Monday, 4 May 2020

बार बार समझो... !!😢

जब तक नही समझोगे, समझाने वाला आता रहेगा..!

लेखन - एन. के. ( पत्रकार )

          नमस्कार ! नवीन विषय घेऊन तुमच्या पर्यत पोहचत आहे. गेले २-३ महिने झाले कोरोना हा शब्द अक्षरशः कानात पिंजून गेलाय, काम बंद, जेवणाच्या किंवा अत्यावश्यक वस्तूच्या मागावर असलेली मन रस्ते आज व्याकुळ झालेले आहेत. मध्यम वार्गीययांच्या कुटुंबाला उदर निर्वाह करणे जोखमीचे किंवा परंतु आव्हानात्मक झाल आहे. घरात बसावं तर अनेक कारणं असतात मग उकाडा अन्य अन्य ; बाहेर पडावे तर कोरोना सांगितलं जातं पण हे सर्वस्वी आपल्याला जड जात ते म्हणजे किंवा रुचत नाही असे म्हणजे बाहेर पडू का देत नाहीत. रोगाचे संक्रमण किंवा त्यावर असलेले बांधील सूचना पाळणे म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जीवनासाठी नक्की नाही तर हे सर्वस्वी आपल्या चांगल्या जीवनासाठी. आपण नको ते प्रश्न चिन्ह उभं केलं आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून फरक न पडणाऱ्या न्यूनगंड मध्ये जगत राहिलो आणि बाहेर पडलो आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतो आपण बेफिकीर , बेजबाबदारपणे वागलाे ६४७ वरून ३०००० पर्यंत भारताला नेणारे आपणही तितकेच जबाबदार आहाेत ना मग आपण आजही बघतो प्रशासन ज्या पद्धतीने लढा देतंय त्यात आपण यशाच्या जवळ आहोत आणि बाकीच्या देशांना ही आपला हेवा वाटतो आणि कुनीतीने त्यांना भारताविषयी द्वेश आहे पण आपण तरी कुठे देशाची पर्वा केली? लॉकडाऊनचं गांभीर्य लक्षात न घेता वागलाे.... पाेलिस , डॉक्टर्स , इतर सर्विस देणारी लाेक आपल्यामुळे मृत्युमुखी पडली तर काहीवेळा अस दिसून ही आलं की फक्त माेदी द्वेश आणि टीका ह्यातच धन्यता मानली, सहकार्य करण्याची सकारात्मक आपल्यात कसलीच तमा नाही. अशी बेशिस्त जनता असल्यावर बाहेरचे शत्रू हवेच कशाला ? आपणच आपल्या पुरतं घाणेरड्या विचारांती देश संपवायला पुरेसा आहे.
मित्रानो आज पण आपण सुरक्षित आहोत ह्यासाठी खरं तर आपण आपल्या सरकारचे (केंद्र असू दे की राज्य ) , डॉक्टरांचे , नर्सेस, शासकीय कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचे आपले पोलीस ह्यांचे शतशः आभार मानलेच पाहिजेत. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. मोदीजींनी देशाला दिलेली 'लॉक डाऊन'ची हाक ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नव्हती की ती राजकीय खेळी नव्हती. "लॉक डाऊन" हा फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी होता हे आज जगात जे काही मृत्यूचं तांडव करोनामुळे सुरु आहे ते बघून जाणवतंय. आपण जर तो पाळला नसता तर देशाची काय अवस्था झाली असती ह्याची साधी कल्पनाही न केलेली बरी... जवळ जवळ १,३५,००० मृत्यू ह्या करोनामुळे झाले आहेत. जगातील बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष डोळ्यात पाणी आणून देवाकडे प्रार्थना करत आहेत की ह्या महामारीच्या विळख्यातून त्यांचा देश सुटावा. म्हणून प्रत्येकाला जाता जाता हेच मागण आणि हात जोडून विनंती आहे की घरीच थांबा आणि सरकारच्या सूचनांचे पालन करा यशाचं पारितोषिक लांब नाही.

धन्यवाद !

No comments:

Post a Comment