Friday, 24 January 2020

फक्त मनाला लढ म्हणा..!

शिर्षक - फक्त मानाला लढ म्हणा...!


 [ कष्टाच्या झाडाखाली चढ आणि उताराची सावली असतेच, चांगल्या म्हणवणाऱ्या दिवसा मागुन वाईट दिवसांची झालर येत असतेच, बहरलेल्या झाडाला वाळवी लागल्यासारख माणसाच्या आयुष्यात देखील अनेक नयन पाणावणारे क्षण एक ना एक दिवस गर्दी करतातच, म्हणून जगण्याला अर्थ नाही म्हणून देवाला आणि दैवाला दोष देणारे आपण सर्रास पाहतो, पण पडलेल्या रास्तावरच्या खड्याला बायपास मारून नवीन सुरवात करून आसवांना आनंद अश्रुत कन्व्हर्ट करणारा एक छोटासा किमान-कमाल प्रयत्न माझ्या या लेखद्वारे...]

        सामान्य माणूस जगायला खऱ्या अर्थाने जगायला लागला तेव्हा त्याची भूक समजली आणि आजवर कमी कमी म्हणत मला कमी पडतंय म्हणून वयाच्या काठी पर्यंत मला हवं हवं म्हणून हव्यासी बनून गेला. कमी जास्त काम जास्त म्हणत साठवत गेला पण कधी सुखं म्हणून अनुभवला का नाही ना ? क्वचितच सोडले तर ऐश आराम वगळता कौटुंबिक तथा जगण्याचं खरं सुख मात्र कोसो दूर गेला आणि ते सुख अगदी बोटावर मोजणी होईल इतक्याच लोकांनी अनुभवली. काम, काबाड कष्ट, मेहनत करून हव्या त्या गोष्टी आज आपल्याला साध्य ही करता येतात हो पण शेजारी असा तसा म्हणून आपले असे तसे रस्ते बदलणारे बाहुल्यांचे वाटाड्या म्हणवणाऱ्या वाटसरूची संख्या मात्र अमाप झाली आहे. देवाच्या देवळात जाताना महागडी चप्पल कडे साधारण १०००-१२०० च्या चपलाकडे लक्ष देणारा आणि गरीब १-२ रु. देताना १०० द विचार करणारा कृत्रिम मानव आज निर्मित झाला आहे. देवाकडे जाताना मागण्या शंभर एक असतात पण देताना हात मात्र पठयाचे आकुंचन पावतात म्हणजे स्वार्थी वृत्तीच जग आपल्या भोवताल आहे. आपल्याला आज कष्ट करायचं आहे तर व्यासपीठ शोधावं लागत. व्यासपीठावर आपला वचक असायला हवं तर कष्टाचे पाढे मात्र २-३ वेळा जास्तीचे पाठ करावी लागतील इतकं समरस परिस्थिती मात्र नक्की आहे. सर्रास आपलं सामान्य जनजीवन घेतलं तर आज अनेकांच्या हाताला काम नाही, धंदा करावं तर मार्केट नाही, भांडवल नाही. या अशा नैराश्यात जगणारा आजचा बेरोजगार नोकऱ्या, आणि कामासाठी वणवण भटकंती करताना दिसतो आहे. कुटुंब आई वडील बायको आणि समाज यांच्या समोर मी व्यस्त दिसलो पाहिजे कामाला असल्याचं एक स्व समाधान आणि समाज सोबत कुटुंबाला दिलासा म्हणून कार्य करत राहणे म्हणजे एकच ध्येय हा आजच्या सर्वांगीण तरुण पिढीचा पाढा झाला आहे. अशात कर्ज काढून भांडवल करणे, धंद्याला चालना मिळायच्या आत आर्थिक मंदीची झळ आणि परत रस्त्यावर येऊन बेरोजगार नावाचा शिक्का माथी घेऊन हिंडणे हीच दिनचर्या बनून जाते. अशा वेळी मन सुन्न होत आणि वेगवेगळ्या नाहक आणि दृष्ट विचारांनी मन ग्रासत आणि अशा वेळी संयम सोडून हातात दोरी, किंवा नोकरीच्या आमिषाने संसार आणि कुटुंबाची राखरांगोळी करणाऱ्या कुटुंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे, असे तरुण आणि मंदीमुळे कंपण्यातून बडतर्फ झालेल्या बेरोजगार गटातील व्यक्तींनी टोकाचा निर्णय न घेता सावरत स्वविश्व उभं करावं न मुंगी होऊन का होईना पण साखर खात जगावं ही गरज, आणि जन जागृती आहे.
      ह्या संदर्भद्वारे इतकंच मत प्रकट करेन की आपण सगळे निव्वळ श्वास घेतोय जगतोय म्हणून जगणं सुरू आहे असा पाढा आहे. आपली तीच मळलेली वाट, त्या वाटेवरचे तेच जुने धुळीचे कण झेलत आपणही जुने होतोय, वर्ष निघून जातात, काही दिवस आणि रात्र काढून एखाद्या दगडाला ठेच लागून पडतो, थांबला जातो तिथंच नकारात्मक गोष्टीचा उदय होतो न आपण संपलं सगळं आता खूप आपण जग पाहिलं पण त्यातून आपण हरलो म्हणून दुःखाला कवटाळून क्षण क्षण संपत जातो. आतून शुष्क होतोय खचला जातोय, पण हा कधी विचार मनात आणत नाही की कधी तरी, कुठे तरी ह्या प्रवासाला नवीन दिशा देत आपला मार्ग जिवंत जगण्याकडे जाईल का ? संपलेल्या वाटेवर नवी चैत्र पालवी फोडता येईल का ? सूक्ष्म सही पण छान जगणं पुन्हा जगता येईल का ? हा विचार कदापी मनात येत नाही. म्हणून चला पेटून उठा आणि म्हणा " स्पर्धा अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही" आपल्या चांगल्या वाणी आणि कुशाग्र वागण्यातून जगाला आपलंसं करत माणसांमधलं आणि परिस्थितीमधलं वैविध्य कुशलतेने हाताळत आपलं स्वतःच जग आणि व्यक्तिमत्त्व विशेष प्रभावशाली करा. समजून ज शून्य आहे मी आणि ज्याच्या सोबत असेन ज्या रस्त्यावर माझी वाटचाल असेल त्याची किंमत नक्की दूगनी (दुप्पट ) करेन म्हणून संघर्षाला आज पासून लागा. स्वतः स्वतःला घडवा नक्की यश मिळेल जळणारे आणि आपल्या लहान कार्याला बघून आता हसणारे बाकीचे मात्र कधी अहंकार तर कधी आत्मसन्मान तर कधी भावनिक कुचंबणा ह्यातून सामान्यच राहतील अशी गोड समजूत मनाला द्या आणि आपल्या वाटचालीत आपण कुठे माघार घ्यायची ,कुठे पुढाकार घ्यायचा हे स्वतः आत्मपरीक्षण करून ठरवा. जगाच्या सल्ल्याची किंचितही वाट बघू नका. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जगू तोपर्यंत आयुष्याची संध्याकाळ खुणावू लागलेली असते. मग जाता जाता बघा जमलं तर अस जगायला " मनाचा थांग लागू न देता स्वच्छंद जागा म्हणजे एक विलक्षण संयमित मुखवटा जगाला दिसेल ही पण तुमचा आतला पॉवर ऑफ न्यू च्यापटर कायम कार्यरत ठेवा. सोबत यश शिखर सर केल्यावर आपली माणसं जी संकटात उभी होती त्यांचं ही मन जिंका. आजच्या युगात मानसिक संघर्ष, उलथापालथ घडत असताना,शब्दांना मौनाचा बांध घालणं खूप कठीण असते अशा देवाने निर्माण केलेली अशी माणसं आजूबाजूला असताना आपण नक्की कुठे चुकलो आणि अपयशी झालो त्याचा आरसा ठेवा आणि लेट बट ग्रेट जगायला सुरू करा.

धन्यवाद...!      - पत्रकार एन.के.- 8806605852

1 comment:

  1. Thank you Sir...
    Because of you, my thinking is growing.

    ReplyDelete