Friday, 22 May 2020

कोरोना : माझा देश आणि बळीराजा...!

शिर्षक : कोरोना : माझं देश अन जगाचा पोशिंदा.... !!

लेखन : पत्रकार एन.के.
मोबाईल : 8806605852 

     
            
       खूप दिवस झालं माझ्या गावाला डोळे भरून पाहू शकलो नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीने थैमान घातले या थैमान मध्ये अनेकांच्या चुली अगदी साजेस्या पेटल्या ना कुठला उठावेव ना कोणत्या जास्तीच्या गरजा किंवा ना कोणत्या मिजास खूप काही शिकवून गेला हा लॉकडाऊन किंवा हा आपला कोरोना. गरिबांच्या गरजेला सरकार धावून आले जीवाच्या आकांताने संरक्षण ही समर्पक मिळालं. पुणा मुंबईच्या लोकांनी गावाकडे आले आपल्या जिवाच्या खबरदारीने गावात आल्यावर ही स्थानिक लोकांत एक सौम्य भीतीचं वातावरण ही जागृत झालं पण गावाच्या हित संबंधात कायम अग्रेसर असणाऱ्या लोकांनी आणि प्रशासनाने नियोजन बद्ध कार्यप्रनाली राबवत समाजात आणि गाव ते तालुकात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कंबर कसली. शासन आणि केंद्राच्या सगळ्या बाजूने देशाची आर्थिक घडी बसली पाहिजे यासाठी सगळे पुढे सरसावले. सुरळीत चाललेल्या गावाच्या गाव गाड्यातील बारा बलुतेदार यांच्या पारंपरिक आणि पूर्वजात व्यवसाय वर संक्रात आली. कोरानाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोरोनानं जगभरातील प्रत्येकाला जेरीस आणलंय. व्यापारी घरात आहे, शिक्षक घरात आहे, उद्योजक आणि कामगारही घरात आहेत. कोरोनानं अख्खंच्या अख्खं जग घरात कोंडून ठेवलंय जणू...  पण, पण आपला शेतकरी मात्र राना-वावरात राबतोय. माती उपसतोय... घाम पेरतोय... अन् मोती पिकवतोय. मात्र ही पिकवलेला माती रानातच सडतेय. कारण कोरोनानं बाजारपेठांना कुलूप लावलंय..! 
            जगातल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे. आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे. आणि त्यासाठी शेतकरी जगला पाहिजे. कारण, कोरोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या या महायुद्धात डॉक्टर दवाखान्यात. पोलिस आणि पत्रकार रस्त्यावर लढतायत. या सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी या सर्वांइतकाच महत्त्वाचा सैनिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं हे चक्रव्युह भेदून, धन-धान्य देणाऱ्या अन्नदात्याला आधार द्यायला हवा. त्याच्या खांद्यांना बळ द्यायला हवं. इतकं असताना सर्वांगीण समदं देशाच्या हितासाठी नव्हे तर जगाच्या उभारणीसाठी आपल्याला सर्वाना प्रशासन सोबत काम करून देशावरील हे संकट दूर करून पुन्हा "अपने दिन" परत आणायचे आहेत. 
         आताचे हे महत्वाचे दिवस म्हणून लेखन करतोय की आता या टप्प्यात कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे आज रोज रास पणे ग्रामीण भाग पासून ते समदं देशात कहर करणारा हा महा भयानक व्हायरस हळू हळू सगळीकडे पाय रोवू पाहतोय. १३० कोटी जनता आणि त्यातली ६० ते ७०% जनता गावात राहते. शहरातील मजूर स्थलांतरित होऊन तपासणी न करता गेले घुसले, शहरापर्यंत मर्यादित होत पण गावात कंट्रोल करणे खूप जोखमीचे होईल. यामुळे गावातील जे लोक आहेत त्या सुरक्षित भाग कोरोनाच्या छायेत जाण्याची दाट भीती आता जाणवू लागली. आज देश बाहेरच्या शत्रूशी कमी आणि अंतर्गत असणाऱ्या शत्रूच्या कारावाह्याशी लढतोय हे नक्की. गरिबी आणि अशिक्षिततेने पिचलेली जनताच आज भारताच्या पृष्ठभागावर दिसते आहे. मोदी जितका देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपडत आहेत तितकंच ती प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. जाता जाता एवढंच सांगेन की गावागावात पोहोचलेल्या कोरोनाच्या पायदळी आपण भरडले जावू न त्यातून कधीच सावरणार नाही ही कल्पनाच न केलेली बरी तर काहींना वाटतंय चीन, इटलीने सावरलं स्वतःला. पण प्रत्येक चुकीचा आणि संकुचित पाऊल आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पायदळी तुडवणूक अर्थात देशाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची नासाडी हेच कटू आणि अंतिम सत्य.!


धन्यवाद...! 

No comments:

Post a Comment