Monday, 9 April 2018

बाबासाहेबांच्या विचारांची गरज...!

शिर्षक :- "बाबासाहेब तुमच्या विचारांची गरज आहे या वेगवेगळ्या रंगाच्या समाजाला...!"

लेखन- पत्रकार एन.के.

दि.१० एप्रिल २०१८

समाज अनेक गोष्टींनी पुढारलेला आहे. समाजात विविध कल्पक आणि आधुनिक समुग्रीच्या माध्यमातून "शॉर्टकट ए जिंदगी" चा फंडा आता फॅशन बनत चालला आहे. समाजात पाहताना अनेक जात,धर्म,पंथ च्या झेंड्याखाली वावरताना आज मनुष्य दिसतो आहे. जगायला लागणार अर्ध भाकरी पेक्षा माझं न आपलं हेच आजच्या जनरेशनला काहीसं महत्वाचं वाटू लागलं आहे. अंधश्रद्धेच्या चितेवरून माणसाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला इतिहासरूपी महापुरुषांनी दिलेल्या मूलमंत्राचा विसर आज समाजाला पडत चालला आहे. ज्या समाजात क्रांतीची मशाल निर्माण झाली त्या समाजात आज महापुरुषांच्या इतिहास आणि शौर्याच्या गाथा आज आम्हाला गळा फाडून सांगाव्या लागतात. इतका समाज शिकला आणि संघर्ष करू लागला तो फक्त आपल्या रोजच्या आणि दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गोष्टींच्या भौतिक सुखाच्या वस्तू किंवा कागद कमावण्याच्या कामात. आजही माझ्या समाजात समान न्याय व्यवस्था असताना सुद्धा बलात्कार करणाऱ्या आरोपीला महिनो न महिने फुकटच बिर्याणी खायला घालणारी आपली न्याय व्यवस्था पाहता आजही लोचारीच बोध झाल्याशिवाय राहत नाही. आणि आजही अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आजही जातीपातीच्या राजकारणात गुंतलेली अति सुज्ञ नागरिक व युवक वर्ग पाहिलं तर भावी पिढी हि फक्त दादा, भाऊ ,नेते म्हणण्यात जाते आणि संध्याकाळी अर्ध्या भाकरी साठी मला-तुला करण्यातच जाते की काय अशी दाट शंका आता वाटू लागली आहे. आपला समाज कसा असावा आणि कसा होता याची प्रचिती आजही आपल्या देशाचं वैभवशाली इतिहास साक्ष देत आहे. सामान्यतः जगात २०० पेक्षा हि जास्त देश असतील पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ज्या देशात राहतो त्या देशाला भूतकाळात जेवढं शौर्य आणि अध्यात्मिक आणि क्रांतिकारक बलिदानाच इतिहास लाभलं आहे तेवढं कोणत्याच देशाला लाभलं नसेल हे सत्य. पण आज ही सांगायला लाज वाटते की आपण आपल्या पाठीमाग कित्येक शतकापासून इतिहास अनुभवतोय पण अनुकरण आणि त्या अनुषंगाने वाटचाल होताना किंवा करताना आज कोणीच दिसत नाहीत. महाराष्ट्र असो किंवा आपला भारत असो कर्मवीर भाऊराव पाटील असो किंवा स्वराज्याचे गादी पुरुष शाहू महाराज असतील, शिक्षणाची गंगा दारोदार पोहोचवत असताना शेण,दगड, माती झेलत ज्ञान गंगेला एक समुद्र बनवणारे फुले कुटुंबीय असतील, जगाला स्वच्छतेचा मंत्र देणारे संत गाडगे बाबा असतील किंवा आपल्या अभंगवाणी तुन जगण्याचं मूलमंत्र पसरवणारे आदर्श संतांच्या पंक्तीतले तुकोबाराय असतील किंवा राजमाता जिजाऊ माँ साहेब असतील किंवा महाराष्ट्र कुलदैवत स्वराज्य निर्मिकार छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा माझं स्वराज्य काही केलं तरी परक्याच्या हातात देणार नाही म्हणून आपल्या शरीराचे अक्षरशा कण कण करून घेऊन बलिदानाच खरं न खडतर स्वरूप जगाला पटवून देणाऱ्या माझ्या शिवपुत्र संभाजी असतील. आणि याबरोबरच कष्ट आणि संघर्षची खरी ठिणगी अंगावर झेलून आपल्या कुटुंबाची लाही लाही झालेली झोळी खांद्यावर घेऊन शिक्षणाच्या क्षेत्रातील पदोच्च शिक्षण तज्ञ तथा दिन दलित यांच्या उदार निर्वाह पासून त्यांच्या जगण्याची व आपल्या सर्वांच्या न्याय हक्क आणि खरं स्वातंत्र्य काय शिकवणारे, बॅरिस्टर व त्यागपुरुष,महामानव, बोधिसत्व, राष्ट्रपती पासून सामान्यांपर्यंत एकच कायदा म्हणून जन्म दिलेल्या संविधान रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे आचार आणि विचार आज पोरके होण्याची भीती आपल्यात आहे . विचार करणारा करत जातो आपल्याला काय करायचं आहे म्हणून पण समाजातील प्रत्येकाच्या न्याय हक्क आणि जबाबदारी याचा उदगाथा म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण होणं आज खूप गरजेचं आहे.
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
४ दिवसावर बाबासाहेबांची जयंती येऊ घातली आहे. बाबासाहेबांचे त्याग आणि संघर्ष यात्रा आम्हाला पाहायला आणि त्यांच्या जीवनावर आधारित रेखाटन प्रति अनुकरण झालेलं सर्वांना पाहायला आवडेल. एक किस्सा आठवतो बाबासाहेबांच्या बायोस्कोपी वाचताना लक्षात आली बाबासाहेब एल्फिस्टन शाळेत शिकत असताना सरांनी त्यांना एक फळ्यावरच गणित सोडवायला सांगितलं तेव्हा बाबासाहेब फळ्याकडे जाऊ नये म्हणून सुवर्ण मुलांनी गोंधळ सुरु केला कारण फळ्याच्या पाठीमाग ठेवलेली जेवणाची डबे गलिच्छ होणार हे गलिच्छ विचार बाबासाहेबांना फळ्याकडे जाण्यापासून रोखू लागले. पण सरांनी त्यांना फळ्यापर्यंत जाऊ दिल आणि बाबासाहेबांनी फक्त गणित सोडवल नाही तर आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या जगण्याची आणि हक्काची गणितं संविधानाच्या माध्यमातून सोडवली. आणि त्या वर्गात ते गणित सोडवणारे फक्त एकटे बाबासाहेब होते. या प्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक क्षण जीवन सार्थक करायला पुरेसा असतो. बाबासाहेब इंग्लंड मध्ये असताना त्यांच्या एकूण ४ पुत्रा पैकी शेवटचा पुत्र सुद्धा विधात्याने हिरावून घेतलं आणि ज्या वेळी बाबासाहेब आपल्या अर्धांगिनी जवळ येतात आणि म्हणतात रमा मी तुला काहीच देऊ शकलो नाही. आपलं शेवटचं बाळ सुद्धा देवाने हिरावून घेतलं आपल्या भविष्य बद्दल बाबासाहेबांनी रमाई जवळ आपली खंत व्यक्त करते तेव्हा रमाई म्हणजे आज जर तुम्ही या एका तुमच्या बाळासाठी विचार करत बसला असता तर देशातली अनेक बाळ तुमच्याविना पोरकी झाली असती. हा असतो त्याग म्हणजे हे रमाई च त्याग जगात असं कोणतीच व्यक्ती किंवा महिला आपल्या संसाराच्या गाड्याला बाजूला सारून समाजाचा विचार करणारी भेटणार नाही. पण देणं आणि समाज याची सांगड खूप मोठी आहे यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि ते केलं तर त्याच तराजू उत्तरात नक्कीच चांगल्या फळाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. 
आज समाजात उलट घडत आहे जस लोक आपलं दैवत वाटून घेतलेत त्याच पद्धतीने आपलं-आपलं महापुरुष वाटून घेतलेत क्षमा असावी पण वास्तव आहे आज निळा,भगवा, पांढरा, पिवळा, हिरवा असं प्रत्येक जात आणि धर्माच्या बेड्या घालून घेतलेल्या प्रत्येक समाजाचा असा वेगळा गट, रंग निर्माण होताना दिसतो आहे. प्रत्येक महापुरुषांनी आपल्या आडनाव प्रमाणे आपल्या जातीच्या धर्माच्या नावाखाली सक्षिप्त पद्धतीने विचार पेरले असते किंवा कार्य केले असतं तर आज या स्वातंत्र्याच्या भारतात आपण वावरलो नसतो. मग आपणच का ? वेगवेगळी मोर्चे आणि वेगवेगळी झेंडे जे सत्य आहे जे हक्कच आहे त्यासाठी पूर्ण समाज एक होऊन का पुढं होत नाही...? बाबासाहेबांनी सांगितलं 'शिका'- आम्ही काय शिकलो एकटा पुढं गेलाय आणि त्याच पाय खेचायच शिकलो, एकमेकांच्यात भांडण लावून शांतता भंग करण्याची शिक्षण कला शिकलो. आणि 'संघटित व्हा' - आपण संघटित फक्त मोर्चाला होतो पण इतर वेळी शेजारच्या माणसांना मदत काय ढुंकुनही बघत नाही. आपण संघटित होतो यासाठी कोणत्या माळावर जायचं न कोणती पार्टी करायची किंवा कुणाच्या डोक्यात दगड घालायचं कुणाला मारायचं कसलं मॅटर मिटवायला संघटित होतो, आणि 'संघर्ष करा' - आपण संघर्ष कुणासाठी करतो वो...? ७ वा वेतन आयोग मिळावं म्हणून... पगार वाढ व्हावी म्हणून...? कधी तरी जगाचा पोशिंदा म्हणून फक्त नावाला राहिलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करा ना व्हा ना संघटित.डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. यातूनच आपण बोध घेत समाजाला वेगळ्या पर्वावर उच्च स्तरावर नेण्याचं कर्तव्य आपण करायचं आहे. यासाठी चला आणि पेटून उठा आणि स्वतःमध्ये बदल घडवूया...! 


धन्यवाद...!

No comments:

Post a Comment