नाही फक्त एक व्यक्ती म्हणून किंवा रक्ताच्या नात्यापालिकडे जाऊन एक महत्वाचा सहवास म्हणून उत्तुंग न आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सोबत असलेल्या विचारांची देवाणघेवाण करत आयुष्याची अनेक वर्षे जात आहेत किंवा नव्याने भेटलेल्या सर्व नूतन पण मनापासून आदर्श विचार घेऊन सोबत केलेल्या आपण सर्वांनी ३१ डिसेंबरला किंवा १ जानेवारीला या पाश्चिमात्य नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यासोबत इतर तुमच्या संलग्न असणाऱ्या सर्वांना कराल. सर्वांना विश करण्यासाठी शुभेच्छा आणि मला केल्याबद्दल धन्यवाद...!
संतांच्या भूमीत आपण वाढलो तुकारामाचे अभंग, कबीरचे दोहे न यातून शिकवण घेऊन जगणं जगायला शिकणारे आपण स्वराज्य निर्माण करताना महाराजासोबत १८ पगड जाती धर्माची लोक सोबत केलीं हा विशाल संस्कृतीचा महाराष्ट्र घडला. अनेक महान हिंदु-मुस्लिम ग्रंथ मग त्यात भगवत गीता, किंवा कुराण असो किंवा कोणत्याही कल्पक जाती ज्या निर्मित आहे त्यांचे धर्मग्रंथ असो ते ग्रंथ नेहमी एकी आणि त्याचे बळ शिकवते ते कधी निंदानालस्ती ना कधी द्वेष किंवा ना ही कधी तेढ शिकवते पण सोबतच संस्कृती आणि परंपरा शिकवते. नूतन वर्षाच्या पाडव्याला शुभेच्छा देऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेची ओळख दृढ करणे माझ्या मते चांगली राहील. धर्म म्हणून मानवता, आणि जात म्हणून मानव बघायला शिकूया आजपासून यातून आपल्या असणाऱ्या प्रत्येक संस्कृती आणि रीती रिवाज भक्कम होण्यास मदत होतील. मी तरी शुभेच्छा दिलं तर उत्तरार्थ धन्यवाद देणार नाही तुम्हि ही ब्रिटिश वर्ष सुरवातीची शुभेच्छा देणं टाळलं तर बरं होईल. बदल होईलच म्हणून सांगणार नाही तर फक्त कॅलेंडर बदलून मन न नात कायम ठेवणारे माझे जिवलग आहात तुम्ही म्हणून एक संदेश आपल्या सर्वांसाठी....!

- आपला एन.के....✍
मो. - ८८०६६०५८५२

Friday, 28 December 2018

मैत्री : रक्तातून जास्त महत्वाचं एक बंधन !!

शिर्षक :- इअर एंडिंग है ; पण नात्यात कायम चांगल्या विचारांची बेगिनींग राहुद्या...!

[खऱ्या जीवनाच्या जिवंत असणाऱ्या निर्जीव माणसाबद्दलच माझं लेख...]

लेखक :- एन.के. पत्रकार

सगळ्यांच्या आयुष्यामधला एक वर्ष संपत्तीच्या सांजवेळी आपल्या या नात्याबद्दल दोन शब्द, वर्ष संपत आलं आहे अनेक कडू गोड आठवणी आपल्या सोबत आहेत प्रत्येक भेटलेला माणूस काही ना काही नवख्या रुपात भेटला , गेला ; पण त्याची तीच वेळ आणि काळ कायम कुणाच्या ना कुणाच्या स्मरणात असते. नात तात्पुरत किंवा अखंडित माहिती नाही पण प्रत्येक क्षण आणि अडचण किंवा सोप्या भाषेत आपण म्हणतो की नड असते त्यावेळी आठवण करणारी आपली स्वार्थी बुद्धी सुधारित आवृत्ती म्हणून कधीही जन्माला येत नाही पण काही अशी ही नाती असतात जी कायम हवीहवीशी वाटतात तर कायम आठवणींच्या हिंदोळ्यात जवळ बाळगावी अशी प्रखर न मनस्वी असतात. "मैत्री" दोनच शब्द पण उजळणी करायला गेलं तर शब्द कमी पडतील, मैत्री म्हणजे काय ? काय असत त्या अतूट नात्यात ? मैत्रीचं नात हे नवीनच लावलेल्या रोपटयासारखं असत ते लहान असतानाच काळजी घ्यावी लागते. एकदा का वृक्ष झालं की तोच आपल्याला सावली देते.,आधार देतो, मित्र ही जगातील अशी एकमेव भेट आहे जी आपण स्वतःलाच स्वतः देत असतो. आपले अंतरंग उघडवून दाखवणारा सर्वोत्तम आरसा म्हणजे आपला मित्र. मैत्रीच्या नात्यातील गोडवा म्हणजे आपल्या सर्वांना प्रिय असत मित्र हा वय, वेळ, काळ काहीच बघत नसत लहान पासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचे जिवलग सवंगडी म्हणजे एक व्यक्त होण्याचं दालन तथा व्यासपीठ असत. आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येत असतो न तिथून मैत्रीची जी सुरवात होते त्यातून अनेक काल त्या त्या कारणाने ती व्यक्ती आपल्या सानिध्यात संपर्कात असते.
              इतकं समरस लोक असतात जगात की त्यांच्यात असणाऱ्या स्वभाव हा एक दृढ कारणाने त्या व्यक्तीला आपण कधीच दुराऊ शकत नाही अशा घट्ट नात्यालाच आपण मैत्री म्हणून संबोधतो. मैत्रीच्या या पर्वात अशीच नाती जपायला शिका प्रत्येक कल्पक नात्यात एक वैशिष्ट्य असत. या वर्षाच्या सांजवेळी माझ्या लेखाची प्रतीक्षा आणि वाचक वाढत आहेत याच समाधान आहे पण समाज आणि सौन्दर्य आणि निसर्गाची निरीक्षणाची सांगड घालत नेहमी एक सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न राहील याचप्रमाणे लेखाच्या वळणावर पुनः मानव म्हणून किंवा एक सजीव म्हणून आपण जगण्याच्या कुठल्या पंक्तीत बसतो हेच कळत नाही हे बघा, मृत्यूच्या उंबरठ्यावरुन स्वर्ग आणि नरकाच्या भव्य दिव्य अशा दैवी महालातून माणूस म्हणून जन्माला येऊन आईच्या गर्भातून बाहेर येऊन हाडांची पकड निर्माण होईपर्यंत तेही आई वडिलांच्या तळहातावर जगलेलं ते बालपण आणि त्यानंतर समाजपुढं स्वतः मी काय आणि माझं अस्तित्व काय म्हणून साकार करण्यासाठी कागदी पुस्तक मधली रेघीव आणि वळणदार शब्दांच्या संगतीत शिक्षण घेत महाविद्यालयीन शिक्षण एक सदृढ पायरीवर आपल्याला जाणवत आपल्याला भाषा मिळाली, जात मिळाल, धर्म मिळलं,मित्र मिळाले एवढंच नाही राज्य मिळालं, देश मिळालं इतकं असूनही कधीच हा विचार केला गेला नाही की मानव म्हणून जिवंत असणाऱ्या आपण खरंच सजीव का निर्जीव...? सजीव म्हणजे हालचाल करतो अशीच व्याख्या असेल का ओ..? स्वतः जगतो आणि दुसऱ्याला जगावतो म्हणजेच मानव किंवा सजीव अस असेल कदाचित...? चालतो बोलतो तो सजीव का मातीचा आवरण घालून "स्वार्थ आणि स्वतःच" जीवन जगणारा बुजगावणे ...? उत्तर नाही ना... असच निर्जीव वस्तू किंवा गोष्टी आपल्याला कायम मदत करतात कधी कधी स्वतःची हानी करून घेऊन मदतगार बनतात, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, पाणी ह्या सगळ्या गोष्टी कधी स्वार्थ बघितलेलं पहातो आपण नाही ना....! मग आपण सजीव कसे सजीव म्हणून जगताना इतरांचा विचार अपल्याकडून कधी होतो कधीच नाही झालेल्या अवतीभवतीच्या घटना वर सुद्धा दुर्लक्ष करणारे आपण इतके कठोर कसे हो झालो....फक्त चाट, कमेंट, यातच दंग असणारे आपण कधीतरी सत्याच्या जीवनात सजीव होऊयात...? या संकल्प करूया जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही काढलं तरी चालेल पण कारण नसताना कॉल किंवा भेट घायच आजपासून, आवडत्या व्यक्तीला भेट न तेही अचानक द्यायचं..., बघा अस जमत का सोप्प पण सुंदर जगायला...! 

★ तात्पर्य - मैत्री हाच मानवाला जगायला शिकवतो कारण मैत्री म्हणजे मानवाच्या कुठल्याही जगण्याच्या स्टेपला आठवणीत येणार, मदतीला येणार साधन नाही तर मानव म्हणून जगण्याचा चूक -बरोबर तपासायच शिक्षक आहे म्हणून या शिक्षकाला स्मरत राहा मानव जन्माच्या सार्थकात सजीव म्हणून जगण्याची खरी मजा येईल...

- धन्यवाद -मो.- ८८०६६०५८५२

Tuesday, 18 December 2018

परमेश्वर सगळं बघत असतो....!

शिर्षक :- लक्षात असुद्या...आपण कायम परमेश्वराच्या CCTV कक्षेत असतो...!

लेखन- एन.के. (पत्रकार)

【 जगण्याच्या दिनचर्येत सदकार्याची घट पाहता स्वार्थी समंजस जगणं सोडून द्यायला हवं ; बहुदा इतरांसाठी जगणं आपल्याला कधी जमणार आहे...?, समाजासाठी जगायला शिकलं पाहिजे हा बोध अभिप्रेत करणारा लेख.... 】

सकाळी सकाळी उठून आपल्या कामाला जायचं आमच्या पदावर काम करायला जायच्या संकुचित वृत्ती प्रत्येकांत असते लहान पासून ते थोरा मोठ्या प्रमाणात हे "आपलं "पाहायला मिळत शाळेत नाही गेलो तर हजेरी पाटावर माझी कमी जाणवेल, कामावर नाही गेलो तर पगार मला कमी मिळेल, इथं नाही गेलो किंवा तिथं नाही गेलो तर अस होईल तस होईल म्हणून स्वार्थी जगणं सोडून कधी जगासाठी वेळ द्यायला आपण मनापासून तयार होतंच नाही का हो...? दुसऱ्यांची सुख दुःख यात २ मिनिट थांबून बघून, ऐकून घेण्याव्यतीरिक्त त्यात सामील होण्यापर्यंत विचाराधीन होणारी आपली मजल कधीच जाणार नाही का हो...? कधी तरी धावत्या युगात गरजेच्या मदतीला आणि कधी तरी दुसऱ्यासाठी एखाद दिवस जगून बघूया..? कारण इतरांच्या साठी केलेलं नेहमी परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्य म्हणून नोंद नोंद होत असते, आणि आपण ऐकलं असेल की -
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा. जनसेवेची आवड रक्तात पाहिजे आज समाजात व्यस्त लोक वाढत आहेत. कधी कधी माणसं आपल्या ऐपती प्रमाणे वागतात किंवा ऐपत नसूनही असूनही देखावा पसंद करतात. म्हणजे भीक देण्यापासून ते एखाद्याला मदत मदत जरी केली आणि ते जरी लहान असलं तरी त्याची जाहिरात मात्र निवडणुकीच्या प्रचारासारख स्वरूप असत. संकुचित राहून स्वतः बद्दल फुशारकीची स्तुती सुमने गाण्यात प्रत्येकाला रुची असते पण ही प्रवृत्ती बदलली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे..! यासाठी मदत म्हणून संतांची शिकवण आपल्याला उपयोगी पडेल म्हणजे यात तुम्ही म्हणाल की संतांच्या आध्यत्मिक जीवनाचा का आशय पण काही शिकवण किंवा काही संतांच्या जीवनव्यथा ह्या जनसेवेची सक्षम आणि भक्कम उदाहरणं देणारी आहेत उदा. संत गाडगेबाबा त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात देशातील जनतेचा उध्दार करण्याचे काम त्यांनी केले आहे व समाजाला प्रबोधन करून ज्ञान प्रसार केला आहे. संत गाडगे बाबा या संतामधील महत्वाची भूमिका पार पडणारे एक आगळे वेगळे संत होऊन गेले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. याप्रमाणे संत तुकाराम असतील त्यांनी ही आपल्यात असणाऱ्या कर्मठ भावनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठीच त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पण एक म्हण आहे ना "कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडचं" याप्रमाणे आपल्यात बदल म्हणून कोणतीही गोष्ट दिसत नाही आपण आपल्या आणि स्वतःच्या विश्वात कायम मग्न असतो इतकं मग्रूर असतो की कोणत्याही गोष्टीला आपण सहज घेऊन त्यावर रिऍक्ट होत नाही जो पर्यंत स्वतःबद्दल नसत किंवा आपल्या बद्दल नसत तो पर्यंत. गरिबीतून वर येण्याची जी पंक्ती आहे त्या पंक्तीला साजेसे जगणे असते आपले साधारणतः म्हणजे की अडचणी आणि परिस्थितीत "बिकट" नावाची पाटी सर्वांच्या माथी असते सर्वांना लहानपणापासून अडचणी असतात. मग राहतो प्रश्न कुठे तर आपल्या परिस्थितीची जाणीव होऊन स्वतःच्या वृद्धिबद्दल विचार करायला सुरुवात करून आपण मग संकुचित बनतो हे टाळले पाहिजे.
   या उलट जगायला छानसे दिवस असतात चांगल्या परिस्थितीत वावर, जगणं, असत अशा वेळी आपल्याला शक्य तेवढं एक मेकाला समाजालाच नाही तर सवंगडी असतील किंवा सोबती असतील याना मदत करत राहणे किंवा बहुदा हे जमत नसल्यास प्रत्येकाच्या सुख दुःखात एकत्र येऊन त्यांना हवा असणारा सहानुभूती प्लस वेळ देत समाजात त्या प्रत्येक गरुजूच्या पाठीवर फिरणार माझं हात अस प्रत्येक बुद्धीने विचार केला पाहिजे आणि गरज आहे. म्हणजे मी म्हणून काय केलं पाहिजे अस ही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो... If we are not the part of solution, then we are the part of the problem. अशी भावना जर असेल ना तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्याचा सन्मान नाही जरी मिळाले तरी समाधान मात्र नक्की मिळेल. प्रत्येकजण अंबानी नसतो त्यामुळे मी काय करायला हवं हा विचार करत बसू नका कारण मी एवढा मोठा लेखक नाही पण साधारण विचार करू आपण की आपल्या आयुष्यात इच्छांचे मृगजळ, आशा-आकांक्षांच्या उसळत्या लाटा, मायेची छाया किंवा परकेपणाचे दु:ख, कर्तृत्वाचे शिखर वा वैफल्याची दरी, सुखाची पौर्णिमा व दु:खाची अमावास्या, कधी वैभव तर कधी पैशांची कमतरता हे येतच राहणार, परंतु या पलीकडे जाऊन मला काही करायचे आहे. बस्स! हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानून पुढे जायचे. मग प्रत्येक मार्ग तुम्हाला गाईड म्हणून काम करेल. आपल्या अवती भवती असणारी जी मार्मिक गोष्टी घडताना आपण बघतो त्यावर आपल्याला आणि आपल्या वैचारिक बुद्धीच्या जोरावर जर मार्ग काढता येऊ शकत असल्यास मनमोकळं व्यक्त व्हा...! आणि यासाठी समाजकार्याची बिल्ले असले पाहिजेत खिशाला अस नाही त्यांच्या साठी काहीतरी करण्याचा प्रयत्नच करा बस... तुमच्या सदकार्याच्या यादीत नाव आणि परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्याची चित्रफीत तयार व्हायला वेळ लागणार नाही...!

"चला कॅमेरा लावलाच आहे २०१८ च्या वर्ष समाप्तीच्या पूर्वसंध्येला हा माझा वर्षाचा शेवटचा लेख तुमच्या साठी सादर करतोय मन जरी बळकट असल तरीही बुद्धी मात्र कर्मठ असत हे दृढ सत्य आहे ; नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक स्वाभाविक संकल्प मनात असतील मग या संकल्पात एक संकल्प अस ही करा मानवाच्या मूलभूत गरजा पाणी, वीज वाचवा, परिसर स्वच्छ ठेवा, बळीराजाला मदत, गरजूला हात, आपल्या सोबत वेळ, देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणं हा ही उद्देश ठेवा ,आर्थिक मदत तुमच्याकडून होऊ शकत नसले, तरी इतर शक्य त्या प्रकारे खारीचा वाटा उचलायचा हे निश्चित करू शकता, रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या सगळी कर्तव्य पार पाडून, थोडासा वेळ आजूबाजूच्या गरजवंतांना द्यायचं द्यायचं ठरवा. आपण नेहमीच आपापल्या कामात व्यग्र असतो. परिणामी आपण माझं कॉलेज, माझा अभ्यास, माझं घर असे आत्मकेंद्री विचार करायला लागतो. आपल्याच भावविश्वात आपण रमलेलो असतो. या सगळ्यातून मुद्दाम वेळ काढून महिन्यातून किमान एकदा तरी जवळपासच्या वृद्धाश्रमात, अनाथाश्रमाला भेट देण्याचा निश्चय करा, महिन्यातल्या एक दिवस तरी त्या मुलांमध्ये, आजी-आजोबांमध्ये जायचं, तिथे जेवायचं, त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या, लहान मुलांशी आपणही लहान होऊन मनसोक्त खेळायचं ठरवा"

धन्यवाद...!

- आपला एन.के. (8806605852)