शिर्षक : जगणं = व्यवहाराच्या सावलीतलं एक अप्रत्यक्ष प्रवास...
【 ...अर्थात जगण्याच्या पंक्तीतल्या माणूस आणि व्यवहार मधला जिंदगीच्या संघर्षाचा काळ आणि द एन्ड यावर कटाक्ष टाकणार माझं लेखन !】
लेखन :- एन.के. (पत्रकार)
सर्वांचं मानापासून धन्यवाद; माझ्या प्रत्येक वैचारिक गोष्टीला आणि सत्य परिस्थितीला शब्दात मांडून आपल्या पर्यंत जेव्हा जेव्हा पोहचवल तेव्हा तेव्हा मला तुम्ही प्रत्येकांनी भरभरून दिल. प्रेरणा आणि एक उमेद मिळावी इतकं स्तुतीसुमने माझ्या पदरात दिलात त्याबद्दल दहे दिल थँक्स..!
हे बघा ! व्यवहार सगळेच जपतात पण माणसातील माणूसपण जपलं गेलं पाहिजे ह्यासाठी आग्रही असणारी व्यक्ती म्हणून प्रत्येकाने स्वतःकड बघितलं या पेक्षा स्वतःला घडवलं तर जीवन खरचं सुंदर वाटल्याखेरीज राहणार नाही. सामन्यात जगायला म्हणून पाहिजे ते करत सुटणारे आपण कधी स्वतःकडे लक्ष देत नाही ही सर्वात मोठी खंत आहे. वयाच्या बालपणात मोकळी स्वप्न कवटाळून जगण्यात मजा वेगळी होती, पण तारुण्यात अस कोणतं अस भूत अवतरलं की आपण जोतिष्य झालो न भविष्याच्या सु- (चांगल्या) च्या पाठीमाग धावताना या जीवन गाण्याला व्यावहारिक बनवून घेतलं. मनसोक्त जिवन जगायचं म्हणून किंवा रिलॅक्स राहायचं म्हणून आपण कमवायच्या नादी लागून बसतो मग हळू हळू ४०-५० शी ओलांडत मग मग या हायब्रीड जगण्यात आपल्याला रिलॅक्स राहू इतकं वेळ त्या वयात संपून जाते. यासाठी मग कोणत्या शेड्युलने जगायचं काहीच गरज नाही तर एक माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणूस म्हणून वावरूया जसे माणस अशी कमवा की २ शब्द शेअर करताना ऐकायला ४ जण असायला हवे सोबत. नाहीतर रोजीरोटीतर आज भिकारी पण कमवून घेऊन खातो. मग आपल्या सूट-बुटला काय किंमत ? म्हणून नात्यांची कदर करायला शिका कारण कुणीतरी किती सहजपणे नात्यांचं मनोगत सांगून गेलं आहे. " जी नाती मनाने जोडली जातात ती कधीच तुटत नाहीत" मग ते प्रेम असो की मैत्री..." अस सिम्पल राहायच. लक्षात घ्या कुणीच कुणाची साथ आयुष्यभर देऊ शकत नाही पण तुम्ही कुणाच्या जगण्याचे अविभाज्य घटक होता तेव्हा ते नातं नक्कीच कॅज्युअल असतं नाही हे मात्र अगदी खरं आहे. अनेकदा तुम्ही जीवापाड जपलेल्या नात्यात गैरसमजुती , मतभेद स्वतःच्या पाऊलखुणा मागे ठेवून जातात पण एका सॉरी ने आणि माफ करण्याने ती नाती पुन्हा सहज जुळली जातात. हा टर्निंग पॉईंट कायम मेंदूवर अधोरेखित करून टाकूया. का नाही जुळणार शेवटी ती आपली असतात आणि कायम कोणत्या ना कोणत्या वळणावर आपलीच राहतात. लेखाच्या शीर्षक प्रमाणे प्रत्येक माणूस व्यावहारिक जीवनाला चिकटला आहे असं नाही तर आज सामन्यात विचार केला की खेड्यात राहणारा माणूस जरा शेजारच्या घरातून आवाज आला की "काय हो काय झालं...?" म्हणून विचारणारा व्यक्तीश: आपुलकी आपल्याला शहरातल्या बनलेल्या आर.सी.सी. मनामध्ये दिसते का हो...? शेजारी कोण राहतो आपल्याला माहिती नसत पण गावातल्या प्रत्येक लहानातल्या लहानग्या तान्ह्याला गावातील गल्ली न घर न बोळ माहिती असत याचा या जगण्याशी काय संबंध म्हणून तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे लक्षात घ्या माणूस म्हणून एखाद्याच्या ज्ञात असणं म्हणजे ओळखीतून हुन जास्त आहे कारण आजकाल ओळखीच्या माणसाचा उपयोग फक्त काम आठवलं की लक्षात येणं अस पाढा बनला आहे. म्हणून कायम आपल्या माणसाच्या सलग्न राहा सोबत करा शेअर करा कारण आठवत का बघा एक रिच लग्न आपल्या सगळ्यांना आवडलं असेल पण माझा वैचारिक किंवा काही जणांनी केला असेल नाही माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात आली. भारतातील नामांकित श्रीमंत अंबानीना आपण सर्व जण ओळखतो माझ्या मते... झालं असं की इशा अंबानी च्या लग्नाचे काही व्हिडीओ बघायला मिळाले लग्नात केलेली अप्रतिम सजावट पाहिली मंत्री, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील दिग्गज यांची मांदियाळी पाहायला मिळाली आणि सोबत पूर्ण हिंदी सिनेसृष्टी तिथे अवतरली होती, सहज मनात विचार येऊन गेला आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि इथल्या मातीत मराठी चित्रपटाने अगदी ऑस्कर पर्यंत झेप घेतलेली...; दर्जेदार कलाकार , साहित्य आणि चित्रपटांची निर्मिती हा मराठी सिनेसृष्टीचा चेहरा आहे पण तरीही एकही मराठी कलाकार ह्या समारंभासाठी आमंत्रित दिसला नाही. का कुणास ठाऊक पण महाराष्ट्रात राहण्याची खंत वाटण्या इतपत थोडं का होईना पण वेगळं आहे हे...काय आहे ना महाराष्ट्राच्या भूमीत राहून मराठी अस्मितेच्या जोरावर आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या मातीत जन्म घेऊन जग विख्यात बनणारी लोकं आज मराठी अस्मिता विसरून जात आहेत का काय ही मला खंत वाटली इतकंच म्हणून हा विषय. तसं पण हे दुःख आजकाल व्यक्त करायचीही महाराष्ट्रात भीती वाटू लागली आहे कारण मराठी आणि महाराष्ट्र ह्या दोघांचा संबंध आता तुटू लागला आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून हा उदाहरण यासाठी की आपण अशा सेलिब्रेटीच्या आयडॉल म्हंणून उपयोग करतो पण लक्षात ठेवा की लेखाच्या शीर्षक प्रमाणे आपल जनजीवन आणि जगणं हे आपल्या माणसासोबत असायला हवं तेव्हाच कुठं तरी आपल्या जगण्याला अर्थ असणार आहे अन्यथा परके न वेगळे या व्याख्यात आपलं जीवन बेजार झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः शहरी जीवन जगण्याच्या बरोबर ग्रामव्यवस्था सुद्धा सुधारित आवृत्तीच्या छायेत असली पाहिजे यासाठी ही प्रयत्न झाले पाहिजेत. भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली गेली आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता आदी अनेक तत्वांचा त्यात समावेश आहे. जगण्याच्या सोयी सुविधा सोबत राहणीमान सुद्धा उंचावला आहे याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण आज तळागाळापर्यंत पोहचल आहे. पण समता रुजली आहे का हा महत्वाचा प्रश्न सुद्धा पडून जातो. कारण माणूस हा माणूसच रक्त लालच पण आजही वेगळ्या जातीची आणि धर्माची लोक आजही खेड्यात वेगवेगळ्या गल्लीत राहतात म्हणजे हमारा हमारा अलग अशी किंचित राहणीमान दिसून येत. त्यासोबत त्यांचे राहणीमान आणि व्यवहार ही वेगळाच दृष्टीस येतो. याचे सुद्धा परिवर्तन झाले पाहिजे यासाठी आपले जगण्याचे व्यवहारात थोडं बदल केल की नक्कीच यात बदल घडतील.
...कारण माणूस म्हटलं की मरण आहे आणि आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे पण इतकं हे जीवन फक्त कमाई, अच्छाई म्हणून जगायला आपण वेडे आहोत का अस म्हटलं तर वाईट वाटू नये कारण माणसं आणि झाडं ह्या दोघांची तुलना आपण करून बघूया झाडांसारखीच माणसांची वेगवेगळी रूप आणि भोग सुद्धा. आता हेच बघा ना कुंडीतली झाडं ही मुळातच नाजूक, अती ऊन वारा न सोसता येणारी, कुंडीच्या सुरक्षित आश्रयात स्वतःची मूळ रोवून बहरणारी. ह्या झाडांना कठोर राहता येत नाही की वागताही येत नाही. ताठरता हा स्वभाव नाही. सुसंस्कृत , संवेदनशील आणि भावुक माणसं देखील अशीच असतात. संस्कारांच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगणारी, स्वप्नांळू ,कुणी दुखावू नये म्हणून काळजी घेणारी, हे जग आपल्या सारखंच साधं सरळ आहे असा विचार करत वाईट अनुभवातून ही सहज कोलॅप्स होतात कारण कुठल्याही कोणताही अपघात न पचवता फक्त व्यवहार म्हणजे मी न माझ संसार किंवा माझी माणसं म्हणून जगणाऱ्या माणसाला कधी कधी लोकांनी टीका केली , निंदा केली तरी स्वतःच्या मुळांना ही चिकटून राहतात. कोणताही बदल दर्शवत नाहीत. अर्थात गुलाबाला काट्यांच सौरक्षण असत पण गुलाब प्रत्यक्षात हा मात्र कोमलच असतो ना ? कुणी दुष्टपणे कुंडीतून उखडून टाकलं तरी जगण्यासाठी लागणारी धडपड ह्यांच्या अंगीच नसते म्हणूनच ती छोट्याशा आघातानेपण ह्या जगाचा निरोप घेतात. मग हा उदाहरण आपल्या जीवनाला समानार्थी ठरतो कारण आपण फक्त आपल्या व्यवहाराच्या कुंडीत राहून आपलं जीवन जगत असतो. जरा बाहेरच्या जगाचा टेक्निकल थिंक करून बघा नक्कीच छान वाटेल. नाहीतर या व्यवहाराच्या जगण्यात आपलं जगायचं हिशोब चुकून जाईल ; हो ना...? मग आजपासून कस जगायच आणि मानवी व्यवहार बाजूला करून कसा वाईट मायनस आणि चांगलं तेवढं प्लस करता येईल न यातून एक सुंदर जगणं जगता येईल ठरवून घेतलं तर बर वाटेल...!
धन्यवाद...!
मोबाईल. - ८८०६६०५८५२
【 ...अर्थात जगण्याच्या पंक्तीतल्या माणूस आणि व्यवहार मधला जिंदगीच्या संघर्षाचा काळ आणि द एन्ड यावर कटाक्ष टाकणार माझं लेखन !】
लेखन :- एन.के. (पत्रकार)
सर्वांचं मानापासून धन्यवाद; माझ्या प्रत्येक वैचारिक गोष्टीला आणि सत्य परिस्थितीला शब्दात मांडून आपल्या पर्यंत जेव्हा जेव्हा पोहचवल तेव्हा तेव्हा मला तुम्ही प्रत्येकांनी भरभरून दिल. प्रेरणा आणि एक उमेद मिळावी इतकं स्तुतीसुमने माझ्या पदरात दिलात त्याबद्दल दहे दिल थँक्स..!
हे बघा ! व्यवहार सगळेच जपतात पण माणसातील माणूसपण जपलं गेलं पाहिजे ह्यासाठी आग्रही असणारी व्यक्ती म्हणून प्रत्येकाने स्वतःकड बघितलं या पेक्षा स्वतःला घडवलं तर जीवन खरचं सुंदर वाटल्याखेरीज राहणार नाही. सामन्यात जगायला म्हणून पाहिजे ते करत सुटणारे आपण कधी स्वतःकडे लक्ष देत नाही ही सर्वात मोठी खंत आहे. वयाच्या बालपणात मोकळी स्वप्न कवटाळून जगण्यात मजा वेगळी होती, पण तारुण्यात अस कोणतं अस भूत अवतरलं की आपण जोतिष्य झालो न भविष्याच्या सु- (चांगल्या) च्या पाठीमाग धावताना या जीवन गाण्याला व्यावहारिक बनवून घेतलं. मनसोक्त जिवन जगायचं म्हणून किंवा रिलॅक्स राहायचं म्हणून आपण कमवायच्या नादी लागून बसतो मग हळू हळू ४०-५० शी ओलांडत मग मग या हायब्रीड जगण्यात आपल्याला रिलॅक्स राहू इतकं वेळ त्या वयात संपून जाते. यासाठी मग कोणत्या शेड्युलने जगायचं काहीच गरज नाही तर एक माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणूस म्हणून वावरूया जसे माणस अशी कमवा की २ शब्द शेअर करताना ऐकायला ४ जण असायला हवे सोबत. नाहीतर रोजीरोटीतर आज भिकारी पण कमवून घेऊन खातो. मग आपल्या सूट-बुटला काय किंमत ? म्हणून नात्यांची कदर करायला शिका कारण कुणीतरी किती सहजपणे नात्यांचं मनोगत सांगून गेलं आहे. " जी नाती मनाने जोडली जातात ती कधीच तुटत नाहीत" मग ते प्रेम असो की मैत्री..." अस सिम्पल राहायच. लक्षात घ्या कुणीच कुणाची साथ आयुष्यभर देऊ शकत नाही पण तुम्ही कुणाच्या जगण्याचे अविभाज्य घटक होता तेव्हा ते नातं नक्कीच कॅज्युअल असतं नाही हे मात्र अगदी खरं आहे. अनेकदा तुम्ही जीवापाड जपलेल्या नात्यात गैरसमजुती , मतभेद स्वतःच्या पाऊलखुणा मागे ठेवून जातात पण एका सॉरी ने आणि माफ करण्याने ती नाती पुन्हा सहज जुळली जातात. हा टर्निंग पॉईंट कायम मेंदूवर अधोरेखित करून टाकूया. का नाही जुळणार शेवटी ती आपली असतात आणि कायम कोणत्या ना कोणत्या वळणावर आपलीच राहतात. लेखाच्या शीर्षक प्रमाणे प्रत्येक माणूस व्यावहारिक जीवनाला चिकटला आहे असं नाही तर आज सामन्यात विचार केला की खेड्यात राहणारा माणूस जरा शेजारच्या घरातून आवाज आला की "काय हो काय झालं...?" म्हणून विचारणारा व्यक्तीश: आपुलकी आपल्याला शहरातल्या बनलेल्या आर.सी.सी. मनामध्ये दिसते का हो...? शेजारी कोण राहतो आपल्याला माहिती नसत पण गावातल्या प्रत्येक लहानातल्या लहानग्या तान्ह्याला गावातील गल्ली न घर न बोळ माहिती असत याचा या जगण्याशी काय संबंध म्हणून तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे लक्षात घ्या माणूस म्हणून एखाद्याच्या ज्ञात असणं म्हणजे ओळखीतून हुन जास्त आहे कारण आजकाल ओळखीच्या माणसाचा उपयोग फक्त काम आठवलं की लक्षात येणं अस पाढा बनला आहे. म्हणून कायम आपल्या माणसाच्या सलग्न राहा सोबत करा शेअर करा कारण आठवत का बघा एक रिच लग्न आपल्या सगळ्यांना आवडलं असेल पण माझा वैचारिक किंवा काही जणांनी केला असेल नाही माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात आली. भारतातील नामांकित श्रीमंत अंबानीना आपण सर्व जण ओळखतो माझ्या मते... झालं असं की इशा अंबानी च्या लग्नाचे काही व्हिडीओ बघायला मिळाले लग्नात केलेली अप्रतिम सजावट पाहिली मंत्री, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील दिग्गज यांची मांदियाळी पाहायला मिळाली आणि सोबत पूर्ण हिंदी सिनेसृष्टी तिथे अवतरली होती, सहज मनात विचार येऊन गेला आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि इथल्या मातीत मराठी चित्रपटाने अगदी ऑस्कर पर्यंत झेप घेतलेली...; दर्जेदार कलाकार , साहित्य आणि चित्रपटांची निर्मिती हा मराठी सिनेसृष्टीचा चेहरा आहे पण तरीही एकही मराठी कलाकार ह्या समारंभासाठी आमंत्रित दिसला नाही. का कुणास ठाऊक पण महाराष्ट्रात राहण्याची खंत वाटण्या इतपत थोडं का होईना पण वेगळं आहे हे...काय आहे ना महाराष्ट्राच्या भूमीत राहून मराठी अस्मितेच्या जोरावर आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या मातीत जन्म घेऊन जग विख्यात बनणारी लोकं आज मराठी अस्मिता विसरून जात आहेत का काय ही मला खंत वाटली इतकंच म्हणून हा विषय. तसं पण हे दुःख आजकाल व्यक्त करायचीही महाराष्ट्रात भीती वाटू लागली आहे कारण मराठी आणि महाराष्ट्र ह्या दोघांचा संबंध आता तुटू लागला आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून हा उदाहरण यासाठी की आपण अशा सेलिब्रेटीच्या आयडॉल म्हंणून उपयोग करतो पण लक्षात ठेवा की लेखाच्या शीर्षक प्रमाणे आपल जनजीवन आणि जगणं हे आपल्या माणसासोबत असायला हवं तेव्हाच कुठं तरी आपल्या जगण्याला अर्थ असणार आहे अन्यथा परके न वेगळे या व्याख्यात आपलं जीवन बेजार झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः शहरी जीवन जगण्याच्या बरोबर ग्रामव्यवस्था सुद्धा सुधारित आवृत्तीच्या छायेत असली पाहिजे यासाठी ही प्रयत्न झाले पाहिजेत. भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली गेली आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता आदी अनेक तत्वांचा त्यात समावेश आहे. जगण्याच्या सोयी सुविधा सोबत राहणीमान सुद्धा उंचावला आहे याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण आज तळागाळापर्यंत पोहचल आहे. पण समता रुजली आहे का हा महत्वाचा प्रश्न सुद्धा पडून जातो. कारण माणूस हा माणूसच रक्त लालच पण आजही वेगळ्या जातीची आणि धर्माची लोक आजही खेड्यात वेगवेगळ्या गल्लीत राहतात म्हणजे हमारा हमारा अलग अशी किंचित राहणीमान दिसून येत. त्यासोबत त्यांचे राहणीमान आणि व्यवहार ही वेगळाच दृष्टीस येतो. याचे सुद्धा परिवर्तन झाले पाहिजे यासाठी आपले जगण्याचे व्यवहारात थोडं बदल केल की नक्कीच यात बदल घडतील.
...कारण माणूस म्हटलं की मरण आहे आणि आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे पण इतकं हे जीवन फक्त कमाई, अच्छाई म्हणून जगायला आपण वेडे आहोत का अस म्हटलं तर वाईट वाटू नये कारण माणसं आणि झाडं ह्या दोघांची तुलना आपण करून बघूया झाडांसारखीच माणसांची वेगवेगळी रूप आणि भोग सुद्धा. आता हेच बघा ना कुंडीतली झाडं ही मुळातच नाजूक, अती ऊन वारा न सोसता येणारी, कुंडीच्या सुरक्षित आश्रयात स्वतःची मूळ रोवून बहरणारी. ह्या झाडांना कठोर राहता येत नाही की वागताही येत नाही. ताठरता हा स्वभाव नाही. सुसंस्कृत , संवेदनशील आणि भावुक माणसं देखील अशीच असतात. संस्कारांच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगणारी, स्वप्नांळू ,कुणी दुखावू नये म्हणून काळजी घेणारी, हे जग आपल्या सारखंच साधं सरळ आहे असा विचार करत वाईट अनुभवातून ही सहज कोलॅप्स होतात कारण कुठल्याही कोणताही अपघात न पचवता फक्त व्यवहार म्हणजे मी न माझ संसार किंवा माझी माणसं म्हणून जगणाऱ्या माणसाला कधी कधी लोकांनी टीका केली , निंदा केली तरी स्वतःच्या मुळांना ही चिकटून राहतात. कोणताही बदल दर्शवत नाहीत. अर्थात गुलाबाला काट्यांच सौरक्षण असत पण गुलाब प्रत्यक्षात हा मात्र कोमलच असतो ना ? कुणी दुष्टपणे कुंडीतून उखडून टाकलं तरी जगण्यासाठी लागणारी धडपड ह्यांच्या अंगीच नसते म्हणूनच ती छोट्याशा आघातानेपण ह्या जगाचा निरोप घेतात. मग हा उदाहरण आपल्या जीवनाला समानार्थी ठरतो कारण आपण फक्त आपल्या व्यवहाराच्या कुंडीत राहून आपलं जीवन जगत असतो. जरा बाहेरच्या जगाचा टेक्निकल थिंक करून बघा नक्कीच छान वाटेल. नाहीतर या व्यवहाराच्या जगण्यात आपलं जगायचं हिशोब चुकून जाईल ; हो ना...? मग आजपासून कस जगायच आणि मानवी व्यवहार बाजूला करून कसा वाईट मायनस आणि चांगलं तेवढं प्लस करता येईल न यातून एक सुंदर जगणं जगता येईल ठरवून घेतलं तर बर वाटेल...!
धन्यवाद...!
मोबाईल. - ८८०६६०५८५२
No comments:
Post a Comment