Tuesday, 10 December 2019

फॉरेनवाला इंडिया...

शिर्षक : पाश्चिमात्य संस्कृती-विचारांचा इंडिया...

लेखन : पत्रकार एन.के. - ८८०६६०५८५२

         [ भगवतगीता आणि कुराण सारख्या अनमोल धर्मग्रंथानी बनलेला हा आपला सुजलाम सुफलाम भारत देश. संस्कृती आणि परंपरा जपत मार्गक्रमण करणारा आपला देश आज अनेक लहान पासून वृद्ध पर्यंत ट्रेण्डच्या विळख्यात फसून मॉडर्न वाली व्याख्या आत्मसात करायला निघालेली पिढी आणि या पाश्चिमात्य मॉडर्न मुळे निर्मित झालेल्या वाईट नजरा आणि घाणेरडी प्रवृत्ती तथा यामुळं अत्याचार सारख्या निर्लज्म घटनांना कारणीभूत कोण ? संस्कृती बाजूला ठेऊन, वयाचा विचार न करता, राहणीमान न पारखता उच्च-भु राहण्याच्या गडबडीत भारतीय नारी म्हणून कोसो दूर गेलेल्या पिढीला, सिनेस्टाईलची कॉपीराईट जिंदगी जगणाऱ्याची डोळे उघडण्यासाठी छोटासा माझा प्रयत्न या लेखद्वारे...]


         शिर्षक अन संदर्भ वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणार हे नक्कीच कारण ; आमच्या फॅशनला आणि राहणीमान आणि स्टेटस भरी जिंदगीला कोणी उपदेश द्यावा आजच्या मानवी विचारांच्या पलीकडचे आहे. अत्याचाराच्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भोवतालच्या घटनांचा क्रम पहिला तर आजवर अत्याचार सहन करून जिवन संपवून घेतलेली ही स्त्री मात्र आहे. बलात्कार, खून, अतिप्रसंग, छेडछाडीच्या बातम्या शिवाय आज पेपर पासून वृत्त चॅनेल्सना सुद्धा रंग नाही का असे छिन्न प्रश्न मनात येऊन जातात. देशाचं भवितव्य म्हणून नजीकच्या काळात बातमी वाचली की देशात महिलांना जास्त धोका असणारा देश म्हणजे चक्क भारत, बलात्कार सारख्या गोष्टीच्या घटनाक्रममध्ये सर्रास भारताचा अव्वल स्थानी क्रमांक पाहायला मिळाला. बातम्या वाचताना किंवा असे विश्लेषण हाताळताना मनात लाज ही वाटते आणि चीडही तितकीच येते. सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर आज जी पिढी तयार होते आहे हेच कारणीभूत असेल ? किंवा आजच राहणीमान आजची "स्टाईल मे रेहने का" मूळ किंवा लोकांची मनस्थिती मूळे अर्थात स्वार्थी ( जी मी क्वालिटी असलो / असले पाहिजे ) च्या नादात अनेक भयावह घटना घडतात हेच अंतिम सत्य म्हणावं लागेल. भारत हा देश अनेक प्रांत अनेक धर्म अनेक महापुरुष अनेक ग्रंथ अनेक वेदो-पुराणनी बनला आहे. भारताच्या विविध प्रांत नुसार चालीरीती, परंपरा, पेहराव इतकंच काय तर खाद्य संस्कृती सुद्धा विभिन्नतेने नटलेली आहे. आज ह्या संस्कृती न विभिन्नता लोप पावत इतिहास जमा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर आजही मॉडर्न म्हणून जगण्यात लोकांना न सध्य + भावी पिढीला धन्यता वाटते. म्हणजे एकूण एक तात्पर्य गाघरा छोली ते चोळी पासून पंजाबी ड्रेस सारख्या पेहरावांची जागा आज जीन्स- टॉप ने घेतली तर वरण भात किंवा दाल-बाटी ची जागा हळूहळू पिझझा बर्गर घेत आहेत म्हटलं तर वावग ठरणार नाही. याचबरोबर सिनेमा न ऑनलाईनवाल्या लाईफने तर लाईफ बदलून टाकली न त्यातून निर्माण होणारी स्टाईल, वागणं, बोलणे, कृत्य यातून आजची पिढी हिरो हिरोईन झाल्या तर काकू अँटी झाल्या न मग स्टाईल के नाम पे बिकनेवाली जिंदगी नजरेच्या जाळ्यात आयटमच्या शिक्क्याला जागा दिली न त्यात सेम बेरोजगारी, ( अंधार कोठडीत पडलेले न कुत्रं पण विचारत नाही आता ) त्या उच्चशिक्षण घेऊन ही काम नसल्याने कट्टा ओस पडून दारू न नसेचे अड्डे तुडुंब व्हायला लागले. म्हणजे आपली संस्कृती, संस्कार कानाडोळा झाले न 90-60 वाले युवक निर्माण झाले. न तरीही मेक इन इंडिया म्हणून अजून प्रशासन ठेम्बा मिरवतय.
संदर्भ कडवट हाती घेतोय भावना दुखावल्या तर क्षमस्व म्हणणार नाही कारण मत प्रकट करतोय न ठाम आहे या मतावर. आज बाहेर काम करणाऱ्या मुली कितीही काम असेल तरी किमान घरापासून ४०-५० किमी अंतराच्या आत काम करतात. आणि अगदीच अडचण असल्यास आज सध्या घरासमोर ४ चाकी असते. साधारण ८ वाजता जरी घरी जायला निघालो तरी लवकर म्हणजे साधारण ९:३० पर्यंत आपण पोहचू म्हणजे सेफ झोन मध्ये पोहचू. हा एक भाग झाला पण जर रोज आपण रात्री प्रवास करतो एकांतात तर त्याला सेफ्टी राहणं महत्वाचं म्हणजे लहान संरक्षण पुरते शस्त्र बाळगा. याच बरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आपण राहतो कसे न आपल्या सभोवताल असणारी जनरेशन न त्याची नजर यावर लक्ष ठेऊन जगात जगाल तर नक्कीच आयुष्य आदर्श न सुरक्षित बनेल मधे एक मराठी कार्यक्रम बघत होतो बिग बॉस मधील मंडळी कार्यक्रमसाठी उपस्थित होते तर अभिजित बिचुकले माहीत असेल सर्वाना त्यांनी एक महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी पुणेकर बहुतेक आडनाव असावे यांच्या एक संदर्भ रंगला " की बिचुकले यांनी ६०+ वर्षाच्या त्या पुणेकर यांना आई म्हंटले म्हणून त्यांनी त्रागा केला की मी महाराष्ट्र गाजवते, थिरकवते मी म्हातारी झाली का ? मला आई म्हणतो हा मी अजून जवान आहे..! अक्षरशः जुंपली की बोलू नका हवं तर बिचुकले तुम्ही पण आई उपमा देऊ नका... उत्तरार्थ बिचुकले म्हणाले की जगातील सर्वात महान उपमा दिली पण तुम्हाला नाही आवडली...!" म्हणजे यावरून तात्पर्य अस की ६० वर्षाची वृद्धा म्हणते मी अजून जवान आहे म्हणजे युवक न पुरुषाच्या मनाची चालबिचालता इथं कोणी मलिन केली. सोबत एक अनुभव अजून शेअर करतो " टिकटॉक माहीत असेल सर्वाना त्यावर ट्रेंड चालतो ३५ ते ५० वर्षाच्या महिला आपल्या आवाजात अनेक नालायक प्रश्नाला स्वतः वाचा फोडलेला पाहायला मिळालं जसे की- "हॅलो फ्रेंड्स लग्न झालं तर काय झालं प्रेम होऊ शकत, लायसन्स असलं तरी आर.टी.ओ. म्हणून मॅनेज होता का ? मी सिंगल आहे बॉय फ्रेंड बनता का ?" इतकंच नाही तर अर्धनग्न कपड्यात व्हिडिओ बनवून पोस्ट करून एक पुरुष न त्याच्या दांडग्या विचारला आपण मालिन करण्याचं कामच केलात ना. अशा सोशल मीडिया माध्यमातून ओळख न मैत्री न प्रेम न ब्रेकअप आणि अंतिम द एन्ड काही वेळा नाही अनेक वेळा : जीवित हानीचा थरार ...! मग मला सांगा चूक कुणाची ??

     जाता जाता एवढंच सांगेन कुणाला दोष देण्याचा किंचितही हेतू नाही पण आपली संस्कृती न परंपरा न आपण कसे असावे पासून कसे जगावे हे सांगणारे महान धर्म ग्रंथांची पर्वणी आपल्याला लाभली आहे त्यानुसार जगणं असुद्या फॅशन करा पण त्याचा बाजार नको, स्टाईल करा पण त्याचा लोकाभिमुख स्टंट नको, महिलांनी विशेषतः स्वतःची काळजी घ्या, स्वतः मॉडर्न राहा पण विचारांनी दृशातून प्रदर्शनाकडे वाटचाल करणारी नको, प्रत्येक वेळी चूक पुरुषाची नसते कारण आपलं संरक्षण आपण स्वतः करायचं आहे पूर्वी स्वयंपाक घरातून बाहेर येत नव्हत्या महिला यातून १०% घ्या नजरा वाईट असतात तर त्यात बदल म्हणून संस्कृती अभिप्रेत होईल असं राहणीमान अवलंबून घ्या...!लवकर निघा-लवकर पोहचा. कसेही जगा पण भारताला इंडिया म्हणून बघून जगू नका. आपण अमेरिकेत नाही भारतात राहतो याचे देहभान सर्वाना असुद्या....!


धन्यवाद...!

"एखाद्या मुलीचा असो किंवा मुलाचा, त्यांचं सौन्दर्य हे जपायची गोष्ट आहे, पुजायची गोष्ट आहे ; भोगायची नाही" एवढं ध्यानात असुद्या...!

No comments:

Post a Comment