आपल्या निंदकामार्फत केले जाणाऱ्या निंदेला, बालिश लिखाण आणि दोषाला आपलं आत्मविश्वासाच औषध म्हणूनच वापरा...
लेखन :- एन.के. पत्रकार
दि. २४/०२/२०१८
ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर एखाद्याच्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर ती त्याची लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच कोणीतरी लिहितो. पण
काहींना प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात निंदक म्हणून कोण ना कोण भेटत असत क्षेत्र कोणतेही असो नाव ठेवणारी लोक हि तयार करावी लागत नाही तर आपोआप आपण फेमस व्हायला लागलो कि संसर्गजन्य पद्धतीने उगवत असतात.
काही जण असतात त्यांना आपलं कधी चांगलं ( जे खरंच चांगलं असत) दिसत नाही वाईटच दिसत असत आणि असे फक्त आपल्या प्रति वाईटच प्रेरित करत असतात जगासमोर मांडत असतात. आणि ज्यांना ज्यांना वाटत कि आपण स्वतः काहीसं लिहून समाजाला एक २% टक्के इतकं संदेश देऊ शकतो किंवा एखाद्याची लेखणी म्हणजे तळपणारी अशी धारधार प्रतिक्रिया जर त्याच्या प्रती उमटत असतील तर नक्कीच माझा गोड सल्ला आहे समाजातल्या प्रत्येक अमुक तमुक घटकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर सामाजिक आणि वैचारिक विषयावर आपले लेखन चालू ठेवावे. स्वतःला कोणी लेखनकार समजून घेत असेल तर म्हणवून घेऊद्या पण तुमच्या मनातला प्रश्न समाजाच्या काही प्रश्नावर कटाक्ष टाकणारा असेल बंधुनो नक्की लिहा कुणाच्या लेखनाला उत्तर नाही तर चांगला सल्ला आहे.
अजून एक सांगायचे होते जर आपल्या लेखनाला जळणारं साधन जरा जास्त ठेवा कारण काहींना सवय आहे आपलं न माझं म्हणवुन घ्यायचं काय करायचं वृत्तीच आहे.... असुदे वाढूदे निंदक कारण....
निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.
मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.
हा विषय घेऊन येण्याचा एकमेव उद्देश आहे की जगात असं कोणतही क्षेत्र नाही की जिथं पाय ओढणाऱ्याची संख्या विरळ आहे. माणूस आणि प्राणी असं आपण धरलं प्राण्यांपेक्षा माणूस पाय ओढण्याचा स्पर्धेत अव्वल आहे. माणसातला सद्गुण अवगत झाला की सदकर्माची फळी त्या त्या क्षेत्रात निर्माण होते तेव्हा त्याला मिळणार सन्मान काहींच्या डोळ्यात टोचू लागतो आणि तो डोळ्यातला कचरा काढण्यासाठी त्याला दंडक उत्तराची गरज असते असे अनेक बुजगावणे तयार होत असतात. अशांना वेळीच त्याच्या कक्षेच्या शेतात जागा करून देण्याची गरज आहे. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्या झेंड्याखाली राहून समाजातल्या काही (मनातल्या विरोधकाकड ) बघण्याचा दृष्टिकोण वाईट असतो आणि यातून त्याच्याबद्दल गैर पसरवणाऱ्यांची संख्या आज बेरजेच्या कॉलम मध्ये आहे.
पण विद्य परिस्थिती पाहता माणसाला पुढं जाण्यासाठी खूप काही कष्टाच्या कचाट्यातून जावं लागतं पण जात असताना अनेक काटे आडवे येत असतात याच काट्याना आपण "निंदक" असे म्हणतात. कारण माणसाला कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि दृढ संकल्प याला पर्याय नाही. त्यासाठी आपल्यातला सत्य परमार्थ जागृत करून लढत राहिले पाहिजे बाकीच्या आजूबाजूच्या निंदकाचे मनावर न घेता आपले ध्येय ध्यानात घेत मार्गक्रमण करत राहायचे. “एक वेळ नशीब कमी पडलं तर चालेल, पण मेहनत कमी पडता कामा नये”. कारण आपल्या मेहनतीवरच जीवनाच्या यश अपयशाच पारड हालत असते. पण ते आपण ठरवावं लागते की, मेहनत करुण ते आपल्या बाजूला ठेवायचं की मेहनत नकरून ते दुसऱ्या बाजूला ठेवायचं.
काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.
उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो....!
त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात.
आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरू केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||
*जाता-जाता....-*
*माणसाच्या जीवनात संधी ह्या चालून येत नसतात तर त्या माणसाने स्वतः मेहनत करुण निर्माण करायच्या असतात आणि हे तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण कठोर परिश्रम करू. एक वाक्य महाविद्यालयीन जीवनात व्याख्यान मालेच्या विषयात एक गोष्ट ऐकली होती- दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवल्यानंतर एका पत्रकाराने विस्टन चर्चिलला प्रश्न विचारला की, जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र कोणता, तेव्हा चर्चिल त्यांना म्हणाले जीवनात यशस्वी होण्याचा असा कोणताही कानमंत्र नाही पण “ज्या माणसाची कामावर श्रद्धा, जिद्द, आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते”. म्हणजेच काय तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही*
धन्यवाद...!
लेखन :- एन.के. पत्रकार
दि. २४/०२/२०१८
ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर एखाद्याच्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर ती त्याची लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच कोणीतरी लिहितो. पण
काहींना प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात निंदक म्हणून कोण ना कोण भेटत असत क्षेत्र कोणतेही असो नाव ठेवणारी लोक हि तयार करावी लागत नाही तर आपोआप आपण फेमस व्हायला लागलो कि संसर्गजन्य पद्धतीने उगवत असतात.
काही जण असतात त्यांना आपलं कधी चांगलं ( जे खरंच चांगलं असत) दिसत नाही वाईटच दिसत असत आणि असे फक्त आपल्या प्रति वाईटच प्रेरित करत असतात जगासमोर मांडत असतात. आणि ज्यांना ज्यांना वाटत कि आपण स्वतः काहीसं लिहून समाजाला एक २% टक्के इतकं संदेश देऊ शकतो किंवा एखाद्याची लेखणी म्हणजे तळपणारी अशी धारधार प्रतिक्रिया जर त्याच्या प्रती उमटत असतील तर नक्कीच माझा गोड सल्ला आहे समाजातल्या प्रत्येक अमुक तमुक घटकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर सामाजिक आणि वैचारिक विषयावर आपले लेखन चालू ठेवावे. स्वतःला कोणी लेखनकार समजून घेत असेल तर म्हणवून घेऊद्या पण तुमच्या मनातला प्रश्न समाजाच्या काही प्रश्नावर कटाक्ष टाकणारा असेल बंधुनो नक्की लिहा कुणाच्या लेखनाला उत्तर नाही तर चांगला सल्ला आहे.
अजून एक सांगायचे होते जर आपल्या लेखनाला जळणारं साधन जरा जास्त ठेवा कारण काहींना सवय आहे आपलं न माझं म्हणवुन घ्यायचं काय करायचं वृत्तीच आहे.... असुदे वाढूदे निंदक कारण....
निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.
मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.
हा विषय घेऊन येण्याचा एकमेव उद्देश आहे की जगात असं कोणतही क्षेत्र नाही की जिथं पाय ओढणाऱ्याची संख्या विरळ आहे. माणूस आणि प्राणी असं आपण धरलं प्राण्यांपेक्षा माणूस पाय ओढण्याचा स्पर्धेत अव्वल आहे. माणसातला सद्गुण अवगत झाला की सदकर्माची फळी त्या त्या क्षेत्रात निर्माण होते तेव्हा त्याला मिळणार सन्मान काहींच्या डोळ्यात टोचू लागतो आणि तो डोळ्यातला कचरा काढण्यासाठी त्याला दंडक उत्तराची गरज असते असे अनेक बुजगावणे तयार होत असतात. अशांना वेळीच त्याच्या कक्षेच्या शेतात जागा करून देण्याची गरज आहे. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्या झेंड्याखाली राहून समाजातल्या काही (मनातल्या विरोधकाकड ) बघण्याचा दृष्टिकोण वाईट असतो आणि यातून त्याच्याबद्दल गैर पसरवणाऱ्यांची संख्या आज बेरजेच्या कॉलम मध्ये आहे.
पण विद्य परिस्थिती पाहता माणसाला पुढं जाण्यासाठी खूप काही कष्टाच्या कचाट्यातून जावं लागतं पण जात असताना अनेक काटे आडवे येत असतात याच काट्याना आपण "निंदक" असे म्हणतात. कारण माणसाला कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि दृढ संकल्प याला पर्याय नाही. त्यासाठी आपल्यातला सत्य परमार्थ जागृत करून लढत राहिले पाहिजे बाकीच्या आजूबाजूच्या निंदकाचे मनावर न घेता आपले ध्येय ध्यानात घेत मार्गक्रमण करत राहायचे. “एक वेळ नशीब कमी पडलं तर चालेल, पण मेहनत कमी पडता कामा नये”. कारण आपल्या मेहनतीवरच जीवनाच्या यश अपयशाच पारड हालत असते. पण ते आपण ठरवावं लागते की, मेहनत करुण ते आपल्या बाजूला ठेवायचं की मेहनत नकरून ते दुसऱ्या बाजूला ठेवायचं.
काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.
उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो....!
त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषच दिसतात.
आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरू केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||
*जाता-जाता....-*
*माणसाच्या जीवनात संधी ह्या चालून येत नसतात तर त्या माणसाने स्वतः मेहनत करुण निर्माण करायच्या असतात आणि हे तेव्हाच साध्य होते जेव्हा आपण कठोर परिश्रम करू. एक वाक्य महाविद्यालयीन जीवनात व्याख्यान मालेच्या विषयात एक गोष्ट ऐकली होती- दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवल्यानंतर एका पत्रकाराने विस्टन चर्चिलला प्रश्न विचारला की, जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र कोणता, तेव्हा चर्चिल त्यांना म्हणाले जीवनात यशस्वी होण्याचा असा कोणताही कानमंत्र नाही पण “ज्या माणसाची कामावर श्रद्धा, जिद्द, आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते”. म्हणजेच काय तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही*
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment