दि. - ०६/०७/२०१७
लेखक : एन.के. (दै. संकेत टाइम्स)
समाजात आम्ही राहतो तुम्हीही राहता बालपण सहजचं आडावर,नदीवर,शेतात,झाडावर कधी संपून जात कळत नाही. १० वी ला आल्यावर अभ्यासाची एक चाकोर मनातून जाते आणि आपण स्वतःला प्रौढ बनल्यासारखं आव आणून एका लाक्षणिक घटनांतून प्रवास सुरु होतो. कॉलेजच्या दिवसात स्टँडवर बॅनर बघून दादा,नेते,राजे या उपमा आपल्या सभोवतालच्या गल्लीतल्या हिरोला द्यायला मोकळे होतो. बालपणी असं काही नव्हतं जागच्या जागी असलेल्या गल्ली बोळातल्या म्होरक्या आणि दादा तिथंच होता ना... फक्त आपल्यात बदल घडतो तो म्हणजे आपल्याला उमजत असलेल्या वॉर्डचा शब्दोच्चार प्रभाग असा होतो मग आपण एखाद्या नेत्याच्या पाठीमाग कट्टर कार्यकर्ता म्हणवत हिंडायला लागतो. स्वतःला आरशात १०० दा बघत केसांवरून हात फिरवत आपण एखाद्या गावच्या कट्ट्यावर पायावर पाय टाकून बसलो कि काय रुबाब राव सांगायला नको. आणि हळू हळू एका निवडणुकीत याच्या पाठीमाग ४ दिवस आणि पुढच्या निवडणुकीत ४ दिवस यांच्या पाठीमाग हिंडून येतो मग स्वतःला एक खंभीर कार्यकर्ता म्हणवत स्वतःच्या लहानशा मिशीला ताव देत हिंडतो.
एक कार्यकर्ता म्हणून जगताना स्वतःची घुसमट होता काम नये या पद्धतीने जगा म्हणजे एका अशा ठिकाणी तुमचं नेतृत्व असायला हवं ज्या ठिकाणी तुम्हाला एक संघ प्रशासक आणि एकीकडे पाईक म्हणून जगताना तुमची भूमिका योग्य आणि काटेकोरपणे निभावली गेली पाहिजे म्हणजे समाजात आपण एखाद्याचा कार्यकर्ता म्हणून अल्प परिचित असलो तरी त्या जनतेच्या कार्याला हातभार लावता आला पाहिजे इतकं सक्षम आणि त्या नेत्याला आपला शब्द म्हणजे जनतेची हाक आणि आपलं कर्तव्य इतकं काहीसं आठवलं पाहिजे इतक सक्षम दृष्टिकोन ठेऊन कार्यकर्ता बना. एखाद्या नेत्यांसाठी आपण दिवस रात्र झटतो आणि त्याला विजयश्री प्रदान करून देतो आणि ज्यावेळी या निवडणुका चालू असतात त्यावेळी या चिन्ह वाल्यांनी त्या चिन्हवाल्याशी घेतलेली दुश्मनी पाहाता म्हणजे या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यासोबत तुरळक पण दुश्मनी असते त्यात आपला शेजारी पण असतो लक्षात घ्या. पण कालांतराने सत्तेच्या हव्यसापोटी राजकर्ते आपला चिन्ह बदलतात पण आपलं काय ? आपण ज्या वेळी भांडलेलो आता एक व्हायचं कस...? चला त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून जायचं का पाठीमाग ? अशी द्विधा मनस्थिती प्रत्येकाच होतं मग प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं काम काय आहे हे शुद्धा अनेक वेळा माहित नसते... समाजातल्या लोकांना एक चांगल्या नेत्यांची महत्व पटवून देऊन त्या महत्वाचा समरस राहून जनतेची काम करून देणे आणि रात्र दिवस मदतीला धावून जाण म्हणजेच कार्यकर्ता..!
...अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख बनवायची असेल तर नक्कीच एका झेंड्याखाली राहा भलेही ध्वजारोहण करणारा माणूस बदलला तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा "भगव्याच्या" छायेत राहून गावाकडच्या निवडणुकीत काँग्रेस वाल्याकडून माझ्याकडं इतकी कार्यकर्ते आहेत,मतदान आहेत म्हणून मलिदा मागणारा नेता नसावा, सेनेनंतर "घडाळ्याच्या" वेळेनुसार चालायचं पण वेळ पडली तर "कमळाला" सलाम करायचं म्हणजे सगळीकडं बट्ट्याबोळ कार्यकर्ते करायच काय असं कधीही करू नका एका कट्टर कार्यकर्त्याच्या मानसिकतेला धक्का पोहचेल असं कधीच करू नका...हे बघा तुम्ही कितीही नेता किंवा युवा राजकर्ता असाल तरीही तुम्ही तेवढ्या वेळेपर्यंत शाबूत आहात जो पर्यंत एक तुमचा कार्यकर्ता तुमच्या चांगुल्पनाची सु-सुमने गाणारा म्हणून आहे... ज्यावेळी तुम्ही त्याला रेल्वेच्या डब्यासारखं एकदा इंजिन-धनुष्य-घड्याळ-कमळ असं प्रवास घडवत असाल तर सावध राहा तुमच्या हातून समाजाचं हित कधीच होऊ शकत नाही. ज्या नेत्याला एका घरचं पाईक होता येत नाही तो काय समाजाचं हित करेल... वेळ गेलेली नाही अजूनही सुधारा जे आपल्याला चांगल्याची धडे द्यायचे तेच "धड" आहेत का बघा...! चुकलं असेल तर क्षमस्व...!
धन्यवाद...!
No comments:
Post a Comment