फेब्रुवारीची शिवजयंती संपली की दोन-एक महिने परीक्षेची धून सुरू होते अर्थातच मी बोर्डाच्या इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परिक्षाबद्दल बोलत आहे. मागील काही वर्षात बोर्डाची परीक्षा असली की एकच ऑक्टोबर पासून परिक्षार्थीची धामधूम असायची.
शाळेच्या नियोजनात पण या परीक्षेला घेऊन कडक नियम करत मुलांकडून चोख अभ्यासक्रम पूर्णत्वाला हात घातलं जायचं न यात शिक्षकांची सुद्धा कसरत व्हायची. अलीकडे आधुनिक काळात परीक्षा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडे असणार एक केंद्रित लक्ष किंवा परीक्षा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनुक्रमे 20 अमानत गुण, विद्यार्थ्यांना हात लावायचं नाही म्हणून सैसाल मोकळं रान म्हणून आज विद्यार्थी परीक्षा किंवा शालेय असणाऱ्या पुस्तकी उपक्रमात तेवढ्या हिरहिरीने भाग घेत नाहीत जेवढं अगोदरच्या काळात घेतलं जायचं, मोबाईल, टीव्ही, पब्जीसारखे ऑनलाईन खेळ, व्हाट्सएप मैत्री, संभाषण यात अभ्यासासाठी काढून ठेवलेल्या एकूण वेळेतून किमान कमाल वेळ आज कमी होत चालला आहे .
पाल्य न पालक यांच्या असणारी परीक्षा बद्दलच गांभीर्य काहीसं ढासळत चाललं आहे. पुस्तकांशी मैत्री म्हणजे जीवनाच्या यशाशी मैत्री ही म्हण आता लोप पावत चालली आहे.
जुन्या काळात मॅट्रिक शिकलं म्हणजे नोकऱ्या लागायच्या आज पदवीधर झाल तर शिपाई म्हणून नोकरी लागायची पंचाईत. आजची ही शिक्षण पद्धत काहीशी सोपी झाली पण त्या शिक्षणाचा फायदा आज काही ठिकाणी होताना दिसत नाही बेरोजगारी, अपुऱ्या नोकऱ्या यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. परीक्षेला सामोरे जाताना आज वेळेत अभ्यास करून त्यावर मात मिळावं यासाठी केलेलं गनिमीकावा टाइपचा अभ्यास आज दिसत नाही. खिंड लढवून आल्यासारखं आनंद आता पास झाल्यावर दिसत नाही. कारण शिक्षण पद्धत सोपी मुलांच्या पाठीवरच्या ओझं कमी करण्याच्या नादात आज शिक्षण कमी मार्क जास्त अशी पद्धत-परंपरा रूढ होताना दिसते आहे. शिक्षण घेतल्यानंतर ९०% च्या वर मार्क असणाऱ्या मुलाला आज घरी बसावं लागत आणि आरक्षण असलेल्या मुलाला रस्ता गवसतो. मग शिकायचं का आणि कसं हा प्रश्न असताना जास्त मार्क किंवा मेरिट मध्ये ९५% च्या वर गुणानुक्रम यायला हवं आणि परीक्षेला एक युद्ध म्हणून जिंकण्याच्या हेतूने लढायचं आणि काढलेला किल्ला हाच आयुष्याचा एक पायरी, स्टेप म्हणून बघितलं तरचं शिक्षण या उक्तीचा उपयोग होईल अन्यथा आपली तलवार म्यानातून बाहेर येऊन जगाच्या बाजारात परफॉर्मन्स दाखवणार नाही हे नक्की त्या उद्देशाने पाल्य न पालक परीक्षा कडे बघावं या हेतू हा लेख.
लेखन : पत्रकार एन.के - ८८०६६०५८५२
No comments:
Post a Comment