Monday, 17 February 2020

प्रेम : आई वडिलांवरचं...!

शिर्षक : खरं प्रेम तेच : आई-वडिलांवरचं

       आजची पिढी इतकी प्रगत झालीय की समाजात सत्य आणि असत्य न जाणता अनेक नात्यात सहज गुंफली जाते. अनेकांच्या स्वार्थी किंवा मतलबी या समर्पक नावाची पुष्टी न करून घेता ट्रस्ट नावाचा विश्वास ठेवून बसते. आजकालची पीढीला माहीत नाही की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं एक नात म्हणजे संबंध हे नक्की मग त्या नात्यात रक्त नाते, मानलेली नाती असे अनेक प्रकार पडतात. वेळ आली की आवाज दिल्यावर येणारे १० तर कारणे सांगणारी १०० अशी अनिष्ट प्रथा आज समाजात वाढीस लागली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक आजकाल आपण सभोवताल पाहतोच, नव-नव्या कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मैत्रीच्या नात्याने तयार होणारी नाती काही स्वार्थी अपेक्षांचे ओझे घेऊन लयास जातात. अर्थातच माझ्या म्हणण्याचा हाच उद्देश आहे की आज सजवून धजवून आपल्या न पुढच्याच्या अंगावर स्तुतीसुमने उधळून तयार केलेल्या डुप्लिकेट नात्यात आज काहीसा प्रत्येक युवा ते सम वयस्क लोकांत ईश्क वाला लव्ह होताना दिसतो आहे. युवा वर्ग असो किंवा कोणीही पुरुष किंबहुना महिला किंवा मुलगी प्रत्येकाला नव्या झालेल्या नात्यात एक मेकांबद्दल जाणून घेण्याची चौकस बुद्धी खूप प्रमाणात अन क्षणात वाढताना दिसते. प्रेम होतं न आकर्षण सारख्या मारक गोष्टीतून नात बनत मान्य पण आवश्यक असणारा त्यातला खरेपणा असतोच किती ? वेळ न एक समज ऑफ जवळचा प्लस ओळखीचा म्हणून ओढाताण करून चालू ठेवलेली नाती टिकतातच किती ? सोशल मीडिया किंवा डोळ्याने किंवा वयाच्या न प्रवाहाच्या बदलात आवडलेली नाती ग्रेट म्हणून निवडली जातातच किती?

           

             असा संदर्भ आज घेऊन येण्याचा एकमेव उद्देश की आज हा म्हणतो ना बोलीभाषेत फेमस तसला तो ट्रेंड झालाय पण नात बनलं तर आई वडील सारख बनावं. जे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या दांपत्यवर असलेली तमा, काळजी, प्रेम कधीही स्वार्थी किंवा उद्देशून व्यक्त होत नाही. सुखात दुःखात कायम काळजीच नव्हे तर त्यात असणारी आपल्या हिताचे सजेशन देणारी ही नाती गुंफणारी ते आई वडील न त्याच नातंच सर्वश्रेष्ठ.  ठेच लागली की आई बाबा वडील हेच सावरणार असतात. कधी अडचण आली तर  माय बापाच्या आशीर्वादाला तोड नसते. पोटच्या गोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला जग माहीत नसताना , आपण या जगात नसताना ९ महिने वाढवलेल्या माउलीने त्रास घेऊन जग दाखवलं तर आजही अशी प्रगत, पाश्चात्य संस्कृतीवर अपार लव्ह करणाऱ्या, जास्त पानांची पुस्तक वाचलेल्या मुलांनी आज अनेक ठिकाणी आई वडिलांच्या जीवाला घोर अर्थातच वृद्धआश्रम दाखवला. न तेही आज लग्न करून आणलेल्या बायकोच्या गॉड बोलीच्या प्रेम जाळ्यात अडकून हे कितपत योग्य आहे...?
तात्पर्य एवढंच की ट्रेंड वाला प्रेम न कमिटमेंटने वाढलेलं प्रेमाचं झाड, वेल एकदिवस वाळून जाणार आहे चांगल आहे की ज्यांनी आपल्याला भूक लागल्यावर दूध पाजलं आपल्या उदरातून त्रास देऊन जग दाखवलं त्यांच्या प्रेमाला उत्तर न उपकार आपल्या जगात कुणाकडे नाहीत पण तेच प्रेम उपकाराच्या छायेत का असेना पण त्यांच्या या वयात न यावेळेत तर प्रेम करा रे ! सांभाळून त्यांच्या वर थोडं तरी प्रेम करा रे !

No comments:

Post a Comment