Friday, 30 March 2018

महिला दिन बद्दल एन के यांचं लेखन...

【 महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सत्य परिस्थिती वरील लेखांकन】

*आजची महिला : मनी सावित्रीबाईचे विचार; संसारात गुरफटले आचार ; कसा होईल समाजाचा उद्धार...?*

लेखन :- *एन.के. - पत्रकार (दै.संकेत टाइम्स)*
दिनांक:- *१३ मार्च २०१८*

आम्हाला जगायचं आहे म्हणून देव देवतांची पूजा, कुटुंब जगला पाहिजे म्हणून साकडं, आणि विविध उपवासाची माळ घेऊन आजची आधुनिक माता-भगिनी जगात वावरताना दिसतात. आधुनिक आणि शिक्षण परीपक्व कुटुंबाच्या ऊंबरठ्यातून जगाच्या पाठीवर सक्षम आणि एक शिक्षित व समाजाच्या उंचवट्याला हातभार लावणाऱ्या स्त्री बाहेर पडतात पण ते हि किंचित. कधी कधी आपण एखाद्या महत्वाच्या घराच्या निर्णयात सुद्धा अनपेक्षितपणे महिला वर्गाला लांब ठेवतो आठवून बघा. सत्य आणि असत्याचा बाजूत नेहमी दुय्यम म्हणून माहिलाना पाहणारे आपण महिला दिनाला मात्र हिरो-हिरोईनच्या फोटो ऐवजी आई-बहिणीच्या फोटोला ठेवत स्वतःला धन्य समाजणाऱ्याला परमात्माचं सुधारू शकेल. आपण लाख म्हणतो की आज स्त्रियांच्या परिस्थित खूप सुधार झाला. त्या खाद्यांला खाद्या देऊन चालतात. पण खरं बघायला गेलं तर हे फक्त एक वर्ग विशेषपर्यंत मर्यादित आहे. परिस्थित बदली आहे आणि बदलत आहे यात शंकाच नाही पण खूप काही गमण्याआधी ती बदलली पाहिजे.
स्त्रियांना पुढे वाढण्यासाठी वाव द्या याचा अर्थ असा नाही की त्यांना पुरुषांपुढे जाण्याची लालूस आहे. पण किमान समान पातळीवर तरी येऊ द्या. शारीरिक रूपाने ती पुरुषांची बरोबरी करू शकत नाही हे स्त्रीचं वैशिष्ट्ये झालं. केवळ या गोष्टीमुळे पुरुषाने तिच्यावर हक्क गाजवावा असं होत नाही. यासाठी आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक गणिक टप्प्यावर किंवा यशस्वी टप्प्यावर स्वतःला घडवताना लहानपणच्या अशा काही भूतकाळाच्या गोष्टी आठवून बघा कधी तरी शांत डोक्यात आणि जग जिंकण्याची उदात्त स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यात कधी तरी महिलांच्या रुपात मार्गदर्शक किंवा शिक्षक किंवा कधी वाटाड्या कधी मैत्रीण बनून उभं ठाकलेल्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि महिलांच्या भूतकाळ बद्दल जास्त लिहिता आलं नाही पण आज समाज घडवण्यासाठी योगदान ठरलेल्या थोर महिला वर्गाचा उल्लेख समजावून घेताना जरासं इतिहास स्पष्ट होतो. फार पूर्वी स्त्रियानी फ़क्त चुल अणि मूल बघायचे आणि पुरुषानी प्रपंच चालवायचा हा अलिखित नियम होता. स्त्रिया फ़क्त उत्सव अणि समारंभ या निमित्तानेच घराबाहेर पडायच्या. त्या वेळीही गार्गी अणि मैत्रेयि सारख्या उच्च शिक्षित स्त्रिया होत्या... पण फारच कमी. पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले यानि स्त्री शिक्षणाची दालने योग्य अर्थाने खुली केलि.
त्यानंतर स्त्रियानी मागे बघितलेच नाही। प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहेत। अगदी अवकशापर्यंत पोचलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स , समाजसेविका मेधा पाटकर , डॉ.रानी बंग , पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या इंदिरा गाँधी , पुलिस क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या किरण बेदी ..... एक नव्हे तर कितीतरी नावे आपल्यासाठी आदर्शवत आहेत। आपले राष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। पण तितक्याच महान आहेत त्या राजमाता जिजाबाई... मनावरील संस्कार, त्याग, चातुर्य , बुद्धिमत्ता, वीरता , सामाजिक बांधिलकी या सर्व गुणांची देण त्यानी शिवरायाना सुपूर्त केलि। त्यानी शिवाजी महाराजाना घडविले , म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले.
घराची गरज पूर्ण करण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेर पडलेली स्त्री, करियर च्या कधी मागे लागली , ते समजलेच नाहीं... पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना , कदाचित आजच्या स्त्रीला याचा विसर पडतो आहे...की तिची सर्वात मोठी करियर म्हणजे चांगली पीढ़ी निर्माण करणे.... हे काम करण्यासाठी लागणारी त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण जेवढी स्त्री कड़े आहे तेवढी पुरूषाकडे नाही। आपल्या मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून सुजाण नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा राष्ट्रकार्याला मदतच आहे। मुलांचा सर्वांगीण विकास करणे ही आज कालाची गरज आहे। उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण , उत्तम संस्कार याचबरोबर सामाजिक बन्धिलाकिची जाणीव आजच्या पिढीत निर्माण करणे आज गरजेचे आहे.
आज महिलांना ५०% आरक्षण बरोबर समान वागणुकीचे जाहिरात तर रोजच पाहतो पण ते पाहत असताना रोज होणाऱ्या बलात्काराला सुद्धा प्रश्न पडतो की कुठं आहे संरक्षण कुठं आहे अभय... पण स्वतः ८ मार्चला धडाधड भाषण देऊन एक सक्षम आणि निडर महिलांची प्रचिती न देता स्वतःच्या संरक्षण आणि स्वतःच्या हिमतीचे शक्तिप्रदर्शन वेळोवेळी हवेच... सामान्यतः एखाद्या महिला किंवा मुलीच्या मनातला प्रश्न -

" तू एक मुलगी आहेस
हे तू विसरू नकोस
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे
तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे
तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा गल्ली-बोळातून जाशील
लोक तुझा पाठलाग करतील,
शिट्याही वाजवतील
तू जेव्हा गल्ली पार करून
मुख्य रस्त्यावर पोहचशील
लोक तुला चरित्रहीन म्हणून शिव्याही देतील
जर तू निर्जीव असशील
तर परत फिरशील नाहीतर
जशी जात आहेस तशीच चालत राहशील....!"

असंच पुढं जाऊन शिक्षित समाजात महिला न महत्व जगापुढं व्यतीत करायचं असेल तर शस्त्र आणि सन्मानाने जगण्याचे अस्त्र आता उचलणे गरजेचे आहे. संकलित माहिती आहे थोडीशी आज आपण महिला दिनाच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमाला हजेरी लावून आलेले कोणीतरी असणार किंवा कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पण ही जागतिक महिला दिनाच्या रूढ परंपरा काय आहे- अमेरिकेमध्ये एका उद्योग क्षेत्रात काम करणार्यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय आणि शोषणाविरुद्ध सण १९१० च्या इसवीत संघटित होऊन न्याय हक्कासाठी एक होऊन रस्त्यावर उतरले आणि ती तारीख होती ८ मार्च तेव्हा पासून ८ मार्च महिला दिन म्हणून रूढ झाला. आणि या संघटनेतून विजयी नारा म्हणून तात्पर्य मिळालं यातून अनेक जगभरातील महिलांना प्रेरणा म्हणून ठरलेली हि एकजूट. आज महिला दिन म्हणून आपल्या सर्वांच्या वाट्याला दरवर्षी येते. सामान्यतः लिहताना न एका ठिकाणी वाचायला मिळालं हे महिला दिनाला होऊन ७-८ दिवस झाले न सहज वाचत असताना हि माहिती मिळाली. एका माझ्या गावातल्याच शाळेत मला महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवता आली. आणि तिथं अनेक अनोळखी महिला वर्गानी अगदी पाठांतर प्रमाणे भाषण केले न वाटलं की खरंच इतकं धाडस आपण या चार चौकटीत करतो तसेच बाहेर हि करायला हवं सक्षम आणि निर्भीड जीवनाचे सार आत्मसात करण गरजेचं आहे. महिला दिन सुद्धा शोषणाविरुध्द व अन्यायाविरुद्ध संघटित झाल्यावरच प्रथा पडली म्हणजे महिला साठीचा दिवस सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी घालवलेला इतिहास घेऊनच पुढं येतो न हे बदलायचे असेल तर परंपरा आणि जाचक बंधने यावर आकलन करत पुरुषाच्या बरोबरीनं जगण्याची सूत्र हाती घेतल्याशिवाय हे शक्य नाही. महिला बद्दल लिहीत असताना सत्य परिस्थितीचे चित्रण काही यशस्वी पदावर काम करणार्यांना थोडस अवचित वाटेलही पण एक प्रयत्न म्हणून करून बघा आज तुम्ही एक मुख्यमंत्री असला तरी सुद्धा शेजारच्या महिलेला एखाद्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ आणू शकत नाही म्हणजेच बंधन, संसार आणि प्रपंच यातून मुक्त करणे आज एका महिलेला अवघड आहे आणि यासाठी नमूद करावे वाटते की आपण जी महिला समाजाच्या धार्मिक आणि संसारिक विळख्यात आहे तिला त्यातून मोकळा स्वास् देत सामाजिक गोष्टीत तिला रुची असेल तर स्वातंत्र्य द्या आणि नसेल तर निर्माण करायला शिका कारण आजची सावित्री उद्याची नेल्सन मंडेला, किरण बेदीची निर्माती असणार आहे.

No comments:

Post a Comment