Saturday, 23 November 2019

कर्माची फळं...!

शिर्षक :- आयुष्यात एक न एक दिवस कर्माची फळ चाखायला मिळतातचं...

लेखन - पत्रकार एन.के.: ८८०६६०५८५२

[ ज्या अर्थी लहान का असेना सक्षम जिवनगाडा ओढत आपण जगत असतो आणि या जगण्यात आपल्या सभोवताल लहान सहान किंवा आपल्या गस्ती (सोयरीक ; मित्र, नातलग ) मधील लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नात्याने भेटत असतात या नात्यांची सांगड घालताना आपण दिलेला त्याना भाव, वागणं यातून आपल्या मनाची कर्मेद्वार कळून जातात. सेम असेच आपण बाहेरच्या जगात वावरताना जसे आपण वागतो "तसे" कर्मफळ आपल्या हयातीच्या जिंदगानीत मिळत राहतात. ]

      भगवत गीतेमध्ये म्हंटले आहे की "कर्म करत जा फळाची चिंता करू नकोस." खरचं कर्मच माणसाचे सर्व काही आहे. माणसाचे बाबतीत जे काही आज घडत आहे ती आपल्या कर्माची फळे आहेत. कर्माच्या बाबतीत माणूस बेफिकीर बनतो खरं पण त्यानंतर आज ना उद्या त्याच रस्त्याने जाणार आहोत आपण याचा विसर मात्र पडून जातो. शिर्षक प्रमाणे फार काही लांब नाही स्वार्थी कातड्यापासून थोडं सोयरीक बाजूला करून घेऊन जगायला शिकण्याची आज गरज आहे पण त्याची प्रचिती माझं शेजारच्याला यावं या विचाराने आजचा माणूस ग्रासला आहे सत्य. म्हणून आपल्या आज ना उद्याची चिंता करून रक्त आटवून घेण्यापेक्षा "Believe on कर्म" जाणून घेणे बंधनकारक म्हणायला काय हरकत आहे. म्हणून माझ्या विचाराने मी विशद होतो जे काही कर्म झालेत त्याची फळे आज आणि आजच्या ह्या जन्मीच मिळणार आहेत एवढं ग्राह्य असावं. जर जन्मतः चांगलं केलं असेल किंवा हयात जिंदगीत जर चांगलं केलं असेल विचाराने आणि आपल्या सभोवताल असणाऱ्या सजीव असो निर्जीव असो या सगळ्या सोबत असणारी कनेक्टव्हिटी जर उत्तम असेल चांगली आणि डिस-कनेक्टव्हिटी असेल तर भोगाची सरशी जीवनासोबत आहे एवढं जाणून जावं माझं मत. अर्थातच जे तुम्ही करता, राहता, वागता आयुष्यात तुमच्या कडून जे घडलं आहे याची नोंद कुठं ना कुठं होत असते न पुढच्या जन्म बघायला कदाचित परमेश्वराला सुद्धा वेळ नाही त्यामुळे योग्य वेळी या मोबदल्यात तुमची चांगली किंवा वाईट फळे रिटर्न गिफ्ट म्हणून पदरात पडत असतात एवढं जाणते व्हा. खूप दिवसांनी लिहायला घेतलं तस सारांश आणि पिन अगोदरच केलेलं पण आज वेळ मिळाला म्हणून मध्यरात्री लिखाण करतोय अनुक्रमे कर्म आणि फळे यावर संदर्भ झाला पण मी म्हणतो किंवा आपल्या ज्ञात असणारे सर्वजण ह्या विचारातून नक्की गेलं पाहिजे म्हणजे की, किंवा गेले असतील बहुदा आपण किती ही चांगली काम करू पण मानव म्हटलं की एक क्षुल्लक चूक झालेली असते किंवा होते तीच चूक लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात म्हणजे केलेली चांगली कामे विसरली जातात अलगद पण चुका मात्र अलगद आणि कायम स्मरणात राहतात. म्हणतात ना "Choose Ur Wors Voicely" जितके बोलायच तितकंच बोलायच जास्त बोलायला जायचं सुद्धा नाही हे सज्जड ऍक्शन ऍक्ट समजा हवं तर. भावनेच्या भरात क्षणार्धात व्यक्त झालेलो असतो आपण तेच कुठं ना कुठं पुढच्याच्या मनाला लागून जात आणि आयुष्य भराच दुखणं होऊन बसलेल असत.
         अच्छा मग राहायचं कस अस पण प्रश्न पडतो तेव्हा मी सल्ले द्यायला कोणी मोठा उपदेशक नाही पण जे पटलं ते लिखित स्वरूपात आपल्या समोर विशद होत आहे इतकंच. मग तात्पर्य इतकंच सांगेन की परिस्थिती समजून घेऊन रिऍक्ट व्हा आणि रिस्पॉन्ड करा. आपल्या हातून होणारी कर्मे ही आपली फलश्रुती असतात. चांगल्या फळ प्राप्तीसाठी एक सुंदर उपाय आणि ऑप्शन आपल्याजवळ आहे म्हणजे की चांगले विचार ठेवले तर प्रत्येक क्षणी वाईट कमी करून चांगलं जास्त घेतलं तर हातून नक्की सदकर्म होत राहतील आणि प्लस्पॉइंट म्हणजे समाधान. कोणाच्याही बद्दल किंतु परंतु असल्यास सकारात्मक विचाराने ते बदलू शकतो. अनेक वेळा आपण अनेक गोष्टींना गृहीत धरतो एखाद्या माणसाबद्दल मत बनवण्या अगोदर आपण जर त्याच्याशी जर सुसंवाद साधला तर कित्येक गैरसमज दूर होतील न नाती शाबूत राहतील.

    "आयुष्यात शहाणपण यायला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते; म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपली कर्मेच त्याला सुंदर बनवणार आहेत."

धान्यवाद...!

[ लॉंग टर्म नंतर लेख पूर्ण करायला वेळ लागला त्या बद्दल दिलगिरी ] 

No comments:

Post a Comment