Sunday, 1 April 2018

महिला : स्वातंत्र्य आणि कर्तव्य...? (ज्वलंत प्रश्न)


शिर्षक:-  महीला कर्तव्याच्या विळख्यामुळं पारतंत्र्यात

दि. ३०/०६/२०१७

लेखक - एन. के.

आधुनिकतेच्या काळात वावरताना महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात परिणामी ५०% आरक्षणाच्या नावाखाली महिलांना सुद्धा आता आरक्षण, हवं तर स्पेस म्हणून त्यांना मिळत आहे. आणि आज महिला अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत.
देशात महिलांचे स्थान, स्थिती पाहून तुम्ही देशाची स्थिती सांगू शकता. भारतालाही मोठी प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना आदिम काळापासून पुजनीय ठिकाणी ठेवले आहे. मात्र आजच्या घटना पाहता यावर संशय येतो. दिल्ली बलात्कारानंतर महिला अत्याचाराविरूद्ध उघड चर्चा आणि आंदोलने झाली. तेव्हापासून यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना पुर्णपणे थांबल्या नाहीत मात्र समाजाने, शासनाने याबद्दल विचार केला यातच थोडे यथ आहे.
महिलांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. बचतगटाच्या माध्यमातून तर महिलांनी ग्रामीण व शहरी विकासाच्या विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे आजची स्त्री ही चूल आणि मूल या पुरातन म्हणीनुसार तेवढयापुरतीच मर्यादित न राहता ती आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून पुरुषापेक्षा काकणभर सरसच ठरत आहे. त्यामुळे आजची महिला ही केवळ महिला राहिली नसून ती सक्षम अशी सबला स्त्री बनली आहे.
‘स्वयंविकासाबरोबरच समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा तसे वातावरण तयार करणे म्हणजे महिला सक्षमीकरण’ अशी सर्वसाधारण व्याख्या मान्यवरांनी येथे केली आहे. या व्याख्येप्रमाणे वातावरण, अधिकार अजूनही महिलांना मिळत नाहीत, मात्र त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमे, पोलीस, न्यायालय, समाज, स्वयंसेवी संस्था यांच्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
समाज सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत आहे. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे, त्यांच्या अधिकारांकडे, व्यक्तिस्वातंत्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजूनही संकुचितच आहे. तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हे प्रश्न मांडणारे, त्यावर उपाय सुचविणारे, उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देणारे महिलांप्रमाणेच पुरुषही आहेतच, हे वास्तव असूनही ही वैचारिकता समाजातील काहीच पुरुषांमध्ये असल्याचे आढळते. अधिकार गाजवणारी पुरुषी मानसिकता बदलायची असल्यास महिला सक्षमीकरणाची चळवळ ही तळागाळापर्यंत पोहोचलीच पाहिजे.
चूल आणि मूल’ ही एक चौकट आहे, स्त्रीजीवनाची. स्त्रीचे आयुष्य या चौकटीतच वावरत, ती शिक्षित असो वा नसो. ती ही तिची सगळी कर्तव्य बिनभोबाटपणे बजावत असते, प्रसंगी त्याग तर तिच्या पाचवीलाच पूजलेला..
स्त्री जगत जाते तिचं आयुष्य , जे तिच अस काहीच नसत. चूल आणि मूल ही गोष्ट सोपी नाही, हे फक्त एक स्त्रीच जाणते. ती स्वतःच अस्तित्व पणाला लावून एक जीव जन्माला घालते, अन या जीवसृष्टीचे चक्र चालू राहावे यासाठी सिहांचा वाटा उचलते.
ती चूल सांभाळते, घरातल्या माणसांची काळजी घेणं, त्यांना हवं नको ते बघण, मुलांना वाढवणं, त्यांच्यावर सुसंस्कार करणं. ती चूल आणि मूल सांभाळता सांभाळता एक नवी पिढी घडवत असते.
हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यात ‘ती’ कुठे असते?…. तिच्या इच्छा, तिची स्वप्न एका मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त असतात, आणि त्या बंदिस्त कोपऱ्याची दार कधीच उघडत नाही.. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढते, पण तिची चूल आणि मूल चौकट ती कधीच सोडत नाही, खरतर कधी सुटतच नाही.
चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री म्हणजे ‘सदासर्वदा ग्राह्य’ धरली जाणारी एक व्यक्ती असते, तीच अस्तित्व असूनही कधीच जाणवत नसत.  अस सगळं असेल तर, ‘चूल आणि मूल’ हे एका स्त्री साठी वरदान कस असेल? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला पडणारच. स्त्री निसर्गतः च सहनशील असते, तर चूल आणि मूल ही तिच्या सहनशीलतेची कसोटी ठरू शकते, वरदान नाही….
स्त्रीने ‘चूल आणि मूल’ सांभाळणं हे वरदान आहे, निसर्गासाठी ज्याचे जीवनचक्र तिच्यामुळे पुढे सरकते.., वरदान आहे, त्या प्रत्येक घरासाठी ज्याचा कमावता भले एक पुरुष असेल, त्या पुरुषासाठी, कारण त्याच्या घराची भविष्यकालीन पिढी ती घडवत असते, अगदी समर्पित भावनेने..!

एकूण एक सांगायचं झालं तर महिलाना एक असा व्यासपीठ उपलब्ध असावं कि जेणेकरून निर्णायक जीवनाच्या चांगल्या रिझल्ट साठी निर्णय तरी मनमोकळ्या पणाने घेण्यासाठी असं एक स्वातंत्र्य असावं यासाठी जुन्या रूढी आणि परपंरांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेवटचे उपाय असतील.


   धन्यवाद...! 

No comments:

Post a Comment