Friday, 28 December 2018

मैत्री : रक्तातून जास्त महत्वाचं एक बंधन !!

शिर्षक :- इअर एंडिंग है ; पण नात्यात कायम चांगल्या विचारांची बेगिनींग राहुद्या...!

[खऱ्या जीवनाच्या जिवंत असणाऱ्या निर्जीव माणसाबद्दलच माझं लेख...]

लेखक :- एन.के. पत्रकार

सगळ्यांच्या आयुष्यामधला एक वर्ष संपत्तीच्या सांजवेळी आपल्या या नात्याबद्दल दोन शब्द, वर्ष संपत आलं आहे अनेक कडू गोड आठवणी आपल्या सोबत आहेत प्रत्येक भेटलेला माणूस काही ना काही नवख्या रुपात भेटला , गेला ; पण त्याची तीच वेळ आणि काळ कायम कुणाच्या ना कुणाच्या स्मरणात असते. नात तात्पुरत किंवा अखंडित माहिती नाही पण प्रत्येक क्षण आणि अडचण किंवा सोप्या भाषेत आपण म्हणतो की नड असते त्यावेळी आठवण करणारी आपली स्वार्थी बुद्धी सुधारित आवृत्ती म्हणून कधीही जन्माला येत नाही पण काही अशी ही नाती असतात जी कायम हवीहवीशी वाटतात तर कायम आठवणींच्या हिंदोळ्यात जवळ बाळगावी अशी प्रखर न मनस्वी असतात. "मैत्री" दोनच शब्द पण उजळणी करायला गेलं तर शब्द कमी पडतील, मैत्री म्हणजे काय ? काय असत त्या अतूट नात्यात ? मैत्रीचं नात हे नवीनच लावलेल्या रोपटयासारखं असत ते लहान असतानाच काळजी घ्यावी लागते. एकदा का वृक्ष झालं की तोच आपल्याला सावली देते.,आधार देतो, मित्र ही जगातील अशी एकमेव भेट आहे जी आपण स्वतःलाच स्वतः देत असतो. आपले अंतरंग उघडवून दाखवणारा सर्वोत्तम आरसा म्हणजे आपला मित्र. मैत्रीच्या नात्यातील गोडवा म्हणजे आपल्या सर्वांना प्रिय असत मित्र हा वय, वेळ, काळ काहीच बघत नसत लहान पासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचे जिवलग सवंगडी म्हणजे एक व्यक्त होण्याचं दालन तथा व्यासपीठ असत. आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने एकत्र येत असतो न तिथून मैत्रीची जी सुरवात होते त्यातून अनेक काल त्या त्या कारणाने ती व्यक्ती आपल्या सानिध्यात संपर्कात असते.
              इतकं समरस लोक असतात जगात की त्यांच्यात असणाऱ्या स्वभाव हा एक दृढ कारणाने त्या व्यक्तीला आपण कधीच दुराऊ शकत नाही अशा घट्ट नात्यालाच आपण मैत्री म्हणून संबोधतो. मैत्रीच्या या पर्वात अशीच नाती जपायला शिका प्रत्येक कल्पक नात्यात एक वैशिष्ट्य असत. या वर्षाच्या सांजवेळी माझ्या लेखाची प्रतीक्षा आणि वाचक वाढत आहेत याच समाधान आहे पण समाज आणि सौन्दर्य आणि निसर्गाची निरीक्षणाची सांगड घालत नेहमी एक सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न राहील याचप्रमाणे लेखाच्या वळणावर पुनः मानव म्हणून किंवा एक सजीव म्हणून आपण जगण्याच्या कुठल्या पंक्तीत बसतो हेच कळत नाही हे बघा, मृत्यूच्या उंबरठ्यावरुन स्वर्ग आणि नरकाच्या भव्य दिव्य अशा दैवी महालातून माणूस म्हणून जन्माला येऊन आईच्या गर्भातून बाहेर येऊन हाडांची पकड निर्माण होईपर्यंत तेही आई वडिलांच्या तळहातावर जगलेलं ते बालपण आणि त्यानंतर समाजपुढं स्वतः मी काय आणि माझं अस्तित्व काय म्हणून साकार करण्यासाठी कागदी पुस्तक मधली रेघीव आणि वळणदार शब्दांच्या संगतीत शिक्षण घेत महाविद्यालयीन शिक्षण एक सदृढ पायरीवर आपल्याला जाणवत आपल्याला भाषा मिळाली, जात मिळाल, धर्म मिळलं,मित्र मिळाले एवढंच नाही राज्य मिळालं, देश मिळालं इतकं असूनही कधीच हा विचार केला गेला नाही की मानव म्हणून जिवंत असणाऱ्या आपण खरंच सजीव का निर्जीव...? सजीव म्हणजे हालचाल करतो अशीच व्याख्या असेल का ओ..? स्वतः जगतो आणि दुसऱ्याला जगावतो म्हणजेच मानव किंवा सजीव अस असेल कदाचित...? चालतो बोलतो तो सजीव का मातीचा आवरण घालून "स्वार्थ आणि स्वतःच" जीवन जगणारा बुजगावणे ...? उत्तर नाही ना... असच निर्जीव वस्तू किंवा गोष्टी आपल्याला कायम मदत करतात कधी कधी स्वतःची हानी करून घेऊन मदतगार बनतात, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, पाणी ह्या सगळ्या गोष्टी कधी स्वार्थ बघितलेलं पहातो आपण नाही ना....! मग आपण सजीव कसे सजीव म्हणून जगताना इतरांचा विचार अपल्याकडून कधी होतो कधीच नाही झालेल्या अवतीभवतीच्या घटना वर सुद्धा दुर्लक्ष करणारे आपण इतके कठोर कसे हो झालो....फक्त चाट, कमेंट, यातच दंग असणारे आपण कधीतरी सत्याच्या जीवनात सजीव होऊयात...? या संकल्प करूया जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही काढलं तरी चालेल पण कारण नसताना कॉल किंवा भेट घायच आजपासून, आवडत्या व्यक्तीला भेट न तेही अचानक द्यायचं..., बघा अस जमत का सोप्प पण सुंदर जगायला...! 

★ तात्पर्य - मैत्री हाच मानवाला जगायला शिकवतो कारण मैत्री म्हणजे मानवाच्या कुठल्याही जगण्याच्या स्टेपला आठवणीत येणार, मदतीला येणार साधन नाही तर मानव म्हणून जगण्याचा चूक -बरोबर तपासायच शिक्षक आहे म्हणून या शिक्षकाला स्मरत राहा मानव जन्माच्या सार्थकात सजीव म्हणून जगण्याची खरी मजा येईल...

- धन्यवाद -मो.- ८८०६६०५८५२

No comments:

Post a Comment