Friday, 29 May 2020

सुप्त गुणांना वाव द्या !

शिर्षक : अपेक्षाच ओझं नको सुप्त गुण शोधा...!

लेखन : एन.के. - ( पत्रकार )

         ....( संदर्भीय वरील शीर्षक नुसार आजच्या स्पर्धेच्या युगात आपण अनेक अशी घटना तपासतो की अमुक विषयात नापास झाल्याने किंवा एखादे ध्येय साध्य झाले नाही की जीवनयात्रा संपवून घेणारे असे अनेक विद्यार्थी, किंवा मानवी जीवनातील उदाहरणे आहेत. प्रत्येक जन्म दिलेल्या मध्यम पासून उच्च शिक्षित कुटुंबातील पालकांमध्ये आपल्या पाल्य कडून एक उच्चभु अशा पदभूषित नोकरीची किंवा पदाची अपेक्षा असते. आजच्या युगातील अनेक जणांनी ज्या अर्थी आपल्या मुलामुलीकडून अशा अपेक्षा ठेवणाऱ्या किंवा समाजात नाव व्हावं म्हणून विद्यार्थ्यांकडे एक लाक्षणिक अभ्यास माध्यमातून ध्येय पाहणाऱ्यांनी किंवा शाळेत शिकणाऱ्या, कोर्स करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अशा सर्वजण आणि पालक-पाल्य यांनी वाचवा असा एक माझ्या लेखनातील लेख. )
   
              आपल्या कुटुंबात कुणी नवा सदस्य आला की कोणत्याही पालकाचे किंवा त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य नुसार प्रत्येक जण त्याला हे करावं तर त्याला ते करावं असं बातचीत सुरू असते इतकंच नाही तर त्या विचारला स्पर्श करून त्याला तसे अभ्यास पासून ते तसे संस्कार धडे द्यायला सुरू करतात यात आई म्हणत असते की मुलगा माझा हे व्हावं, बाप म्हणत असतो की अधिकारी व्हावं तर आजोबा म्हणत असतात की त्याने सैन्यात भरती व्हावे असे अनेक प्रश्न आणि अपेक्षाच भडीमार त्या शिकणाऱ्या पाल्याच्या डोईवर असते. ह्या मुलांच्या बाबतीत नाही तर आजच्या जगण्याकडे एक नजर केलं ना की असे अनेक जण म्हणजे लाखो करोडो कुटुंब अशा एका विशिष्टअपेक्षांच्या ओझ्याखाली धावत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा नोकरदार असो किंवा घर चालवणाऱ्या त्या गृहिणी सुद्धा अनेक प्रकारची टास्क घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कसरत म्हणजे एक प्रकारची खांद्यावर बंदूक म्हणतात ना तसे सेम अपेक्षांचं गाठोडं घेऊन जीवन जगत आहेत. सहज विचार केला की आपल्याला समजून येत की आपण ज्या प्रवाहात जगत आहोत त्या प्रवाहात आपण सध्या काय आहोत आणि आपली पायरी कोणती आहे, आपल्याला शिखर गाठायचं असेल तर आपल्याला कितपत पाय पसरावे लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे अंथरून उपलब्ध आहे का , आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करण्यासाठी आपण त्यासाठी सक्षम आहोत का, आणि जे व्हायचं आहे ज्या स्टेप वर आपण विराजमान होणार आहोत त्यासाठी आपलं मन, वातावरण, स्फूर्ती किंवा अनभिज्ञ असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यात तयार होईल का किंवा होणार का ? याची आकलनात्मक एक विचारांची किनार समजली जाणारी एक थिंक नावाचा पॉझिटिव्ह पिन आपल्या बुद्धीला किंवा मेंदूला व्हायला हवं हे खरं. म्हणजेच मला म्हणायचं इतकंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही स्वार्थी नावाचा व्हायरस चिकटून असतो आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपली वाटचाल असते तर त्या वाटचालीत आपल्याला अमुक न तमुक नावाच्या हेवा असतात न ते तस झालं की मला बर वाटेल, शेजारी हे आणले मला आणायला हवं, मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे मला असं तस करावं लागेल,मला प्रमोशन हवं आहे मला हे करावं लागेल, मला असं हवं तसं हवं हे ठरवणे नक्कीच चुकीचं नाही, ध्येयवादी माणसाने नक्की असावे पण समाधान नावाच्या झाडाखाली झोप हवी असेल ना आकलन नावाच्या उशीला जन्म द्यावा लागेल मग ह्या आकलन म्हणजे हेच की आपण काय करू शकतो, आपल्यात कोणती धमक आहे हे ओळखून त्या वाटेवर वाटचाल करणे अर्थात असे की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आपण क्रीडा क्षेत्रात आपलं करिअर आजमावत असू तर नक्कीच ठेच लागणार असे बारीक गोष्टी असतात समजा स्वतःला, पारखा मग ध्येय ठेवून चालायला सुरू करा वेळ लागेल पण तुमची वेळ येणार हे नक्की.
           काही अशी उदाहरणे आहेत आज आपल्या समोर की सचिन तेंडुलकर ज्याला ४ थीत असताना समजलं की मला क्रिकेट मध्ये रस आहे आज नामवंत जगविख्यात खेळाडूच्या यादीत नाव आहे. ज्याला इंग्लिश विषयात नापास व्हावं लागलं त्याच्या नावाने आज भारतरत्न अधोरेखित झालं. सांगायचं एवढंच की आपल्याला काय हवं या पेक्षा आपल्या जवळ काय आहे किंवा आपल्यात काय आहे हे ओळखून जगणे अर्थातच सुप्त गुणांना वाव देऊन जगणं होय. अस ही एक उदाहरण आठवत की आजही जपान मध्ये वयाच्या ४ थ्या वर्षी प्रत्येक बालकाचे आकलन केले जाते आणि त्याच्या आकलन क्षमते वरून अस ठरवलं जात की त्याला काय व्हायचं आहे किंवा हा कशात आपलं करिअर करू शकतो मग तिथूनच त्यांच्या जीवनाची वाटचाल पालक त्या दिशेने करतात म्हणूज आज ही जपान ऑलम्पिक मध्ये पोते भरून पदके मिळवतो तर आपल्या भारताच्या १३० कोटी हुन जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाला एखादं पदकवर समाधान मानावे लागते.
              जगायचं सर्वांना आहे जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येक नात हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण जपत असतो या मागे त्याचा उपकार किंवा सुप्त गुण किंवा बहुदा त्याच्यात असलेली ती खुबी जी इतरांत नसते. म्हणून त्या नात्यांना तसेच जर अविरत आपल्या जीवनाशी बांधील ठेवायचं असेल तर तिथं ही त्याकडुन अपेक्षा बंद करून नात्याची खातरजमा करून त्या नात्याला तसेच पुढ्यात न्या, पालक आणि पाल्य हे वाचावं यासाठी सुरवातीला म्हटलं की आज मुलांना तुम्हाला काय हवं हेच डोळ्यासमोर ठेऊन ते जगत आहेत, पुस्तकं, खेळ, अगदी सिस्त बद्ध पणे वागतात पण कधी त्यांच्या मनाचा विचार करा, त्याला काय व्हायचं याकडे लक्ष द्या, तुम्हाला त्याला त्या क्षेत्रात त्याला नाव करताना पाहायला मिळेल न नाहक अपयश पाहण्यापासून तुमचे डोळे तरी वाचतील. लेख जास्त आणि मोठा झाला तरी काही विषय घेऊन आज पर्यंत लिहले प्रतिसाद बद्दल धन्यवाद वरील लिंक वर माझे अनेक विषय वर लेखन आहे जरूर भेट द्या.


धन्यवाद !

मोबाईल : 8806605862

Friday, 22 May 2020

कोरोना : माझा देश आणि बळीराजा...!

शिर्षक : कोरोना : माझं देश अन जगाचा पोशिंदा.... !!

लेखन : पत्रकार एन.के.
मोबाईल : 8806605852 

     
            
       खूप दिवस झालं माझ्या गावाला डोळे भरून पाहू शकलो नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीने थैमान घातले या थैमान मध्ये अनेकांच्या चुली अगदी साजेस्या पेटल्या ना कुठला उठावेव ना कोणत्या जास्तीच्या गरजा किंवा ना कोणत्या मिजास खूप काही शिकवून गेला हा लॉकडाऊन किंवा हा आपला कोरोना. गरिबांच्या गरजेला सरकार धावून आले जीवाच्या आकांताने संरक्षण ही समर्पक मिळालं. पुणा मुंबईच्या लोकांनी गावाकडे आले आपल्या जिवाच्या खबरदारीने गावात आल्यावर ही स्थानिक लोकांत एक सौम्य भीतीचं वातावरण ही जागृत झालं पण गावाच्या हित संबंधात कायम अग्रेसर असणाऱ्या लोकांनी आणि प्रशासनाने नियोजन बद्ध कार्यप्रनाली राबवत समाजात आणि गाव ते तालुकात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कंबर कसली. शासन आणि केंद्राच्या सगळ्या बाजूने देशाची आर्थिक घडी बसली पाहिजे यासाठी सगळे पुढे सरसावले. सुरळीत चाललेल्या गावाच्या गाव गाड्यातील बारा बलुतेदार यांच्या पारंपरिक आणि पूर्वजात व्यवसाय वर संक्रात आली. कोरानाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोरोनानं जगभरातील प्रत्येकाला जेरीस आणलंय. व्यापारी घरात आहे, शिक्षक घरात आहे, उद्योजक आणि कामगारही घरात आहेत. कोरोनानं अख्खंच्या अख्खं जग घरात कोंडून ठेवलंय जणू...  पण, पण आपला शेतकरी मात्र राना-वावरात राबतोय. माती उपसतोय... घाम पेरतोय... अन् मोती पिकवतोय. मात्र ही पिकवलेला माती रानातच सडतेय. कारण कोरोनानं बाजारपेठांना कुलूप लावलंय..! 
            जगातल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे. आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे. आणि त्यासाठी शेतकरी जगला पाहिजे. कारण, कोरोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या या महायुद्धात डॉक्टर दवाखान्यात. पोलिस आणि पत्रकार रस्त्यावर लढतायत. या सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी या सर्वांइतकाच महत्त्वाचा सैनिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं हे चक्रव्युह भेदून, धन-धान्य देणाऱ्या अन्नदात्याला आधार द्यायला हवा. त्याच्या खांद्यांना बळ द्यायला हवं. इतकं असताना सर्वांगीण समदं देशाच्या हितासाठी नव्हे तर जगाच्या उभारणीसाठी आपल्याला सर्वाना प्रशासन सोबत काम करून देशावरील हे संकट दूर करून पुन्हा "अपने दिन" परत आणायचे आहेत. 
         आताचे हे महत्वाचे दिवस म्हणून लेखन करतोय की आता या टप्प्यात कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे आज रोज रास पणे ग्रामीण भाग पासून ते समदं देशात कहर करणारा हा महा भयानक व्हायरस हळू हळू सगळीकडे पाय रोवू पाहतोय. १३० कोटी जनता आणि त्यातली ६० ते ७०% जनता गावात राहते. शहरातील मजूर स्थलांतरित होऊन तपासणी न करता गेले घुसले, शहरापर्यंत मर्यादित होत पण गावात कंट्रोल करणे खूप जोखमीचे होईल. यामुळे गावातील जे लोक आहेत त्या सुरक्षित भाग कोरोनाच्या छायेत जाण्याची दाट भीती आता जाणवू लागली. आज देश बाहेरच्या शत्रूशी कमी आणि अंतर्गत असणाऱ्या शत्रूच्या कारावाह्याशी लढतोय हे नक्की. गरिबी आणि अशिक्षिततेने पिचलेली जनताच आज भारताच्या पृष्ठभागावर दिसते आहे. मोदी जितका देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपडत आहेत तितकंच ती प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. जाता जाता एवढंच सांगेन की गावागावात पोहोचलेल्या कोरोनाच्या पायदळी आपण भरडले जावू न त्यातून कधीच सावरणार नाही ही कल्पनाच न केलेली बरी तर काहींना वाटतंय चीन, इटलीने सावरलं स्वतःला. पण प्रत्येक चुकीचा आणि संकुचित पाऊल आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पायदळी तुडवणूक अर्थात देशाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची नासाडी हेच कटू आणि अंतिम सत्य.!


धन्यवाद...! 

Monday, 4 May 2020

बार बार समझो... !!😢

जब तक नही समझोगे, समझाने वाला आता रहेगा..!

लेखन - एन. के. ( पत्रकार )

          नमस्कार ! नवीन विषय घेऊन तुमच्या पर्यत पोहचत आहे. गेले २-३ महिने झाले कोरोना हा शब्द अक्षरशः कानात पिंजून गेलाय, काम बंद, जेवणाच्या किंवा अत्यावश्यक वस्तूच्या मागावर असलेली मन रस्ते आज व्याकुळ झालेले आहेत. मध्यम वार्गीययांच्या कुटुंबाला उदर निर्वाह करणे जोखमीचे किंवा परंतु आव्हानात्मक झाल आहे. घरात बसावं तर अनेक कारणं असतात मग उकाडा अन्य अन्य ; बाहेर पडावे तर कोरोना सांगितलं जातं पण हे सर्वस्वी आपल्याला जड जात ते म्हणजे किंवा रुचत नाही असे म्हणजे बाहेर पडू का देत नाहीत. रोगाचे संक्रमण किंवा त्यावर असलेले बांधील सूचना पाळणे म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जीवनासाठी नक्की नाही तर हे सर्वस्वी आपल्या चांगल्या जीवनासाठी. आपण नको ते प्रश्न चिन्ह उभं केलं आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून फरक न पडणाऱ्या न्यूनगंड मध्ये जगत राहिलो आणि बाहेर पडलो आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतो आपण बेफिकीर , बेजबाबदारपणे वागलाे ६४७ वरून ३०००० पर्यंत भारताला नेणारे आपणही तितकेच जबाबदार आहाेत ना मग आपण आजही बघतो प्रशासन ज्या पद्धतीने लढा देतंय त्यात आपण यशाच्या जवळ आहोत आणि बाकीच्या देशांना ही आपला हेवा वाटतो आणि कुनीतीने त्यांना भारताविषयी द्वेश आहे पण आपण तरी कुठे देशाची पर्वा केली? लॉकडाऊनचं गांभीर्य लक्षात न घेता वागलाे.... पाेलिस , डॉक्टर्स , इतर सर्विस देणारी लाेक आपल्यामुळे मृत्युमुखी पडली तर काहीवेळा अस दिसून ही आलं की फक्त माेदी द्वेश आणि टीका ह्यातच धन्यता मानली, सहकार्य करण्याची सकारात्मक आपल्यात कसलीच तमा नाही. अशी बेशिस्त जनता असल्यावर बाहेरचे शत्रू हवेच कशाला ? आपणच आपल्या पुरतं घाणेरड्या विचारांती देश संपवायला पुरेसा आहे.
मित्रानो आज पण आपण सुरक्षित आहोत ह्यासाठी खरं तर आपण आपल्या सरकारचे (केंद्र असू दे की राज्य ) , डॉक्टरांचे , नर्सेस, शासकीय कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचे आपले पोलीस ह्यांचे शतशः आभार मानलेच पाहिजेत. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. मोदीजींनी देशाला दिलेली 'लॉक डाऊन'ची हाक ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नव्हती की ती राजकीय खेळी नव्हती. "लॉक डाऊन" हा फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी होता हे आज जगात जे काही मृत्यूचं तांडव करोनामुळे सुरु आहे ते बघून जाणवतंय. आपण जर तो पाळला नसता तर देशाची काय अवस्था झाली असती ह्याची साधी कल्पनाही न केलेली बरी... जवळ जवळ १,३५,००० मृत्यू ह्या करोनामुळे झाले आहेत. जगातील बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष डोळ्यात पाणी आणून देवाकडे प्रार्थना करत आहेत की ह्या महामारीच्या विळख्यातून त्यांचा देश सुटावा. म्हणून प्रत्येकाला जाता जाता हेच मागण आणि हात जोडून विनंती आहे की घरीच थांबा आणि सरकारच्या सूचनांचे पालन करा यशाचं पारितोषिक लांब नाही.

धन्यवाद !