Thursday, 19 April 2018

Come On Lets Go For Change...! (चला बदल घडवायला..)

शिर्षक:- एका सकारात्मक गोष्टीची सुरवात...लेटस गो फॉर चेंज..!!

लेखन- पत्रकार एन.के.

दि. २०-०४-२०१८

अनेकांच्या काळ्या आणि भगव्या झेंडा किंवा इतर रंगाच्या आणि डीपी ठेऊन झाल्या असतील तर मनापासून आभार मानावे मनातून राग व्यक्त करून हवं ते बरं वाईट बोलून टाकावं. प्रत्येकांनी आपापल्या परीने फक्त व्यक्त व्हावं म्हणून किंवा वाटलं मनाला म्हणून श्रद्धांजली वाहून झाली असेलचं यात शंका नको हो ना... कधी आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक घटना घडतात तेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येकांनी बघ्याची भूमिका घेताना आपल्या चामड्याला जरा चिमटून बघत जावा. प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईटची सुरवातही एका ठिणगीने होत असते. सामाजिक भान ठेवून जगताना समाज काय म्हणेल किंवा समाजात माझी प्रतिमा अप आणि डाऊन होईल का म्हणून प्रेक्षक बनून किती दिवस असं स्वतःला गुदमरून घेणार आहात ...? आवाज काढणे आणि आवाज उठवणे कधी जमणार आहे आपल्याला ? आज प्रत्येक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, अन्याय होत चालल्या आहेत शासन आणि प्रशासन हतबल होत आहे की चक्क प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या नेत्यांच्या हातून असं सावरसावरीच गाठोडं बाहेर निघावं इतकं अक्षम्य कर्तृत्वपुढं आम्ही तर काय करणार म्हणून बांधलेल्या हाताला आपण आपल्या एकजूट आणि ठिणगीतून हळू हळू वणवा कधी बनणार आहोत वो ...? साधारण विचार करताना मी अमुक रंगाचा मी तमुक रंगाचा म्हणून किती दिवस नो इंटर फेअरच्या बोर्ड खाली सापडून मरणार आहोत. विचार करा ना कधी तरी आपण आपल्या परीने योग्य सुटसुटीत विचारधारा घेऊन आसपासच्या सामाजिक भान बिघडवणाऱ्या किंवा संस्कृती लोप पावणाऱ्या कृत्याला आपण आळा घालू शकतो. स्वतः पेटून उठून दुसऱ्याची अन्यायी प्रवृत्ती कधी संपवायला पुढं सरसवणार आहोत..?
आज जगताना आपण अनेक लहान सहान गोष्टीत नाक का खुपसायच म्हणून गप्प बसायचो पण आता सार्वत्रिक घडत असलेल्या मार्मिक गोष्टीवर आपण कॅडल घेऊन उभं राहतो. आणि जेणेकरून कसे का होईना त्या अन्यायाच्या प्रति आपल्यात चीड निर्माण होते आहे म्हणजे एक सुरवात आहे की अपल्यातलं शमलेले मन आणि रक्त आता रुळावर यायला लागली आहे. मग आपण काय करू शकतो अनेकांना प्रश्न पडला असेल नक्की सांगतो सामान्य जीवन जगणारं आपण आहोत समजून चला कि दिल्ली, कोपर्डी नंतर असिफा नंतर आपल्या आस पास कुठं तरी ही घटना आज ना उद्या घडेल का असा भयनाक विचार मनात आणून बघा वाईट वाटत आना चीड येते न... यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल उचलू शकतो.


चित्रपटात आणि इतरत्र स्त्री देहाच हिडीस दर्शन घडविणाऱ्या स्त्रिया आणि संबंधित मंडळी ह्याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे. (मराठी असो वा हिंदी ) आयटम गाणी ह्याचा अर्थ कळतो का ? पुरेसे कपडे न घालता नक्की कुणाच मनोरंजन केल जात ? ज्या समाजाचे ते घटक आहेत त्या समाजाप्रती त्यांची काहीच जबाबदारी नाही का ? जर ती त्यांना कळत नसेल तर त्यांना त्याची जाणीव करून द्या..ज्या स्त्रिया ह्या गोष्टी करतात जे करवून घेतात त्यांना कुठलीच झळ पोहोचत नाही बळी जातात निष्पाप निरागस मुली आया बहिणीची अब्रू आणि नको त्या गोष्टीचे कृत्य आणि जेवढे झाकले पाहिजे अशा वर आपला डोळा वळतो आहे आणि अशा अंगाचा लचका आणि त्यानंतर अमानुष पणे खून त्यानंतर कँडल मौन, निषेध, काळे डीपी ,काळे झेंडे, निदर्शने का पाहिजे असलं ? मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टी या अगोदर संपन्न नव्हती का ? कमाई हा एकमवव उद्देशाने आपल्यावर लादलेल्या या मुन्नी, आणि शिळा आजच्या शिलतेला आणि चारित्र्याचा काळिमा हवं असं नाही वाटत का ? आपण अशा पद्धतीवर बंधन अनु शकतो चित्रपट पाहायचं नाही ज्यात आयटम सॉंग आहे. का विचार बद्लनार नाही ...? शुद्ध चित्रपट आशय घेऊन आला तर नक्कीच १०० तली १० टाळकी सुधारली म्हणजे आपण सफल झालो. निदान आता तरी ज्या मुली ह्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत त्याचं त्याच्या कुटुंबियांच दुखः समजून घ्या. ती मुलगी जितकी असुरक्षित होती तितकीच आपल्या कुटुंबातील स्त्री पण आहे ह्याचा विचार करा...दुसर्याच्या पेटलेल्या घराची झळ आपल्याही घराला बसू शकते...वाढणार्या विकृतींना आळा घाला..! असच घडत चालल्या व गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या त्याचा निषेध प्रत्येक माध्यमाने केला आहे. मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते अशी की ह्या गोष्टीच्या निषेधामध्ये स्त्रियाइतकाच पुरुषांनी दिलेला आपला सहभाग, मत सगळच त्यांच्याविषयी आदर निर्माण करणार आहे मग इथे वयाचा भाग तितकासा महत्वाचा नाही. जे घडत आहे ते चुकीच आहे हे कळण हीच एक चांगल्या समाजाची नांदी आहे. हा एक आशेचा किरण आहे..
निसर्गाच्या प्रत्येक घटकाला सुखाने जगण्याचा हक्क आहे त्याच्या त्या हक्काचा आदर प्रत्येकाने ठेवायला हवा. जग आणि जगू द्या .कुणाच्याही यातनांच कारण होऊ नका. होईल तितका आनंद सुख वाटण्याचा प्रयत्न करा हीच सदिच्छा...! एक चांगला विचार आपल्याला समाज आणि त्यानंतर गाव आणि असं वर्क दिवस चांगला देश म्हणून घडवण्याच्या विचारात आपण आहोत.


धन्यवाद...!

No comments:

Post a Comment