Sunday, 1 April 2018

नोटबंदी आणि प्रशासन = सध्य परिस्थिती.

शीर्षक :- म्हशीचे वर्षश्राद्ध...

लेखन :- एन.के.(पत्रकार)

"हर हर मोदी,घर घर मोदी", "छत्रपतींचा आशिर्वाद" आणि "सबका साथ सबका विकास" या सगळ्या ब्रीद वाक्यांचा अभ्यास केला तर नक्कीच विकास दर वाढलाय, काळा पैसा बाहेर आलाय का वेगवेगळ्या समर्थक आणि वेगवेगळ्या विरोधकांची त्यांच्या त्यांच्या लेखनातून समर्थन आणि विरोध व्यक्त झाला असेल पण या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून आज शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला का...? "विकास" सुधरलाय आता इतका कि या डिजिटल संकल्पेतून कंप्युटर वरून ज्वारी आणि बाजरीची पेरनीही झाली आहे. नोटबंदी करून वर्ष झालं सगळी कडे विकासाच्या मुद्द्यावर माझंही वाचन झालं विविध क्षेत्रातून विविध मतांच्या विविध मुद्देही पडताळून झाले असे खालील काही प्रश्न पडले न ते लेखनाच्या माध्यमातून दृष्टीक्षेपात आणायचं ठरवलं *(कितीही पटण्यासारख लिहलं तरीही विरोधकांना विरोध करायला पाहिजेच कारण जनतेपेक्षा झेंडा महत्वाचं)* चला तर वर्ष पूर्तीनंतर मला पडलेले काही प्रश्न-  आज ग्रामीण भागात सकाळी उठून बैलजोडी घेऊन शेतात जाणाऱ्या माणसाला GST चा फायदा किती झाला,
महिन्याला संपणाऱ्या गॅस टाकीला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या बापाला आता ९६/- जास्त मोजावे लागणार आहेत कारण देश बदलतोय त्यामुळे सामान्यांनी ९६/- वर्गनिस्वरूपात सर्वांनी हुकमावरून भरायचे आहेत, क्रूड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३८% नी स्वस्त झालं असून तेल आपल्याला कमी किमतीत मिळण्या ऐवजी अधिक रकमेत मिळत आहे याचा उद्देश एवढंच कि आपण वाहन घेऊन प्रदूषण करता आणि भविष्यकाळात वाढीव किमतीमूळ आपण सायकल वर प्रवास करून प्रदूषणाला आळा बसवणारे महान महामेरू होणार आहात, ६० वर्षात काँग्रेस ने घोटाळे वर घोटाळे केले आणि देशावर पावणे तीन लाख हजार कोटींचे कर्जाचा डोंगर उभा केला आहे आणि त्याला हटवण्यासाठी माझ्या "मा.पंतप्रधान साहेबानी" अवघ्या ३ वर्षात साडेसात लाख हजार रुपयांचे कर्ज देशावर निर्माण केले आहेत कोणी काही म्हणु नका कारण देश बदलतोय डिजिटल इंडिया होतोय पुढच्या काही दिवसात घरात बसून पेरणी आणि online मेट्रोने खते आणायला आपण जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकणी जाणार आहोत... घाबरू नका कर्ज काढून आपल्या मुलाबाळांना शिकवा कारण शेतामध्ये कोपऱ्यात बांधावर पुस्तक ठेऊन पेरणी आणि शेतीची मशागत करताना पाहायला मदतीची होणार आहेत आता पर्यंत १५ लाख लोकांच्या नोकऱ्या तर गेलेत पण सरकारी नोकर भरती बंद झाल्यावर या शिक्षणाचा शेतात उपयोग होईल, सरकारी योजना काय आहेत ते नीट समजून घ्या कारण जाहिरातीतून आपल्याला बोध मिळणार आहे त्याची माहिती मिळणार आहे आणि तुम्ही 'लाभार्थी' होणार आहात ज्या पद्धतीने त्या आजोबांचं आणि आज्जींच फोटो छापला गेला तसं तुमचं कोणी अचानक फोटो वैगरे काढून नेलं तर भिऊ नका आपण त्यांच्या जाहिरातीचे लाभार्थी असणार आहात कारण कोट्यवधी रुपय जाहिरात करण्यासाठी शासन देत आहे, आणि आपला संसार भविष्य काळात सुख आणि समृद्धीचा होणार आहे जर घरखर्चासाठी पैसे कमी पडत असतील तर शेती करायला पैसे नसतील घाबरू नका प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रु येणार आहेत आणि लवकरच विकास दर ७% वरून २.४ वर आलाय लवकरच तुमच्या पर्यंत पोहचेल सगळीकडे विकास भक्कम होतोय आणि प्रगती हरवली आहे शोधाच्या ताणावमध्ये कर्ज बाजरी न होता बिनधास्त राहा आत्महत्या वैगरे करू नका कारण सरकार ने सर्वात मोठी कर्जमाफी केलीय आणि आपण सगळे त्याचे "लाभार्थी" आहोत जाता जाता एक उदाहरणं देतो जनतेला आणि काहींना पटेल न पटेल पण वाचा "दूध दाखवून माशीला राखायला लावणारं मालकी सिस्टीम..."
 उदा. त्याच्या गोठ्यातली म्हैस फार मारकी होती, दिसेल त्या गोष्टीला म्हैस ढुसण्या मारायची म्हणून गोठ्यातल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या त्यामुळे गोठा कायम अस्वच्छ दिसायचा. गोठा असा पाहून मालक सालगड्याला नेहमी त्याच्या अप्रामाणीकते साठी शिव्या घालायचा आणी कोण्या पाहुण्याला गोठ्याची ही परिस्थिती दिसू नये म्हणून मालक गोठा नेहमी झाकून (अपारदर्शी) ठेवायचा.
ह्यावर जालीम उपाय म्हणून एक दिवस सालगड्याने म्हैसच मारून टाकली, आता गोठा कायम स्वच्छ दिसायला लागला, मालकाचेही सालगड्याला शिव्या देणे बंद झाले, गोठा स्वच्छ असल्यामुळे आता मालक गोठा पारदर्शी ठेवू लागला होता. पण म्हैस मारल्यामुळे मालकाच्या मुलांना दूध मिळेनासे झाले म्हणून मुलं रडू लागली पण सालगडी महा चतुर, त्याने म्हैस मारल्यामुळे मालकाला चामडे मिळाले हा किती मोठा फायदा आहे हे पटवून देणे चालू केले.. ईकडे उपाशी पोरांना हेच कळेनासे झालेय कि दूध महत्वाचे की म्हशीचे चामडे..!!

No comments:

Post a Comment