Sunday, 29 April 2018

कविता : प्रेम हे असंच असत !

शिर्षक :- प्रेम हे असंच असत...मनाला वेड लावून बसतं..!

लेखन- एन.के. ( पत्रकार )

दि. २९ एप्रिल २०१८

प्रेम हे असंच असत हवं ते मिळायला इथं कसरत
लागणार,
पण जितकं जवळ असावं तितकंच लांब असलेले प्रेम विरहाच्या प्रवाहात धावणार,
प्रेम करता करता मनापासून अनेक गोष्टी एकटं करवून बसतो,
पण मनाच्या आतल्या भावना प्लस प्रेम मात्र आपण नेहमीच हरवून बसतो...!

असच असते हे प्रेम
कुणाच्या तरी आठवणी जपणार
कुणाची तरी स्वप्न दाखवणार ,
कुणाच्या तरी भावनांना श्वासात रोखणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
डोळ्याची मुकी भाषा समजणार
कुणाच्या तरी मनातील मधुरस चाखणार
कुणाला तरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
प्रत्येक श्वास घेताना कुणाचे तरी नाव घेणार .
कुणाच्या तरी भेटीची अनामिक ओढ लावणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
कुणाशी तरी सतत भांडणार
कुणाला तरी रातभर रडवणार
कुणाशी तरी भांडून रडऊन झाले कि हळूच मिठीत घेणार ,
असच असते हे प्रेम

असच असते हे प्रेम
काही दिवस विरह सहन करायाल लावणार .
डोळ्यात आलेल्या अश्रुना स्वताच समजावणार
ती कधी भेटेल याची वाट पाहायला लावणार .
असच असते हे प्रेम....!

कुणाला प्रेमाची कदर असो ना असो त्या त्या मनाला असते हे सत्य,
पण जीवनात स्वप्न १०० पण पूर्ण होण्याची पाहिलेली स्वप्न मात्र असत्य,
मग आपल्या शाश्वती प्रमाणे आपल्याला न मिळणाऱ्या या गोडव्याला प्रेम न म्हणता गेम म्हणूया,
पण तरी सुद्धा यात जिंकणारे योद्धा पाहिलं तर त्यांच्या आयुष्याच्या त्या क्षणाला प्रेम म्हणूया...!
धन्यवाद...!

Thursday, 26 April 2018

तुला नाही कळायचं ग प्रेम म्हणजे काय असत...?

शिर्षक - तुला नाही कळायचं ग प्रेम काय असत...!

लेखक - एन.के. पत्रकार

दि. २५/०४/२०१८

खरंच ना आयुष्यात कोण असावं यापेक्षा महत्व त्याच्या असण्याला आज आहे,
पण असलं तर मनाच्या आवडीचा मनकवडा असावं असं सर्वांचं आहे,
आकर्षणाने प्रेम कधीच होत नसत पण जुळायला लागतात हेच त्या अडीच अक्षर बाबत सत्य असत,
पण जरा तू वेडी आहेस तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं..! ...१

आज आणि उद्या गोड बोलून मन वळवायला आज असंख्य असतात,
पण जे खरे असतात काळजी आणि राग राग करतात तेवढेच मनात घर करून बसतात,
आठवत मला अशी संध्याकाळ झालीच नाही की त्यात तुझं आठवण नसत,
पण तू नटखट बुद्धू तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं...! ..२

जवळच्या व्यक्तीवर रागावून प्रेम वाढत रे म्हणणारी तू कधी मनाला विचारलीस का प्रेम करता येत का स्वतःला,
नाही आवडत काही गोष्टी त्यावर मन मोकळं व्यक्त होतेस खरं प्रेमाच्या व्याख्येला भिऊन नाही म्हणता येत का विचार न स्वतःला..,
राग आणि गोडवा भरला आहे तुझ्यात पण न उमजे की तुला मिळवायला कोणतं exercise करायचं असत,
के करू खूप प्रेम+कठोर दिल आहेस म्हणून सांगतो ऎक तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं..! ...३

वाहणाऱ्या वाऱ्याला विचारलं तर त्याने पण तुझं नाव सांगितलं की मला ती खूप आवडते,
मी म्हटलं सोड रे हट्ट करू नको ती माझी आहे तर रागावून वादळ होणारं ते वाऱ्याच प्रेम पण आवडत झालं,
सौन्दर्य जणू ताज महाल जैसी म्हणून आजही डोळ्यात तूझी छबी मुमताज सारख दिसत,
पण मनातला शाहजान वेडा होऊन म्हटला सोड ना तुला नाही कळायचं ग प्रेम काय असतं...! ...४

सुरेख नाव घेऊन प्रेम किंवा सुंदर चेहऱ्यावर प्रेम नाही होत फक्त त्यात आकर्षण होत,
कधी कळणार तुला की तू हिर-रांझा च्या जोडीतली आहेस,
मनापासून तुझ्यावर प्रेम केलं तर तू स्वीकाराशील का हेच खंत मनी कायम असत,
पण राहूदे पागल ग तुला नाही कळायचं ग प्रेम काय असत...! ...

धन्यवाद...!

Thursday, 19 April 2018

Come On Lets Go For Change...! (चला बदल घडवायला..)

शिर्षक:- एका सकारात्मक गोष्टीची सुरवात...लेटस गो फॉर चेंज..!!

लेखन- पत्रकार एन.के.

दि. २०-०४-२०१८

अनेकांच्या काळ्या आणि भगव्या झेंडा किंवा इतर रंगाच्या आणि डीपी ठेऊन झाल्या असतील तर मनापासून आभार मानावे मनातून राग व्यक्त करून हवं ते बरं वाईट बोलून टाकावं. प्रत्येकांनी आपापल्या परीने फक्त व्यक्त व्हावं म्हणून किंवा वाटलं मनाला म्हणून श्रद्धांजली वाहून झाली असेलचं यात शंका नको हो ना... कधी आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक घटना घडतात तेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येकांनी बघ्याची भूमिका घेताना आपल्या चामड्याला जरा चिमटून बघत जावा. प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईटची सुरवातही एका ठिणगीने होत असते. सामाजिक भान ठेवून जगताना समाज काय म्हणेल किंवा समाजात माझी प्रतिमा अप आणि डाऊन होईल का म्हणून प्रेक्षक बनून किती दिवस असं स्वतःला गुदमरून घेणार आहात ...? आवाज काढणे आणि आवाज उठवणे कधी जमणार आहे आपल्याला ? आज प्रत्येक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, अन्याय होत चालल्या आहेत शासन आणि प्रशासन हतबल होत आहे की चक्क प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या नेत्यांच्या हातून असं सावरसावरीच गाठोडं बाहेर निघावं इतकं अक्षम्य कर्तृत्वपुढं आम्ही तर काय करणार म्हणून बांधलेल्या हाताला आपण आपल्या एकजूट आणि ठिणगीतून हळू हळू वणवा कधी बनणार आहोत वो ...? साधारण विचार करताना मी अमुक रंगाचा मी तमुक रंगाचा म्हणून किती दिवस नो इंटर फेअरच्या बोर्ड खाली सापडून मरणार आहोत. विचार करा ना कधी तरी आपण आपल्या परीने योग्य सुटसुटीत विचारधारा घेऊन आसपासच्या सामाजिक भान बिघडवणाऱ्या किंवा संस्कृती लोप पावणाऱ्या कृत्याला आपण आळा घालू शकतो. स्वतः पेटून उठून दुसऱ्याची अन्यायी प्रवृत्ती कधी संपवायला पुढं सरसवणार आहोत..?
आज जगताना आपण अनेक लहान सहान गोष्टीत नाक का खुपसायच म्हणून गप्प बसायचो पण आता सार्वत्रिक घडत असलेल्या मार्मिक गोष्टीवर आपण कॅडल घेऊन उभं राहतो. आणि जेणेकरून कसे का होईना त्या अन्यायाच्या प्रति आपल्यात चीड निर्माण होते आहे म्हणजे एक सुरवात आहे की अपल्यातलं शमलेले मन आणि रक्त आता रुळावर यायला लागली आहे. मग आपण काय करू शकतो अनेकांना प्रश्न पडला असेल नक्की सांगतो सामान्य जीवन जगणारं आपण आहोत समजून चला कि दिल्ली, कोपर्डी नंतर असिफा नंतर आपल्या आस पास कुठं तरी ही घटना आज ना उद्या घडेल का असा भयनाक विचार मनात आणून बघा वाईट वाटत आना चीड येते न... यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल उचलू शकतो.


चित्रपटात आणि इतरत्र स्त्री देहाच हिडीस दर्शन घडविणाऱ्या स्त्रिया आणि संबंधित मंडळी ह्याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे. (मराठी असो वा हिंदी ) आयटम गाणी ह्याचा अर्थ कळतो का ? पुरेसे कपडे न घालता नक्की कुणाच मनोरंजन केल जात ? ज्या समाजाचे ते घटक आहेत त्या समाजाप्रती त्यांची काहीच जबाबदारी नाही का ? जर ती त्यांना कळत नसेल तर त्यांना त्याची जाणीव करून द्या..ज्या स्त्रिया ह्या गोष्टी करतात जे करवून घेतात त्यांना कुठलीच झळ पोहोचत नाही बळी जातात निष्पाप निरागस मुली आया बहिणीची अब्रू आणि नको त्या गोष्टीचे कृत्य आणि जेवढे झाकले पाहिजे अशा वर आपला डोळा वळतो आहे आणि अशा अंगाचा लचका आणि त्यानंतर अमानुष पणे खून त्यानंतर कँडल मौन, निषेध, काळे डीपी ,काळे झेंडे, निदर्शने का पाहिजे असलं ? मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टी या अगोदर संपन्न नव्हती का ? कमाई हा एकमवव उद्देशाने आपल्यावर लादलेल्या या मुन्नी, आणि शिळा आजच्या शिलतेला आणि चारित्र्याचा काळिमा हवं असं नाही वाटत का ? आपण अशा पद्धतीवर बंधन अनु शकतो चित्रपट पाहायचं नाही ज्यात आयटम सॉंग आहे. का विचार बद्लनार नाही ...? शुद्ध चित्रपट आशय घेऊन आला तर नक्कीच १०० तली १० टाळकी सुधारली म्हणजे आपण सफल झालो. निदान आता तरी ज्या मुली ह्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत त्याचं त्याच्या कुटुंबियांच दुखः समजून घ्या. ती मुलगी जितकी असुरक्षित होती तितकीच आपल्या कुटुंबातील स्त्री पण आहे ह्याचा विचार करा...दुसर्याच्या पेटलेल्या घराची झळ आपल्याही घराला बसू शकते...वाढणार्या विकृतींना आळा घाला..! असच घडत चालल्या व गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या त्याचा निषेध प्रत्येक माध्यमाने केला आहे. मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते अशी की ह्या गोष्टीच्या निषेधामध्ये स्त्रियाइतकाच पुरुषांनी दिलेला आपला सहभाग, मत सगळच त्यांच्याविषयी आदर निर्माण करणार आहे मग इथे वयाचा भाग तितकासा महत्वाचा नाही. जे घडत आहे ते चुकीच आहे हे कळण हीच एक चांगल्या समाजाची नांदी आहे. हा एक आशेचा किरण आहे..
निसर्गाच्या प्रत्येक घटकाला सुखाने जगण्याचा हक्क आहे त्याच्या त्या हक्काचा आदर प्रत्येकाने ठेवायला हवा. जग आणि जगू द्या .कुणाच्याही यातनांच कारण होऊ नका. होईल तितका आनंद सुख वाटण्याचा प्रयत्न करा हीच सदिच्छा...! एक चांगला विचार आपल्याला समाज आणि त्यानंतर गाव आणि असं वर्क दिवस चांगला देश म्हणून घडवण्याच्या विचारात आपण आहोत.


धन्यवाद...!

Monday, 9 April 2018

बाबासाहेबांच्या विचारांची गरज...!

शिर्षक :- "बाबासाहेब तुमच्या विचारांची गरज आहे या वेगवेगळ्या रंगाच्या समाजाला...!"

लेखन- पत्रकार एन.के.

दि.१० एप्रिल २०१८

समाज अनेक गोष्टींनी पुढारलेला आहे. समाजात विविध कल्पक आणि आधुनिक समुग्रीच्या माध्यमातून "शॉर्टकट ए जिंदगी" चा फंडा आता फॅशन बनत चालला आहे. समाजात पाहताना अनेक जात,धर्म,पंथ च्या झेंड्याखाली वावरताना आज मनुष्य दिसतो आहे. जगायला लागणार अर्ध भाकरी पेक्षा माझं न आपलं हेच आजच्या जनरेशनला काहीसं महत्वाचं वाटू लागलं आहे. अंधश्रद्धेच्या चितेवरून माणसाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला इतिहासरूपी महापुरुषांनी दिलेल्या मूलमंत्राचा विसर आज समाजाला पडत चालला आहे. ज्या समाजात क्रांतीची मशाल निर्माण झाली त्या समाजात आज महापुरुषांच्या इतिहास आणि शौर्याच्या गाथा आज आम्हाला गळा फाडून सांगाव्या लागतात. इतका समाज शिकला आणि संघर्ष करू लागला तो फक्त आपल्या रोजच्या आणि दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गोष्टींच्या भौतिक सुखाच्या वस्तू किंवा कागद कमावण्याच्या कामात. आजही माझ्या समाजात समान न्याय व्यवस्था असताना सुद्धा बलात्कार करणाऱ्या आरोपीला महिनो न महिने फुकटच बिर्याणी खायला घालणारी आपली न्याय व्यवस्था पाहता आजही लोचारीच बोध झाल्याशिवाय राहत नाही. आणि आजही अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आजही जातीपातीच्या राजकारणात गुंतलेली अति सुज्ञ नागरिक व युवक वर्ग पाहिलं तर भावी पिढी हि फक्त दादा, भाऊ ,नेते म्हणण्यात जाते आणि संध्याकाळी अर्ध्या भाकरी साठी मला-तुला करण्यातच जाते की काय अशी दाट शंका आता वाटू लागली आहे. आपला समाज कसा असावा आणि कसा होता याची प्रचिती आजही आपल्या देशाचं वैभवशाली इतिहास साक्ष देत आहे. सामान्यतः जगात २०० पेक्षा हि जास्त देश असतील पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ज्या देशात राहतो त्या देशाला भूतकाळात जेवढं शौर्य आणि अध्यात्मिक आणि क्रांतिकारक बलिदानाच इतिहास लाभलं आहे तेवढं कोणत्याच देशाला लाभलं नसेल हे सत्य. पण आज ही सांगायला लाज वाटते की आपण आपल्या पाठीमाग कित्येक शतकापासून इतिहास अनुभवतोय पण अनुकरण आणि त्या अनुषंगाने वाटचाल होताना किंवा करताना आज कोणीच दिसत नाहीत. महाराष्ट्र असो किंवा आपला भारत असो कर्मवीर भाऊराव पाटील असो किंवा स्वराज्याचे गादी पुरुष शाहू महाराज असतील, शिक्षणाची गंगा दारोदार पोहोचवत असताना शेण,दगड, माती झेलत ज्ञान गंगेला एक समुद्र बनवणारे फुले कुटुंबीय असतील, जगाला स्वच्छतेचा मंत्र देणारे संत गाडगे बाबा असतील किंवा आपल्या अभंगवाणी तुन जगण्याचं मूलमंत्र पसरवणारे आदर्श संतांच्या पंक्तीतले तुकोबाराय असतील किंवा राजमाता जिजाऊ माँ साहेब असतील किंवा महाराष्ट्र कुलदैवत स्वराज्य निर्मिकार छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा माझं स्वराज्य काही केलं तरी परक्याच्या हातात देणार नाही म्हणून आपल्या शरीराचे अक्षरशा कण कण करून घेऊन बलिदानाच खरं न खडतर स्वरूप जगाला पटवून देणाऱ्या माझ्या शिवपुत्र संभाजी असतील. आणि याबरोबरच कष्ट आणि संघर्षची खरी ठिणगी अंगावर झेलून आपल्या कुटुंबाची लाही लाही झालेली झोळी खांद्यावर घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रातील पदोच्च शिक्षण तज्ञ तथा दिन दलित यांच्या उदार निर्वाह पासून त्यांच्या जगण्याची व आपल्या सर्वांच्या न्याय हक्क आणि खरं स्वातंत्र्य काय शिकवणारे, बॅरिस्टर व त्यागपुरुष,महामानव, बोधिसत्व, राष्ट्रपती पासून सामान्यांपर्यंत एकच कायदा म्हणून जन्म दिलेल्या संविधान रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे आचार आणि विचार आज पोरके होण्याची भीती आपल्यात आहे . विचार करणारा करत जातो आपल्याला काय करायचं आहे म्हणून पण समाजातील प्रत्येकाच्या न्याय हक्क आणि जबाबदारी याचा उदगाथा म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण होणं आज खूप गरजेचं आहे.
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
४ दिवसावर बाबासाहेबांची जयंती येऊ घातली आहे. बाबासाहेबांचे त्याग आणि संघर्ष यात्रा आम्हाला पाहायला आणि त्यांच्या जीवनावर आधारित रेखाटन प्रति अनुकरण झालेलं सर्वांना पाहायला आवडेल. एक किस्सा आठवतो बाबासाहेबांच्या बायोस्कोपी वाचताना लक्षात आली बाबासाहेब एल्फिस्टन शाळेत शिकत असताना सरांनी त्यांना एक फळ्यावरच गणित सोडवायला सांगितलं तेव्हा बाबासाहेब फळ्याकडे जाऊ नये म्हणून सुवर्ण मुलांनी गोंधळ सुरु केला कारण फळ्याच्या पाठीमाग ठेवलेली जेवणाची डबे गलिच्छ होणार हे गलिच्छ विचार बाबासाहेबांना फळ्याकडे जाण्यापासून रोखू लागले. पण सरांनी त्यांना फळ्यापर्यंत जाऊ दिल आणि बाबासाहेबांनी फक्त गणित सोडवल नाही तर आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या जगण्याची आणि हक्काची गणितं संविधानाच्या माध्यमातून सोडवली. आणि त्या वर्गात ते गणित सोडवणारे फक्त एकटे बाबासाहेब होते. या प्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक क्षण जीवन सार्थक करायला पुरेसा असतो. बाबासाहेब इंग्लंड मध्ये असताना त्यांच्या एकूण ४ पुत्रा पैकी शेवटचा पुत्र सुद्धा विधात्याने हिरावून घेतलं आणि ज्या वेळी बाबासाहेब आपल्या अर्धांगिनी जवळ येतात आणि म्हणतात रमा मी तुला काहीच देऊ शकलो नाही. आपलं शेवटचं बाळ सुद्धा देवाने हिरावून घेतलं आपल्या भविष्य बद्दल बाबासाहेबांनी रमाई जवळ आपली खंत व्यक्त करते तेव्हा रमाई म्हणजे आज जर तुम्ही या एका तुमच्या बाळासाठी विचार करत बसला असता तर देशातली अनेक बाळ तुमच्याविना पोरकी झाली असती. हा असतो त्याग म्हणजे हे रमाई च त्याग जगात असं कोणतीच व्यक्ती किंवा महिला आपल्या संसाराच्या गाड्याला बाजूला सारून समाजाचा विचार करणारी भेटणार नाही. पण देणं आणि समाज याची सांगड खूप मोठी आहे यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि ते केलं तर त्याच तराजू उत्तरात नक्कीच चांगल्या फळाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. 
आज समाजात उलट घडत आहे जस लोक आपलं दैवत वाटून घेतलेत त्याच पद्धतीने आपलं-आपलं महापुरुष वाटून घेतलेत क्षमा असावी पण वास्तव आहे आज निळा,भगवा, पांढरा, पिवळा, हिरवा असं प्रत्येक जात आणि धर्माच्या बेड्या घालून घेतलेल्या प्रत्येक समाजाचा असा वेगळा गट, रंग निर्माण होताना दिसतो आहे. प्रत्येक महापुरुषांनी आपल्या आडनाव प्रमाणे आपल्या जातीच्या धर्माच्या नावाखाली सक्षिप्त पद्धतीने विचार पेरले असते किंवा कार्य केले असतं तर आज या स्वातंत्र्याच्या भारतात आपण वावरलो नसतो. मग आपणच का ? वेगवेगळी मोर्चे आणि वेगवेगळी झेंडे जे सत्य आहे जे हक्कच आहे त्यासाठी पूर्ण समाज एक होऊन का पुढं होत नाही...? बाबासाहेबांनी सांगितलं 'शिका'- आम्ही काय शिकलो एकटा पुढं गेलाय आणि त्याच पाय खेचायच शिकलो, एकमेकांच्यात भांडण लावून शांतता भंग करण्याची शिक्षण कला शिकलो. आणि 'संघटित व्हा' - आपण संघटित फक्त मोर्चाला होतो पण इतर वेळी शेजारच्या माणसांना मदत काय ढुंकुनही बघत नाही. आपण संघटित होतो यासाठी कोणत्या माळावर जायचं न कोणती पार्टी करायची किंवा कुणाच्या डोक्यात दगड घालायचं कुणाला मारायचं कसलं मॅटर मिटवायला संघटित होतो, आणि 'संघर्ष करा' - आपण संघर्ष कुणासाठी करतो वो...? ७ वा वेतन आयोग मिळावं म्हणून... पगार वाढ व्हावी म्हणून...? कधी तरी जगाचा पोशिंदा म्हणून फक्त नावाला राहिलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करा ना व्हा ना संघटित.डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. यातूनच आपण बोध घेत समाजाला वेगळ्या पर्वावर उच्च स्तरावर नेण्याचं कर्तव्य आपण करायचं आहे. यासाठी चला आणि पेटून उठा आणि स्वतःमध्ये बदल घडवूया...! 


धन्यवाद...!

Friday, 6 April 2018

जगण्याची जीएसटी...!

शिर्षक: - जगण्यातली जि.एस.टी. 0%

लेखन - एन.के. (पत्रकार)

दि. ०७/०४/२०१८

सकाळी उठलो नेहमी प्रमाणे कंटाळवाण वाटत होत म्हणून असच पडून राहिलो. परत झोपताना आठवलं कि अमुक आणि तमुक कामं राहिलेत आणि त्यासाठी उठायला हवं. उठलो आणि अवरलो दिवस सुरवात झालं कामाच्या दिशेने आगेकुच करत -करत दुपार झाली जेवायला बायको कडून आमंत्रणच फोन झालं. जेवल कस बस आणि परत कामाला जुंपल गेलो. आणि संध्याकाळ झाली काही काम झाली आणि काही झाली नाहीत. त्या कामाच्या पूर्णत्वास पुन्हा आखणी आणि नियोजनात सूर्यदेव गायब झाले न आजच्या वर्तमान तारखेचा दिवस मावळला. अशी दिनचर्या रेखाटली गेली. प्रत्येक जण असं स्वतःसाठी किती दिवस जगणार आहोत..? काय केलं आज स्वतः साठी ...? भविष्याची स्वप्न रंगवत रंगवत आज एक एक दिवस मावळत चालला आहे.  जगायला जरा आता शिकायला पाहिजे का अशी सध्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळ पासून संध्याकाळ पासून नियोजित कामात दिवस गेला अक्खा. याच पद्धतीने फक्त 'कामात' जगणं हे आता सर्वांचं ब्रीद वाक्य झालं आहे जरा स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसासाठी स्मार्ट पद्धतीने जगायला आपण कधी शिकणार...? आपल्या स्वतःची आवड-निवड, आपल्या कुटुंबाचं क्षणिक सही आनंदाचे क्षण आपण कधी 'स्पेन्ड' करवून घेणार...? स्मार्ट सिटी व्हायला लागला पण त्या सिटीतील रहिवाशी मन कधी आपण स्मार्ट करणार...? आहे का उत्तर द्या ना...!!
         राहिला प्रश्न उत्तर नसल्या शिवाय प्रभू पण अडचणी निर्माण करत नाही म्हणे.... अहो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी आहेतच. त्या अडचणींना आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या आणि खंबीर मनाच्या जोरावर चांगलं सणसणीत उत्तर द्यायला शिकूया. चला, आपल्या स्वतःची जबाबदारी स्वीकारत स्मार्टपणे जगायला सुरुवात करूया. बरोबर ना आपल्या आजच्या परिस्थितीला आपण सोबत इतर परिस्थितीला कसं सगळेच जबाबदार आहेत, हे पटवून देण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला. परिस्थितीनं कसा आपला जवळजवळ बळीच घेतलाय, असं सांगत आपण एका कोपऱ्यात पडून एकाच रडगाण्यात अडकून राहिलो तर अवघड आहे. काही वेळा अडचणी आणि दुःखात स्वतःच स्वतःला बिचारं आणि निर्दोष असल्याचं प्रशस्तीपत्र देऊन टाकलं आहे; पण यामुळे मानसिक स्थितीही फारशी बदलणार नाही आणि  प्रगतीही होणार नाही.
     अशा वेळी थोडंसं कटू सत्य दाखविण्याची वेळ असते. कोणत्या परिस्थितीत आपण कोणता मार्ग काढतो, कोणता निर्णय घेतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. अशा वेळी चुकीचे निर्णय घेतले, तर त्याची जबाबदारीही सर्वस्वी आपल्यावर असली पाहिजे. स्वतःचं दुःख कुरवाळून, स्वतःला बिचारं मानून समस्या सुटत नाहीत. म्हणून असली नकारात्मक मानसिक संरक्षण यंत्रणा मोडीत काढलीच पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा माझ्या लेखातून सांगत आलोय पडलेल्या आणि सुखलेल्या फुलात व सुगंध आहे तस आपल्या जगण्यावर निर्बंध आहेत ना जीएसटी आहे. जगा ना स्वच्छन्द.

   धन्यवाद....!

Thursday, 5 April 2018

एन.के.लिहतात - ऑनलाइन-बिनलाईन

शिर्षक : अनमोल नात्यांची जपणूक होतेय आता फक्त ऑनलाइनवर...?

लेखन : एन.के.
दि. ०५/०३/२०१८

पाहिलं आयुष्याकडे तर वाटत या संसारात अनेक नाती आणि अनेक चेहरे वेगवेगळ्या रंग छटानी बनलेले आहेत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन जुन्या चेहऱ्यापाठीमाग एक नात्याची ओळख लपलेली असते. सकाळ पासून झोपेपर्यंत अनेक नाती आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतात. या सगळ्या चेहऱ्यांना वेगवेगळी नाव आणि नातं असलेल्या या जाळ्यात चांगली आणि वाईट सुद्धा असतात तेवढंच नव्हे तर रक्त नात्यापासून मनाची नाती याबरोबर महत्वाची नाती सुद्धा असतात. आज "शॉर्टकट कम ग्रेट" म्हणून संपर्क आपला मोजका आणि कामपूरत बनत चालल आहे. आई बाबा आज्जी आजोबा ताई दादा काका काकूंची नाती आता मॉडर्न आणि ब्रिटिश राजवटीच्या उदा. ममा-पप्पा, अंकल, ब्रदर, आंटीने घेतलीत. सकाळचा चहा घेताना पारलेने आता गुडडे ने घेतलं असं महत्वाची नाती आता जपली जातात ती फक्त एक १० आकड्याच्या नंबरने फोन झालं की बोलणं झालं आणि मेसेज झालं की आपला उद्देश पोहोचल गेलं अशी संक्षिप्त वृत्ती माणसाची झालीय.
आज नातवाला खेळवायला आजोबा बाहेर येत नाहीत कारण नातवाला त्या व्हिडीओ गेम मध्ये सगळं दिसत अंगण, माया न प्रेम, आज बायकोला हिरव्या मिरच्यांचा ठेचा ऐवजी बाहेरची तंदुरी रोटी रुचकर लागते. अशा गोड सकाळी सगळी बसून स्वतःबद्दल चर्चा करत हवं ते खायला हवं ते मागायला आज कुणाकडे वेळ नाही. मोठ्या आवडीने एखाद्या कार्यक्रमात भेटलो तर चर्चा फक्त माझं घड्याळ, माझं हे न माझं ते न माझी साडी न माझी गाडी यातच आपलं घर जाऊन फक्त भिंतीची माडी उरलीय हे उमजेना झालय. आज संध्याकाळ आणि सकाळ आपली फक्त एका ग्रुप आणि मेसेज मध्ये जातो कधी निवांत चंद्राच्या सावली आई वडिलांच्या मांडीवर बसून इतिहासाची पाने चाळताना आता कोण दिसत नाही. अचानक का होईना पण येणारा पाहुणा आणि त्याच आनंद आता मावळत चालला आहे. फोन वरून येणं सांगितलं जातं न तो येणार आहे म्हणून केलेलं ऍडजस्ट म्हणजे जिंदगी का...? कधी तरी मनमोकळं पणाने सरप्राईज द्या. कधीतरी वाढदिवस नसताना पण घरातले खातील म्हणून केक आणून अचानक फक्त घरगुती वाढदिवस आपल्या आई वडिलांच्या आनंदाचा आपल्या माणसाच्या आनंदाचा दिवस म्हणून साजरा करा ना. फक्त सेलफोन यातच माझं सौख्य सामावल आहे अशी प्रतिज्ञा नको व्हायला. वेळ न मेळ घालून आपल्या सोबत आपल्यासारख वागुया चला. येताय ना.

- धन्यवाद

Tuesday, 3 April 2018

ब्लॅक अँड व्हाइट रेखाटलेले आयुष्याचं रंगीत चित्र...

शिर्षक :- विनारंग विना पेन्सिल रेखाटलेलं; रंगीत आयुष्याचं चित्रं ...

आयुष्याची पाने आता अजीर्ण झालेत, फळं पण पिकायला आलेत म्हणून हरलो असं नाही समजायचं,
पण हे जिंदगीच चित्र रुपी झाडं उभं करायला जगण्यातल्या बॉक्स मधलं किती रंग सामान वापरलं गेलं हे जगल्याशिवाय कसं समजायचं...? ...१

धडपडत धडपडत उभं राहायचं म्हणून ऍडजस्ट करत जगत आलो पण मन भरलं नाही,
यशाची शिखरे कोसो दूर वाटतात म्हणून घुडगे टेकायची नसतात कारण शिखरावर सगळं तुमचं आहे सोबत दिशा दाही...! ...२

१०० जण सांगतात म्हणून १०० रस्ते जगण्याचे शोधायचं नाही आयुष्याचा खरा रस्ता स्वतः चं निवडायचं असत,
कारण वाटाड्या जरी भेटला तरी मुक्कामाला आपल्या सोबत कोण नसत म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवत पुढं जायचं असत...!   ...३

तुमच्या न आमच्या जीवनाला कवी कधी न कसं रेखाटील सांगता येत नाही पण शब्द आणि भावनांची सांगड घालणे अवघड असते,
जेव्हा सत्य झाकून खोटं गावभर हिंडून येत तेव्हा आपली खरी परीक्षा सुरु होत असते म्हणून मनानं जागे व्हायचं आणि स्वतः मार्ग काढत जिंकायचं असत...! ...४

शब्दांना जोड शब्दाची मिळते तेव्हा कविता बनते पण त्यात रंग आणि ढंग आपणच भरायचं असत,
कविता करणे सोपे असते पण मनाच्या पलीकडे जाऊन शब्दांची माळ बनवताना सुई टोचऊन न घेता सुगंध पेरायच असत...! ...५


म्हणून विनारंग विना पेन्सिल रेखाटलेलं; रंगीत आयुष्याचं चित्रं नेहमी मनापासून बनवायचं असत...!


लेखन : एन.के (पत्रकार)

दि. ०३ एप्रिल २०१८

Sunday, 1 April 2018

या लाईफ सुंदर बनवूया...!

शीर्षक- लाईफ मधलं बोअर आणि सायलन्टपणा दूर करून जिंदगीचे रियल शिल्पकार स्वतः बना...

लेखक - एन.के. (पत्रकार)

मो.- ८८०६६०५८५२

जगतो आपण म्हणजे काय करतो हो ? २४ तासाची वेळ मारून नेणे म्हणजे जिंदगी का हो ? नक्कीच नाही. प्रत्येक क्षणाला जगात असताना आनंदाचे क्षण कॅप्चर आणि दुःखाचे क्षण डिलिट करत राहणे म्हणजे जगणे, असच आपल्या आयुष्याची बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर चला कमला लागा....!  सकाळी उठा आणि प्रत्येक क्षणाला अनुभवा म्हणजे जगणं समझेल नक्की करायचं काय आहे जीवन म्हणजे मोबाईल समझु पण मोबाईल सारखं व्हायला नको ; याची काळजी घ्या..! सकाळची सुर्य किरणे जशी ताजी-तवानी असतात तस सुरुवात करा... रात्रभर बघितलेल्या स्वप्नाच्या रिव्हिजन करताना चांगल्याच पठण करा आणि वाईटाचा रस्ता रिसायकल बिन ठरवा...! चांगलं या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि वाटचाल ठरला कि मग पाऊले हलके करत एक सुन्दर जीवनाच्या गाण्याची प्ले- लिस्ट करा, अडचणी येत असतात सामोरे जायला शिका म्हणजे काय करायचं- स्व-परीने हाताळायचं सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करा...!
    "जिने के है चार दिन बाकी है बेकार दिन..." म्हणून चार दिवसात आयुष्य आणि त्यातलं जगणं आणि जगण्यातला आनंद आणि आनंदातून मिळवतात आलेली नावलौकिकता पूर्ण क्षमतेने जपण्याचा एक जिगरी प्रयत्न करा ; तुम्ही कितीही कोणासाठी जीवाचं रं केलं तरी ते कुठं ना कुठं कमी पडतच ना म्हणून म्हणतो स्वतः पेक्षा इतरांना कधी जास्त इज्जत देऊ नका कारण मी पण कुठं तरी वाचलं आहे की *"सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर हिंडून आलेलं असत...!"* म्हणून आपल्याला सुरवात गवसते का नाही यापेक्षा आपल्याला काय करायचे आणि त्यासाठी आपल्याला पायाभरणी कोणत्या स्वरूपाची करायला हवं हे महत्त्वाचं. ज्या माणसामध्ये ठायी सत्य,पावित्र्य आणि निस्वार्थ पणा ठासून भरला आहे त्याला जगातली कोणतीच व्यक्ती आणि शक्ती हरवू शकत नाही. नशिबाच्या कटपुतलीला दोष देत बसू नका कारण तुमच्या दोन्ही *"म"* (मनगट आणि मन) यांत जो पर्यंत समार्थ्यच भक्कम विचार आणि सकारात्मक रस्त्याची जाळी आहे तो पर्यंत तुम्हाला अपयशाची झुळूक सुद्धा लागणार नाही असच संघर्षाची सीडी चढत राहा यशाची किल्ली आणि तिजोरी काही कालांतराने तुमच्या पुढ्यात असेल.  आयुष्यात असच असत तापवून ठोके दिल्याशिवाय हत्यार बनत नाही तस कष्ट केल्याशिवाय यशश्री प्राप्त होत नाही...! चला मग कामला लागा जिओ जी भरके...!


 धन्यवाद...!💐

मैत्रीत तूच महत्वाची मला....!

मैत्रीच्या स्नेहबंधात तुझी स्पंदने...

प्रत्येक पावलावर तुझ्या मैत्रीची जाणीव घट्ट आहे,
तुझ्या स्नेहाची किरणे आज ही माझ्यात प्रकाशमय आहे,
क्षणिक मैत्री कधी जमली नाही,
 नातं दोन मानाचं जोडलं आहे घटिकभरासाठी हे बंध नाही...!

भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी तुझी हि मैत्री,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी तुझी हि मैत्री,

अगदीच निराळी आपली मैत्री..
निराळा तो व्हाट्स अप कट्टा..
रोजच आम्ही भेटतो...!
आजही तसेच भेटू..
तिथेच भेटू..!

     लेखन- एन.के. (पत्रकार)

नोटबंदी आणि प्रशासन = सध्य परिस्थिती.

शीर्षक :- म्हशीचे वर्षश्राद्ध...

लेखन :- एन.के.(पत्रकार)

"हर हर मोदी,घर घर मोदी", "छत्रपतींचा आशिर्वाद" आणि "सबका साथ सबका विकास" या सगळ्या ब्रीद वाक्यांचा अभ्यास केला तर नक्कीच विकास दर वाढलाय, काळा पैसा बाहेर आलाय का वेगवेगळ्या समर्थक आणि वेगवेगळ्या विरोधकांची त्यांच्या त्यांच्या लेखनातून समर्थन आणि विरोध व्यक्त झाला असेल पण या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून आज शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला का...? "विकास" सुधरलाय आता इतका कि या डिजिटल संकल्पेतून कंप्युटर वरून ज्वारी आणि बाजरीची पेरनीही झाली आहे. नोटबंदी करून वर्ष झालं सगळी कडे विकासाच्या मुद्द्यावर माझंही वाचन झालं विविध क्षेत्रातून विविध मतांच्या विविध मुद्देही पडताळून झाले असे खालील काही प्रश्न पडले न ते लेखनाच्या माध्यमातून दृष्टीक्षेपात आणायचं ठरवलं *(कितीही पटण्यासारख लिहलं तरीही विरोधकांना विरोध करायला पाहिजेच कारण जनतेपेक्षा झेंडा महत्वाचं)* चला तर वर्ष पूर्तीनंतर मला पडलेले काही प्रश्न-  आज ग्रामीण भागात सकाळी उठून बैलजोडी घेऊन शेतात जाणाऱ्या माणसाला GST चा फायदा किती झाला,
महिन्याला संपणाऱ्या गॅस टाकीला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या बापाला आता ९६/- जास्त मोजावे लागणार आहेत कारण देश बदलतोय त्यामुळे सामान्यांनी ९६/- वर्गनिस्वरूपात सर्वांनी हुकमावरून भरायचे आहेत, क्रूड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३८% नी स्वस्त झालं असून तेल आपल्याला कमी किमतीत मिळण्या ऐवजी अधिक रकमेत मिळत आहे याचा उद्देश एवढंच कि आपण वाहन घेऊन प्रदूषण करता आणि भविष्यकाळात वाढीव किमतीमूळ आपण सायकल वर प्रवास करून प्रदूषणाला आळा बसवणारे महान महामेरू होणार आहात, ६० वर्षात काँग्रेस ने घोटाळे वर घोटाळे केले आणि देशावर पावणे तीन लाख हजार कोटींचे कर्जाचा डोंगर उभा केला आहे आणि त्याला हटवण्यासाठी माझ्या "मा.पंतप्रधान साहेबानी" अवघ्या ३ वर्षात साडेसात लाख हजार रुपयांचे कर्ज देशावर निर्माण केले आहेत कोणी काही म्हणु नका कारण देश बदलतोय डिजिटल इंडिया होतोय पुढच्या काही दिवसात घरात बसून पेरणी आणि online मेट्रोने खते आणायला आपण जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकणी जाणार आहोत... घाबरू नका कर्ज काढून आपल्या मुलाबाळांना शिकवा कारण शेतामध्ये कोपऱ्यात बांधावर पुस्तक ठेऊन पेरणी आणि शेतीची मशागत करताना पाहायला मदतीची होणार आहेत आता पर्यंत १५ लाख लोकांच्या नोकऱ्या तर गेलेत पण सरकारी नोकर भरती बंद झाल्यावर या शिक्षणाचा शेतात उपयोग होईल, सरकारी योजना काय आहेत ते नीट समजून घ्या कारण जाहिरातीतून आपल्याला बोध मिळणार आहे त्याची माहिती मिळणार आहे आणि तुम्ही 'लाभार्थी' होणार आहात ज्या पद्धतीने त्या आजोबांचं आणि आज्जींच फोटो छापला गेला तसं तुमचं कोणी अचानक फोटो वैगरे काढून नेलं तर भिऊ नका आपण त्यांच्या जाहिरातीचे लाभार्थी असणार आहात कारण कोट्यवधी रुपय जाहिरात करण्यासाठी शासन देत आहे, आणि आपला संसार भविष्य काळात सुख आणि समृद्धीचा होणार आहे जर घरखर्चासाठी पैसे कमी पडत असतील तर शेती करायला पैसे नसतील घाबरू नका प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रु येणार आहेत आणि लवकरच विकास दर ७% वरून २.४ वर आलाय लवकरच तुमच्या पर्यंत पोहचेल सगळीकडे विकास भक्कम होतोय आणि प्रगती हरवली आहे शोधाच्या ताणावमध्ये कर्ज बाजरी न होता बिनधास्त राहा आत्महत्या वैगरे करू नका कारण सरकार ने सर्वात मोठी कर्जमाफी केलीय आणि आपण सगळे त्याचे "लाभार्थी" आहोत जाता जाता एक उदाहरणं देतो जनतेला आणि काहींना पटेल न पटेल पण वाचा "दूध दाखवून माशीला राखायला लावणारं मालकी सिस्टीम..."
 उदा. त्याच्या गोठ्यातली म्हैस फार मारकी होती, दिसेल त्या गोष्टीला म्हैस ढुसण्या मारायची म्हणून गोठ्यातल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या त्यामुळे गोठा कायम अस्वच्छ दिसायचा. गोठा असा पाहून मालक सालगड्याला नेहमी त्याच्या अप्रामाणीकते साठी शिव्या घालायचा आणी कोण्या पाहुण्याला गोठ्याची ही परिस्थिती दिसू नये म्हणून मालक गोठा नेहमी झाकून (अपारदर्शी) ठेवायचा.
ह्यावर जालीम उपाय म्हणून एक दिवस सालगड्याने म्हैसच मारून टाकली, आता गोठा कायम स्वच्छ दिसायला लागला, मालकाचेही सालगड्याला शिव्या देणे बंद झाले, गोठा स्वच्छ असल्यामुळे आता मालक गोठा पारदर्शी ठेवू लागला होता. पण म्हैस मारल्यामुळे मालकाच्या मुलांना दूध मिळेनासे झाले म्हणून मुलं रडू लागली पण सालगडी महा चतुर, त्याने म्हैस मारल्यामुळे मालकाला चामडे मिळाले हा किती मोठा फायदा आहे हे पटवून देणे चालू केले.. ईकडे उपाशी पोरांना हेच कळेनासे झालेय कि दूध महत्वाचे की म्हशीचे चामडे..!!

महिला : स्वातंत्र्य आणि कर्तव्य...? (ज्वलंत प्रश्न)


शिर्षक:-  महीला कर्तव्याच्या विळख्यामुळं पारतंत्र्यात

दि. ३०/०६/२०१७

लेखक - एन. के.

आधुनिकतेच्या काळात वावरताना महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात परिणामी ५०% आरक्षणाच्या नावाखाली महिलांना सुद्धा आता आरक्षण, हवं तर स्पेस म्हणून त्यांना मिळत आहे. आणि आज महिला अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत.
देशात महिलांचे स्थान, स्थिती पाहून तुम्ही देशाची स्थिती सांगू शकता. भारतालाही मोठी प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना आदिम काळापासून पुजनीय ठिकाणी ठेवले आहे. मात्र आजच्या घटना पाहता यावर संशय येतो. दिल्ली बलात्कारानंतर महिला अत्याचाराविरूद्ध उघड चर्चा आणि आंदोलने झाली. तेव्हापासून यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना पुर्णपणे थांबल्या नाहीत मात्र समाजाने, शासनाने याबद्दल विचार केला यातच थोडे यथ आहे.
महिलांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांनी ग्रामीण व शहरी विकासाच्या विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे आजची स्त्री ही चूल आणि मूल या पुरातन म्हणीनुसार तेवढयापुरतीच मर्यादित न राहता ती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून पुरुषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे. त्यामुळे आजची महिला ही केवळ महिला राहिली नसून ती सक्षम अशी सबला स्त्री बनली आहे.
‘स्वयंविकासाबरोबरच समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा तसे वातावरण तयार करणे म्हणजे महिला सक्षमीकरण’ अशी सर्वसाधारण व्याख्या मान्यवरांनी येथे केली आहे. या व्याख्येप्रमाणे वातावरण, अधिकार अजूनही महिलांना मिळत नाहीत, मात्र त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमे, पोलीस, न्यायालय, समाज, स्वयंसेवी संस्था यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
समाज सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत आहे. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे, त्यांच्या अधिकारांकडे, व्यक्तिस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजूनही संकुचितच आहे. तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे प्रश्न मांडणारे, त्यावर उपाय सुचविणारे, उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देणारे महिलांप्रमाणेच पुरुषही आहेतच, हे वास्तव असूनही ही वैचारिकता समाजातील काहीच पुरुषांमध्ये असल्याचे आढळते. अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलायची असल्यास महिला सक्षमीकरणाची चळवळ ही तळागाळापर्यंत पोहोचलीच पाहिजे.
चूल आणि मूल’ ही एक चौकट आहे, स्त्रीजीवनाची. स्त्रीचे आयुष्य या चौकटीतच वावरत, ती शिक्षित असो वा नसो. ती ही तिची सगळी कर्तव्य बिनभोबाटपणे बजावत असते, प्रसंगी त्याग तर तिच्या पाचवीलाच पूजलेला..
स्त्री जगत जाते तिचं आयुष्य , जे तिच अस काहीच नसत. चूल आणि मूल ही गोष्ट सोपी नाही, हे फक्त एक स्त्रीच जाणते. ती स्वतःच अस्तित्व पणाला लावून एक जीव जन्माला घालते, अन या जीवसृष्टीचे चक्र चालू राहावे यासाठी सिहांचा वाटा उचलते.
ती चूल सांभाळते, घरातल्या माणसांची काळजी घेणं, त्यांना हवं नको ते बघण, मुलांना वाढवणं, त्यांच्यावर सुसंस्कार करणं. ती चूल आणि मूल सांभाळता सांभाळता एक नवी पिढी घडवत असते.
हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यात ‘ती’ कुठे असते?…. तिच्या इच्छा, तिची स्वप्न एका मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त असतात, आणि त्या बंदिस्त कोपऱ्याची दार कधीच उघडत नाही.. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढते, पण तिची चूल आणि मूल चौकट ती कधीच सोडत नाही, खरतर कधी सुटतच नाही.
चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री म्हणजे ‘सदासर्वदा ग्राह्य’ धरली जाणारी एक व्यक्ती असते, तीच अस्तित्व असूनही कधीच जाणवत नसत.  अस सगळं असेल तर, ‘चूल आणि मूल’ हे एका स्त्री साठी वरदान कस असेल? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला पडणारच. स्त्री निसर्गतः च सहनशील असते, तर चूल आणि मूल ही तिच्या सहनशीलतेची कसोटी ठरू शकते, वरदान नाही….
स्त्रीने ‘चूल आणि मूल’ सांभाळणं हे वरदान आहे, निसर्गासाठी ज्याचे जीवनचक्र तिच्यामुळे पुढे सरकते.., वरदान आहे, त्या प्रत्येक घरासाठी ज्याचा कमावता भले एक पुरुष असेल, त्या पुरुषासाठी, कारण त्याच्या घराची भविष्यकालीन पिढी ती घडवत असते, अगदी समर्पित भावनेने..!

एकूण एक सांगायचं झालं तर महिलाना एक असा व्यासपीठ उपलब्ध असावं कि जेणेकरून निर्णायक जीवनाच्या चांगल्या रिझल्ट साठी निर्णय तरी मनमोकळ्या पणाने घेण्यासाठी असं एक स्वातंत्र्य असावं यासाठी जुन्या रूढी आणि परपंरांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेवटचे उपाय असतील.


   धन्यवाद...! 

समस्यावर मार्ग हेच जीवनाचं यश...!

🔘 समस्या नाहीत असा मानव नाही आणि उपाय नाहीत असं आयुष्य नाही... 🔘

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार होत असतात पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पथदर्शक फलक नसलं तरी एखादा पादचारी आपल्यासाठी देवाने ठेवलं आहे म्हणून फक्त प्रत्येकाचा सल्ला घेऊ नका विचारात्मक गोष्ट म्हणून मनात घेऊन पाऊल उचला म्हणजे यशाला सुद्धा तुमचंच पदर दिसेल वाचता वाचता एक गोष्ट आठवली... एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!

हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!

जस पौर्णिमेला चंद्र आहे आणि त्याला डाग आहेत तस अमावश्याला भयाण काळोख दिली आहे तस प्रत्येकात देवाने चांगलं-वाईटची मेमरिकार्ड दिलेल आहे फक्त आपल्याकडं कशाचा संग्रह आहे त्यावरून वाटचाल करताना आपण कुठं तर चुकतो मग नशिबाला दोष देत बसतो...

💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!

✍🏼 एक सुंदर विचार👌🏼

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!

     .... त्यामुळे

   ☄Be Positive☄,,,

    - तुमचा एन.के. ( पत्रकार )

उसंत हवं आहे जीवाला...!



शीर्षक - अ(महत्वाच्या) व्यापात व्यस्थ असलेली "आपली" माणसं
लेखक - एन.के. (पत्रकार)
मोबा.- ८८०६६०५८५२
आधुनिक जग आणि मानवी जीवनातील वेग याचा संगनमताने विचार केला तर दोन्हीला गती आहे. या गतिमान जीवनात आपण कितपत आपल्या माणसासोबत वेळ घालवतो ? आपल्या माणसासोबत व्यक्तिशः कित्ती संलग्न राहतो किंचितच ना...? आपलं आयुष्य जगताना काही जणांना असा पण एक प्रचित भास होत असेल का हो बघा ना- तेल संपलेल्या पणतीची वात वाढवून, फाटलेल्या पतंगाला ढील देऊन, सुकलेल्या ओढ्यात खड्डा खणून, सगळं करून झालं,यश काही येईना म्हणून नशिबाला डोष देत आपण आपलं आयुष्य जगत असतो काहीदा बोलायला वाईट वाटत ओ पण जगामध्ये इतकी मानस कमावली पण कुणाकडे २ मिनिटे बोलायला वेळ नाही आज मी थांबलो तर माझा काळ वाईट होईन म्हणून खोटी ऊर्मी अंगात आणून माणूस असा आत्मविश्वास घेऊन जगतोय ते पण सांगू का...- मी थांबणार नाही,थांबून चालणार नाही, अजुनही मुजलेल्या विहिरीवर मोट बांधायची आहे,संपलेल्या पारायणात टाळ वाजवायचे आहेत,रिकाम्या देवळाला फेर्‍या घालायच्या आहेत,एवढं सगळं करायचं आहे. म्हणून आपलं आयुष्य वेशीला टांगून घ्यायचं आणि कधीतरी आपणच विचार करत बसायचं व्यस्त व्यस्त व्यस्त झालोय... ! काहीच्या काहीच सुचत नाही... !
आम्हाला सुद्धा आता कळेना झालाय राव माणसाशी प्रेमानं वागावं का रागानं माणसांना आठवण काढून फोन केला तर इतकं बोलतात कि जगाची सगळी काम यांनाच दिलेत त्यांचं तर काय प्रत्येकाच्या घरातलं सुरवात पण असंच झालाय त्याला तर कोण काय करणार एका कुटुंबातलं (शिक्षीत) - एका बायको आणि नावाऱ्यातलं संभाषण साधारणतः - अरे सकाळी उठल्या उठल्या WhatsApp messages बघण्यापेक्षा पिल्लुला जरा ब्रश करवतोस का ? मी जरा चहाच बघते.” हल्ली आमची सकाळ ही  WhatsApp messages बघुनच होते आणि बहुदा आमच्यासारखीचअनेक जणांची सुद्धा होत  असावी.
        गडद काळोख्या रात्री जस आकाश ताऱ्यांनी गच्च भरलेल बघितल की मनाला तृप्ताता वाटते अगदी तशीच भावना जेव्हा आपला फोन messages नी तुडुंब भरलेला असतो तेव्हा दाटून येतात. मनात कुठेतरी आनंदच   झालेला  असतो. खरतर आपल्या कामाची अशी मोजकीच messages असतात..बाकी सगळी लग्नात आलेल्या साडीसारखी forwaded आणि कदाचित यापूर्वीही बर्‍याच वेळा आलेली .
हेच आणि इतकंच एका सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्ती,महिला,युवक आणि युवतीच्या मतानुसार आयुष्य आहे. मग एखाद्याला वेळ द्यायचा आणि काढायचा म्हटलं तर कुठून येणार ? सांगा ना आहे का उत्तर...?
       हे पण खरं आहे जाता जाता सांगू वाटलं आणि माझ्या मते तुमच्या-आमच्या आयुष्यात येणार प्रत्येक नातं हे तुम्हाला काही ना काही देऊनच जात. फक्त तुम्ही त्यातून काय घेता . काय शिकता हे महत्वाचं. सहवासात येणारे सगळेच हे सोफेस्टीकेटेड , सुशिक्षित आणि सन्माननीय कुटुंबातील असतातच अस नाही किंबहुना अशा लोकांपेक्षा बहुतांशी वेळेला साधी सरळ पण माणुसकी असलेली लोकच तुम्हाला श्रीमंत करून जातात . म्हणून सर्वांनी व्यस्त राहा पण आपल्या या शब्दातली ताकद ओळखून त्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेळ काढायला शिका म्हणजे तुम्ही शिकलेल्याला अर्थ आहे. मग मला फक्त आणि फक्त Albert  Einstein  च्या ओळी  आठवल्या “I  fear  the  day technology will surpass our human interaction .The world will  have a generation of idiots . ”

     धन्यवाद...!

नेता आणि कार्यकर्ता कसा असावा...?


शिर्षक:- मी कार्यकर्ता म्हणून कुठं आहे...

दि. - ०६/०७/२०१७

लेखक : एन.के. (दै. संकेत टाइम्स)

    समाजात आम्ही राहतो तुम्हीही राहता बालपण सहजचं आडावर,नदीवर,शेतात,झाडावर कधी संपून जात कळत नाही. १०  वी ला आल्यावर अभ्यासाची एक चाकोर मनातून जाते आणि आपण स्वतःला प्रौढ बनल्यासारखं आव आणून एका लाक्षणिक घटनांतून प्रवास सुरु होतो. कॉलेजच्या दिवसात स्टँडवर बॅनर बघून दादा,नेते,राजे या उपमा आपल्या सभोवतालच्या गल्लीतल्या हिरोला द्यायला मोकळे होतो. बालपणी असं काही नव्हतं जागच्या जागी असलेल्या गल्ली बोळातल्या म्होरक्या आणि दादा तिथंच होता ना... फक्त आपल्यात बदल घडतो तो म्हणजे आपल्याला उमजत असलेल्या वॉर्डचा शब्दोच्चार प्रभाग असा होतो मग आपण एखाद्या नेत्याच्या पाठीमाग कट्टर कार्यकर्ता म्हणवत हिंडायला लागतो. स्वतःला आरशात १०० दा बघत केसांवरून हात फिरवत आपण एखाद्या गावच्या कट्ट्यावर पायावर पाय टाकून बसलो कि काय रुबाब राव सांगायला नको. आणि हळू हळू एका निवडणुकीत याच्या पाठीमाग ४ दिवस आणि पुढच्या निवडणुकीत ४ दिवस यांच्या पाठीमाग हिंडून येतो मग स्वतःला एक खंभीर कार्यकर्ता म्हणवत स्वतःच्या लहानशा मिशीला ताव देत हिंडतो.
    एक कार्यकर्ता म्हणून जगताना स्वतःची घुसमट होता काम नये या पद्धतीने जगा म्हणजे एका अशा ठिकाणी तुमचं नेतृत्व असायला हवं ज्या ठिकाणी तुम्हाला एक संघ प्रशासक आणि एकीकडे पाईक म्हणून जगताना तुमची भूमिका योग्य आणि काटेकोरपणे निभावली गेली पाहिजे म्हणजे समाजात आपण एखाद्याचा कार्यकर्ता म्हणून अल्प परिचित असलो तरी त्या जनतेच्या कार्याला हातभार लावता आला पाहिजे इतकं सक्षम आणि त्या नेत्याला आपला शब्द म्हणजे जनतेची हाक आणि आपलं कर्तव्य इतकं काहीसं आठवलं पाहिजे इतक सक्षम दृष्टिकोन ठेऊन कार्यकर्ता बना. एखाद्या नेत्यांसाठी आपण दिवस रात्र झटतो आणि त्याला विजयश्री प्रदान करून देतो आणि ज्यावेळी या निवडणुका चालू असतात त्यावेळी या चिन्ह वाल्यांनी त्या चिन्हवाल्याशी घेतलेली दुश्मनी पाहाता म्हणजे या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यासोबत तुरळक पण दुश्मनी असते त्यात आपला शेजारी पण असतो लक्षात घ्या. पण कालांतराने सत्तेच्या हव्यसापोटी राजकर्ते आपला चिन्ह बदलतात पण आपलं काय ? आपण ज्या वेळी भांडलेलो आता एक व्हायचं कस...? चला त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून जायचं का पाठीमाग ? अशी द्विधा मनस्थिती प्रत्येकाच होतं मग प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं काम काय आहे हे शुद्धा अनेक वेळा माहित नसते... समाजातल्या लोकांना एक चांगल्या नेत्यांची महत्व पटवून देऊन त्या महत्वाचा समरस राहून जनतेची काम करून देणे आणि रात्र दिवस मदतीला धावून जाण म्हणजेच कार्यकर्ता..!
   ...अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख बनवायची असेल तर नक्कीच एका झेंड्याखाली राहा भलेही ध्वजारोहण करणारा माणूस बदलला तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा "भगव्याच्या" छायेत राहून गावाकडच्या निवडणुकीत काँग्रेस वाल्याकडून माझ्याकडं इतकी कार्यकर्ते आहेत,मतदान आहेत म्हणून मलिदा मागणारा नेता नसावा, सेनेनंतर "घडाळ्याच्या" वेळेनुसार चालायचं पण वेळ पडली तर "कमळाला" सलाम करायचं म्हणजे सगळीकडं बट्ट्याबोळ कार्यकर्ते करायच काय असं कधीही करू नका एका कट्टर कार्यकर्त्याच्या मानसिकतेला धक्का पोहचेल असं कधीच करू नका...हे बघा तुम्ही कितीही नेता किंवा युवा राजकर्ता असाल तरीही तुम्ही तेवढ्या वेळेपर्यंत शाबूत आहात जो पर्यंत एक तुमचा कार्यकर्ता तुमच्या चांगुल्पनाची सु-सुमने गाणारा म्हणून आहे... ज्यावेळी तुम्ही त्याला रेल्वेच्या डब्यासारखं एकदा इंजिन-धनुष्य-घड्याळ-कमळ असं प्रवास घडवत असाल तर सावध राहा तुमच्या हातून समाजाचं हित कधीच होऊ शकत नाही. ज्या नेत्याला एका घरचं पाईक होता येत नाही तो काय समाजाचं हित करेल... वेळ गेलेली नाही अजूनही सुधारा जे आपल्याला चांगल्याची धडे द्यायचे तेच "धड" आहेत का बघा...! चुकलं असेल तर क्षमस्व...!


   धन्यवाद...! 

वणवण पाल्याची______!!

शासनाची हि योजना बनेल वाड्या वस्तीवरील पाल्याना आडकाठी - वाड्या वस्तीवरील  विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणार पायपीट व वणवण पालकातून नाराजी

 - एन.के. (पत्रकार)

अनुक्रमे शासनाने नव्याने घेतलेल्या शाळा बंदीचा निर्णय म्हणजे चक्क चुकीची ठरते का काय अशी भीती निर्माण झाली आहे. आज पर्यंत वर्षानुवर्षे कमी पटसंख्या असून सुद्धा आपल्या पाल्याला जवळच्या शाळेत घालून त्याची पायपीट कमी करणे, आणि शिक्षण हे शेवटी विद्येचे एक अनुभवी पात्र म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला शाळेच्या दर्जा असो वा गुणवत्ता ऐवजी शिक्षणाचं दार आणि व्यासपीठ म्हणून या शाळांकडे पहिले परंतु शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा जनतेतून असंतोष निर्माण होत आहे. जि प शाळा यांच्या पटसंख्या कमी म्हणून या शाळा मुख्य शाळांना जोडण्याचे काम शासन करणार आहे... देशात शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गाव तिथे शाळा,वाडी-वस्ती तिथे शाळा या योजनेचे स्वागत या अगोदर झाले आणि परिणामी सीमाभागातील कन्नड शाळा बंद पडून मराठी शाळेकडे निश्चितच कौल वाढला होता आणि या शासनाच्या निर्णयाने पाल्याची शिक्षणासाठी वणवण होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्वरूपाच्या या शाळा शासनाने जर बंद केल्या तर अनेक मुलं आपल्या शिक्षणासाठी गावातील शाळेपर्यंत पोहचण्यासाठी जर साधन उपलब्ध नसेल किंवा बालवयात शिक्षणाच्या दारापर्यंत पाल्याला पोहचवणे जर पालकांना जमले नाही तर ते पुढं पाल्य शिक्षण घेईल...? किंवा पालक पाठवतील...? आणि याचा परिणाम म्हणून शिक्षण या संज्ञेपासून कितीजण वंचित राहतील...? किती पाल्यांचे नुकसान होईल...? वेळोवेळी शिक्षकांच्या मूल्यमानापाच्या परीक्षा ? कन्नड शाळा पूर्वतत सुरु करण्याची मागणी तर वाढणार नाही ना...? ऐपत परीक्षण इ. मुळे अगोदरच शिक्षकांच्या मानगुटीवर टांगती तलवार बनलेल्या प्रश्नात या शाळा बंदीच भूत नव्याने... यातून शासनाला काय साध्य करायचे आहे सीमाभागातील कन्नड शाळेकडे नक्की कौल वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षक कमी म्हणून शाळा संकुचिकरणाचे काम शासन करणार आहे म्हणजे त्या पाल्याला आणि शिक्षकाला नवखं व्यासपीठ देऊन गोंधळात टाकण्याची हि भूमिका किती सकारात्मक बरोबर किती स्वीकारा योग्य वेळ आणि भाविष्यचं ठरवेल.

धन्यवाद...!