शिर्षक : फक्त जयंती नको ! जीवनात सावित्रीबाई फुलेंची आणि जिजाऊ मातेच्या शिकवणीचा उत्सव होऊद्या...!
【सावित्रीबाई फुलेंची जिवनगाथा, शिक्षण क्षेत्रांच्या सुरवातीसाठीचा प्रयत्न, संघर्ष आणि जिजाऊ मातेच्या व्यवस्थापन आणि एक प्रशासन यासाठीची धडपड लक्षात घेऊन त्या वे (Way) ने वाटचाल करण्याची समाजाला गरज ; संदर्भीय माझा लेख...】
लेखन - एन.के. (पत्रकार)
शाळा नसत्या तर आपण खूप निबंध वाचली आहेत, असतील. पण लक्षात ठेवा जर शाळा नसत्या तर आपण असतो का हो ? म्हणजे शब्द, हावभाव, संभाषण हे सर्व काही अंधुक असल असत. म्हणजे अळणी म्हणतो ना आपण अस एक बेचव जीवन म्हणून आपल्या वाट्याला जगण आलं असत. शिक्षण उद्गात्या सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची दारे उघडली नसती तर आज जगण्याला एक अर्थ म्हणून काहीच राहील नसत. आणि जिजाऊ मातेने जर शिवबा दिला नसता तर हा महाराष्ट्र एक लोकशाहीच्या कट्टर शिकवणी पासून किंवा एक नेतृत्व म्हणजे काय या बोधाला मुकला असता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात दोन महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या आपल्याला साजरी करायला मिळतात. हार, श्रीफळ आणि अगरबत्ती वाहून तर काही ठिकाणी केलेल्या पूजेचे धन्य मानले पाहिजे इतकं देखणी जयंती उत्सव डोळ्यांचे पारणे ही फुटेल इतकं छान सगळं चालेल असत लक्षात घ्या; आई जिजामाता ज्याने हा महाराष्ट्र घडवलं आणि एवढंच नाही तर सत्ता म्हणजे काय प्रजादक्ष राजेशाही म्हणजे काय याची प्रचिती घडवणाऱ्या शिवबाला आणि त्याग म्हणजे आणि मृत्यू अटळ असून शेवटच्या स्वासपर्यंत लढवय्या शंभूराजा दिला. आणि दुसरीकडे ज्या स्त्रीने अंगावर दगड धोंडे झेलत महिलांच्या शिक्षणाची दरवाजे खुले करत आज समाजात उंच मानेन महिलेला स्थान आहे त्याच्या मूळ म्हणून किंवा महिलांच्या हक्काच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले या दोन महत्त्वाच्या महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या ह्या आपण संक्षिप्त किंवा वाजत गाजत करतो याची खरी गरज आहे का ? त्यांनी दिलेल्या वचन आणि बोधमृताचा परामर्ष आपण असे फेडायचे का हो ? दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचा इतिहास पाहिलं तर समाजासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत साम्राज्य असो किंवा एक दक्ष कारभार असो किंवा एक शैक्षणिक गंगा दारोदार पोहचवऱ्याचा आदर्श व्यक्तीमत्वाच्या शिकवणीचा पांग आपण या पद्धतीने फेडणे कितपत योग्य...? ज्या संकुचित वृत्तीच्या आज जयंत्या होत आहेत यावरून एक खंत वाटून जाते की अमुक-तमुक विशिष्ट जाती प्रवर्गातील लोकांनी आपापले महापुरुष आणि देव वाटून घेऊन त्यांच्या जयंत्या ह्या संघर्षातून केली जात आहे पण कुठं तरी त्यांचा इतिहास , बोध आपण मागे सोडून जात आहोत का अशीही भीती वाटून गेल्याखेरीज राहणार नाही.
आजच्या महिलाबद्दल लिहायचं म्हटलं की,अनेक प्रश्न उभे रहातात,द्विधा मनस्थिती होते. ती आधुनिक काळातील महिला असो वा पुर्व काळातील महिलेचा विचार केला तरी अनंत यातना मग यात(मानसिक यातना असो वा शारीरिक) सोशिकतेची,सहनशिलतेची सुंदर वरदान असणारी 'स्त्री' कालची स्त्री -तीची मानसिकता,तीचे स्थान,तीची अवहेलना तीला गृहित धरने हेच तीच्या माहितीत होते, पुरुष प्रधान असलेल्या या समाजात तीला सोशिकपणाशी मुलीची बाई म्हणुन नाळ थेट जोडलेली असायची याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे आगमनही त्याच काळातले. परंतु नशिबाने महात्मा ज्योतीराव फुले यांच्या अमृत सहवासाने सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणसाठी जीवाचे रान करत स्त्रिशिक्षण सुरु केले.त्यांची ती अभुतपूर्व कामगिरीने आजची महिला जन्माला आली.
【सावित्रीबाई फुलेंची जिवनगाथा, शिक्षण क्षेत्रांच्या सुरवातीसाठीचा प्रयत्न, संघर्ष आणि जिजाऊ मातेच्या व्यवस्थापन आणि एक प्रशासन यासाठीची धडपड लक्षात घेऊन त्या वे (Way) ने वाटचाल करण्याची समाजाला गरज ; संदर्भीय माझा लेख...】
लेखन - एन.के. (पत्रकार)
शाळा नसत्या तर आपण खूप निबंध वाचली आहेत, असतील. पण लक्षात ठेवा जर शाळा नसत्या तर आपण असतो का हो ? म्हणजे शब्द, हावभाव, संभाषण हे सर्व काही अंधुक असल असत. म्हणजे अळणी म्हणतो ना आपण अस एक बेचव जीवन म्हणून आपल्या वाट्याला जगण आलं असत. शिक्षण उद्गात्या सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची दारे उघडली नसती तर आज जगण्याला एक अर्थ म्हणून काहीच राहील नसत. आणि जिजाऊ मातेने जर शिवबा दिला नसता तर हा महाराष्ट्र एक लोकशाहीच्या कट्टर शिकवणी पासून किंवा एक नेतृत्व म्हणजे काय या बोधाला मुकला असता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात दोन महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या आपल्याला साजरी करायला मिळतात. हार, श्रीफळ आणि अगरबत्ती वाहून तर काही ठिकाणी केलेल्या पूजेचे धन्य मानले पाहिजे इतकं देखणी जयंती उत्सव डोळ्यांचे पारणे ही फुटेल इतकं छान सगळं चालेल असत लक्षात घ्या; आई जिजामाता ज्याने हा महाराष्ट्र घडवलं आणि एवढंच नाही तर सत्ता म्हणजे काय प्रजादक्ष राजेशाही म्हणजे काय याची प्रचिती घडवणाऱ्या शिवबाला आणि त्याग म्हणजे आणि मृत्यू अटळ असून शेवटच्या स्वासपर्यंत लढवय्या शंभूराजा दिला. आणि दुसरीकडे ज्या स्त्रीने अंगावर दगड धोंडे झेलत महिलांच्या शिक्षणाची दरवाजे खुले करत आज समाजात उंच मानेन महिलेला स्थान आहे त्याच्या मूळ म्हणून किंवा महिलांच्या हक्काच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले या दोन महत्त्वाच्या महान व्यक्तिमत्वाच्या जयंत्या ह्या आपण संक्षिप्त किंवा वाजत गाजत करतो याची खरी गरज आहे का ? त्यांनी दिलेल्या वचन आणि बोधमृताचा परामर्ष आपण असे फेडायचे का हो ? दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचा इतिहास पाहिलं तर समाजासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत साम्राज्य असो किंवा एक दक्ष कारभार असो किंवा एक शैक्षणिक गंगा दारोदार पोहचवऱ्याचा आदर्श व्यक्तीमत्वाच्या शिकवणीचा पांग आपण या पद्धतीने फेडणे कितपत योग्य...? ज्या संकुचित वृत्तीच्या आज जयंत्या होत आहेत यावरून एक खंत वाटून जाते की अमुक-तमुक विशिष्ट जाती प्रवर्गातील लोकांनी आपापले महापुरुष आणि देव वाटून घेऊन त्यांच्या जयंत्या ह्या संघर्षातून केली जात आहे पण कुठं तरी त्यांचा इतिहास , बोध आपण मागे सोडून जात आहोत का अशीही भीती वाटून गेल्याखेरीज राहणार नाही.
आजच्या महिलाबद्दल लिहायचं म्हटलं की,अनेक प्रश्न उभे रहातात,द्विधा मनस्थिती होते. ती आधुनिक काळातील महिला असो वा पुर्व काळातील महिलेचा विचार केला तरी अनंत यातना मग यात(मानसिक यातना असो वा शारीरिक) सोशिकतेची,सहनशिलतेची सुंदर वरदान असणारी 'स्त्री' कालची स्त्री -तीची मानसिकता,तीचे स्थान,तीची अवहेलना तीला गृहित धरने हेच तीच्या माहितीत होते, पुरुष प्रधान असलेल्या या समाजात तीला सोशिकपणाशी मुलीची बाई म्हणुन नाळ थेट जोडलेली असायची याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे आगमनही त्याच काळातले. परंतु नशिबाने महात्मा ज्योतीराव फुले यांच्या अमृत सहवासाने सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणसाठी जीवाचे रान करत स्त्रिशिक्षण सुरु केले.त्यांची ती अभुतपूर्व कामगिरीने आजची महिला जन्माला आली.
याचप्रमाणे जिजाऊ मातेने सुद्धा एक राजा घडवताना शिवाजी महाराजांच्या प्रजादक्ष अजेंड्याच्या कायम पाठीशी राहून स्वराज्य घडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक नवीन योजना किंवा प्रजेला दिलेलं वचन पूर्ती करत असताना त्यांच्या समोर माँसाहेब यांच मार्गदर्शन म्हणून कायम पाठीशी असणारी एक सक्षम आई, स्त्री म्हणून जिजामातेने प्रतिनिधित्व केलं.
या दोन्ही महान नेतृत्व किंवा समाजाच्या सुपिकतेसाठी आपलं जीवन वाहिलेल्या महिलांच्या जीवन चरित्र पाहिलं तर कोणत्याही अत्याचाराच्या विरोधात उभे राहून लढणे, किंवा पुरुषांच्या साथीने वाटचाल करत समाजात एक महिला म्हणून वेगळं स्थान न प्राप्त करता आम्ही ही सर्व गुण संपन्न असून आम्ही ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, लढा उभारू शकतो हे दाखवून दिलं न याला सपोर्ट म्हणून यांचा इतिहास असणार आहे.
...पण खंत ही कधी कधी वाटून जाते की आमच्या काही महिला वर्गांना फुल्यांची सावित्री कधी कळलीच नाही, सत्यवानाच्या सावित्री मधेच अजून अडकून आहेत, जिजाऊ मातेचे किंवा अनेक आदर्श घ्यायला पाहिजे असे पण आज ही आपण मार्गशीर्ष गुरुवार आणि उपवासाच्या दिनचर्येत व्यस्त आहोत...अंधश्रद्धा आणि श्रधिक गोष्टीवर भाष्य केले तरीही काहूर माजेल इतकं भीती असते पण आज काळाची गरज पुढ्यात असलेल्या प्रगतशील राष्ट्रांचा दृष्टिकोन बघून त्या अनुषंगाने उच्च शिक्षण पासून ते एक व्यवस्थित लाईफ यासाठी महापुरुष यांच्या जयंत्या ऐवजी त्यांचे बाळकडू, बोध लक्षात घेऊन त्या रस्त्याने आपली वाटचाल हवी अन्यथा समाज अजून कुठं ना कुठं बॅकलॉगला आहे असं भविष्यात म्हणावं लागेल...!
संक्रातीच्या या शुभ मुहूर्तावर चला तर मग छान छान आणि गोड विचारांची उधळण करूया, मनापासून गोड सणाच्या ;मकर संक्रातीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
धन्यवाद..!
मो. 8806605852
No comments:
Post a Comment