Wednesday, 10 June 2020

नाती : रस्ते आणि जिवन...!

शिर्षक :- नाती अशीच असतात...!🙏🏻

     
         
       जगाच्या पाठीवर अनेक लोक भेटतात, करतात, मैत्रीच्या आणि आपुलकीच्या नात्यावर भुरळ पडेल अशी अनेक नाती बनतात सत्य असत्यच्या खेळा सुरू होतात यात ही अनेक नाती अशी अदृश्य असतात जे प्रेमाच्या प्रवाहात वाहिलेली असतात. स्वच्छ आणि सुंदर नाती कधीही बाधत नाहीत कारण अशी नाती कधी प्रेम नावाच्या पंखाच्या असेने हरत नाहीत तर उलट अशी नाती मैत्रीला एक किनार मानून मार्गक्रमण करत राहतात. कधी कधी नाती अशी अवजड वाटतात की आपल्यात निर्माण झालेला त्यांच्या बद्दलचा कणव कमी व्हावी आणि संपर्क नात्यातला संपवावे आणि निस्वार्थ भावनेने एकवटावे. नाती असतातच अशी लिहताना भान राहत नाही की सकाळ ते संध्याकाळ पर्यंत प्रत्येक नात वेगळं अर्थ, समज, वेगळी तमा, वेगळं आकर्षण अर्थात वेगळेपण असणाऱ्या असतात. पण अशा नात्यात एक प्राजळ मनाने आपल्या साठी केलेली प्रार्थनिय नाती असतात.
अशा नात्यात कधी तर प्रेम, विरह, सहवास पासून ते अगदी जिवलग पाखरांच्या गुफ्त-गु असतात. एखाद नात सुंदर आणि सजवून धजवून निर्माण केलं जातं त्याला प्रेमाचा वास लागतो अशा वेळी प्रत्येक शब्द आणि प्रत्येक बोली भाषा ही सावरून जगणं आणि व्यक्त होण्याला सुरवात होते. कधी कधी वाटून जात की अशी नाती जुंपली जन्माला की वाईट किंवा कोणत्या तरी लहानशा चुकीने दुरावली जाऊ नयेत म्हणून कधी प्रपोज केला जात नाही कारण मैत्री मलीन होऊ नये यासाठी धडपड असते. खरं तर मला तरी वाटतो.की मैत्री मधले प्रेम जा​स्त महत्वाचं आहे .कारण की आपल्याला जर अचानक एखादं संकट आले तर आपण एकटेच काही करू शकत नाही .जर आपण अगोदरच जर मैत्री करून ठेवली तर ती मैत्री आपल्याला आपल्यावर जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा ही मैत्री आपल्याला साथ देत असते. असं पण नाही की प्रेमा मधली मैत्री चांगली नाही ते पण ते पण एक महत्वाची मैत्री आहे. परंतु त्यांचा पेक्षा जास्त महत्वाची म्हणजे मैत्री. व्यवहार आणि मैत्री या दोहोंपैकी काहीच निवडु नका...
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा...
"व्यवहारात मैत्री असावी पण मैत्रीत व्यवहार नसावा...!"
व्यवहार करताना मैत्री सर्वांशी असावी...पण व्यवहारात भोळे पणा...सालस दाखवले तर जवळील व्यक्ति सुद्धा आपला वापर करेल...म्हणून पूर्ण व्यवहारीकच रहावे...
मैत्रीत व्यवहार केल्यास एखाद्या व्यक्तीचा करार करत आहोत असे काहीतरी जाणवेल...म्हणून मैत्री आणि व्यवहार दोन्ही असावे पण दोन्हीही आपापल्या ठिकाणी ठेवून पुढे जात रहायचे...! मैत्रीणीला मैत्रीण पणा जिवंत ठेऊन आज सांगतो की, होय तु माझी आवडती मैत्रीण असल्यामुळे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करीत होतो. परंतु जर माझं प्रेम तुला मान्य नसेल तर माझी काहीच हरकत नाही. यासाठी मैत्री तोडण्याची गरज नाही. मैत्री आणि प्रेम ह्या समांतर प्रक्रीया असून मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन याची खात्री मी आज तुला देतो .मैत्रीत प्रेम हे असतेच त्याशिवाय जर प्रेमच नसेल तर ती टिकणार तरी कशी हो ना , मैत्री म्हणजेच जिवापाड प्रेम हे आज समजलं न आज पासून प्रेमाची सांगड कमी घालू शकतो हे पक्के केलं आहे. माझ्या मते प्रेमाचा अर्थ प्रेमाची मागणी असा लावून कदाचित बोलणे बंद केले असेल तर माझे प्रेम हे निरपेक्ष मैत्रीचे नात्यातील प्रेम असून भविष्यात तीला या मैत्रीतील प्रेमामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खात्री मी आज देतो.
जेव्हा आठवणींचा हात साेडायला मन तयार नसतं तेव्हा समजून जावं त्याने पुढचा प्रवास नाकारलाय. अट्टाहासाने त्यात आभाळाची आेढ निर्माण करणं टाळावं कारण कितीही प्रयत्न केला तरी ते आभाळाच्या इंद्रधनुष्यात नाही तर मातीत रुजलेल्या इवल्याशा अंकुरात गुंतलेलं असतं,रमलेलं असतं..आणि जाे एकदा मातीशी जाेडला गेला ताे तिथेच विसावला.... अनेकदा काही माणसं जगाच्या दृष्टीने एकाच वळणावर थांबलेली असतात पण खरं सांगायचं तर त्यांचा स्वतःपुरता,स्वतःसाठीचा प्रवास हा तिथेच संपलेला असताे...अजून काही मिळविण्याच्या लालसेपेक्षा अशीच आठवणींची पाऊलवाट चालत चालत जीवनाचा प्रवास संपवणं त्यांना जास्त भावतं..असं जगण्याचं वेड याेग्य की अयाेग्य हा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला बरा..!!

लेखन - पत्रकार एन.के.
     मोबाईल - ( ८८०६६०५८५२ )

No comments:

Post a Comment