Saturday, 30 November 2019

खरा रावण अजून जिवंत आहे...!

शिर्षक :- खरा रावण मेलाच नाही..!

लेखन :- पत्रकार एन.के.- ८८०६६०५८५२

⚫ Justice For Nirbhaya_Priyanka ⚫



[ आई ! प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला शब्द. प्रांत, देश, राज्य, गाव अनेक तर धर्म, जात, पंथ, बोलीभाषा अनेक पण मानव प्राणी हा एकाच प्रजातीचा आणि त्याचा जन्म हा एक महिले कडून होते न त्याला आपण आई म्हणतो. मातृत्व दिल्यावर जगाची पारख झालेले आपण जगाच्या बाजारात हमीभाव मिळवून रॉयल जगण्यात तिची ती ९ महिन्याच्या त्रासाला बायपास देऊन इतरांच्या आया, बहिणी कडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत करतो ? इतकंच नाही तर लचके तोडायच्या संधीला धन्यता मानून अमानुष बनून जातो. एवढी नीच प्रवृत्ती कशी निर्मित होते ? कसे बनतात हे नराधम ? बनतात पुनः तर दरवर्षी दसऱ्याला रावण जळून पण उरतो कसा...?
         लेख यासाठी लिहीत आहे की, देशात राहायचं तर का ? कशासाठी ? भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल म्हणजे झालं का ? नराधम अजून तयार होत आहे सावधान आणि सतर्क राहा. रात्र वैऱ्याची आहे. आज जगाच्या पाठीवर महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. हम भी कुछ कम नही म्हणून समाजात आपला आदर्श निर्माण करतात आणि जगतात. अस कोणतं क्षेत्र नाही की जिथं महिला काम करत नाहीत. एवढंच नाही तर देशाचं नेतृत्व केलेल्या महिलांचा उदाहरण, धाडशी संस्था, कार्य करणारी महिला अधिकारी वर्ग पाहिल्यावर प्रत्येकाला आपल्या देशाचा हेवा वाटेल इतकी महिला शक्ती आज देशात आपल्याला वर्तमान आणि भूतकाळात पाहायला मिळत. एक महिला उभी राहिली म्हणून राज्य गुलामगिरी मधून बाहेर आल, महिला सोबतीने समाजाची घाण अंगावर घेत शिकवली म्हणून आज सगळ्यांना अक्षरांची ओळख झाली. महिला इतकी सक्षम आहे. तशीच एक स्त्री जी आपली आई, बहीण, बायको च्या रुपात आपल्या आयुष्यात असते किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात असते मग प्रत्येकाच्या ती मुख्य भाग म्हणून जगण्याची आणि देशाची रण रागिणी आहे तर देहावर नजर टाकणारे कोणत्या उदरातून जन्माला आले ? आरोप प्रत्यारोप, श्रद्धांजली, जस्टिश हे ते नको ढीगभर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या... कोपर्डी नंतर चिमुकली असिफा नंतर हे ताज उदाहरण प्रियांका रेड्डी प्रकरण बघून मन छिन्न झालं. काय गुन्हा होता त्यांचा मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून ? का राक्षसाची भूक भागवायला ? गेंड्याच्या शिंगाला खाज सुटली म्हणून खाजवून घ्यायला जन्म घेतला का त्यांनी ? आजही अशा प्रकरणांनी त्या नराधमाच्या जन्म प्रक्रियेवर लाज वाटते कोणत्या सिस्टीम मधून जन्म घेतले असतील हे ? नराधमांना शिक्षा करायला ही सरकार तयार नाही. लाचार मीडिया आपली लोणी खाण्यात व्यस्त तर तळव्याचाटु नेत्यांनी आपली आरोप प्रत्यारोपात त्या पीडितांची खोटी सहानुभूती घेऊन उभे ठाकले हे सर्व चित्र आज आहे हे बदलणार कधी ? रावण अर्थात मारणार कधी ? निष्पापांच्या अंगावर पडणारे ओरखडे थांबणार कधी ? अजून किती निर्भया, असिफा आणि प्रियांका बघणार आहोत आपण ? कठोर शासन का होत नाही ? अशा नराधमांना भर रस्त्यात नग्न करून हात-पाय कापून धिंडवडे काढून नॉयलॉनच्या दोरीने गळ्यातला स्वास शांत होईपर्यंत ओरखडे का दिल जात नाही...? 

माझी ओळख तेव्हाच संपली,
फक्त "निर्भया" म्हणूनच उरली,
आता मरणाची आस मनी धरली,
शंभर वर्षे तर केव्हाच भरली....!!

... आपली आई, बहीण, बायको जिथं कुठं कामाला जात असेल, शिकायला जात असेल तिच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आज मनापासून काळजी वाटते आहे हे सत्य. आजपासून संध्याकाळ झाली की १० कॉल झाले तरी चालेल पण काळजीपोटी चौकशी करत राहू अशी शपथ घ्या. समाजात जगायचं असेल तर फक्त नाव, पैसा पुरेस नाही तर आज भीतीची गरज आहे. भीतीने बचाव म्हणून सतर्क राहून कार्य करा, राहा, जगा. कारण दरवर्षी दसऱ्याला रावण जळतो पण जळताना हसत मरतो कारण त्याला माहिती आहे. हा मनुष्य मला जरवर्षी जाळतो पण मी कोणत्याही स्त्रीला स्पर्श देखील केला नाही, आणि हास्य यासाठी करतो आणि म्हणतो आज मला जाळलं पण तुमच्यात अजून रावण शिल्लक आहे. म्हणजे खरा रावण जिवंत आहे. तो मेलाच नाही. फक्त कधी निर्माण होईल कुणाला माहीत नाही इतकच, म्हणून काळजी घ्या स्वतःची...!

       जाता जाता एवढंच सांगेन जगात प्रत्येकाला आई आहे, जगात प्रेम आहे जिव्हाळा आहे, माणसाला आवाज आहे, शब्द आहेत, बुद्धी पण प्लस पॊइंट मध्ये आहे. एकदा बालपण आठवा आई आठवेल फक्त आईचे कर्तृत्व आणि त्याग तथा योगदान लक्षात ठेवा बस...! माय-बाप, माता-भगिनीला माझा सल्ला आहे आपल्याची काळजी घ्या, स्टाईलने जगणारी पिढी आहे, कॉपी-पेस्टची नीच प्रवृत्ती समाजात कुठ तरी उदयास येत आहे. अंधारात रावण आहे रावणात महिला द्वेश नव्हता पण बदनाम झाला आणि "बदनाम राक्षस बननें देर नही करता"

काळजी घ्या ! स्वतःला जपा !! सतर्क-सावधान राहा...!!!


धन्यवाद...!!!

No comments:

Post a Comment