!!•● जय हिंद 🇮🇳 जय भारत ●•!!
शिर्षक :- वे हमे हरे, पीले और भगवे मे बाटेंगे ; मगर तुम "तिरंगा" पे अडे रेहना...
लेखन- पत्रकार एन.के.
【 "... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा हा माझा श्री भारतदेशा" म्हणणाऱ्यांची देशभक्ती न खऱ्या माणुसकीची पारख करणार लेखन 】
महाराष्ट्राच्या पावन मातीत आणि भारत मातेच्या कुशीत आपण वाढलो, ज्या मातीत अनेक वीर, शहिद, आणि संतांच्या शिकवणीची भूमी म्हणून असणाऱ्या या मातीत आपण कितीजण भारतीय म्हणून जगत आहोत...? देशातले असणारे १८ पगड जाती धर्माचे बांधव यांच्या सोबत आपण किती बांधव म्हणून जगतो...? आज प्रत्येक कानाकोपऱ्यात भूमीच्या प्रत्येक गल्ली बोळात माझी जातीची माणसं, माझ्या समाजाची माणसं , माझ्या धर्माची माणसं म्हणून संकुचित विचार सरणीतून केव्हा बाहेर येणार आहोत आपण...? शेजारी आणि माझ्या सहवासातील म्हणत कधी आपली टोपी, पगडी शेअर करणार आहोत आपण ? का असंच आरक्षण आणि विविध रंगीबेरंगी झेंड्याची कट्टे म्हणून जगणार आहोत आपण...? अस संकुचित विचार सरणी घेऊन जगात वावरताना माणुसकीची मशाल कुठं तरी वेगळ्या रस्त्याला आपल्या हातून राहून जातेय का काय अशी आत्मपरीक्षण करण्याची गरज आज भासत आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या आगमनाला कधी तरी त्या तिरंग्याकडे बघून त्या तिरंग्याला कठड्यावर अभिमानाने फडकण्यासाठी किती जणांचा संघर्ष आणि प्राणाची आहुती घेऊन विराजित झालं आहे हे कुठं तरी विचाराधीन होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. फक्त प्रजासत्ताक आणि स्वतंत्र दिवस दिवशीच देशभक्तीची गुणगान गाणाऱ्या आपल्या पैकी काही जणांना कधी कळणार आहे की ज्या मातीत राहतो , ज्या स्वराज्यात राहतो त्याचे पाईक म्हणून क्षणभंगुर नको तर आजन्म ऋणी राहत त्याचा सार्थ अभिमान आणि देशाचा स्वाभिमान कायम उच्च स्तरावर तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
आज आपण जगात जगात असताना लहान विचार केला तर आपण आनंद एकाला आणि दुःख एकाला वाटत असतो म्हणजे एक सुखमय क्षण असेल तर आपण आठवतो आपले पय-पाहुणे आणि काही दुःखाच्या क्षणाला विशिष्ट लोकांना आठवत असतो. लक्षात घ्या आपल्या द्विधा मनस्थिती असलेली विचारसरणी किती दिवस आपल्याला सोबत करणार आहे. आपला मुल्क म्हणजे सर्वदूर कलावंतामधले (यात साहित्यिकांसह सर्वच अभिप्रेत) काही विचारवंत आणि राज्यकर्ते- सत्ताधीश यांच्यात नेहमी वैचारिक युद्धे होत असतात. राजकारणी सुसंस्कृत असतील तर ते विचारवंत- साहित्यिकांच्या कलाने राज्यव्यवहार चालवतात. सत्ताधीशांना विचारवंतांशिवाय पुढे जाता येत नाही. राजकारणी वा सत्ताधीश, विचारवंतांना- साहित्यिकांना डावलून आपला अजेंडा राबवायला लागलेत की समजावे आपण हुकूमशाहीकडे निघालोत. (लोकशाही पद्धतीने निवडून येणारे राज्यकर्ते सत्ताधीश लोकानुनय करताना दिसत असले तरी सुसंस्कृत सत्ताधीश हे नेहमी विचारवंतांना बिचकून असतात.) त्यासाठी लक्षात हे ठेवलं पाहिजे की आपण जगत असताना आपल्याला फक्त आणि फक्त आपले आप्तेष्ट नाही तर सर्वजण लागणारं आणि भविष्यात कुठं ना कुठं अडचण किंवा नड मध्ये त्या त्या व्यक्तीची गरज आपल्याला भासणार आहे.
या उलट अर्थी विचार केला तर आज आपण गेले अनेक दिवस, महिने वर्ष झालं बघतो आहे. विकास काहीसा वेडा झाला आहे गट तट राजकारण एवढंच अभिप्रेत होत आहे. कधी सामान्यांच्या जगण्यावर गदा तर कधी गरीबाच्या माथी माती पडली आहे. अनेक राज्यकर्ते आणि अनेक राजकारणी फक्त पदाच्या मिळवणी पर्यंत आपल्या समाजाला पोषक म्हणून असतात. पण जेव्हा सत्ता मिळते तेव्हा मात्र आपल्याला परक्यासारखं वागणूक देतात. हे कुठं तरी थांबल पाहिजे. म्हणून आज सर्व ठिकाणी चाललेल्या आरक्षणाची झेंडे लक्षात घेतलं ; हक्क म्हणून नक्की घ्या पण किंवा आरक्षण च्या झाडाखाली आपल्या न्याय हक्काला सावली जरी दिली तरी ज्या वेळी आपण आपले लोकप्रतिनिधी निवड करत असतो तेव्हा मात्र तिरंगा टिकला पाहिजे आणि संविधानने दिलेल्या प्रत्येक हक्क आणि न्याय शाबूत राहिलं पाहिजे यासाठी हातात रंगीबेरंगी न घेता केवळ तिरंगा घेऊन स्वाभिमान जगावला तर नक्कीच सशक्त भारत घडल्याशिवाय राहणार नाही. लेख लिहिण्याचा उद्देश एवढंच ठेवलं की आजही अनेक चेहऱ्याच्या सानिध्यात सहवासात राहताना वाटून जात की संकुचित प्रवृत्ती अजून नष्ट झाली नाही. कारण ज्याला भेटतो तो काही वेळा काही संदर्भाला व्यक्त होताना माझी जात, धर्म, पंथला टच मध्ये राहून व्यक्त होत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी आपण तिरंगा घेऊन हिंडतो हे सत्य, आपल्या छाताडावर तिरंगाचा बिल्ला लावून हिंडतो, राष्ट्रगीताला स्तब्ध राहून वंदन करतो हे सगळं सुंदर आणि छान असत पण काही बदल आहेत ते आपल्यात झाले पाहिजेत. संदर्भ म्हणून राज्यकर्ते आणि समाज यावर बोलताना देशासाठी आहुती आणि संतांच्या या भूमीत आपण फक्त (काहीजण हा) २६ जानेवारी आजी १५ ऑगस्टला देशभक्ती व्यक्त करतात पण कायम माझा भारत देश आणि इथले माझे बांधव म्हणून तिरंग्याच्या प्रति कायम प्रामाणिक राहायला शिकल पाहिजे. पण आपण काही वेळा इतकं सिरीयस नसतो म्हणून आजही आपल्याला सोशल मीडिया आणि टीव्ही वर राष्ट्रध्वज खाली टाकू नका अवमान करू नका , संकुचित जाती धर्माचा भारत नव्हता हे आजही सांगायला लागत. शब्द कडू असले तरी कृपा करून सत्य गोष्टी कायम मनात राहतात. त्यामुळे कुणाच्या भावना या लेखामुळे दुखावले असतील तर क्षमस्व...!
धन्यवाद...!
शिर्षक :- वे हमे हरे, पीले और भगवे मे बाटेंगे ; मगर तुम "तिरंगा" पे अडे रेहना...
लेखन- पत्रकार एन.के.
【 "... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा हा माझा श्री भारतदेशा" म्हणणाऱ्यांची देशभक्ती न खऱ्या माणुसकीची पारख करणार लेखन 】
महाराष्ट्राच्या पावन मातीत आणि भारत मातेच्या कुशीत आपण वाढलो, ज्या मातीत अनेक वीर, शहिद, आणि संतांच्या शिकवणीची भूमी म्हणून असणाऱ्या या मातीत आपण कितीजण भारतीय म्हणून जगत आहोत...? देशातले असणारे १८ पगड जाती धर्माचे बांधव यांच्या सोबत आपण किती बांधव म्हणून जगतो...? आज प्रत्येक कानाकोपऱ्यात भूमीच्या प्रत्येक गल्ली बोळात माझी जातीची माणसं, माझ्या समाजाची माणसं , माझ्या धर्माची माणसं म्हणून संकुचित विचार सरणीतून केव्हा बाहेर येणार आहोत आपण...? शेजारी आणि माझ्या सहवासातील म्हणत कधी आपली टोपी, पगडी शेअर करणार आहोत आपण ? का असंच आरक्षण आणि विविध रंगीबेरंगी झेंड्याची कट्टे म्हणून जगणार आहोत आपण...? अस संकुचित विचार सरणी घेऊन जगात वावरताना माणुसकीची मशाल कुठं तरी वेगळ्या रस्त्याला आपल्या हातून राहून जातेय का काय अशी आत्मपरीक्षण करण्याची गरज आज भासत आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या आगमनाला कधी तरी त्या तिरंग्याकडे बघून त्या तिरंग्याला कठड्यावर अभिमानाने फडकण्यासाठी किती जणांचा संघर्ष आणि प्राणाची आहुती घेऊन विराजित झालं आहे हे कुठं तरी विचाराधीन होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. फक्त प्रजासत्ताक आणि स्वतंत्र दिवस दिवशीच देशभक्तीची गुणगान गाणाऱ्या आपल्या पैकी काही जणांना कधी कळणार आहे की ज्या मातीत राहतो , ज्या स्वराज्यात राहतो त्याचे पाईक म्हणून क्षणभंगुर नको तर आजन्म ऋणी राहत त्याचा सार्थ अभिमान आणि देशाचा स्वाभिमान कायम उच्च स्तरावर तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
आज आपण जगात जगात असताना लहान विचार केला तर आपण आनंद एकाला आणि दुःख एकाला वाटत असतो म्हणजे एक सुखमय क्षण असेल तर आपण आठवतो आपले पय-पाहुणे आणि काही दुःखाच्या क्षणाला विशिष्ट लोकांना आठवत असतो. लक्षात घ्या आपल्या द्विधा मनस्थिती असलेली विचारसरणी किती दिवस आपल्याला सोबत करणार आहे. आपला मुल्क म्हणजे सर्वदूर कलावंतामधले (यात साहित्यिकांसह सर्वच अभिप्रेत) काही विचारवंत आणि राज्यकर्ते- सत्ताधीश यांच्यात नेहमी वैचारिक युद्धे होत असतात. राजकारणी सुसंस्कृत असतील तर ते विचारवंत- साहित्यिकांच्या कलाने राज्यव्यवहार चालवतात. सत्ताधीशांना विचारवंतांशिवाय पुढे जाता येत नाही. राजकारणी वा सत्ताधीश, विचारवंतांना- साहित्यिकांना डावलून आपला अजेंडा राबवायला लागलेत की समजावे आपण हुकूमशाहीकडे निघालोत. (लोकशाही पद्धतीने निवडून येणारे राज्यकर्ते सत्ताधीश लोकानुनय करताना दिसत असले तरी सुसंस्कृत सत्ताधीश हे नेहमी विचारवंतांना बिचकून असतात.) त्यासाठी लक्षात हे ठेवलं पाहिजे की आपण जगत असताना आपल्याला फक्त आणि फक्त आपले आप्तेष्ट नाही तर सर्वजण लागणारं आणि भविष्यात कुठं ना कुठं अडचण किंवा नड मध्ये त्या त्या व्यक्तीची गरज आपल्याला भासणार आहे.
या उलट अर्थी विचार केला तर आज आपण गेले अनेक दिवस, महिने वर्ष झालं बघतो आहे. विकास काहीसा वेडा झाला आहे गट तट राजकारण एवढंच अभिप्रेत होत आहे. कधी सामान्यांच्या जगण्यावर गदा तर कधी गरीबाच्या माथी माती पडली आहे. अनेक राज्यकर्ते आणि अनेक राजकारणी फक्त पदाच्या मिळवणी पर्यंत आपल्या समाजाला पोषक म्हणून असतात. पण जेव्हा सत्ता मिळते तेव्हा मात्र आपल्याला परक्यासारखं वागणूक देतात. हे कुठं तरी थांबल पाहिजे. म्हणून आज सर्व ठिकाणी चाललेल्या आरक्षणाची झेंडे लक्षात घेतलं ; हक्क म्हणून नक्की घ्या पण किंवा आरक्षण च्या झाडाखाली आपल्या न्याय हक्काला सावली जरी दिली तरी ज्या वेळी आपण आपले लोकप्रतिनिधी निवड करत असतो तेव्हा मात्र तिरंगा टिकला पाहिजे आणि संविधानने दिलेल्या प्रत्येक हक्क आणि न्याय शाबूत राहिलं पाहिजे यासाठी हातात रंगीबेरंगी न घेता केवळ तिरंगा घेऊन स्वाभिमान जगावला तर नक्कीच सशक्त भारत घडल्याशिवाय राहणार नाही. लेख लिहिण्याचा उद्देश एवढंच ठेवलं की आजही अनेक चेहऱ्याच्या सानिध्यात सहवासात राहताना वाटून जात की संकुचित प्रवृत्ती अजून नष्ट झाली नाही. कारण ज्याला भेटतो तो काही वेळा काही संदर्भाला व्यक्त होताना माझी जात, धर्म, पंथला टच मध्ये राहून व्यक्त होत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी आपण तिरंगा घेऊन हिंडतो हे सत्य, आपल्या छाताडावर तिरंगाचा बिल्ला लावून हिंडतो, राष्ट्रगीताला स्तब्ध राहून वंदन करतो हे सगळं सुंदर आणि छान असत पण काही बदल आहेत ते आपल्यात झाले पाहिजेत. संदर्भ म्हणून राज्यकर्ते आणि समाज यावर बोलताना देशासाठी आहुती आणि संतांच्या या भूमीत आपण फक्त (काहीजण हा) २६ जानेवारी आजी १५ ऑगस्टला देशभक्ती व्यक्त करतात पण कायम माझा भारत देश आणि इथले माझे बांधव म्हणून तिरंग्याच्या प्रति कायम प्रामाणिक राहायला शिकल पाहिजे. पण आपण काही वेळा इतकं सिरीयस नसतो म्हणून आजही आपल्याला सोशल मीडिया आणि टीव्ही वर राष्ट्रध्वज खाली टाकू नका अवमान करू नका , संकुचित जाती धर्माचा भारत नव्हता हे आजही सांगायला लागत. शब्द कडू असले तरी कृपा करून सत्य गोष्टी कायम मनात राहतात. त्यामुळे कुणाच्या भावना या लेखामुळे दुखावले असतील तर क्षमस्व...!
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment