शाळा आणि नोकर भरत्या बंद करून भावी पिढीच्या भविष्याला काळोखात लोटू नका
( *टीप : लेख जरासं मोठा आहे...* )
आज सामान्य जीवन जगताना आणि समाजातील प्रत्येक स्थरातील (म्हणजे काहींनी घालून दिलेल्या गरीब आणि श्रीमंतांच्या दरी) तील प्रत्येक घटक आपल्या नवजात पासून शालेय पाल्याला भविष्यात एका चांगल्या आणि एक सक्षम स्थरावर पोटाच्या खळगीच्या छताखाली असावं असं एक मार्मिक स्वप्न असतं. गरिबांच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं माझं पोर बांधावर शेळ्या सोडण्याऐवजी शाळेत जाऊन शिकावं म्हणून रात्रीचा फिवास आणि दिवसाचा रात्र करणारी मायबाप आज शासनाच्या विविध निर्णयाचे आत्महत्याने स्वागत करताना दिसत आहेत. कुणाच्या मनाला टोचले किंवा कुनाच्या मनाला आंनद वाटेल असं द्वितीय पद्धतीचं लिखाण करायला कधी आवडलं नाही पण सत्य परिस्थितीच एखादं विषय आणि त्यावर संक्षिप्त पण सत्य रेखाटन करायला मला कुणाची भीती हि नाही वाटत. सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं आज आपल्या पाल्याला भविष्य काढावं म्हणून शिक्षण पासून ते कपडे ते खर्चायला पॉकेट मनी पर्यंत विचार करून दुसऱ्याच्या शिवारात राब राब राबतात आणि एका पुढच्या पिढीच्या आयुष्याला घडवायला रक्ताचं पाणी करतात तेव्हा मला सांगा तुमचं डिजिटल इंडिया कुठं कामाला आलं हो..?
शिकून सवरून पोरांनी नशीब काढावे, आपण केलेल्या काबाड कष्टाचे पांग फेडावेत, ही सर्वसाधारणत: कोणत्याही पालकांची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे चांगले शिकून शासकीय नोकरीत जावे, सुखासीन आयुष्य जगावे अशी सर्वसाधारणत: तरुण पिढीची अपेक्षा असते, किंबहुना तेच त्यांनी आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानलेले असते आणि त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. सरकारी नोकरीत दाखल व्हायचा एक प्रमुख राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा, ही अडथळ्याची शर्यत एकदा का आपण पार केली की आपण आपले ध्येय साध्य केलेच, अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळेच राज्यात आजमितीला जवळपास 10 लाखांहून अधिक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात. केंद्र अथवा राज्य पातळीवरील कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विचारात घेता सहजासहजी आणि एक-दोन वर्षांत साध्य होणारी ही गोष्ट नाही, हे सहज लक्षात येते. किमान तीन-चार वर्षांपासून आठ-दहा वर्षे रात्रंदिवस घाम गाळावा, प्रचंड प्रमाणात अभ्यास करावा, तेव्हा कुठे ते ध्येय साध्य होते. मात्र, आपल्या ध्येयपूर्तीच्या आकांक्षेने झपाटलेले लाखो तरुण आणि तरुणी या कशाचीही फिकीर न करता स्पर्धा परीक्षेसाठीचे हे कष्ट वर्षानुवर्षे उपसताना दिसत आहेत. या कष्टाचे फलित जर व्हायचे असेल तर अजून तारेवरची कसरत करावी का...? यश नावाचं लेबल मिळवण्यासाठी ७ आकडी रक्कम कुठून आणायची...? मागील ४-५ वर्षापाठीमागचा काळ आठवला तर ३-४ हजाराच्या घर खर्चाच्या रकमेत ३ पटीने वाढ होऊन ती रक्कम् आता आज १० हजार वर पोहचली आहे आणि यात जर आपल्या द्यायची दुरडी कधीच भरणार नसेल शिक्षण आणि पदाव्यांचं काय चिवडा आणि लाडू बांधायला उपयोगात आणायचे का वो...?आज केंद्र शासनाच्या सेवेतील 4 लाख 20 हजार आणि राज्य शासनाच्या सेवेतील 1 लाख 77 हजार वेगवेगळ्या पातळीवरील पदे रिक्त आहेत. आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदे भरली जातील आणि त्यातच कुठेतरी आपल्या नशिबाची दारे उघडतील म्हणून राज्यातील हे दहा लाखांवर तरुण वर्षानुवर्षे आपले नशीब आजमावत आहेत, तर काही आजमावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे राज्यातील या लाखो तरुण-तरुणींच्या ध्येयावर पाणी फिरण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जवळपास 30 टक्के शासकीय पदे म्हणजे नोकर्या कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कपात केलेली पदे सोडून राहिलेली रिक्त पदेसुद्धा भरण्याचा शासनाचा मानस दिसत नाही. तातडीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याकडे शासनाचा कल दिसत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या आणि त्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट उपसणार्या स्पर्धा परीक्षार्थींच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकू लागले आहेत. आपल्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या चाहुलीमुळे हा सगळा वर्ग पुरता भेदरून गेलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यात प्रचंड नैराश्याची भावना दाटून आल्याचे दिसत आहे. शासनाने गांभीर्याने या वर्गाचा विचार केला नाही तर त्यांच्या नैराश्याला भलतीकडेच वाटा फुटण्याचा धोका दिसत आहे.
*आयुष्याची माती करू नका!*
स्पर्धा परीक्षार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे आपले ध्येय साध्य करण्यासाठी खर्ची घालत आहेत. ते ध्येयपूर्तीच्या टप्प्यावर असतानाच जर शासनाने नोकर कपात अथवा नोकर भरती बंदीसारखे निर्णय घेतले तर या युवकांच्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रिक्त पदे भरावीत, अन्यथा या युवकांच्या मनातील असंतोषाचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. आज कोणत्याही सामर्थ्य विना जगणे मुश्किल झाले आहे विचार आणि प्रभोधनाचे माध्यमातून जगण्याचे संकेत तर शुभ मिळू शकतात पण एखाद्या झाडाखाली उभं राहून झाड सावली देईल का अंगावर पडेल अशी भीती बाळगून सामान्य रोजी-रोटीच जीवन जगणं आता मुश्किल झाले आहे आज प्रत्येक शाळकरी मुलगा शैक्षणिक आणि वैचारिक धडा अंगीकृत करतो खरा पण माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षणाच्या संभाव्य स्पर्धे नंतर मात्र आयुष्यचं वर्तमान पुसट आणि अंधुक वाटायला लागले आहे. आयुष्याचा कार्दन काळ म्हणून शासनाच्या योजनांचा रोज स्वागत करत राहिलो तर नक्कीच आपलं जीवन हे काळा-पाण्याची शिक्षा म्हणवल्याशिवाय राहणार नाही.
लेखन - एन.के. (पत्रकार संकेत टाइम्स)
दि. ११-०२-२०१८
( संकलन आकडेवारी साभार - इंटरनेट)
( *टीप : लेख जरासं मोठा आहे...* )
आज सामान्य जीवन जगताना आणि समाजातील प्रत्येक स्थरातील (म्हणजे काहींनी घालून दिलेल्या गरीब आणि श्रीमंतांच्या दरी) तील प्रत्येक घटक आपल्या नवजात पासून शालेय पाल्याला भविष्यात एका चांगल्या आणि एक सक्षम स्थरावर पोटाच्या खळगीच्या छताखाली असावं असं एक मार्मिक स्वप्न असतं. गरिबांच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं माझं पोर बांधावर शेळ्या सोडण्याऐवजी शाळेत जाऊन शिकावं म्हणून रात्रीचा फिवास आणि दिवसाचा रात्र करणारी मायबाप आज शासनाच्या विविध निर्णयाचे आत्महत्याने स्वागत करताना दिसत आहेत. कुणाच्या मनाला टोचले किंवा कुनाच्या मनाला आंनद वाटेल असं द्वितीय पद्धतीचं लिखाण करायला कधी आवडलं नाही पण सत्य परिस्थितीच एखादं विषय आणि त्यावर संक्षिप्त पण सत्य रेखाटन करायला मला कुणाची भीती हि नाही वाटत. सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं आज आपल्या पाल्याला भविष्य काढावं म्हणून शिक्षण पासून ते कपडे ते खर्चायला पॉकेट मनी पर्यंत विचार करून दुसऱ्याच्या शिवारात राब राब राबतात आणि एका पुढच्या पिढीच्या आयुष्याला घडवायला रक्ताचं पाणी करतात तेव्हा मला सांगा तुमचं डिजिटल इंडिया कुठं कामाला आलं हो..?
शिकून सवरून पोरांनी नशीब काढावे, आपण केलेल्या काबाड कष्टाचे पांग फेडावेत, ही सर्वसाधारणत: कोणत्याही पालकांची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे चांगले शिकून शासकीय नोकरीत जावे, सुखासीन आयुष्य जगावे अशी सर्वसाधारणत: तरुण पिढीची अपेक्षा असते, किंबहुना तेच त्यांनी आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानलेले असते आणि त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. सरकारी नोकरीत दाखल व्हायचा एक प्रमुख राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा, ही अडथळ्याची शर्यत एकदा का आपण पार केली की आपण आपले ध्येय साध्य केलेच, अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळेच राज्यात आजमितीला जवळपास 10 लाखांहून अधिक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात. केंद्र अथवा राज्य पातळीवरील कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप विचारात घेता सहजासहजी आणि एक-दोन वर्षांत साध्य होणारी ही गोष्ट नाही, हे सहज लक्षात येते. किमान तीन-चार वर्षांपासून आठ-दहा वर्षे रात्रंदिवस घाम गाळावा, प्रचंड प्रमाणात अभ्यास करावा, तेव्हा कुठे ते ध्येय साध्य होते. मात्र, आपल्या ध्येयपूर्तीच्या आकांक्षेने झपाटलेले लाखो तरुण आणि तरुणी या कशाचीही फिकीर न करता स्पर्धा परीक्षेसाठीचे हे कष्ट वर्षानुवर्षे उपसताना दिसत आहेत. या कष्टाचे फलित जर व्हायचे असेल तर अजून तारेवरची कसरत करावी का...? यश नावाचं लेबल मिळवण्यासाठी ७ आकडी रक्कम कुठून आणायची...? मागील ४-५ वर्षापाठीमागचा काळ आठवला तर ३-४ हजाराच्या घर खर्चाच्या रकमेत ३ पटीने वाढ होऊन ती रक्कम् आता आज १० हजार वर पोहचली आहे आणि यात जर आपल्या द्यायची दुरडी कधीच भरणार नसेल शिक्षण आणि पदाव्यांचं काय चिवडा आणि लाडू बांधायला उपयोगात आणायचे का वो...?आज केंद्र शासनाच्या सेवेतील 4 लाख 20 हजार आणि राज्य शासनाच्या सेवेतील 1 लाख 77 हजार वेगवेगळ्या पातळीवरील पदे रिक्त आहेत. आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही पदे भरली जातील आणि त्यातच कुठेतरी आपल्या नशिबाची दारे उघडतील म्हणून राज्यातील हे दहा लाखांवर तरुण वर्षानुवर्षे आपले नशीब आजमावत आहेत, तर काही आजमावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे राज्यातील या लाखो तरुण-तरुणींच्या ध्येयावर पाणी फिरण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जवळपास 30 टक्के शासकीय पदे म्हणजे नोकर्या कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कपात केलेली पदे सोडून राहिलेली रिक्त पदेसुद्धा भरण्याचा शासनाचा मानस दिसत नाही. तातडीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याकडे शासनाचा कल दिसत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या आणि त्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट उपसणार्या स्पर्धा परीक्षार्थींच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकू लागले आहेत. आपल्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या चाहुलीमुळे हा सगळा वर्ग पुरता भेदरून गेलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यात प्रचंड नैराश्याची भावना दाटून आल्याचे दिसत आहे. शासनाने गांभीर्याने या वर्गाचा विचार केला नाही तर त्यांच्या नैराश्याला भलतीकडेच वाटा फुटण्याचा धोका दिसत आहे.
*आयुष्याची माती करू नका!*
स्पर्धा परीक्षार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे आपले ध्येय साध्य करण्यासाठी खर्ची घालत आहेत. ते ध्येयपूर्तीच्या टप्प्यावर असतानाच जर शासनाने नोकर कपात अथवा नोकर भरती बंदीसारखे निर्णय घेतले तर या युवकांच्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रिक्त पदे भरावीत, अन्यथा या युवकांच्या मनातील असंतोषाचा स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. आज कोणत्याही सामर्थ्य विना जगणे मुश्किल झाले आहे विचार आणि प्रभोधनाचे माध्यमातून जगण्याचे संकेत तर शुभ मिळू शकतात पण एखाद्या झाडाखाली उभं राहून झाड सावली देईल का अंगावर पडेल अशी भीती बाळगून सामान्य रोजी-रोटीच जीवन जगणं आता मुश्किल झाले आहे आज प्रत्येक शाळकरी मुलगा शैक्षणिक आणि वैचारिक धडा अंगीकृत करतो खरा पण माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षणाच्या संभाव्य स्पर्धे नंतर मात्र आयुष्यचं वर्तमान पुसट आणि अंधुक वाटायला लागले आहे. आयुष्याचा कार्दन काळ म्हणून शासनाच्या योजनांचा रोज स्वागत करत राहिलो तर नक्कीच आपलं जीवन हे काळा-पाण्याची शिक्षा म्हणवल्याशिवाय राहणार नाही.
लेखन - एन.के. (पत्रकार संकेत टाइम्स)
दि. ११-०२-२०१८
( संकलन आकडेवारी साभार - इंटरनेट)
No comments:
Post a Comment