Monday, 20 April 2020

देवा दि देव बाप ..!

शिर्षक - माहीत नसलेला डोंगराएवढा आपला बाप...!!

घराला घरपण देणारी माणसं म्हणून आई वडिलांकडे आजकाल पाहिल जातं. समाजाच्या कानाकोपऱ्यात आईला महत्व आणि यशाचं कल्पिक श्रेय कायम देण्यात आलं. घर, खर्च, नाती, अडचणी सोडवणारा बाप माणूस कायम मागच्या रांगेत दिसला. बापाने माणुसकीची झाडं उभी केली, स्वतः कष्टाच्या हिंदोळ्यात गुंतवून घेऊन स्वतःची प्रतिमा झाकोळून जगाला आपल्या आप्तेष्ट असणाऱ्या कुटुंबाची झंकारच कायम प्रकाशझोतात तेवत ठेवली. आईच्या सोबतीची आणि मायाळू ऊब कायम सर्वांना समजली पण बापच महत्व आणि बापाबद्दल संदर्भ लेखन आणि उपमा कायम कमी प्रमाणातच आढळली. म्हणतात ना की जिजाबाईंनी शिवाजी महाराजच्या रुपात दैवत ए महाराष्ट्र नक्की घडवला किंवा तसं अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी. शहाजी राजे आपल्या नेतृत्व आणि संभाषण कौशल्य अधिक निधड्या छातीने स्वराज्यासाठी रावण रंक व्यक्तिमत्व निर्माण करून शत्रूला अस्मान दाखवण्याची पुरुषार्थ कला मात्र महाराजांच्या देवाने अर्थात बापानेच दिली अस हे सत्य न स्वीकारावेच सोबत देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव पण तितकाच लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या आधुनिक जगाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे, पडलेल्या बनियनच्या भोकातून आपल्या बापाची कीर्ती न स्वराज्य नकाशा इतका प्रखर आपला बाप असतो. घरासाठी १-१ रुपयांची कधी न कधी काटकसर केलेला अधोरेखित बाप हा पुण्य दैवत ए होम असतो, दैवत ए जिंदगी असतो, दैवत ए सुख असतो हे विधिलिखित सत्य.
वडिलांचं महत्व कोणाला कळत? १०० दा बापाच्या प्रशशेंची स्तुतीसुमने गायली तरी कमीच बापाबद्दल लिहायला खूप काही आहे शब्द अपुरे पडतील इतकं बापच व्यक्ती मत्व आहे. अनेक ठिकाणी पितृछत्र हरपलं की घर सांभाळून घराची सावली बनुन राहणारी अनेक मोठी मुले, भावंड, आई, यांची जबाबदारी घेणारी माऊली- मुली असे अनेक जणांना बापाच्या व्यक्तिमत्व बद्दल नक्कीच जास्त माहिती असणार आहे. आईला न घराला बघत बघत स्वतःची इमेज तयार करायला लागणार वेळ आणि त्यानंतर पाठीमागे पाहिलं तर बाबा, पप्पा, वडील यांचं कर्तृत्व आठवलं तर नक्कीच डोळ्यांत अश्रू तरळल्या शिवाय राहणार नाहीत. लग्न सराई त्यात मुलीचं आयुष्य बहराव, मुलगा हवं नको बघितला असेल नसेल पण बापाला एक कप चहा, आणि एक ग्लास पाणी देणारी आपली मुलगी बहीण ताई हिच्या लग्नाच्या वेळी डोंगराच्या आकारएव्हढं बापाचा अंतकरण भरून येत. बापाच्या पश्चात पितृ छत्र नसलेल्या कुटुंबाला एकेक वस्तू, सुख क्षणासाठी , वस्तूसाठी तरसावं लागतं. अस हा बाप, बाबा, फादर, वडील ज्याची ख्याती जगविख्यात आणि डोंगराच्या अथांग विशालतेत पण न मावणारा लक्षणीय आपला बाप.



लेखन : एन.के. - ८८०६६०५८५२

महाराष्ट्र पोलीस दैवत ए जंग !

शिर्षक : "वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे" !!

ओस पडली मंदिरे आणि देऊळ तारणारं कोण दिसेना,
जिवाच्या आकांताने सगळेच भयभीत कसला हा करोना,
एक विषाणू सांगतोय जगाला तुम्ही शून्य आहात,
माणुसकी विसरून जाताय त्याचीच फळे भोगत आहात...!!१!!

शेवटी फक्त उरणार प्राणी आणि पक्षी न मोकळं रान,
मानवा बघितलं नाहीस माझं रूप आता कर गुमान सहन,
जग ओस पडेल सगळे अन्न धान्याला महाग होतील,
डोक्याला हात लावून सगळं बघून रडशील ; आताच रडून घे रे !!२!!

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...- २

बोललं सरकार फिरू नको उनाडगत जीवाशी जाशील मरून,
मानव ऐकला नाही अन फिरत राहिला मोकळं गाव न रान,
पोशिंदा म्हणून उभं झाले ते देव वर्दीतले त्याचं थोडं ऐक,
मानव जन्म पुन्हा नाही मिळणार करून घे आताच काम नेक,

देव पण आला नाही वाचवायला आणि येणार ही नाही तुझ्या मदतीला,
पोलीस येतील न समजावून सांगतील जीवन म्हणजे काय स्मरून घे त्या गोष्टीला,
मेल्यावर कोण नाही उचलायला अशी गत हा विषाणू करेल,
आयुष्यात येऊन खूप मिळवलं तू पण जाताना साधं स्पर्श पण नशीब नसेल तुला अरे,

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...- २

अहोरात्र झटून तुमच्यासाठी जीव ही मुठीत घेऊन हिंडतात हे देव,
मार खाऊन ही ढुंगण सुजल तरी ओसाड हिंडायची सुटते कशी तुला पेव,
जगायचं असेल तर माय-बाप माणसाचं ऐकून घे थोडंस,
नियम मोडशील बसेल काठी पण अंती संपवून घेशील जीवन हे गोंडस,

तुला तमा नाही या जगात नाही तुझा हेवा कुणाला या मातीत,
दाखवून दिलं ह्या निसर्गानं तू आहेस काडीचा ह्या भु -भागात,
त्यांना पण संसार आणि घर आहे पण राबतात देवदूत तुमच्यासाठी,
विठ्ठल आणि अल्लाह नाही इथं पण कायम वर्दीवाले हे प्रभू असतात जगासाठी !!३!!

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...
वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...

जाता जाता एवढंच सांगतो जगात असं मानव नाही जिथं देव आणि श्रद्धा नाही,
पर आज तीही झुकली पण सामान्य आणि देशासाठी ह्यांची ड्युटी कधीच माग हटली नाही,
संसार आणि मुलं बाळ असतात त्यांनाही जगायचं त्यांना पण,
तू उनाडगत फिरू नको बाहेर काढ आता तरी त्यांच्या साठी तुझ्यातला तो माणूसपण...!! ४!!


लेखन :- एन.के. ( पत्रकार / समाजसेवक )
मो. - ८८०६६०५८५२

भाकरी मिळेल ना ?

शिर्षक :- साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..!"

कोरोनाच्या महामारी संकट मूळ सगळ्याच्या जीवन मरणाचा गाडा आता कुठं न कुठं दिवसेंदिवस स्लोडाऊन झालाय हे नक्की ह्या लॉकडाऊन मुळं प्रशासन आणि सरकारच्या मध्यात जनता पण त्रस्त झाली असेल कदाचीत विचाराने पण त्या भाजीपाला न अर्धी भाकरीपायी कधी न बाजार पाहिलेला माणूस नव्याने गावात आलेल्या माकडागत माणसाची अवस्था होतेय हे नक्की. जागतिक संकट म्हणून नावारूपाला आलेल्या कोरोनाच्या शिकवणीला एक धडा म्हणून जगणं आणि पैसे हेच सर्वस्व नसत आणि श्राधिक भावनेने तयार झालेले देव, धर्म आज निपचीत पडून आहेत हे ही नक्की माणसाला समजलं. सगळ्यात जास्त यात कुणाला त्रास झाल असेल तर स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंब किंवा देवाच्या श्रद्धेला साक्षी ठेऊन मागून खाणाऱ्या किंवा फिरत्या व्यावसायिक , गिसाडी यासारख्या कुटुंबाची फरफड मात्र झाली हे नक्की. चार पैक मिळतील या आशेने आलेल्या ह्या कुटुंबाने आपला संसार उघड्या अभाळखाली मांडला खरं पण कोरोनाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला पोटच्या भाकरीचा तुकडा सुद्धा हिरावून घेतल या कोरोनाने. जगाच्या बाजारात आज प्रत्येक माणूस ४ बुक शिकून स्वतःच्या जीवाला जपायचं म्हणून तोंडाला मास्क आणि काळजी घेताना दिसतोय. 
पण असे कुटुंब, वेडसर होऊन फिरणाऱ्या काही पर्मनंट पाहुणे यांच्या आरोग्याची काळजी आणि पोटाची खळगी याकडे लक्ष कुणाचं गेलं नाही. 
मंत्री न संत्री सगळीजण जनतेच्या विचारानं योजना, धान्य, गॅस , सेवा सुविधा देताहेत. कोरोना पासून जनता वाचली पाहिजे म्हणून प्रशासन आणि सरकार तारेवरची कसरत करत आहे. पण यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. भारत म्हणजे धार्मिक आणि संस्कृतीच्या स्वबळावर स्वार होऊन जीवन जगणाऱ्या देशातला एक देश. पण आज प्रार्थना करायला जाणार मंदिरे पण नाहीत इतकी भयावह परिस्थिती ओढवली आहे. माणुसकी पणाची एक मशाल म्हणून रक्कम शासनाला जमा होतेय पण ह्या गाव गाड्यात राहणाऱ्या व्यावसायिक कुटुंबांना पण आधार हवं. कोरोना मुळ कंपन्या बंद झाल्या खायचं काय म्हणून हतबल झालेल्या लाखो तरुणांनी गावाकडे जायला धूम ठोकली पण अडकले मध्यात. शासन सगळं करतय पण आपल्या देशात आरोपी सारख राहायला लागली ही माणसं. प्रशासन आणि सरकार दिलेलं निर्देश देशाच्या आणि आपल्या जीवासाठी महत्वाच्या आहेत न ते पाळले पाहिजे हे नक्की. पण आज दैवत म्हणून अवरतलेले रस्त्यावरचे देव आणि दवाखान्यात असलेले डॉक्टर यांना ही तात्पुरती जनता आज एवढंच म्हणत असेल की , साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..! 
साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ...!


लेखन : पत्रकार एन.के. ( मो. 8806605852)

Think !!

शिर्षक :- विचार : सकारात्मक आणि नकारात्मक..!

अनेकदा जीवनाच्या पावलावर एखाद्या सत्य किंवा कल्पक गोष्टींच्या बाबतीत आपल्या डोक्यात चालू असलेले तर्क वितर्क अर्थातच विचार. विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे आहे किंवा असते हे अनेकदा आढळून आले आहे. निसर्गाने हा विचार करण्याचा एक चातुर्य किंवा विचारशक्ती माणसाला अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. विचाराने निर्णय आणि विचाराने दिनचर्या किंवा कोणतीही गोष्ट घ्या त्याबाबत अधिकचे जाणून घेण्याच्या चौकस बुद्धीने अनेक कार्य फळाला गेलेली आज समाजात उदाहरण आहेत. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. म्हणजे सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यत शरीराच्या हरेक अवयव पासून ते पेहराव पासून अगदी चप्पल विशिष्ट वेळेत घालण्याचा एक विचार सुद्धा मनात असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते.
सत्य आहे ना की आज काल माणूस १०० - एक विचारात जास्तीत जास्त विचार आपल्या स्वतः बाबतीत कमी पण सकारात्मक आणि इतरांच्या बाबतीत जास्त पण नकारात्मक विचार करताना दिसून आले आहे. म्हणून जस सुंदर हवं आपल्याला सगळं स्वतःच तस चांगलं आणि तितकाच सकारात्मक विचार आपण करायला हवं हे ही सत्य.
मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.

लेखन :- पत्रकार एन.के.... ✍️

रिफ्रेश नेचर फॉर यु...!

शिर्षक : रिनिव्ह निसर्ग तुमची वाट पाहतोय...!

आपण राहतो तो देश म्हणजे भारत. भरताना वैचारिक आणि अभूतपूर्व शैलीचा इतिहास स्पर्शून जातो. विविध भाषा, प्रांत, विविध वेशभूषा, विविध खाद्यसंस्कृतीने विशाल नटलेला हा आपला देश. निसर्गाने देखील भूभाग आणि निसर्ग सौंदर्य ही भारताला मुबलक दिल आहे. मानव हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला खायला कमवाव लागत अर्थात बाकी सगळे जीव शृष्टीला आपली उपजीविका स्वतः करतात. भारतला असो किंवा जगातला कोणताही मनुष्य थोडी का होईना श्रद्धा, प्रेम न जिव्हाळा अर्पित करणारा किंवा मानणाऱ्या रांगेत येतो. कधी कधी आपल्या श्रद्धेच्या आणि कष्टाला बगल देत समाजाच्या एक विशिष्ट उंचीवर जाण्याच्या लोभापायी मानव माणुसकी नावाचं पुस्तक झाकून ठेऊन कृत्यात उतरताना दिसतो. आपल्या जगण्याकडे एकवेळ बॅक बघितलं ना की दिसून येत की, या विश्‍वाच्या अनंत पसार्‍यात इतर आवश्यक घटकांप्रमाणे मानवी जीविताच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्ष, वनस्पती व प्राणी यांचाही मोलाचा वाटा आहे. यामुळे त्यांचं संवर्धन आणि जपणूक ही आपलं आद्य कर्तव्य आहे याचा विसर ही मानवाला पडला आहे ते ही १००% खरं. यासाठी आज आपल्याला कळून चुकलं असेल की परिस्थिती आली की चुका सुधारून ही काही होत नाही किंवा त्याला असणारी कल्पक बंधनकारक उपाय पण टेंगणे पडतात असा बदला निसर्ग एखादं दिवस हा निसर्ग घेणारच न हे त्याने दाखवून ही दिलय. सांगायचं उद्देश वजा संदेश एवढंच की आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सान्निध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य माणसाला करावेच लागेल, त्याशिवाय आपण हे महत्कार्य पूर्णत्वास नेऊ शकणार नाही. मानवाने त्यांचा भाग काबीज करण्याचा प्रयत्न केला, आता ते तुमच्या भागात येवून थैमान घालतील, तर दोष कुणाचा ? सोसा मग !
संदर्भ दुसरा घेऊन येतो म्हणतात ना "सृष्टीची किमयाच सारी.. मारे तो शैतान, तारे सो भगवान" आधी निसर्गाची अधोगती करायची आणि नंतर निसर्ग कोपला की गोंधळ माजवायचा. आता आजच्या परिस्थितीच घ्या ना की विज्ञान, तंत्रज्ञान सगळं टेंगणे पडलंय पण संकट काही जाईना , आजच्या मानवाला आपल्या जीवाची पर्वा वाटू लागली इतकंच खरं पण कर्माच्या अधोगतीने आपण नरक जवळ करतोय हे कधीच उमगलं नाही. तस सेम माणूस कितीही विज्ञानवादी असला आणि मानवाला त्याच्या कुशल बुद्धीवर प्रचंड विश्वास असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. जेव्हा त्या मर्यादेचे भान होते आणि तेव्हा माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. ही तीच निसर्गशक्ती आहे जिला कोणी भगवंत मानतो, कुणी खुदा तर कुणी जिजस. प्रत्येकाच्या दैवी संकल्पना वेगळ्या असल्या तरी सामान्य भावना तीच आहे, ‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे.
सगळं ठीक आहे पण आता खरी परिस्थिती पाहता घरी थांबणं आणि स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे हेच एकमेव पर्याय आपल्या कडे असेल कर्म न मर्म पाहून देव न निसर्ग नक्की आपल्या पारड्यात आपला हिस्सा टाकेल पण त्या लेखा-जोखाला वेळ नाही, किंवा मानव जन्म पुन्हा नाही म्हणून ह्या संकटाला हरवायच असेल तर काळजी घ्या. संकट टाळलं गेलं की मग आहेच रोजच जनजीवन. निसर्ग आता आपली परीक्षा पाहतोय. आपण घरात न प्राणी सैसाल न खुश अशी एक रचयिता दृश्य आहे. सो काळजी घ्या आणि काळजी करू नका निसर्ग वेळ घेतोय स्वतःसाठी आणि तो परतेल नवं न ताज तवांन होऊन तुमच्या भेटीला उसंत असुद्या लवकरचं रिनिव्ह कल्चर भेटणार हे नक्की.


लेखन : पत्रकार एन.के. 

Sunday, 5 April 2020

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकवेळी गुगल मॅप नसतो ..!

         

       सर्व साधारण जीवनाच्या जडणघडण मध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीत प्रत्येकाची काही ना काही अडचण, दुखाच एक क्षणिक का होईना पण एखादी किनार असतेच. काही महिन्यापूर्वी एका ठिकाणी मित्रा समवेत एक कार्यक्रमात जाण्याचा योग आला. आमच्यात मनसोक्त गप्पा रंगल्या . सगळ्यांची वेगळी कहाणी . कुणाला या कॉलेजात त्या कॉलेजात अॅडमिशन मिळेल का ही चिंता , कुणी नोकरीत पगारवाढ झाली नाही म्हणून हिरमुसलेलं होतं . तर कुणाला या वर्षी तरी पोस्ट काढायची होती . कुणाला परदेशात एमएसला प्रवेश हवा होता आणि कुणाकुणाला विशिष्ट वयापर्यंत सेटल व्हायचं होतं . असे सगळ्यांचे प्लॅन तयार होते . सर्व एकमेकांसोबत शेअर करत होते . तेव्हा असंच आमच्या गप्पा मधून एक कटाक्ष टाकलं तर एक आजी - आजोबा यांचं जोडपं आम्हा मुलांच्या घोळक्याशेजारी बसले होते . आमच्या मोठ्या आवाजातल्या गप्पा त्या आजी - आजोबांना ऐकु जातच होत्या बहुतेक. काही वेळानंतर त्या आजोबांनी आमची चौकशी केली . कोण कुठलंय , कुठून आलोय , काय करतोय याची माहिती विचारली . आणि त्यानंतर हळच म्हणाले । " माझाही नातू तुमच्या वयाचा आहे . आता हट्टाने रशियाला डॉक्टर व्हायला गेला आहे . तुमच्या पिढीकडे पाहून वाटतं , 
          तुमच्याइतकं नियोजन आम्ही कधी केलं नाही . ते बरंही होतं . तेव्हा स्पर्धाही नव्हती . तुम्हाला तुमची ठिकाणं माहीत आहेत हे चांगलंच आहे . तरी लक्षात ठेवा , आयुष्याच्या प्रवासाला गुगल मॅप नसतो . " आम्ही थिजलो . विचारात पडलो . आजोबांचं हे वाक्य अनुभवाचं होतं . कारण स्थिर - अस्थिर असे दोन्ही तट आजोबांनी अनुभवले होते . त्यामुळेच पटणारं होतं. आयुष्याचा प्रवास सुरू होतो तो पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत . पण रोजच्या धावपळीत काहीतरी निमित्ताने प्रवास करतच असतो . गच्च भरलेल्या शहरात , खच्चन भरलेल्या बसच्या गर्दीत , सिग्नलवर वाट बघत , स्टेशनवर ताटकळत , लोंबकळत प्रवास हा चालच असतो . कधी स्वतःच्या वाहनाने ट्रॅफिकच्या गर्दीतही रेडिओ ऐकत स्टिअरिंग फिरवत , दुचाकीवर स्वार होत क्लच , ब्रेक ऍकसिलेटर आणि गिअर बदलत आपला प्रवास चालूच असतो अखंडपणे . मात्र भरलेल्या शहरात , गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर एक गुगल मॅप सतत आपल्या मदतीला असतो . अनोळखी ठिकाणी पोहोचवण्यासाठी . हा गुगल मॅप इच्छित स्थळ शोधून द्यायला आणि रस्ता दाखवायला तत्परच असतो . पण आयुष्याचं असं नाही ना ? अमुक एक ठिकाण आपल्यापासून किती दूर आहे हे वेळ आणि अंतर यासह गुगल मॅपला अचूकतेनं सांगता येत असलं तरी आपण पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी लागू शकणारा वेळ आयुष्याच्या प्रवासात कधी समजतो का ? अर्थात नाही . रस्त्यावरच्या प्रवासात ट्रॅफिक सिग्नलवर काही निश्चित सेकंद थांबून कूच करता येते . 
         
             
        अगदी सहज आणि निष्ठेने सांगायचं झाल तर आयुष्यात अनेक पर्वावर आपल्याला यश अपयश मिळत राहत पण कधी कधी आपल्याला हवं असत ते ध्येयवादी रस्ता मिळत नाही तर कधी कधी आपल्याला नको असलेल्या मॅप वर आपण येऊन ठेपतो. अर्थातच सगळ्याच गोष्टी आपल्याला गुगल वर मिळतात असे नाही. माणसाची तमा किंवा अपेक्षा विचारात घेतल्या तर ७०% गोष्टी ह्या माणसाच्या आचरण आणि वागणुकीच्या लेखा-जोखावर मिळतात, म्हणून का होईना साधं आणि सोप्प जीवन जगायला सुरू करा त्यामुळे आपल्याला हवं नको ते नक्की आयुष्यात मिळत राहील हे नक्की. आयुष्याच्या प्रवासात सहनशीलतेने खूप वेळ वाट बघायला लागू शकते . त्यासाठी लागणारी वेळ आणि अंतर कुणालाच ठाऊक नसतं . ही प्रतीक्षा न संपणारी असू शकते . पण हरकत काय ? एक दिवस बस नाही मिळाली आपण रिक्षा , टॅक्सी घेतो , तर कधी पर्यायी रस्ता निवडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तसंच कायम प्राप्त परिस्थितीत पर्यायांच्या शोधात राहायचं . जरा विसावायचं आणि पुढे जायचं . . जरा नजर बदलली की प्रवास सुंदर होतो. 

लेखन : पत्रकार एन.के.- 8806605852

Friday, 3 April 2020

वरुणराजाची आनंद अश्रू...!

शिर्षक : अखेर पावसाच्या सरी रुपात वरुण राजा सुखावला...!
 
"मानवाने माणुसकी विसरली, प्राणी मात्रावर दया न प्रेम विसरला, गरिबांच्या खिल्लीला उगम दिला तर आपल्या श्रीमंतीला माज दिला म्हणून निसर्गाच्या प्रकोपात निर्माण झालेल्या जगावरच्या संकटावर आज सर्वस्व हतबल झालं याच संक्षिप्त उदा. आणि यात मानवाला शिकवलेला धडा आणि यावर उदार होऊन इंद्र देव हास्य करत सरी रुपात भूतलावर आलेल्या क्षणाची स्पस्टोक्ती करणारा लेखांकन स्पर्शत एक प्रयत्न..."
                   

     कोरोनाच्या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. जे सुखाच्या दारात उभं राहून गर्वाने चालेलल ऐटीतलं जनजीवन पण विस्कळीत होऊन पडलेल्या मानवी जीवनाला आता या विषाणूने जेरीस आणून सोडले आहे. भूतलावर असलेल्या प्राणीमात्रावर निसर्गाने जन्मताच विभागणी वजा एक कल्पक ओळख दिली आहे. काही देशात या प्राणीमात्रावर जीवानिशी खेळून अन्याय केला त्या अन्यायाला निसर्गाने मानवाला चांगली अद्दल घडवली. माणसाला आपल्या घरचं हक्काचं दार पण आज बंद करायला लावल त्या विधात्याने. "जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर" या पंक्तीप्रमाणे मानवाला फळ देतोय इतकंच सत्य. मानवाने मानवतेच्या शाळेत उत्तम राहणे किंवा राहायला हवे होते याची शिकवण देऊन जाणारी ही आजची भयावह परिस्थिती. मानव निर्मित मशनरीपण आता काम करत नाहीत, पैसा, अडका, धन, दौलत सगळी पाण्यात गेलीय हे नक्कीच सत्य. काळाच्या घाल्यासमोर मानवच काही चालेना हे तितकंच कटू सत्य. सांगायचं तात्पर्य इतकंच की मानव जसा वागला, राहिला त्याची फळे इथं वाटली जात आहेत हे नक्कीच खरं. सगळे देव, प्रार्थना सुद्धा हरून कोपऱ्यात पडलेले आहेत. इतकी दुर्दशा जिंदगीत झाली नाही स्पस्टोक्ती जेष्ठ लोक करत आहेत. यातून बचाव करायचं असेल पुन्हा नेटाने जगायचं असेल काळजी घेणे न समाजाच्या हितासाठी झटणे हा एकमेव मार्ग मानवसमोर आहे.
          अशावेळी कालच्या सायंकाळी निसर्गाने ढग काळे केले, तर पावसाच्या प्रमाणाचे वातावरण धारण करून घेतलं आणि काही अवकाळी पावसाचा सरी अचानक कोसळायला सुरवात झाली तो मुग्ध करणारा मातीचा सुगंध सांगत होता असेल की मानवा मी आता सुखावलो, तुझ्या कष्टाला उरलो, तुला पोसल पण मानववृत्ती तू नाहीशी करतोय पण आता तुझ्यातल्या मरणाच्या भीतीने तू राग, मोह, मत्सर काढून टाकून माणूस बनून राहिलास त्या क्षणांनी मी भारावलो अर्थात सुखावलो. निसर्गाच्यात आत असणाऱ्या जन्मजात बदला वृत्तीला तू पुरून उरणार नाही हेच सत्य. पावसाच्या सरी सांगत असतील की हे मानवा आता मी ही सुखावलो न इतकंच नाही पावसाच्या निमित्ताने आनंद अश्रू सुद्धा मी ढळल्या माणसाच्या असणाऱ्या मागण्या किंवा मी पणाचा काहीसा अंत मी कोरोनाच्या माध्यमाने तुजला योग्य ती शिक्षा दिलीय मी आता भोग आपल्या कर्जाची फळे. वरुण राजा कोसळताना म्हणत असेल आणि आनंद व्यक्त करत असेल की मी ही तृप्त झालो आमच्या निसर्गावर जेरीस म्हणून असलेल्या मानवाला पण अद्दल घडली म्हणून धारा कोसळवून वरुन राजा पण ढसा ढसा रडला आज. अवकाळी पावसाचा स्वरूपात प्रकट होऊन साक्षात ईश्वरच पृथ्वीर येऊन अवस्था बघून सुखावला असेल आणि त्यात नित्य समाजसेवा करणाऱ्या माणसाचं रूप न हाल बघून आज इंद्रदेव पण रडला असेच म्हणावे लागेल. जाता जाता इतकंच म्हणावं लागेल की. निसर्गाच्या सानिध्यात राहताना माणुसकी पणाच दर्शन घडवून समाजसेवेची प्रार्थना अर्पण केल्यासच हे सर्व काही बरे होईल अन्यथा बोध दिलेल्या या परिस्थितीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे ही सत्य...!


लेखन : पत्रकार एन.के. (8806605852)