फक्त आणि फक्त जयंती उत्सव साजरे करणारे २१ व्या शतकातले महापुरुषांचे भक्त
आज कोणत्याही महापुरुषांची जयंती आणि उत्सव म्हटलं की आपल्या दृष्टीस पडणारं पाहिलं दृश्य म्हटलं तर डॉल्बीच्या कर्कश आवाजात ताल धरलेले २० ते ३० वयोगटातले तरुण. सामाजिक आणि वैचारीक इतिहास घेऊन या जन्मभूमीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या महापुरुषाकडे पाहताना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या कर्माच्या आणि कर्तृत्वाने त्या त्या क्षेत्राचं विशाल साम्राज्य उभं करणाऱ्या या इतिहासकारांच्या स्मृतीला आठवण म्हणून आयोजल्या जाणाऱ्या विविध सामाजिक बोधमृत पाजणाऱ्या प्रत्येक समारंभला पाहता एक प्रश्न मनी ठेका धरू लागतो तो म्हणजे " इतिहासाची जपणूक का इतिहासाची पुसवणूक". एखादी जयंती होत असताना कुतूहलाने पाहणारे आम्ही त्या गजबजलेल्या वातावरणात काही क्षणासाठी कुणाची जयंती, कुणाच्या विचारांचे पाईक हे बनत आहेत, कोणत्या महापुरुषांच्या आचार विचारांना डोळ्यासमोर ठेऊन असे सभ्य वर्तन करत आहेत असे विचारांनी मन ग्रासत. अनेक गाव तालुका जिल्हा यापातळीवर अनेक महापुरुषांना नेमून दिल्यासारखं त्या त्या कट्टर नावाची उपाधी घेऊन हिंडणारे ग्रुप न मंडळे जयंती साजरी करतात ते हि मनापासून सुद्धा अनु तो तितक्या मोठ्या प्रमाणात कृतज्ञतेने देखील सर्वत्र साजरा सुद्धा केला जातो पण तो कसा?
तर मोठ्याने एका ट्रक मध्ये डी.जे. लावला जातो ज़्यात कधी मुन्नी बदनाम होत असते, कधी शिला जवान होत असते, कधी हलकट जवानीचं प्रदर्शन होत असतं, तर नाचणारे महापुरुषांचे विचाराक म्हणवणारे? त्या ट्रकच्या समोर चक्क दारू पिऊन न "चिपका दे सय्या फेविकॉल से…" म्हणत कुणा कुणाला 'चिपकण्याचा' प्रयत्न करताना दिसतात काय हीच आहे त्या महापुरुषाची शिकवण? या साठीच का त्यांनी आपले आयुष्य, आपले तारुण्य नि सर्वस्व पणाला
लावले? विचार करा अशी मिरवणूक पाहून कोण प्रभावित होणार नाही? डी.ज़े. च्या कर्ण कर्कश धांगड धींग्यां पासून लांब पळणारे लोकंच मग शांत उभे राहून या मिरवणुकी कडे उत्सुकतेने पाहत राहतील.
बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेला शांततेचा संदेश, शिवाजी महाराजांनी दिलेला लढवय्या बाळकडू किंवा महिला समता बंधुता लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि हीच आदर्श व त्यांच्या शिकवणुकी प्रमाणे असलेली मिरवणूक ठरेल! असे मला वाटते त्या नंतर सर्वजण एकत्र येऊन महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून, त्यांचे विचार सांगणारे कार्यक्रम प्रस्तुत करून मिरवणुकीची सांगता करावी.
मी आजवर अश्याच मिरवणुकीचे, जयंतीचे दृश्य आपण पाहत आलोय आपण ही यावर एकदा विचार केलं पाहिजे भविष्य काळात अशा शांत, निर्व्यसनी व आदर्श जयंती व मिरवणुका पहावयास मिळतील अशी अपेक्षा.बोलताना कटू वाटत पण सत्य आहे आज प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माने महापुरुषांना वाटून घेतल्यासारखं वर्तन पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं पाहायला मिळत आहे की महापुरुष किंवा देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या जयंत्या सुद्धा काहींना आठवेनासे झालेत. मध्ये असंच वाचनात आले महात्मा गांधींच्या ३० जानेवारीच्या स्मृती निमित्त काही अपवाद वगळता कोण मूर्तिकडे फिरकल सुद्धा नाही म्हणे...ज्या अर्थी जर वर्षी नवनवीन कार्यक्रम, उपक्रम घेणारे संस्था किंवा संबंधीत व्यक्ती संघ इतकं आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झालो आहोत का हो...? समाजात वाटून दिल्यासारखं वर्गणी आणि वर्गणीची खर्चिक बाजू म्हणून महाप्रसाद आणि धांगड-धिंगा हेच आपल्या पिढीची जयंती साजरी करण्याची रूढ परंपरा आहे का हो...? समाजाच्या उन्नती साठी एखादे लाक्षणिक व्याख्यान माला किंवा जयंती महापुरुषांची ख्याती प्रसिद्ध करणारे उपक्रम राबवून शॉर्ट बट स्वीट जयंती आपण का करू शकत नाही ही...? आज राजकारण सुद्धा त्या महापुरुष किंवा एखाद्या दौवताच्या समान माणसाला समोर ठेऊन भावनिक राजकारणाला सुरवात झाली आहे आजचे सरकार पाहता महाराजांचे आशीर्वाद घेते आणि जनतेला दिला जाणारा वृद्धी म्हणून त्रास पाहता जनसामान्यांचे जनजीवन विस्कळत चालले आहे. आज ही आपण राम मंदिर आणि मशजिदच्या नावाखाली मते मागायला गरिबांची झोपडी शोधत असतो.
काळाची गरज पाहता आजच्या पिढीला विसर पडलेल्या त्या इतिहासाची बाळकडू पाजणे गरजेचे आहे. सामाजिक आणि गोष्टीकडचा कल आपला वाढला पाहिजे जेणेकरुन यातून समाजाला १% घेता आलं तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाले हे कटू सत्य. चला मग वसा घेऊया आज पासून कोणत्याही कारणाने एखाद्या जयंती किंवा कोणत्याही सामाजिक बोधाच्या कार्यक्रमात "मुन्नीला बदनाम" करणार नाही किंवा "शिलाच्या जवानाला" खुले आम आणणार नाही. पाऊल मोठं आहे पण सुरवात झाली तर नक्कीच शिखर व्हायला वेळ लागणार नाही.
धन्यवाद...!
लेखक :- एन.के. (पत्रकार दै. संकेत टाइम्स)
दि. ०७/०२/२०१८
आज कोणत्याही महापुरुषांची जयंती आणि उत्सव म्हटलं की आपल्या दृष्टीस पडणारं पाहिलं दृश्य म्हटलं तर डॉल्बीच्या कर्कश आवाजात ताल धरलेले २० ते ३० वयोगटातले तरुण. सामाजिक आणि वैचारीक इतिहास घेऊन या जन्मभूमीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या महापुरुषाकडे पाहताना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या कर्माच्या आणि कर्तृत्वाने त्या त्या क्षेत्राचं विशाल साम्राज्य उभं करणाऱ्या या इतिहासकारांच्या स्मृतीला आठवण म्हणून आयोजल्या जाणाऱ्या विविध सामाजिक बोधमृत पाजणाऱ्या प्रत्येक समारंभला पाहता एक प्रश्न मनी ठेका धरू लागतो तो म्हणजे " इतिहासाची जपणूक का इतिहासाची पुसवणूक". एखादी जयंती होत असताना कुतूहलाने पाहणारे आम्ही त्या गजबजलेल्या वातावरणात काही क्षणासाठी कुणाची जयंती, कुणाच्या विचारांचे पाईक हे बनत आहेत, कोणत्या महापुरुषांच्या आचार विचारांना डोळ्यासमोर ठेऊन असे सभ्य वर्तन करत आहेत असे विचारांनी मन ग्रासत. अनेक गाव तालुका जिल्हा यापातळीवर अनेक महापुरुषांना नेमून दिल्यासारखं त्या त्या कट्टर नावाची उपाधी घेऊन हिंडणारे ग्रुप न मंडळे जयंती साजरी करतात ते हि मनापासून सुद्धा अनु तो तितक्या मोठ्या प्रमाणात कृतज्ञतेने देखील सर्वत्र साजरा सुद्धा केला जातो पण तो कसा?
तर मोठ्याने एका ट्रक मध्ये डी.जे. लावला जातो ज़्यात कधी मुन्नी बदनाम होत असते, कधी शिला जवान होत असते, कधी हलकट जवानीचं प्रदर्शन होत असतं, तर नाचणारे महापुरुषांचे विचाराक म्हणवणारे? त्या ट्रकच्या समोर चक्क दारू पिऊन न "चिपका दे सय्या फेविकॉल से…" म्हणत कुणा कुणाला 'चिपकण्याचा' प्रयत्न करताना दिसतात काय हीच आहे त्या महापुरुषाची शिकवण? या साठीच का त्यांनी आपले आयुष्य, आपले तारुण्य नि सर्वस्व पणाला
लावले? विचार करा अशी मिरवणूक पाहून कोण प्रभावित होणार नाही? डी.ज़े. च्या कर्ण कर्कश धांगड धींग्यां पासून लांब पळणारे लोकंच मग शांत उभे राहून या मिरवणुकी कडे उत्सुकतेने पाहत राहतील.
बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेला शांततेचा संदेश, शिवाजी महाराजांनी दिलेला लढवय्या बाळकडू किंवा महिला समता बंधुता लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि हीच आदर्श व त्यांच्या शिकवणुकी प्रमाणे असलेली मिरवणूक ठरेल! असे मला वाटते त्या नंतर सर्वजण एकत्र येऊन महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून, त्यांचे विचार सांगणारे कार्यक्रम प्रस्तुत करून मिरवणुकीची सांगता करावी.
मी आजवर अश्याच मिरवणुकीचे, जयंतीचे दृश्य आपण पाहत आलोय आपण ही यावर एकदा विचार केलं पाहिजे भविष्य काळात अशा शांत, निर्व्यसनी व आदर्श जयंती व मिरवणुका पहावयास मिळतील अशी अपेक्षा.बोलताना कटू वाटत पण सत्य आहे आज प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माने महापुरुषांना वाटून घेतल्यासारखं वर्तन पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं पाहायला मिळत आहे की महापुरुष किंवा देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या जयंत्या सुद्धा काहींना आठवेनासे झालेत. मध्ये असंच वाचनात आले महात्मा गांधींच्या ३० जानेवारीच्या स्मृती निमित्त काही अपवाद वगळता कोण मूर्तिकडे फिरकल सुद्धा नाही म्हणे...ज्या अर्थी जर वर्षी नवनवीन कार्यक्रम, उपक्रम घेणारे संस्था किंवा संबंधीत व्यक्ती संघ इतकं आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झालो आहोत का हो...? समाजात वाटून दिल्यासारखं वर्गणी आणि वर्गणीची खर्चिक बाजू म्हणून महाप्रसाद आणि धांगड-धिंगा हेच आपल्या पिढीची जयंती साजरी करण्याची रूढ परंपरा आहे का हो...? समाजाच्या उन्नती साठी एखादे लाक्षणिक व्याख्यान माला किंवा जयंती महापुरुषांची ख्याती प्रसिद्ध करणारे उपक्रम राबवून शॉर्ट बट स्वीट जयंती आपण का करू शकत नाही ही...? आज राजकारण सुद्धा त्या महापुरुष किंवा एखाद्या दौवताच्या समान माणसाला समोर ठेऊन भावनिक राजकारणाला सुरवात झाली आहे आजचे सरकार पाहता महाराजांचे आशीर्वाद घेते आणि जनतेला दिला जाणारा वृद्धी म्हणून त्रास पाहता जनसामान्यांचे जनजीवन विस्कळत चालले आहे. आज ही आपण राम मंदिर आणि मशजिदच्या नावाखाली मते मागायला गरिबांची झोपडी शोधत असतो.
काळाची गरज पाहता आजच्या पिढीला विसर पडलेल्या त्या इतिहासाची बाळकडू पाजणे गरजेचे आहे. सामाजिक आणि गोष्टीकडचा कल आपला वाढला पाहिजे जेणेकरुन यातून समाजाला १% घेता आलं तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाले हे कटू सत्य. चला मग वसा घेऊया आज पासून कोणत्याही कारणाने एखाद्या जयंती किंवा कोणत्याही सामाजिक बोधाच्या कार्यक्रमात "मुन्नीला बदनाम" करणार नाही किंवा "शिलाच्या जवानाला" खुले आम आणणार नाही. पाऊल मोठं आहे पण सुरवात झाली तर नक्कीच शिखर व्हायला वेळ लागणार नाही.
धन्यवाद...!
लेखक :- एन.के. (पत्रकार दै. संकेत टाइम्स)
दि. ०७/०२/२०१८
No comments:
Post a Comment