शिर्षक : अखेर पावसाच्या सरी रुपात वरुण राजा सुखावला...!
"मानवाने माणुसकी विसरली, प्राणी मात्रावर दया न प्रेम विसरला, गरिबांच्या खिल्लीला उगम दिला तर आपल्या श्रीमंतीला माज दिला म्हणून निसर्गाच्या प्रकोपात निर्माण झालेल्या जगावरच्या संकटावर आज सर्वस्व हतबल झालं याच संक्षिप्त उदा. आणि यात मानवाला शिकवलेला धडा आणि यावर उदार होऊन इंद्र देव हास्य करत सरी रुपात भूतलावर आलेल्या क्षणाची स्पस्टोक्ती करणारा लेखांकन स्पर्शत एक प्रयत्न..."
कोरोनाच्या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. जे सुखाच्या दारात उभं राहून गर्वाने चालेलल ऐटीतलं जनजीवन पण विस्कळीत होऊन पडलेल्या मानवी जीवनाला आता या विषाणूने जेरीस आणून सोडले आहे. भूतलावर असलेल्या प्राणीमात्रावर निसर्गाने जन्मताच विभागणी वजा एक कल्पक ओळख दिली आहे. काही देशात या प्राणीमात्रावर जीवानिशी खेळून अन्याय केला त्या अन्यायाला निसर्गाने मानवाला चांगली अद्दल घडवली. माणसाला आपल्या घरचं हक्काचं दार पण आज बंद करायला लावल त्या विधात्याने. "जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर" या पंक्तीप्रमाणे मानवाला फळ देतोय इतकंच सत्य. मानवाने मानवतेच्या शाळेत उत्तम राहणे किंवा राहायला हवे होते याची शिकवण देऊन जाणारी ही आजची भयावह परिस्थिती. मानव निर्मित मशनरीपण आता काम करत नाहीत, पैसा, अडका, धन, दौलत सगळी पाण्यात गेलीय हे नक्कीच सत्य. काळाच्या घाल्यासमोर मानवच काही चालेना हे तितकंच कटू सत्य. सांगायचं तात्पर्य इतकंच की मानव जसा वागला, राहिला त्याची फळे इथं वाटली जात आहेत हे नक्कीच खरं. सगळे देव, प्रार्थना सुद्धा हरून कोपऱ्यात पडलेले आहेत. इतकी दुर्दशा जिंदगीत झाली नाही स्पस्टोक्ती जेष्ठ लोक करत आहेत. यातून बचाव करायचं असेल पुन्हा नेटाने जगायचं असेल काळजी घेणे न समाजाच्या हितासाठी झटणे हा एकमेव मार्ग मानवसमोर आहे.
अशावेळी कालच्या सायंकाळी निसर्गाने ढग काळे केले, तर पावसाच्या प्रमाणाचे वातावरण धारण करून घेतलं आणि काही अवकाळी पावसाचा सरी अचानक कोसळायला सुरवात झाली तो मुग्ध करणारा मातीचा सुगंध सांगत होता असेल की मानवा मी आता सुखावलो, तुझ्या कष्टाला उरलो, तुला पोसल पण मानववृत्ती तू नाहीशी करतोय पण आता तुझ्यातल्या मरणाच्या भीतीने तू राग, मोह, मत्सर काढून टाकून माणूस बनून राहिलास त्या क्षणांनी मी भारावलो अर्थात सुखावलो. निसर्गाच्यात आत असणाऱ्या जन्मजात बदला वृत्तीला तू पुरून उरणार नाही हेच सत्य. पावसाच्या सरी सांगत असतील की हे मानवा आता मी ही सुखावलो न इतकंच नाही पावसाच्या निमित्ताने आनंद अश्रू सुद्धा मी ढळल्या माणसाच्या असणाऱ्या मागण्या किंवा मी पणाचा काहीसा अंत मी कोरोनाच्या माध्यमाने तुजला योग्य ती शिक्षा दिलीय मी आता भोग आपल्या कर्जाची फळे. वरुण राजा कोसळताना म्हणत असेल आणि आनंद व्यक्त करत असेल की मी ही तृप्त झालो आमच्या निसर्गावर जेरीस म्हणून असलेल्या मानवाला पण अद्दल घडली म्हणून धारा कोसळवून वरुन राजा पण ढसा ढसा रडला आज. अवकाळी पावसाचा स्वरूपात प्रकट होऊन साक्षात ईश्वरच पृथ्वीर येऊन अवस्था बघून सुखावला असेल आणि त्यात नित्य समाजसेवा करणाऱ्या माणसाचं रूप न हाल बघून आज इंद्रदेव पण रडला असेच म्हणावे लागेल. जाता जाता इतकंच म्हणावं लागेल की. निसर्गाच्या सानिध्यात राहताना माणुसकी पणाच दर्शन घडवून समाजसेवेची प्रार्थना अर्पण केल्यासच हे सर्व काही बरे होईल अन्यथा बोध दिलेल्या या परिस्थितीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे ही सत्य...!
लेखन : पत्रकार एन.के. (8806605852)
"मानवाने माणुसकी विसरली, प्राणी मात्रावर दया न प्रेम विसरला, गरिबांच्या खिल्लीला उगम दिला तर आपल्या श्रीमंतीला माज दिला म्हणून निसर्गाच्या प्रकोपात निर्माण झालेल्या जगावरच्या संकटावर आज सर्वस्व हतबल झालं याच संक्षिप्त उदा. आणि यात मानवाला शिकवलेला धडा आणि यावर उदार होऊन इंद्र देव हास्य करत सरी रुपात भूतलावर आलेल्या क्षणाची स्पस्टोक्ती करणारा लेखांकन स्पर्शत एक प्रयत्न..."
कोरोनाच्या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. जे सुखाच्या दारात उभं राहून गर्वाने चालेलल ऐटीतलं जनजीवन पण विस्कळीत होऊन पडलेल्या मानवी जीवनाला आता या विषाणूने जेरीस आणून सोडले आहे. भूतलावर असलेल्या प्राणीमात्रावर निसर्गाने जन्मताच विभागणी वजा एक कल्पक ओळख दिली आहे. काही देशात या प्राणीमात्रावर जीवानिशी खेळून अन्याय केला त्या अन्यायाला निसर्गाने मानवाला चांगली अद्दल घडवली. माणसाला आपल्या घरचं हक्काचं दार पण आज बंद करायला लावल त्या विधात्याने. "जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर" या पंक्तीप्रमाणे मानवाला फळ देतोय इतकंच सत्य. मानवाने मानवतेच्या शाळेत उत्तम राहणे किंवा राहायला हवे होते याची शिकवण देऊन जाणारी ही आजची भयावह परिस्थिती. मानव निर्मित मशनरीपण आता काम करत नाहीत, पैसा, अडका, धन, दौलत सगळी पाण्यात गेलीय हे नक्कीच सत्य. काळाच्या घाल्यासमोर मानवच काही चालेना हे तितकंच कटू सत्य. सांगायचं तात्पर्य इतकंच की मानव जसा वागला, राहिला त्याची फळे इथं वाटली जात आहेत हे नक्कीच खरं. सगळे देव, प्रार्थना सुद्धा हरून कोपऱ्यात पडलेले आहेत. इतकी दुर्दशा जिंदगीत झाली नाही स्पस्टोक्ती जेष्ठ लोक करत आहेत. यातून बचाव करायचं असेल पुन्हा नेटाने जगायचं असेल काळजी घेणे न समाजाच्या हितासाठी झटणे हा एकमेव मार्ग मानवसमोर आहे.
अशावेळी कालच्या सायंकाळी निसर्गाने ढग काळे केले, तर पावसाच्या प्रमाणाचे वातावरण धारण करून घेतलं आणि काही अवकाळी पावसाचा सरी अचानक कोसळायला सुरवात झाली तो मुग्ध करणारा मातीचा सुगंध सांगत होता असेल की मानवा मी आता सुखावलो, तुझ्या कष्टाला उरलो, तुला पोसल पण मानववृत्ती तू नाहीशी करतोय पण आता तुझ्यातल्या मरणाच्या भीतीने तू राग, मोह, मत्सर काढून टाकून माणूस बनून राहिलास त्या क्षणांनी मी भारावलो अर्थात सुखावलो. निसर्गाच्यात आत असणाऱ्या जन्मजात बदला वृत्तीला तू पुरून उरणार नाही हेच सत्य. पावसाच्या सरी सांगत असतील की हे मानवा आता मी ही सुखावलो न इतकंच नाही पावसाच्या निमित्ताने आनंद अश्रू सुद्धा मी ढळल्या माणसाच्या असणाऱ्या मागण्या किंवा मी पणाचा काहीसा अंत मी कोरोनाच्या माध्यमाने तुजला योग्य ती शिक्षा दिलीय मी आता भोग आपल्या कर्जाची फळे. वरुण राजा कोसळताना म्हणत असेल आणि आनंद व्यक्त करत असेल की मी ही तृप्त झालो आमच्या निसर्गावर जेरीस म्हणून असलेल्या मानवाला पण अद्दल घडली म्हणून धारा कोसळवून वरुन राजा पण ढसा ढसा रडला आज. अवकाळी पावसाचा स्वरूपात प्रकट होऊन साक्षात ईश्वरच पृथ्वीर येऊन अवस्था बघून सुखावला असेल आणि त्यात नित्य समाजसेवा करणाऱ्या माणसाचं रूप न हाल बघून आज इंद्रदेव पण रडला असेच म्हणावे लागेल. जाता जाता इतकंच म्हणावं लागेल की. निसर्गाच्या सानिध्यात राहताना माणुसकी पणाच दर्शन घडवून समाजसेवेची प्रार्थना अर्पण केल्यासच हे सर्व काही बरे होईल अन्यथा बोध दिलेल्या या परिस्थितीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे ही सत्य...!
लेखन : पत्रकार एन.के. (8806605852)
छान
ReplyDelete