Tuesday, 18 December 2018

परमेश्वर सगळं बघत असतो....!

शिर्षक :- लक्षात असुद्या...आपण कायम परमेश्वराच्या CCTV कक्षेत असतो...!

लेखन- एन.के. (पत्रकार)

【 जगण्याच्या दिनचर्येत सदकार्याची घट पाहता स्वार्थी समंजस जगणं सोडून द्यायला हवं ; बहुदा इतरांसाठी जगणं आपल्याला कधी जमणार आहे...?, समाजासाठी जगायला शिकलं पाहिजे हा बोध अभिप्रेत करणारा लेख.... 】

सकाळी सकाळी उठून आपल्या कामाला जायचं आमच्या पदावर काम करायला जायच्या संकुचित वृत्ती प्रत्येकांत असते लहान पासून ते थोरा मोठ्या प्रमाणात हे "आपलं "पाहायला मिळत शाळेत नाही गेलो तर हजेरी पाटावर माझी कमी जाणवेल, कामावर नाही गेलो तर पगार मला कमी मिळेल, इथं नाही गेलो किंवा तिथं नाही गेलो तर अस होईल तस होईल म्हणून स्वार्थी जगणं सोडून कधी जगासाठी वेळ द्यायला आपण मनापासून तयार होतंच नाही का हो...? दुसऱ्यांची सुख दुःख यात २ मिनिट थांबून बघून, ऐकून घेण्याव्यतीरिक्त त्यात सामील होण्यापर्यंत विचाराधीन होणारी आपली मजल कधीच जाणार नाही का हो...? कधी तरी धावत्या युगात गरजेच्या मदतीला आणि कधी तरी दुसऱ्यासाठी एखाद दिवस जगून बघूया..? कारण इतरांच्या साठी केलेलं नेहमी परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्य म्हणून नोंद नोंद होत असते, आणि आपण ऐकलं असेल की -
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा. जनसेवेची आवड रक्तात पाहिजे आज समाजात व्यस्त लोक वाढत आहेत. कधी कधी माणसं आपल्या ऐपती प्रमाणे वागतात किंवा ऐपत नसूनही असूनही देखावा पसंद करतात. म्हणजे भीक देण्यापासून ते एखाद्याला मदत मदत जरी केली आणि ते जरी लहान असलं तरी त्याची जाहिरात मात्र निवडणुकीच्या प्रचारासारख स्वरूप असत. संकुचित राहून स्वतः बद्दल फुशारकीची स्तुती सुमने गाण्यात प्रत्येकाला रुची असते पण ही प्रवृत्ती बदलली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे..! यासाठी मदत म्हणून संतांची शिकवण आपल्याला उपयोगी पडेल म्हणजे यात तुम्ही म्हणाल की संतांच्या आध्यत्मिक जीवनाचा का आशय पण काही शिकवण किंवा काही संतांच्या जीवनव्यथा ह्या जनसेवेची सक्षम आणि भक्कम उदाहरणं देणारी आहेत उदा. संत गाडगेबाबा त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात देशातील जनतेचा उध्दार करण्याचे काम त्यांनी केले आहे व समाजाला प्रबोधन करून ज्ञान प्रसार केला आहे. संत गाडगे बाबा या संतामधील महत्वाची भूमिका पार पडणारे एक आगळे वेगळे संत होऊन गेले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. याप्रमाणे संत तुकाराम असतील त्यांनी ही आपल्यात असणाऱ्या कर्मठ भावनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठीच त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पण एक म्हण आहे ना "कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडचं" याप्रमाणे आपल्यात बदल म्हणून कोणतीही गोष्ट दिसत नाही आपण आपल्या आणि स्वतःच्या विश्वात कायम मग्न असतो इतकं मग्रूर असतो की कोणत्याही गोष्टीला आपण सहज घेऊन त्यावर रिऍक्ट होत नाही जो पर्यंत स्वतःबद्दल नसत किंवा आपल्या बद्दल नसत तो पर्यंत. गरिबीतून वर येण्याची जी पंक्ती आहे त्या पंक्तीला साजेसे जगणे असते आपले साधारणतः म्हणजे की अडचणी आणि परिस्थितीत "बिकट" नावाची पाटी सर्वांच्या माथी असते सर्वांना लहानपणापासून अडचणी असतात. मग राहतो प्रश्न कुठे तर आपल्या परिस्थितीची जाणीव होऊन स्वतःच्या वृद्धिबद्दल विचार करायला सुरुवात करून आपण मग संकुचित बनतो हे टाळले पाहिजे.
   या उलट जगायला छानसे दिवस असतात चांगल्या परिस्थितीत वावर, जगणं, असत अशा वेळी आपल्याला शक्य तेवढं एक मेकाला समाजालाच नाही तर सवंगडी असतील किंवा सोबती असतील याना मदत करत राहणे किंवा बहुदा हे जमत नसल्यास प्रत्येकाच्या सुख दुःखात एकत्र येऊन त्यांना हवा असणारा सहानुभूती प्लस वेळ देत समाजात त्या प्रत्येक गरुजूच्या पाठीवर फिरणार माझं हात अस प्रत्येक बुद्धीने विचार केला पाहिजे आणि गरज आहे. म्हणजे मी म्हणून काय केलं पाहिजे अस ही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो... If we are not the part of solution, then we are the part of the problem. अशी भावना जर असेल ना तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्याचा सन्मान नाही जरी मिळाले तरी समाधान मात्र नक्की मिळेल. प्रत्येकजण अंबानी नसतो त्यामुळे मी काय करायला हवं हा विचार करत बसू नका कारण मी एवढा मोठा लेखक नाही पण साधारण विचार करू आपण की आपल्या आयुष्यात इच्छांचे मृगजळ, आशा-आकांक्षांच्या उसळत्या लाटा, मायेची छाया किंवा परकेपणाचे दु:ख, कर्तृत्वाचे शिखर वा वैफल्याची दरी, सुखाची पौर्णिमा व दु:खाची अमावास्या, कधी वैभव तर कधी पैशांची कमतरता हे येतच राहणार, परंतु या पलीकडे जाऊन मला काही करायचे आहे. बस्स! हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानून पुढे जायचे. मग प्रत्येक मार्ग तुम्हाला गाईड म्हणून काम करेल. आपल्या अवती भवती असणारी जी मार्मिक गोष्टी घडताना आपण बघतो त्यावर आपल्याला आणि आपल्या वैचारिक बुद्धीच्या जोरावर जर मार्ग काढता येऊ शकत असल्यास मनमोकळं व्यक्त व्हा...! आणि यासाठी समाजकार्याची बिल्ले असले पाहिजेत खिशाला अस नाही त्यांच्या साठी काहीतरी करण्याचा प्रयत्नच करा बस... तुमच्या सदकार्याच्या यादीत नाव आणि परमेश्वराच्या कॅमेऱ्यात पुण्याची चित्रफीत तयार व्हायला वेळ लागणार नाही...!

"चला कॅमेरा लावलाच आहे २०१८ च्या वर्ष समाप्तीच्या पूर्वसंध्येला हा माझा वर्षाचा शेवटचा लेख तुमच्या साठी सादर करतोय मन जरी बळकट असल तरीही बुद्धी मात्र कर्मठ असत हे दृढ सत्य आहे ; नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक स्वाभाविक संकल्प मनात असतील मग या संकल्पात एक संकल्प अस ही करा मानवाच्या मूलभूत गरजा पाणी, वीज वाचवा, परिसर स्वच्छ ठेवा, बळीराजाला मदत, गरजूला हात, आपल्या सोबत वेळ, देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणं हा ही उद्देश ठेवा ,आर्थिक मदत तुमच्याकडून होऊ शकत नसले, तरी इतर शक्य त्या प्रकारे खारीचा वाटा उचलायचा हे निश्चित करू शकता, रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या सगळी कर्तव्य पार पाडून, थोडासा वेळ आजूबाजूच्या गरजवंतांना द्यायचं द्यायचं ठरवा. आपण नेहमीच आपापल्या कामात व्यग्र असतो. परिणामी आपण माझं कॉलेज, माझा अभ्यास, माझं घर असे आत्मकेंद्री विचार करायला लागतो. आपल्याच भावविश्वात आपण रमलेलो असतो. या सगळ्यातून मुद्दाम वेळ काढून महिन्यातून किमान एकदा तरी जवळपासच्या वृद्धाश्रमात, अनाथाश्रमाला भेट देण्याचा निश्चय करा, महिन्यातल्या एक दिवस तरी त्या मुलांमध्ये, आजी-आजोबांमध्ये जायचं, तिथे जेवायचं, त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या, लहान मुलांशी आपणही लहान होऊन मनसोक्त खेळायचं ठरवा"

धन्यवाद...!

- आपला एन.के. (8806605852)

1 comment: