वळसंगच्या मातीतला शिक्षक पेशातला खरा आधुनिक शिक्षण तज्ञ : मा.स्व. इनामदार सर
जगामध्ये अनेक शिखरे पादाक्रांत केलेले व्यक्तिमत्वे आपल्या डोळ्यासमोर रोजच तरळत असतात आणि यांची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्याला आशय आणि पाठबळ देणारी गुरु नावाची व्यक्ती, शिक्षणाबरोबर जगण्याची शिकवण देणाऱ्या उमेदरुपी व्यक्ती प्रत्येकाच्या पाठीशी नेहमी कोणी ना कोणी असते आणि ती आपल्या यशाचा खरा कणा म्हणून काम करत असतो. जगामध्ये गुरु शिवाय यश नाही आणि यश प्राप्तीनंतर कौतुकाची थाप घ्यायला हवं असलेलं व्यासपीठ म्हणून प्रत्येकाच्या जीवनशैलीत गुरूला विशेष महत्व आहे.
गाव तस लहान पण शुशिक्षीत माणसाच्या वस्तीतलं माझं २-३ हजाराच्या लोकवस्तीचे गोर-गोमटं गाव आणि आणि या गावातली मोहरे जे विविध पदावर काम करणारी माणसं पाहता आज वळसंगच्या नावाची छाप जगाच्या बरोबरीने म्हटलं तरी कमीचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज माझ्या गावाची माणसं एका विशिष्ट आणि महत्वाच्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या पाठीमागे मन उंचावणारी कथा कथित इतिहास जे एखाद्या कालाटणीने किंवा गुरुदक्षिणाने प्राप्त सुवर्ण अक्षराने लिहलेला इतिहास भावपूर्ण मनाला स्पर्शनारा आहे. आज या लेखनाचे उद्देश आणि गरज कुणाला हवी नको वाटण्यापेक्षा त्याची प्रचिती आणि त्यांच्या आचार विचारांची जपणूक महत्वाची वाटली इतकेच कारण मी सुद्धा गावाचा रहिवाशी आहे आणि समाजाच्या देनेकरी स्वरूपात माझ्या गावाच्या वैचारिक आणि सक्षम पायभारणीचे शिल्पकार म्हणून त्या महान माणसाच्या इतिहास बद्दल चार गोष्टी लिहिण्याची मला संधी मिळावी याला मी माझं धन्य मानेन एक छोटासा प्रयत्न केला आहे कुणाच्या महापुरुषाच्या बद्दल लिहताना किंवा व्यक्तिरेखाटन करत असताना आत्तापर्यंत मला नेहमी प्रेरणात्मक चालना मिळाली.
आज सामन्यातील सामान्य माणूस एखादा चुका करत असेल तर त्याला पहिली चपराक म्हणजे अडाणी असल्याचा आपण देतो आणि सोबतच हेच शिकलास शाळेत का अशी बोचक टीका केली जाते म्हणजे नक्कीच कोणत्याही गोष्टीतील शिक्षण हे त्या निगडित गोष्टीशी असो किंवा त्या मधला आपला अनुभव म्हणजे त्यातले ज्ञान असणे महत्त्वाचे असते यामते आज सुद्धा त्या महामेरुचा विषय तुमच्या समोर घेऊन येतो आहे. ती व्यक्ती ज्यावेळी आपल्या गावाला तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ते नव्हते की जेणेकरून माध्यमिक शिक्षण घेणे परवडत नसायचे अशा वेळी निघालेल्या सन - १९८० च्या हायस्कुल शाळेची किनार आणि प्रेरणा म्हणजे आपल्या गावाचे *स्व.कै. इनामदार सर* ज्या वेळी समाजातील आजच्या संचालक बॉडीने निर्माण केलेल्या श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ च्या संस्थेची स्थापना करून श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली आणि समाजातील गोर गरीबापासून प्रत्येकाच्या शिक्षणाची महत्वाची पायरी म्हणजे माध्यमिक शिक्षणाचे दारे उघडून सर्वासाठी खुले करून दिले. सुरवातीपासून शाळेच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यापासून शाळेच्या व्यवस्थापन बाबत आणि पटसंख्याचा विषय असो त्यावेळी सरांचे योगदान त्या अर्थी आणि परिस्थितीनुरूप प्रामुख्याने बोधमृत ठरले. ज्याला शिक्षणाची आवड आहे त्याला शाळेत यायला काहीच अडचण नसायची पण ज्याला शिक्षण हवे ज्याला पुढं न्यायचं आहे अशी एखादी व्यक्ती कुटुंबातील शिकली कि त्याचा परिणाम सुधारणा या संकल्पनेत होतो हे जाणकार असलेले इनामदार सरांनी सर आपल्या स्वखर्च - श्रमातून कर्मचारी करवे त्या पाल्याला घरातून आणून शिक्षणाची गोडी आणि आवड निर्माण करण्याचे काम केले म्हणजे तूर्तास काळातले ते आपल्या गावासाठी शाहू-फुले- आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराचे वारसदार म्हणून लाभले. त्या महापुरुषांच्या स्मरणात शिक्षण आणि समाज आणि यातला दुवा बनण्याचे काम सरांनी केले. सरांच्या पंक्तीत शिकलेली मुलं आज शिस्त आणि समाजाच्या एका उंचीच्या पायरीवर कार्यरत आहेत आणि याचा त्यांना सरांचा सार्थ अभिमान आहे. श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे - श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुल या शाळेवर काम करत असताना एक शिस्त व कडक मुख्याध्यापकाच्या रुपात सरांनी काम केलं काम यापेक्षा शाळेच्या नावाप्रमाणे हनुमान बनून भक्कम कार्यप्रणाली राबवली. त्यांच्या अंगीकृत असलेल्या शिस्तीच्या धड्यांची सर्वामध्ये भिस्त असायची. आणि आज त्याची पावती देणारी इतिहासात्मक चित्रण म्हणजे सरांच्या आणि संचालकांच्या अथांग परिश्रम तथा संयोजनातून एक विविध उपक्रम आणि सर्व विद्या प्रदान करणारी संस्था म्हणून आज ही शाळा नावारूपाला येत आहे.
आज अनेक शिक्षणाची दुकानदारी उघडून शाळेचा धंदा करताना आपण अनेक संस्था बघतो पण सत्य आणि निस्वार्थ भावनेनं शाळा म्हणजे घर म्हणजे शाळेतील प्रत्येक घटक म्हणजे कुटुंब या पद्धतीने इनामदार सरांनी आपले अनमोल विचार पेरत गेले आणि त्यांनी पेरलेल्या वृक्षाचा वटवृक्ष होताना आज पाहतो आहोत. सरांनी घालून दिलेल्या पायाभरणीचे अनुकरण आज ही होत आहे. आजसुद्धा सरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवत संचालकांच्या अथक परिश्रम आणि सहयोहातून विविध उपक्रम राबवणारी आणि सर्वगुण संपन्न आदर्श नागरिक घडवणारी संस्था म्हणून आजही हि शाळा नावारूपाला येत आहे. आमचे इनामदार सर (मी फक्त १६४ दिवस त्यांच्या निगराणीत शिकलो...)
आमचे इनामदार सर म्हणजे खरे सच्चे आदर्शवत चेहरा त्यांच्या बद्दल हि कविता मी त्यांना अर्पण करतो-
*इनामदार सर म्हणजे*
*शाळाशाळांतून वर्गावर्गातून*
*पिढ्यांचं बांधकाम करणारा चेहरा,*
*शांतपणाने सातत्याने संस्कारांचे चारधाम पेरणारा चेहरा,*
*इनामदार सर म्हणजे देशांच्या सीमांचा अदृश्य एक रक्षक..*
*जीवनाच्या वाटेवर शिस्त आणि शिक्षणाचा डोंगर घेऊन हिंडणारा शिक्षक...*
*कधी शांत तर रौद्र कधी स्थळ काळानुरूप बदलणारा चेहरा..*
*हसमुख कधी प्रेमळ हात पाठीवर तर...*
*ध्येयनिष्ठ अन् जिद्दीचा स्वतंत्र दंडक आपल्या पाठीवर..*
.... असे आमचे इनामदार सर त्यांच्या आठवणीत आमचे डोळे काहीवेळा पाणावतात कारण एखाद्या खऱ्या खुऱ्या आधुनिक जगतातील शिक्षण तद्न्य म्हणून सरांकडे पहिले जाते. या माझ्या गावाच्या प्रत्येक महर्षी आणि बड्या लहान पण स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या विचार आणि आचाराना आपलं केलं आहे. सर ज्या पद्धतीने समाजात उंची म्हणजे काय आणि एक स्वाभिमानी जगणं म्हणजे काय याची शिकवण देणारे ते खरे गुरु होते न माझ्यासाठी किंवा प्रत्येकाच्या बाबतीत.
सराबद्दल मला जास्त लिहता आलं नाही पण प्रमाणिक पणे त्यांच्या सहवासातील १६४ दिवसाच्या प्रवासात मला मिळालेल्या मोटिव्हेशनल गुरु बद्दल दोन शब्द व्यतीत झाले चुकलं असेल क्षमस्व. सरांची विचार सरणी म्हणजे- *"संघर्षाच्या दगडावर रेंगाळत बसू नका, स्वतःला एका चांगल्या जीवनशैलीवर पाहायचे असेल तर नवं विचार किंवा नवं शिक्षण यापेक्षाही जीवन जगण्याची कलात्मक शिस्त आणि नियोजनबद्ध वाटचालीचे वाटसरू व्हा."* अशा भविष्य निर्मिक विचार आजही मनात घर करून आहेत सर आणि सरांची प्रत्येक बोट आणि ओठ सांगायचे कि *"Without Positive Attitude, Success Called Luck, But With Positive Attitude , Success Called Achievement"* अशा विचारांची माणसं देव सुद्धा आपलंसं करून घेतो... सरांनी जो कानमंत्र दिला तो आजही आमच्या प्रत्येकाच्या वाटेला "मॅप/गाईड/दिशादर्शक/त्त्वद्न्य" म्हणून काम करतो आणि आम्हाला हे सर्व जे सरांनी दिले ती खाण घेऊन जाताना आम्ही कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही त्यांच्या या आदर्श जीवनशैलीचे बाळकडू अनुभवताना अजून एक म्हण सरांना साजेशी वाटते ते म्हणजे- *"Dont Believe in Luck, Believe in HARD WORK"*
सर तुमची आठवण आणि विचारांची साठवण आणि तुमची प्रतिमा आजही मनाच्या कोपऱ्यात आधुनिक शिक्षण तज्ञ बनून राज्य करते आहे...!
लेखन- एन.के. उर्फ कल्लू
(पत्रकार नंतर अगोदर सरांचा शिष्य)
मोबा.- ८८०६६०५८५२
जगामध्ये अनेक शिखरे पादाक्रांत केलेले व्यक्तिमत्वे आपल्या डोळ्यासमोर रोजच तरळत असतात आणि यांची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्याला आशय आणि पाठबळ देणारी गुरु नावाची व्यक्ती, शिक्षणाबरोबर जगण्याची शिकवण देणाऱ्या उमेदरुपी व्यक्ती प्रत्येकाच्या पाठीशी नेहमी कोणी ना कोणी असते आणि ती आपल्या यशाचा खरा कणा म्हणून काम करत असतो. जगामध्ये गुरु शिवाय यश नाही आणि यश प्राप्तीनंतर कौतुकाची थाप घ्यायला हवं असलेलं व्यासपीठ म्हणून प्रत्येकाच्या जीवनशैलीत गुरूला विशेष महत्व आहे.
गाव तस लहान पण शुशिक्षीत माणसाच्या वस्तीतलं माझं २-३ हजाराच्या लोकवस्तीचे गोर-गोमटं गाव आणि आणि या गावातली मोहरे जे विविध पदावर काम करणारी माणसं पाहता आज वळसंगच्या नावाची छाप जगाच्या बरोबरीने म्हटलं तरी कमीचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज माझ्या गावाची माणसं एका विशिष्ट आणि महत्वाच्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या पाठीमागे मन उंचावणारी कथा कथित इतिहास जे एखाद्या कालाटणीने किंवा गुरुदक्षिणाने प्राप्त सुवर्ण अक्षराने लिहलेला इतिहास भावपूर्ण मनाला स्पर्शनारा आहे. आज या लेखनाचे उद्देश आणि गरज कुणाला हवी नको वाटण्यापेक्षा त्याची प्रचिती आणि त्यांच्या आचार विचारांची जपणूक महत्वाची वाटली इतकेच कारण मी सुद्धा गावाचा रहिवाशी आहे आणि समाजाच्या देनेकरी स्वरूपात माझ्या गावाच्या वैचारिक आणि सक्षम पायभारणीचे शिल्पकार म्हणून त्या महान माणसाच्या इतिहास बद्दल चार गोष्टी लिहिण्याची मला संधी मिळावी याला मी माझं धन्य मानेन एक छोटासा प्रयत्न केला आहे कुणाच्या महापुरुषाच्या बद्दल लिहताना किंवा व्यक्तिरेखाटन करत असताना आत्तापर्यंत मला नेहमी प्रेरणात्मक चालना मिळाली.
आज सामन्यातील सामान्य माणूस एखादा चुका करत असेल तर त्याला पहिली चपराक म्हणजे अडाणी असल्याचा आपण देतो आणि सोबतच हेच शिकलास शाळेत का अशी बोचक टीका केली जाते म्हणजे नक्कीच कोणत्याही गोष्टीतील शिक्षण हे त्या निगडित गोष्टीशी असो किंवा त्या मधला आपला अनुभव म्हणजे त्यातले ज्ञान असणे महत्त्वाचे असते यामते आज सुद्धा त्या महामेरुचा विषय तुमच्या समोर घेऊन येतो आहे. ती व्यक्ती ज्यावेळी आपल्या गावाला तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ते नव्हते की जेणेकरून माध्यमिक शिक्षण घेणे परवडत नसायचे अशा वेळी निघालेल्या सन - १९८० च्या हायस्कुल शाळेची किनार आणि प्रेरणा म्हणजे आपल्या गावाचे *स्व.कै. इनामदार सर* ज्या वेळी समाजातील आजच्या संचालक बॉडीने निर्माण केलेल्या श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ च्या संस्थेची स्थापना करून श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली आणि समाजातील गोर गरीबापासून प्रत्येकाच्या शिक्षणाची महत्वाची पायरी म्हणजे माध्यमिक शिक्षणाचे दारे उघडून सर्वासाठी खुले करून दिले. सुरवातीपासून शाळेच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यापासून शाळेच्या व्यवस्थापन बाबत आणि पटसंख्याचा विषय असो त्यावेळी सरांचे योगदान त्या अर्थी आणि परिस्थितीनुरूप प्रामुख्याने बोधमृत ठरले. ज्याला शिक्षणाची आवड आहे त्याला शाळेत यायला काहीच अडचण नसायची पण ज्याला शिक्षण हवे ज्याला पुढं न्यायचं आहे अशी एखादी व्यक्ती कुटुंबातील शिकली कि त्याचा परिणाम सुधारणा या संकल्पनेत होतो हे जाणकार असलेले इनामदार सरांनी सर आपल्या स्वखर्च - श्रमातून कर्मचारी करवे त्या पाल्याला घरातून आणून शिक्षणाची गोडी आणि आवड निर्माण करण्याचे काम केले म्हणजे तूर्तास काळातले ते आपल्या गावासाठी शाहू-फुले- आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराचे वारसदार म्हणून लाभले. त्या महापुरुषांच्या स्मरणात शिक्षण आणि समाज आणि यातला दुवा बनण्याचे काम सरांनी केले. सरांच्या पंक्तीत शिकलेली मुलं आज शिस्त आणि समाजाच्या एका उंचीच्या पायरीवर कार्यरत आहेत आणि याचा त्यांना सरांचा सार्थ अभिमान आहे. श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे - श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कुल या शाळेवर काम करत असताना एक शिस्त व कडक मुख्याध्यापकाच्या रुपात सरांनी काम केलं काम यापेक्षा शाळेच्या नावाप्रमाणे हनुमान बनून भक्कम कार्यप्रणाली राबवली. त्यांच्या अंगीकृत असलेल्या शिस्तीच्या धड्यांची सर्वामध्ये भिस्त असायची. आणि आज त्याची पावती देणारी इतिहासात्मक चित्रण म्हणजे सरांच्या आणि संचालकांच्या अथांग परिश्रम तथा संयोजनातून एक विविध उपक्रम आणि सर्व विद्या प्रदान करणारी संस्था म्हणून आज ही शाळा नावारूपाला येत आहे.
आज अनेक शिक्षणाची दुकानदारी उघडून शाळेचा धंदा करताना आपण अनेक संस्था बघतो पण सत्य आणि निस्वार्थ भावनेनं शाळा म्हणजे घर म्हणजे शाळेतील प्रत्येक घटक म्हणजे कुटुंब या पद्धतीने इनामदार सरांनी आपले अनमोल विचार पेरत गेले आणि त्यांनी पेरलेल्या वृक्षाचा वटवृक्ष होताना आज पाहतो आहोत. सरांनी घालून दिलेल्या पायाभरणीचे अनुकरण आज ही होत आहे. आजसुद्धा सरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवत संचालकांच्या अथक परिश्रम आणि सहयोहातून विविध उपक्रम राबवणारी आणि सर्वगुण संपन्न आदर्श नागरिक घडवणारी संस्था म्हणून आजही हि शाळा नावारूपाला येत आहे. आमचे इनामदार सर (मी फक्त १६४ दिवस त्यांच्या निगराणीत शिकलो...)
आमचे इनामदार सर म्हणजे खरे सच्चे आदर्शवत चेहरा त्यांच्या बद्दल हि कविता मी त्यांना अर्पण करतो-
*इनामदार सर म्हणजे*
*शाळाशाळांतून वर्गावर्गातून*
*पिढ्यांचं बांधकाम करणारा चेहरा,*
*शांतपणाने सातत्याने संस्कारांचे चारधाम पेरणारा चेहरा,*
*इनामदार सर म्हणजे देशांच्या सीमांचा अदृश्य एक रक्षक..*
*जीवनाच्या वाटेवर शिस्त आणि शिक्षणाचा डोंगर घेऊन हिंडणारा शिक्षक...*
*कधी शांत तर रौद्र कधी स्थळ काळानुरूप बदलणारा चेहरा..*
*हसमुख कधी प्रेमळ हात पाठीवर तर...*
*ध्येयनिष्ठ अन् जिद्दीचा स्वतंत्र दंडक आपल्या पाठीवर..*
.... असे आमचे इनामदार सर त्यांच्या आठवणीत आमचे डोळे काहीवेळा पाणावतात कारण एखाद्या खऱ्या खुऱ्या आधुनिक जगतातील शिक्षण तद्न्य म्हणून सरांकडे पहिले जाते. या माझ्या गावाच्या प्रत्येक महर्षी आणि बड्या लहान पण स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या विचार आणि आचाराना आपलं केलं आहे. सर ज्या पद्धतीने समाजात उंची म्हणजे काय आणि एक स्वाभिमानी जगणं म्हणजे काय याची शिकवण देणारे ते खरे गुरु होते न माझ्यासाठी किंवा प्रत्येकाच्या बाबतीत.
सराबद्दल मला जास्त लिहता आलं नाही पण प्रमाणिक पणे त्यांच्या सहवासातील १६४ दिवसाच्या प्रवासात मला मिळालेल्या मोटिव्हेशनल गुरु बद्दल दोन शब्द व्यतीत झाले चुकलं असेल क्षमस्व. सरांची विचार सरणी म्हणजे- *"संघर्षाच्या दगडावर रेंगाळत बसू नका, स्वतःला एका चांगल्या जीवनशैलीवर पाहायचे असेल तर नवं विचार किंवा नवं शिक्षण यापेक्षाही जीवन जगण्याची कलात्मक शिस्त आणि नियोजनबद्ध वाटचालीचे वाटसरू व्हा."* अशा भविष्य निर्मिक विचार आजही मनात घर करून आहेत सर आणि सरांची प्रत्येक बोट आणि ओठ सांगायचे कि *"Without Positive Attitude, Success Called Luck, But With Positive Attitude , Success Called Achievement"* अशा विचारांची माणसं देव सुद्धा आपलंसं करून घेतो... सरांनी जो कानमंत्र दिला तो आजही आमच्या प्रत्येकाच्या वाटेला "मॅप/गाईड/दिशादर्शक/त्त्वद्न्य" म्हणून काम करतो आणि आम्हाला हे सर्व जे सरांनी दिले ती खाण घेऊन जाताना आम्ही कधी नशिबावर विश्वास ठेवला नाही त्यांच्या या आदर्श जीवनशैलीचे बाळकडू अनुभवताना अजून एक म्हण सरांना साजेशी वाटते ते म्हणजे- *"Dont Believe in Luck, Believe in HARD WORK"*
सर तुमची आठवण आणि विचारांची साठवण आणि तुमची प्रतिमा आजही मनाच्या कोपऱ्यात आधुनिक शिक्षण तज्ञ बनून राज्य करते आहे...!
लेखन- एन.के. उर्फ कल्लू
(पत्रकार नंतर अगोदर सरांचा शिष्य)
मोबा.- ८८०६६०५८५२
No comments:
Post a Comment