Monday, 20 April 2020

रिफ्रेश नेचर फॉर यु...!

शिर्षक : रिनिव्ह निसर्ग तुमची वाट पाहतोय...!

आपण राहतो तो देश म्हणजे भारत. भरताना वैचारिक आणि अभूतपूर्व शैलीचा इतिहास स्पर्शून जातो. विविध भाषा, प्रांत, विविध वेशभूषा, विविध खाद्यसंस्कृतीने विशाल नटलेला हा आपला देश. निसर्गाने देखील भूभाग आणि निसर्ग सौंदर्य ही भारताला मुबलक दिल आहे. मानव हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला खायला कमवाव लागत अर्थात बाकी सगळे जीव शृष्टीला आपली उपजीविका स्वतः करतात. भारतला असो किंवा जगातला कोणताही मनुष्य थोडी का होईना श्रद्धा, प्रेम न जिव्हाळा अर्पित करणारा किंवा मानणाऱ्या रांगेत येतो. कधी कधी आपल्या श्रद्धेच्या आणि कष्टाला बगल देत समाजाच्या एक विशिष्ट उंचीवर जाण्याच्या लोभापायी मानव माणुसकी नावाचं पुस्तक झाकून ठेऊन कृत्यात उतरताना दिसतो. आपल्या जगण्याकडे एकवेळ बॅक बघितलं ना की दिसून येत की, या विश्‍वाच्या अनंत पसार्‍यात इतर आवश्यक घटकांप्रमाणे मानवी जीविताच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्ष, वनस्पती व प्राणी यांचाही मोलाचा वाटा आहे. यामुळे त्यांचं संवर्धन आणि जपणूक ही आपलं आद्य कर्तव्य आहे याचा विसर ही मानवाला पडला आहे ते ही १००% खरं. यासाठी आज आपल्याला कळून चुकलं असेल की परिस्थिती आली की चुका सुधारून ही काही होत नाही किंवा त्याला असणारी कल्पक बंधनकारक उपाय पण टेंगणे पडतात असा बदला निसर्ग एखादं दिवस हा निसर्ग घेणारच न हे त्याने दाखवून ही दिलय. सांगायचं उद्देश वजा संदेश एवढंच की आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सान्निध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य माणसाला करावेच लागेल, त्याशिवाय आपण हे महत्कार्य पूर्णत्वास नेऊ शकणार नाही. मानवाने त्यांचा भाग काबीज करण्याचा प्रयत्न केला, आता ते तुमच्या भागात येवून थैमान घालतील, तर दोष कुणाचा ? सोसा मग !
संदर्भ दुसरा घेऊन येतो म्हणतात ना "सृष्टीची किमयाच सारी.. मारे तो शैतान, तारे सो भगवान" आधी निसर्गाची अधोगती करायची आणि नंतर निसर्ग कोपला की गोंधळ माजवायचा. आता आजच्या परिस्थितीच घ्या ना की विज्ञान, तंत्रज्ञान सगळं टेंगणे पडलंय पण संकट काही जाईना , आजच्या मानवाला आपल्या जीवाची पर्वा वाटू लागली इतकंच खरं पण कर्माच्या अधोगतीने आपण नरक जवळ करतोय हे कधीच उमगलं नाही. तस सेम माणूस कितीही विज्ञानवादी असला आणि मानवाला त्याच्या कुशल बुद्धीवर प्रचंड विश्वास असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. जेव्हा त्या मर्यादेचे भान होते आणि तेव्हा माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. ही तीच निसर्गशक्ती आहे जिला कोणी भगवंत मानतो, कुणी खुदा तर कुणी जिजस. प्रत्येकाच्या दैवी संकल्पना वेगळ्या असल्या तरी सामान्य भावना तीच आहे, ‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे.
सगळं ठीक आहे पण आता खरी परिस्थिती पाहता घरी थांबणं आणि स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे हेच एकमेव पर्याय आपल्या कडे असेल कर्म न मर्म पाहून देव न निसर्ग नक्की आपल्या पारड्यात आपला हिस्सा टाकेल पण त्या लेखा-जोखाला वेळ नाही, किंवा मानव जन्म पुन्हा नाही म्हणून ह्या संकटाला हरवायच असेल तर काळजी घ्या. संकट टाळलं गेलं की मग आहेच रोजच जनजीवन. निसर्ग आता आपली परीक्षा पाहतोय. आपण घरात न प्राणी सैसाल न खुश अशी एक रचयिता दृश्य आहे. सो काळजी घ्या आणि काळजी करू नका निसर्ग वेळ घेतोय स्वतःसाठी आणि तो परतेल नवं न ताज तवांन होऊन तुमच्या भेटीला उसंत असुद्या लवकरचं रिनिव्ह कल्चर भेटणार हे नक्की.


लेखन : पत्रकार एन.के. 

No comments:

Post a Comment