Friday, 29 May 2020

सुप्त गुणांना वाव द्या !

शिर्षक : अपेक्षाच ओझं नको सुप्त गुण शोधा...!

लेखन : एन.के. - ( पत्रकार )

         ....( संदर्भीय वरील शीर्षक नुसार आजच्या स्पर्धेच्या युगात आपण अनेक अशी घटना तपासतो की अमुक विषयात नापास झाल्याने किंवा एखादे ध्येय साध्य झाले नाही की जीवनयात्रा संपवून घेणारे असे अनेक विद्यार्थी, किंवा मानवी जीवनातील उदाहरणे आहेत. प्रत्येक जन्म दिलेल्या मध्यम पासून उच्च शिक्षित कुटुंबातील पालकांमध्ये आपल्या पाल्य कडून एक उच्चभु अशा पदभूषित नोकरीची किंवा पदाची अपेक्षा असते. आजच्या युगातील अनेक जणांनी ज्या अर्थी आपल्या मुलामुलीकडून अशा अपेक्षा ठेवणाऱ्या किंवा समाजात नाव व्हावं म्हणून विद्यार्थ्यांकडे एक लाक्षणिक अभ्यास माध्यमातून ध्येय पाहणाऱ्यांनी किंवा शाळेत शिकणाऱ्या, कोर्स करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अशा सर्वजण आणि पालक-पाल्य यांनी वाचवा असा एक माझ्या लेखनातील लेख. )
   
              आपल्या कुटुंबात कुणी नवा सदस्य आला की कोणत्याही पालकाचे किंवा त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य नुसार प्रत्येक जण त्याला हे करावं तर त्याला ते करावं असं बातचीत सुरू असते इतकंच नाही तर त्या विचारला स्पर्श करून त्याला तसे अभ्यास पासून ते तसे संस्कार धडे द्यायला सुरू करतात यात आई म्हणत असते की मुलगा माझा हे व्हावं, बाप म्हणत असतो की अधिकारी व्हावं तर आजोबा म्हणत असतात की त्याने सैन्यात भरती व्हावे असे अनेक प्रश्न आणि अपेक्षाच भडीमार त्या शिकणाऱ्या पाल्याच्या डोईवर असते. ह्या मुलांच्या बाबतीत नाही तर आजच्या जगण्याकडे एक नजर केलं ना की असे अनेक जण म्हणजे लाखो करोडो कुटुंब अशा एका विशिष्टअपेक्षांच्या ओझ्याखाली धावत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा नोकरदार असो किंवा घर चालवणाऱ्या त्या गृहिणी सुद्धा अनेक प्रकारची टास्क घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कसरत म्हणजे एक प्रकारची खांद्यावर बंदूक म्हणतात ना तसे सेम अपेक्षांचं गाठोडं घेऊन जीवन जगत आहेत. सहज विचार केला की आपल्याला समजून येत की आपण ज्या प्रवाहात जगत आहोत त्या प्रवाहात आपण सध्या काय आहोत आणि आपली पायरी कोणती आहे, आपल्याला शिखर गाठायचं असेल तर आपल्याला कितपत पाय पसरावे लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे अंथरून उपलब्ध आहे का , आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करण्यासाठी आपण त्यासाठी सक्षम आहोत का, आणि जे व्हायचं आहे ज्या स्टेप वर आपण विराजमान होणार आहोत त्यासाठी आपलं मन, वातावरण, स्फूर्ती किंवा अनभिज्ञ असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यात तयार होईल का किंवा होणार का ? याची आकलनात्मक एक विचारांची किनार समजली जाणारी एक थिंक नावाचा पॉझिटिव्ह पिन आपल्या बुद्धीला किंवा मेंदूला व्हायला हवं हे खरं. म्हणजेच मला म्हणायचं इतकंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही स्वार्थी नावाचा व्हायरस चिकटून असतो आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपली वाटचाल असते तर त्या वाटचालीत आपल्याला अमुक न तमुक नावाच्या हेवा असतात न ते तस झालं की मला बर वाटेल, शेजारी हे आणले मला आणायला हवं, मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे मला असं तस करावं लागेल,मला प्रमोशन हवं आहे मला हे करावं लागेल, मला असं हवं तसं हवं हे ठरवणे नक्कीच चुकीचं नाही, ध्येयवादी माणसाने नक्की असावे पण समाधान नावाच्या झाडाखाली झोप हवी असेल ना आकलन नावाच्या उशीला जन्म द्यावा लागेल मग ह्या आकलन म्हणजे हेच की आपण काय करू शकतो, आपल्यात कोणती धमक आहे हे ओळखून त्या वाटेवर वाटचाल करणे अर्थात असे की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आपण क्रीडा क्षेत्रात आपलं करिअर आजमावत असू तर नक्कीच ठेच लागणार असे बारीक गोष्टी असतात समजा स्वतःला, पारखा मग ध्येय ठेवून चालायला सुरू करा वेळ लागेल पण तुमची वेळ येणार हे नक्की.
           काही अशी उदाहरणे आहेत आज आपल्या समोर की सचिन तेंडुलकर ज्याला ४ थीत असताना समजलं की मला क्रिकेट मध्ये रस आहे आज नामवंत जगविख्यात खेळाडूच्या यादीत नाव आहे. ज्याला इंग्लिश विषयात नापास व्हावं लागलं त्याच्या नावाने आज भारतरत्न अधोरेखित झालं. सांगायचं एवढंच की आपल्याला काय हवं या पेक्षा आपल्या जवळ काय आहे किंवा आपल्यात काय आहे हे ओळखून जगणे अर्थातच सुप्त गुणांना वाव देऊन जगणं होय. अस ही एक उदाहरण आठवत की आजही जपान मध्ये वयाच्या ४ थ्या वर्षी प्रत्येक बालकाचे आकलन केले जाते आणि त्याच्या आकलन क्षमते वरून अस ठरवलं जात की त्याला काय व्हायचं आहे किंवा हा कशात आपलं करिअर करू शकतो मग तिथूनच त्यांच्या जीवनाची वाटचाल पालक त्या दिशेने करतात म्हणूज आज ही जपान ऑलम्पिक मध्ये पोते भरून पदके मिळवतो तर आपल्या भारताच्या १३० कोटी हुन जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाला एखादं पदकवर समाधान मानावे लागते.
              जगायचं सर्वांना आहे जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येक नात हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण जपत असतो या मागे त्याचा उपकार किंवा सुप्त गुण किंवा बहुदा त्याच्यात असलेली ती खुबी जी इतरांत नसते. म्हणून त्या नात्यांना तसेच जर अविरत आपल्या जीवनाशी बांधील ठेवायचं असेल तर तिथं ही त्याकडुन अपेक्षा बंद करून नात्याची खातरजमा करून त्या नात्याला तसेच पुढ्यात न्या, पालक आणि पाल्य हे वाचावं यासाठी सुरवातीला म्हटलं की आज मुलांना तुम्हाला काय हवं हेच डोळ्यासमोर ठेऊन ते जगत आहेत, पुस्तकं, खेळ, अगदी सिस्त बद्ध पणे वागतात पण कधी त्यांच्या मनाचा विचार करा, त्याला काय व्हायचं याकडे लक्ष द्या, तुम्हाला त्याला त्या क्षेत्रात त्याला नाव करताना पाहायला मिळेल न नाहक अपयश पाहण्यापासून तुमचे डोळे तरी वाचतील. लेख जास्त आणि मोठा झाला तरी काही विषय घेऊन आज पर्यंत लिहले प्रतिसाद बद्दल धन्यवाद वरील लिंक वर माझे अनेक विषय वर लेखन आहे जरूर भेट द्या.


धन्यवाद !

मोबाईल : 8806605862

No comments:

Post a Comment