Friday, 30 March 2018

शेतकरी : जगाचा सर्वेसर्वा, पोशिंदा

जगाच्या पोशिंद्याच्या पायावरचे फोड आता असह्य ; कधी कळणार रे शासना तुला आता तरी जाण रे...!

【शेतकरी विषयी आत्मीयता असणाऱ्या आणि शेतकरी बांधवाने वाचावे असे... जगाच्या पोशिंद्या बद्दल २ शब्द लिहण्याचा माझा प्रयत्न...】

लेखन :- एन.के. ( पत्रकार)

दि. २२ मार्च २०१८

कृषी प्रधान देश माझा भारत देश माझा साऱ्या भारतीयांवर माझा अभिमान आहे सारे माझे बांधव आहेत या सगळ्या गोष्टींना आत्मसात करण्याचं दालन म्हणून शाळेच्या पटांगणात अगोदरच शिकून घेतलं. जय जवान आणि जय किसान च्या घोषणा पण देऊन झाल्या आहेत. समाजात आज एखाद्या गावाच्या किंवा देशाच्या % वारीचा आकडा काढला तर ६० पेक्षा जास्त टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. आपल्या कुटुंबाची खळगी भरायची असेल तर बळीराजाने शेतात घाम गाळून पिकवलेल्या सोन्यापासून आज आपण भोजन म्हणून आत्मा थंड करवून घेतो. माझा बळीराजा आज शेतीच्या एका टप्प्यावर शासन सोबत फुगडी घालत आहे त्याच्या व्यथा न प्रश्न फक्त एक मीडिया वरील माफिया म्हणून घेणं कितपत योग्य...? आज सामान्यतः शेतकरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जो उठाठेव करत आहे त्याकडे जाणून बुजून म्हणावे कि जगाच्या पोशिंद्यासाठी असा कोणता कायदा, नियम किंवा अटी नाहीत की ज्यानं काळ्या मातीत घामाचे शरीर घेऊन रक्त आटवत तुमच्या बाजार पेठा फुलवायच्या तुमच्या १०० रु मध्ये पिशव्या भरायच्या आणि मागण्या साठी बळीराजा पुढं दिसला की दातखिळी बसल्यागत आव आणत बसायचं....? काय असतात वो मागण्या माझ्या बळीराजाचे माझे शेतकरी राजे काय मागतात वो शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा मालाला भाव. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी कधीच रस्त्यावर उतरत नाही. आंदोलन करत नाही. ज्यामुळे सरकारी व्यवस्था कोलमडेल. जर तसा प्रयत्न झालाच कधी तर पोलिसांचा लाठीमार त्यांना सहन करावा लागतो. आमच्या जनावरांसाठी चारा द्या आणि आमच्या लोखंडाच्या हाताला निदान काही काम द्या. एवढेच मागणे असते त्यांचे. पण सरकार तेही देऊ शकत नाही. शेती म्हणजे उदरनिर्वाहाचे निव्वळ साधन नाही तर ती राष्ट्राची सेवा आहे. या राष्ट्राच्या सेवेला आज आपण ज्या कल्पक बुद्धीतून बघतो प्रत्येक समाजाला मागण्या मान्य करण्यासाठी शासनाचा विहित जी आर निघतो माझ्या बळीराजाचा जी आर कधी येणार या रंगबदलू निसर्गाच्या कुशीत काही तरी हिरवी असावी माझी पृथ्वी माय सुंदर दिसते ते बळीराजामुळं मग त्या मायच्या सुंदरतेची काळजी म्हणून आणि जर पोटाच्या चिमट्याला कमी कातडं यावं म्हणून उदरनिर्वाहासाठी पिकवण्यासाठी घेतलेल्या कर्जाला माफ करण्यासाठी तुम्हाला इतके दिवस लागतात...? इतकं अभ्यास करून एखादा कृषीमंत्री झाला असता. अरे ४ रुपडं तर माफ करायचं आहे ना करा ना मग प्यायला मिळेना म्हणून दारू बंद करून पुन्हा चालू करता येते... तर हे कर्ज का माफ करता येत नाही...? शेतकऱ्याच्या समस्या आणि मोर्चे यातून सरकारच्या कानाला ओढायच आणि आपल्या मागण्याचा कोण तर वाली मिळेल या अशे पोटी हा मायबाप अनवाणी मिळेल त्या सोयीने तिथं पोहचून आपल्या उपस्थितीत मॉब दाखवून आपल्या सहजनांच्या समस्यांचे बळ वाढले पाहिजेत म्हणून ही जीवाची तळमळ पाहवत नाही. पायाला फोड आणि घशाला कोरड पडली तरी कुणाला काहीच पडलं नाही निसर्गाच्या विसंगत वागणुकीचे पडसाद झेलत आज शेती करताना अक्षरश कसरत करतो माझा बळीराजा. डिजिटल इंडियाच्या नावाखाली अनेक कोट्यवधी रुपयांचे योजना राबवताना काही टक्केवारी शेतकऱ्यांच्या पदरात द्यायला हवं ना. अरे ज्या बळीराजाच्या जीवावर संध्याकाळी आपल्या अर्धांगिनी सोबत हातच न घरच म्हणून खादी शर्टाच्या आतली छाती फुगवून रुबाबात खात असतोस तेव्हा खाताना कोण पिकवला न कोण आणलं त्या बरोबर कुठून येत हे ओळखून तरी तुझ्या हापिसात आल्यावर तुझ्या उंबर्यावर घेऊन आलेल्या मागण्याचा झोळीत आणि निर्माण झालेल्या बळीराजाच्या वेदनेला मलम आणि आकांताला शांततेची गोळी द्यायची कस रे विसरून जातोस...? काय असत रे बळीराजकड शेतात पिकणारे धान्य हे एकच एक शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहात असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने अवसान व मनोधैर्य खचू लागते. आणि खचलेल्या या अवस्थेत मोर्चा आणि मोर्च्यावर पण तुम्ही शिंतवंडे उडवत आपल्या बेताल जिभेवर सपाटा लावता तेव्हा माझ्याच मातीत मला दिलेली वागणूक यावर कटाक्ष टाकून हताश झालेला माझा बरीराज बंधावरचा लिंबाच्या झाडाला आपलं करून घेतो आणि आणि ढवळ्याला बांधलेल्या दोऱ्याची सांगत मानेसोबत करून आपली जीवन यात्रा संपवतो. या जीवनाच्या यात्रेत माझा बाप आज हरला म्हणून म्हणून कुटुंबाच्या जाबाबदारीला छातीला कवटाळून बसतो आणि यात पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात तरुण वर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे व उपासमारीला कंटाळल्यामुळे ग्रामीण भागातील लोक डाके, चोरी, खिसे कापू, भुरटय़ा चोऱ्या असे प्रकार करण्यास सुरुवात करतात. चोरी-लूटमारीच्या भीतीमुळे एकटी बाई शेतावर जायला घाबरते. सर्वत्र अफवा पसरतात. त्यामुळे जिवाच्या आकांताने जरी कोणी ओरडले तरी कोणीही मदतीसाठी धावून येत नाही. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते. गावातील सर्व जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वात जास्त हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात. अशा परिस्थितीला सामोरे जाणारा एकमेव म्हणजे तो बाहुबलीच पाहिजे इतक्या पातळीच जनजीवन असत याच चित्रण एखाद्या तरी नेत्याला असेल ना...? आणि या असलेल्या जाणिवांचा पुतळा म्हणून एखादा तरी नेता पुढं येऊन सरकारच्या कानात कुजबुज करून बरीराज्याच्या प्रश्नांना कधी तर उत्तर बनावं ना...? कधी तरी वरूनराजाची कृपा होते न यंदा चांगला पाऊस झाला म्हणून आनंदाच्या भारत रात्रीचे दिवस करत डोळ्यात तेल घालून पिकवलेल्या शेतमालाला मार्केट मध्ये नेतो हा बळीराजा पण तिथं या हमीभावाच्या नावानं कीर्तन चालू आहे हे नंतर कळत आणि घरापासून ४-५ दिवसाच्या मुक्कामात शेतीमाल १०० चा असतो तो दिसण्यावरून ५०-६० च्या किमतीचा होतो. आणि यात जर अपयशी ठरते तर मागण्या सुद्धा मान्य करताना हाक शासना पर्यंत पोहचून देखील कानात काडी घटल्यासारख्या घटना बघून अक्षरशः माझ्या बळीराजाच पीक हे वाहनांच्या चाकाचा साथीदार होतो इतकं विदारक परिस्थिती मधून मुक्त कधी होणार बळीराजा....? कधी त्याला न्याय मिळणार...? कधी लाल मोर्चा ऐवजी पायातुन निघालेल्या रक्ताचे थेंब दिसणार...? आज सुद्धा शेतीमालाला कधीही मूलभूत हमीभाव नसतो. एकूण उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. जर शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. राजकीय नेते आणि सरकार या दोघांच्या जाळ्यात शेतकरी नेहमी भरडला जातो. बी, बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील त्याची कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. हे सर्व करण्यात राजकारणी लोकांचा हात असतो.
वरूनराजाची कृपादृष्टी कधी न कसं होईल यात पिकाला पोषक आहे कि घातक या द्विबाजू डोळ्यासमोर घेऊन जगणारा पोशिंदा कायम निसर्गाच्या हातात टांगती तलवार देऊन हिंडत असतो. आणि वर सरकारचे हे लोचले... सांगा ना कसा जगणार हा पोशिंदा...?
पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण असतो. बरं साठवलेलं पाणी शेतासाठी वापरले तर पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून? सलग काही दिवस पाऊस पडला नाही तर सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केल्यास काही विशेष सवलती मिळू शकतील एवढी एकच आशा उरते. जसे की अन्नधान्य, रॉकेल कमी दराने मिळेल. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळेल इत्यादी. प्रत्येकाची समस्या निराळी, त्या सर्वाचे निवारण सरकार वैयक्तिक पातळीवर करू शकत नाही.
मध्ये पोस्ट वाचायला मिळाली शक्यतो सत्य होत न तेही १००% त्यामध्ये तलाठी, सरकारी कर्मचारी, बँक वाल्याला किंवा कोणत्याही क्षेत्रात शेतकऱ्यांकडून एक प्रकारची आर्थिक लूट चालू आहे शासकीय योजना असुद्या किंवा कोणत्याही प्रकारचं प्रकरण असुद्या शेतकऱ्यांकडून ४ पैक मिळतील या आशेपोटी पाहणाऱ्याला देवचं सुधारू शकतो हेच सत्य. आज जगाच्या पोशिंद्याला पाहताना विरोधी पक्षाला वाटते आपली सत्ता आनायची आसल तर शेतकरीच महत्वाचा..आणि कधी कधी हे मोर्चे आणि आंदोलने बघून वाटत कि शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी कमी झाला की देशातील सर्व समस्या संपतील म्हणून पहीले यांना संपवा देश आपोआप सुधारेल... अशा अनेक क्षेत्रात माझ्या बळीराजाचे हात दगडाखाली आहेत न अशा परिस्थितीत बघणाऱ्याला गॉड वाटणाऱ्याला चपराक कधी बसेल देव जाणे असं अनेक ठिकाणी अजुन कुणाचे काही राहीले असतील तर हिसाब न देता काढुन घ्या कारण माझा देश कृषीप्रधान आहे....मीच राजा आणि मीच प्रधान मग दोष कुणाला...? असंच यु-ट्युब वर एक कविता ऐकायला मिळाली -

काळ्या मातीतून कोंब फुटलं आणि पीक मोठं झालं त्याला डौलदार पीक म्हणतात, 
आज दोन वेळचे पोट हि भरू शकत नाही त्या माझ्या बळीराजाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात..! 

झाड मोठं झालं की त्याला फुटणाऱ्या पानांना फांद्या म्हणतात,
माझ्या बळीराजाच्या आर्थिक संकटाच्या कारणाला नोटबंदी म्हणतात..!

न आक्रोश करता मिळणाऱ्या बक्षिसाला सातवा वेतन आयोग म्हणतात,
आक्रोश, आत्महत्या करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला कर्जमाफी म्हणतात..!

काही गोष्टी सांगितल्यावर वळतात तर वळत नाहीत ह्याला आपल्यातलीच कमतरता म्हणतात,
ज्यांना GST चा अर्थ काळाला त्यांना तोटा आणि ज्यांना कळालं नाही ते आपल्या सारखं Good Night Sweet Dream Take Care म्हणतात. 

भारतीय तिर्थक्षेत्रांना वाराणसी,पंढरपूर, काशी म्हणतात,
ज्या बळीराजात आम्ही विठ्ठल पाहतो तो मारतो त्याला फाशी म्हणतात..!

माणूस माणसाला जागणं त्याला माणुसकी म्हणतात,
आमचा बळीराजा आज त्याच्या मुलीच्या कन्यादानापर्यंतही टिकत नाही त्याला त्याचंच दुर्दैव म्हणतात..!

हक्क मागण्यासाठी फुटलेल्या वाचेला गर्जना म्हणतात,
मागून मागून थकला पण त्याच्या पर्यंत न पोचलेल्या गोष्टीला योजना म्हणतात..! 

आपल्या माणसाकडून काही मिळणं त्याला अपेक्षा म्हणतात,
जगाच्या पोशिंद्याला आज लोकं "साले" ही म्हणतात..!

देशात राहणाऱ्या प्रत्येकाला भारतीय म्हणतात,
खऱ्या आयुष्यात आत्महत्या करणाऱ्या माझ्या बळीराजाला आज जाहिरातीतील "लाभार्थी" म्हणतात..! 

एक मुलगी चिडून आपल्या आईला विचारते सरकारी नोकर पेक्षा माझा शेतकरी बापच मरतो याला काय म्हणतात...?",
त्यावर आई म्हणाली "सरकारी नोकराला सरकार पोसतो आणि सरकारला तुझा बाप पोसतो त्याला तुझ्या बापाचीच चूक म्हणतात...!"

एक मुलगी लहान असताना म्हणजे बाप मिळतो का बाप असा आक्रोश करू लागते त्याला बापाची भूक म्हणतात,
आई म्हणते- *"अग पोरी तुला बाप मिळेल,मला नवरा मिळेल, घराला कर्ता पुरुष मिळेल, पण जगाला पोशिंदा मिळणार नाही ह्याला आजची वास्तवाची परिस्थिती म्हणतात...!"*

*"इतकं सगळं असून ही सुख आणि दुःखात डरकाळी फोडणाऱ्या प्राण्याला ढाण्या वाघ म्हणतात.."*
*"वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या शिवाजी आणि संभाजी सारख्यांच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माझ्या बळीराजाच्या कष्टाला बघून सुद्धा त्याला आजही जगाचा पोशिंदा म्हणतात...जगाचा पोशिंदा म्हणतात...!"*

खूप काही त्याच्या बद्दल लिहायचं होत पण आज बळीराजाच्या गळ्याला लागलेली ती कोरड आणि सरकारच्या लाभार्थींची हिरवळ याची सांगड कधी बसते यापेक्षा पायाला आलेल्या फोडाला आणि केलेल्या मोर्चाला आज हे सरकार "कुठे होते शेतकरी" असा सवाल करत आहे. जगाच्या पोशिंदा इतिहास जमा व्हायच्या आधी त्याच्या आवाजाला आपण सर्वांनी आपल्या परीने आदर सन्मान पेक्षा त्याच्या हक्काच्या हाकेला साद देणं तितकंच गरजेचं आहे. 

तरीही त्याच्या आदर साठी *"जय जवान, जय किसान"*

धन्यवाद...! 

No comments:

Post a Comment