Monday, 20 April 2020

Think !!

शिर्षक :- विचार : सकारात्मक आणि नकारात्मक..!

अनेकदा जीवनाच्या पावलावर एखाद्या सत्य किंवा कल्पक गोष्टींच्या बाबतीत आपल्या डोक्यात चालू असलेले तर्क वितर्क अर्थातच विचार. विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे आहे किंवा असते हे अनेकदा आढळून आले आहे. निसर्गाने हा विचार करण्याचा एक चातुर्य किंवा विचारशक्ती माणसाला अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. विचाराने निर्णय आणि विचाराने दिनचर्या किंवा कोणतीही गोष्ट घ्या त्याबाबत अधिकचे जाणून घेण्याच्या चौकस बुद्धीने अनेक कार्य फळाला गेलेली आज समाजात उदाहरण आहेत. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. म्हणजे सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यत शरीराच्या हरेक अवयव पासून ते पेहराव पासून अगदी चप्पल विशिष्ट वेळेत घालण्याचा एक विचार सुद्धा मनात असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते.
सत्य आहे ना की आज काल माणूस १०० - एक विचारात जास्तीत जास्त विचार आपल्या स्वतः बाबतीत कमी पण सकारात्मक आणि इतरांच्या बाबतीत जास्त पण नकारात्मक विचार करताना दिसून आले आहे. म्हणून जस सुंदर हवं आपल्याला सगळं स्वतःच तस चांगलं आणि तितकाच सकारात्मक विचार आपण करायला हवं हे ही सत्य.
मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.

लेखन :- पत्रकार एन.के.... ✍️

No comments:

Post a Comment