शिर्षक :- विनारंग विना पेन्सिल रेखाटलेलं; रंगीत आयुष्याचं चित्रं ...
आयुष्याची पाने आता अजीर्ण झालेत, फळं पण पिकायला आलेत म्हणून हरलो असं नाही समजायचं,
पण हे जिंदगीच चित्र रुपी झाडं उभं करायला जगण्यातल्या बॉक्स मधलं किती रंग सामान वापरलं गेलं हे जगल्याशिवाय कसं समजायचं...? ...१
धडपडत धडपडत उभं राहायचं म्हणून ऍडजस्ट करत जगत आलो पण मन भरलं नाही,
यशाची शिखरे कोसो दूर वाटतात म्हणून घुडगे टेकायची नसतात कारण शिखरावर सगळं तुमचं आहे सोबत दिशा दाही...! ...२
१०० जण सांगतात म्हणून १०० रस्ते जगण्याचे शोधायचं नाही आयुष्याचा खरा रस्ता स्वतः चं निवडायचं असत,
कारण वाटाड्या जरी भेटला तरी मुक्कामाला आपल्या सोबत कोण नसत म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवत पुढं जायचं असत...! ...३
तुमच्या न आमच्या जीवनाला कवी कधी न कसं रेखाटील सांगता येत नाही पण शब्द आणि भावनांची सांगड घालणे अवघड असते,
जेव्हा सत्य झाकून खोटं गावभर हिंडून येत तेव्हा आपली खरी परीक्षा सुरु होत असते म्हणून मनानं जागे व्हायचं आणि स्वतः मार्ग काढत जिंकायचं असत...! ...४
शब्दांना जोड शब्दाची मिळते तेव्हा कविता बनते पण त्यात रंग आणि ढंग आपणच भरायचं असत,
कविता करणे सोपे असते पण मनाच्या पलीकडे जाऊन शब्दांची माळ बनवताना सुई टोचऊन न घेता सुगंध पेरायच असत...! ...५
म्हणून विनारंग विना पेन्सिल रेखाटलेलं; रंगीत आयुष्याचं चित्रं नेहमी मनापासून बनवायचं असत...!
लेखन : एन.के (पत्रकार)
दि. ०३ एप्रिल २०१८
आयुष्याची पाने आता अजीर्ण झालेत, फळं पण पिकायला आलेत म्हणून हरलो असं नाही समजायचं,
पण हे जिंदगीच चित्र रुपी झाडं उभं करायला जगण्यातल्या बॉक्स मधलं किती रंग सामान वापरलं गेलं हे जगल्याशिवाय कसं समजायचं...? ...१
धडपडत धडपडत उभं राहायचं म्हणून ऍडजस्ट करत जगत आलो पण मन भरलं नाही,
यशाची शिखरे कोसो दूर वाटतात म्हणून घुडगे टेकायची नसतात कारण शिखरावर सगळं तुमचं आहे सोबत दिशा दाही...! ...२
१०० जण सांगतात म्हणून १०० रस्ते जगण्याचे शोधायचं नाही आयुष्याचा खरा रस्ता स्वतः चं निवडायचं असत,
कारण वाटाड्या जरी भेटला तरी मुक्कामाला आपल्या सोबत कोण नसत म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवत पुढं जायचं असत...! ...३
तुमच्या न आमच्या जीवनाला कवी कधी न कसं रेखाटील सांगता येत नाही पण शब्द आणि भावनांची सांगड घालणे अवघड असते,
जेव्हा सत्य झाकून खोटं गावभर हिंडून येत तेव्हा आपली खरी परीक्षा सुरु होत असते म्हणून मनानं जागे व्हायचं आणि स्वतः मार्ग काढत जिंकायचं असत...! ...४
शब्दांना जोड शब्दाची मिळते तेव्हा कविता बनते पण त्यात रंग आणि ढंग आपणच भरायचं असत,
कविता करणे सोपे असते पण मनाच्या पलीकडे जाऊन शब्दांची माळ बनवताना सुई टोचऊन न घेता सुगंध पेरायच असत...! ...५
म्हणून विनारंग विना पेन्सिल रेखाटलेलं; रंगीत आयुष्याचं चित्रं नेहमी मनापासून बनवायचं असत...!
लेखन : एन.के (पत्रकार)
दि. ०३ एप्रिल २०१८
No comments:
Post a Comment