Saturday, 27 February 2021

जगणं ! राहून गेलं...


 शिर्षक : जगण ! राहून गेलं....!

  [ धगधगत्या जीवनशैलीत माणूस म्हणून जगायचं राहून गेलं आहे हे सत्य आहे, आजच काम, आजचा पैसा, आजचा दिवस यावर फक्त आणि फक्त भविष्य रंगवून मोकळा होऊन आजच्या दिवसाचीखळगी भरली, आजच्या पदरात असलेलं केलं म्हणजे झालं ही गत मात्र आता पसरून रूढ होऊन प्रत्येकाची परंपरा बनली आहे म्हणायला हरकत नाही. जगायचं म्हणून भूमीला बोझ म्हणून नाही तर जीवनात उत्साह आणि उत्सव असायला हवा. परमेश्वराने मनुष्य जन्म हा मोकळेपणाने हसायला, उत्सव साजरा करायला, मनोरंजन करायला आणि खेळण्यासाठी दिला आहे. सर्व जाती, धर्माच्या आणि संस्कारांमध्ये समतोल राखून नृत्य, संगीत आणि पदार्थांचा सामंजस्याने समावेश केलेला आहे. उत्सवामुळे जीवनात सकारात्मकता येते. भेटीगाठी वाढतात आणि अनुभवाची समृद्धी येते. जीवन जगणं ही देखील एक कला आहे. उदा. ड्रायव्हिंग न शिकलेल्या चालकाच्या हातात एखादी गाडी तर तिचे नुकसान होणार हे ठरलेलेच आहे. जीवनात ज्ञान, बुद्धी, विश्वासाशिवाय तुमच्या इच्छेचेही योगदान असते. योग्य ज्ञान आणि पूर्ण विश्वास यांच्या जोडीला सकारात्मकता नसेल तर तुम्हाला सतत अपयश येत राहते. याचे कारण अनेकजण जीवन म्हणजे एक संघर्ष आहे असे मानतात. तसे नसून जगणे म्हणजे एक कला असावी आणि त्या कलेला वाव द्यावं म्हणून रंग भरून मनसोक्त जगणं म्हणजेच जीवन... ]


   खुप दिवसांनी लेख आपल्या भेटीस आले वेळेच्या अभावी अर्थातच जगण्याच्या पंक्तीत वेळ मिळाला नाही असेच म्हणेन पण छंद जोपासून लिखाण करत राहून एक जगण्याची कला अवगत केल्याचा आनंद मात्र थोडा वेगळाच म्हणून वाचकांच्या पसंदीला उतरण आणि मनातल्या काही शब्दांना उतरवून रंगवून एक छान चित्र तयार करणे म्हणजे पण एक सुंदर कला समजू. आज आपण बघतो आपल्या आसपास, आपल्या वागण्यात यापैकी  क्रोध, सामाजिक द्वेष, हावरटपणा, युद्ध आणि अनेक प्रकारच्या विषारी विचारधारांमध्ये आपण कुठं ना कुठं यात बसतो आणि साहजिक लोकांना यात एक बाजूने असहाय्य वाटत आहे. डोक्यावरचा भार इतका वाढला आहे की, आता माणसे सामूहिक आत्महत्या करायला लागली तर वावग वाटायला नको.  आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही  सतत विचारचक्र सुरू असते. प्रेम, द्वेष, अपमान, बदला, गुन्हेगारी, नैराश्य अशा अनेक गोष्टींच्या दडपणाखाली आपण कसेबसे जीवन जगत आहोत. इतकंच नाही तर अनेकवेळा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा ठिकाणी गेल्यावरही काहींचे मन शांत राहात नाही. जीवन जगण्याची कलाच जणू काहींना अवगत नाही,असे वाटते. जगायला आज माणसाकडे काय हवं याच उत्तर कोणीही क्षणात देईल आणि ते म्हणजे "पैसा" माणसाला इतका प्रिय असणारा हा पैसा माणसाला जगायला नक्की शिकवतो म्हणजे असेल तर एक रस्ता अन नसेल तर एक रस्ता पण ह्या दिवसाच्या वजाबाकी शिवाय ते जगणं जे खळखळून हसणं, बागडत लहान होऊन निरागस होत आनंद घेत दिवस घालवण हे जगणं कधी माणूस अनुभवून खरं आणि सत्य असणार असलं जगणं म्हणजेच आयुष्य कधी समजून दिवस काढलेत का ? कदाचित ह्या प्रश्नाच उत्तर जास्तीत जास्त "नाही" असणार आहे कारण जगायचं असेल तर आपल्याला नवं अस काय करायला हवं का ? अर्थात नाही तर आपल्या दिनचर्येत वेळ - काळ,स्थिती-परिस्थिती बघून प्रत्येकाच्या मदतीला येत त्यात आनंद मानत, एक अशी सोज्वळ वेळ जी समाधानी म्हणून येते तेच जगणं बाकी सगळे तास फक्त जिवंत राहून दाखवून ह्या बाजारात आम्ही टिकलो हेच सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड या व्यतिरिक्त काहीच नाही. माणूस होऊन माणसानं माणसाला माणसासारखं वागवावं, इतकी साधी मागणी अन मन त्या दिशेने वावरत जाऊन त्या बुद्धिन एक कल्पक आनंदी राहण्याचा, आनंदाच्या पेटीत असलेले ते रंग प्रत्यक्ष वागण्यात आणि आपल्या मानवी जीवनात अवरतवून रेखाटन करणं अर्थात जगणं. मग त्यात संवेदनशील माणसाचं स्वत्व हरवू नये, यासाठी समतेचा दिवा होऊन जग उजळवण्यासाठी आपण तत्पर आहे. दिवस कितीही वाईट आले, तरी लढण्याचं वय सरणार नाही, याची हमी देत पुन्हा नव्या जोमाने संघर्षाला उभी राहणे. आयुष्यभर सोसलेल्या कळा विसरून वेदनेला ही जगण्याचा लळा लागावा, इतकी नितांतसुंदर नाती निर्माण करून त्या नात्यात एक आनंद भरून दिवस काढणे अर्थात जगणं. वागणं नावाची जी चीज आहे ती प्रत्येक माणसातल्या माणुसकीचं प्रतिनिधित्व करते. आनंदाच्या महालात आपोआप जिव्हाळा राहायला लागतो मग प्रेम उदभवून त्यात अनेक चांगले रंग मिसळून एक दिवस "छान" केल्याचं समाधान अर्थात जगणं.  प्रेम ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती फक्त आणि फक्त मिळणारी गोष्ट आहे. प्रेयसीच्या सुखात सुख मानणारा प्रियकर हा खऱ्या प्रेमाचं प्रतिनिधित्व करतो. अशा अनेक उदाहरण मधून , अनेक नात्यांच्या प्रकट आणि जपलेल्या प्रत्येक त्या मानवी सच्चेपणाला स्पर्श करणार जगणं म्हणजे आयुष्य असावं तर मुखवट्याचं जगणं कदापी कुणाला मान्य नसावं, म्हणून माणुसकीचा वसा घेऊन अंतर्मनातील संवेदनेची ज्योत प्रत्येक वादळात प्रखरतेने तग धरून उजळत राहिल, शेवटच्या श्वासापर्यंत वणवण करत काळजाच्या जखमेला काळजीचा लेप लावायला मानवतेचे हात पुढे सरसावतील, हा आशावाद घेऊन जर प्रत्येक माणूस जगायला लागला तर खरा जीवनाचा अर्थात आयुष्याचा मतितार्थ कळून जाईल. संघर्ष हा माणसाच्या आयुष्याचा कणा आहे. जगण्याची भ्रांत माणसाला निवांत बसू देत नाही. काळजाला जाणिवेचा चटका लागला की, माणसाचं जगणं समृद्ध होत जातं. माणसाचा स्वाभिमानी विवेक जागा असायला हवा. तेव्हाच जगायला आपण शिकू अन्यथा या शाळेत आपण नापास गाडग म्हणून स्वतःला स्वतःच हिणवत बसू.

     लेखाच्या मुळ मुद्द्यावर परतत असताना सांगायचं एवढंच आहे की खरंच मनापासून आपण जगणं विसरून गेलोय धावपळ, उठाठेव, नको त्या तसदी, नको असलेल्या काही गोष्टी आपल्या हातून अनपेक्षितपणे असो किंवा प्रत्यक्ष होतातच पण २१ व्या शतकात आपण जगतोय, प्रगत आणि विकसित परिसरात राहतो , वागतो हा न्यूनगंड पण तितकाच कारणीभूत म्हणावं लागेल. जस शतक तस आपण दैनंदिन जीवनात वापारास आणत असलेली ती साधने जी जुन्या काळातील टपाल, पत्र, संभाषण, गाठ, भेट , सगळं काही पुसून टाकली. अजून एक ते काय डिजिटल जमाना शोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाच्या इतक्या जवळ आलोय की खरं जगणं सुद्धा विसरून गेलोय. पत्रावरून आठवण आली की आज अनेक अशी प्रश्न जी आपली होती, आपल्या अंतर्मनातून निर्माण झालेली न सहज आपल्या माणसाच्या काळजाला स्पर्शून जाणारी जशी की, 'आई बाबा कसे आहेत, ताई कशी आहे, दादा काय करतो, वासरू विकल का ? शेजारचे काका-काकू बोलतात का आपल्याशी ? अशी कित्येक प्रश्न आजच्या धावपळीच्या जीवनयात्रेत 'अनुत्तरित' च राहिले सत्य. "शतदा या जन्मावर प्रेम करावे" या पंक्तीला केव्हाच या वेळ-काळेने फाटा दिलाय. स्वतःची जगण्याची शैली निर्माण करून साधं पण छान जगण्याची स्वच्छंदी सवय मोडकळीस निघाली आहे न ती कला परत आल तरच जगायला आनंद वाटेल हे अधोरेखित सत्य नाही तर त्रिकाल बाधित सत्य म्हणावं लागेल. म्हणून हरवून जाऊ नका ह्या सुंदर जगात अनेक अशी आपली बनवलेली, सजवलेली गोड गोमटी नाती न त्यांची सुंदर मने आहेत त्यावर राज्य करा अन एक छान जगणं पदरात पाडून घ्या. 

     जाता जाता फक्त इतकेच सांगेन, तुम्ही स्वतः मधेच हरवून गेले ना की मग हट्ट करूनही कोणी आणून देणार नाही हे लक्षात ठेवा. जगण्याच्या ह्या चाकोरीत तुमचं बालपण ही जगत राहा जे आज वयाबरोबर हरवत चाललंय. पूर्वी एखादी गोष्ट करण्याची जिद्द असायची पण त्यामागे कोणी आपले आयुष्य विसरून धावत नसे. लोक स्वप्ने पूर्ण ही करायची आणि प्रत्येक गोष्टींचा आनंद ही घ्यायचे. अलिकडे मात्र हे कुठे तरी ढासळताना दिसते. अलिकडे लोक फक्त स्वप्नांमागे धावताना दिसतांत, परंतु कूठेतरी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला ते विसरतात. खरंच, या स्पर्धेच्या युगांत कुठेतरी तो आनंद, तो प्रत्येक क्षण जगण्याची कला कुठेतरी आयुष्यातून हरवत चालली आहे. खर्‍या अर्थाने कुठेतरी आयुष्य हरवत चालले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसच अगदी हा रोजच्या जगण्यातला खाचखळग्यांचा प्रवास करीत असताना, धावत असताना कधी ठेचकाळणं, पडणं, रकतबंबाळ होणं, उठुन पुन्हा धावणं, या प्रवासात येणारे सहप्रवासी, त्यांनी मारलेली फुंकर, त्यांचा तो मुलायम स्पर्श, स्नेह, ओलावा, जिव्हाळा, माया, ममता हे सगळं सगळं विसरुन आपण ईच्छित स्थळ गाठण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा गाठतो ही, पण हे सगळं करीत असताना खुप काही मागे हरवुन पुढे आलेलो असतो. जे हरवलेलं असतं अस वाटायला लागतं, ते खरं आयुष्य असतं. आपण काहीतरी सोडुन पुढे आलेलो आहे ही मनाला रुखरुख लागुन रहाते. ते हरवलेले क्षण म्हणजे हरवलेले आयुष्य. कित्येक गोष्टींचा आनंद न घेता रूक्षपणे बेचव रंगहिन जगणं म्हणजे हरवत गेलेले आयुष अस मला वाटतं, बरोबर ना ?

     धन्यवाद..! 

     लेखन : पत्रकार एन.के. ,वळसंग.  ( ☎️ : 8806605852)


No comments:

Post a Comment